Did you like the article?

Showing posts with label Rome. Show all posts
Showing posts with label Rome. Show all posts

Tuesday, January 17, 2023

 Mother Teresa 

 Mother Teresa Home in Panjim, Goa is located at an important junction, connecting the 18th June Road and the road leading to St. Inez. St. Don Bosco School which is located nearby is an important landmark to help a visitor to find the Home for the Aged and Destitute run by the Missionaries of Charity sisters.

Many years back in late 1970s, I was a frequent visitor to this institution along with my Jesuits-run Loyola Hall pre-novitiate colleagues. We pre-novices who were also studying in Miramar-based Dhempe College offered our services to give regular hair-cuts to the poor, disabled and senior citizens inmates of the Mother Teresa Home there.

On Sunday morning, soon after the weekly mass, our group of three to four pre-novice (or pre-seminary) youths used to arrive at the Mother Teresa Home equipped with aprons, pairs of scissors, shaving cream, and razors. Our sole mission was to give a new or somewhat civilised look to the male inmates who most often looked barbarian with their long disheveled, unkempt hair and long grown beards.

The nuns there, a majority of whom were Keralites or Bengalis, would entrust us with the inmates and get themselves busy catering to the large number of destitute women, children and elders living there.

The next two to three hours, we would give the inmates haircuts, shave their beards and also cut nails of their fingers and toes. One by one, the inmates would step into the wooden chairs placed before us and by the time we finished our job, they would have a complete new look as they would get haircut and shaving done only once in three months. The old, destitute persons used to look very fresh and content after the haircut and shaving.

I recalled these scenes at Mother Teresa Homes when I watched a nearly comatose patient long haired `Anand Bhai’ getting a clean, new look in Sanjay Dutt’s film `Munnabhai MBBS’.

At that time, as a teenager, I had not even started shaving myself and so as a precautionary measure for the safety of those people, I confined my services only for giving haircuts to those senior citizen destitute.

The last time I visited the Mother Teresa Home in Panjim was in early 1980s when Mother Teresa arrived in Goa for the first time after she was conferred the Nobel Peace Award. The Government of India too had later honoured her with a Bharat Ratna award.

However this time I was visiting the Missionaries of Charity Home in a different capacity. I was no longer a Jesuit pre-novice, a person attached to a religious congregation. I had arrived there as a reporter of a local English daily, The Navhind Times. The nuns at the destitute home who knew me personally were transferred and others had replaced them.

I saw the Nobel laureate sitting in a wooden chair at the same open place where we used to give haircuts to the inmates. There were not many people there. I approached Mother Teresa and as was her wont, with her folded hands, she shook hands with me and mumbled some hardly audible words. The Mother at that time was already in her seventies. I lingered around her for some time, hoping to get a good copy for my newspaper. But I was disappointed.

Mother Teresa spoke very little, almost in a whispering voice, about loving everyone, especially those in need. About being selfless and doing everything in the name of Lord! That was not exactly the content which would make page one headlines or news. While returning to my newspaper office, I wondered what would be the intro for my news copy. The Navhind Times next day carried my news story on an inside page with a photo of the Mother Teresa at the destitute home.

Of course to be honest, at that time I was not awed by her personality. The realisation of being privileged to have come in contact with Mother Teresa came only in retrospect.

Mother Teresa passed away on 5 September 1997. Fifteen years after her death, once again I came in association with the Missionaries of Charity in another role and in a foreign land, at Rome in Italy. On an Europe tour along with my wife and daughter, I stayed along with the priests belonging to the Missionaries of Charity (Male), a congregation co- founded by Mother Teresa and doing the similar work for the destitute.

We had camped at the Missionaries of Charity centre at Via S Agapito 8 in Rome for a week, I realised that the poor, destitute and the homeless in Europe are, of course, are not as those in India. They are well-dressed and when moving outside, one can hardly believe that they are inmates of the destitute centre. A majority of these destitute and homeless are alcoholics and drug addicts.

These inmates are expected to return to the centre before the supper at 7 pm as the gates of the institution are locked for them by this time. Although offered free food and shelter at centre, some of these inmates are seen on the road, famous churches, begging to earn cash to purchase liquor or drugs.

During my stay there, twice I witnessed one or inmates returning to the destitute centre past the deadline totally sozzled and therefore forced to spend the night on the road. Since this was quiet routine affair with these inmates, no compassion was shown to them, I was told.

We journalists are privileged to come in contact with veterans from various fields, power wielding politicians, senior government officials, celebrities, and so on. Often, we tend to view them with cynicism.

Pope John Paul II canonised Mother Teresa, making her the first person to be declared a saint in a shortest period after her death. Incidentally. Pope John Paul himself became the second person to be declared a saint posthumously in a shortest duration.

Both Mother Teresa and Pope John Paul are the two saints I observed from a very close distance during their lifetimes and as a journalist, covered their functions for my newspaper.

Camil Parkhe 

Thursday, September 22, 2022

 फादर थॉमस स्टीफन्स ‘क्रिस्तपुराण’

जैसी हरळांमाजी रत्नकिळा की रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ॥
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । की पदिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी । मराठिया ॥
पखिया माजी मयोरू । वृखिआंमध्ये कल्पतरू ।
भाषांमध्ये मानु थोरू । मराठियेसी ॥
तारांमध्ये बारा रासी । सप्तवारांमाजी रवी शशी ।
या दीपीचेआ भाषांमध्ये तैसी । बोली मराठिया ॥
 
मराठी भाषेची अशा प्रकारे स्तुती करून सतराव्या शतकाच्या सुरुवातीस फादर थॉमस स्टीफन्स यांनी आपल्या ‘क्रिस्तपुराण’ या ग्रंथाची निर्मिती केली. ‘ओं नमो विश्वभरिता’ या नमनापासून सुरू होणारे हे पुराण पुढील दहा हजार ओव्यांमध्ये आपला हा एतद्देशीय थाट कायम राखते.
 
इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि वयाच्या तिशीनंतर गोमंतकात आलेल्या फादर स्टीफन्स यांना पूर्णतः देशी अवतारातील क्रिस्तपुराणाची निर्मिती शक्य झाली हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. 
 
क्रिस्तपुराण वाचताना या ग्रंथाची भाषाशैली, म्हणी आणि वाक्‌प्रचार, हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अनेक संदर्भांचा मुबलक वापर यामुळे परदेशातून आलेल्या धर्माचा ग्रंथ आहे असे जाणवतदेखील नाही. 
 
अकराव्या शतकात महानुभाव पंथाच्या चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रापासून सुरू झालेल्या ग्रांथिक मराठी भाषेच्या इतिहासातील क्रिस्तपुराण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
.
बायबलमधील अनेक संकल्पना, ग्रीक पारिभाषिक शब्द, बायबलच्या जुन्या आणि नव्या करारामधील अनेक घटना मध्ययुगीन काळातील गोमंतकीय सामान्य जनतेला समजतील अशा शब्दांत सांगण्याचा यशस्वी प्रयत्न फादर स्टीफन्स यांनी केला आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये वाढलेल्या नवख्रिस्ती लोकांची धर्मग्रंथाची गरज लक्षात घेऊन फादर स्टीफन्स यांनी क्रिस्तपुराणाची रचना केली.
.
फादर थॉमस स्टीफन्स यांचा जन्म इंग्लंडमधील विल्टशायर परगण्यात बुशटन गावी 1549 साली झाला. थॉमस स्टीफन्सने 20 ऑक्टोबर 1575 रोजी रोम येथे संत इग्नाती लोयोलाकर यांनी स्थापन केलेल्या येशूसंघात प्रवेश केला. फादर थॉमस स्टिफन्स हे गोव्यात येणारे पहिले ब्रिटिश जेसुईट फादर. 24 ऑक्टोबर 1579 रोजी थॉमस स्टीफन्सने आपले मिशनकार्य सुरू केले.
 
फादर स्टीफन्स यांचे गोव्यातील सासष्टी भागात धर्मगुरुपदाचे कार्य सुरू झाले. गोव्यातील रायतूर येथील येशूसंघाच्या कॉलेजचे रेक्टर म्हणून 1590 ते 1594 या काळात त्यांनी काम पाहिले. वसईतील 1611-12 या काळातील मराठी अध्यापनाचा काळ वगळता स्टीफन्स यांनी भारतातील आपली सर्व हयात गोव्यातच घालविली. 35 वर्षे त्यांनी मडगाव, बेनावली आणि नावेली या भागात धर्मगुरू म्हणून काम केले.
 
`दौत्रिना क्रिस्ता’ किंवा `क्रिस्तीधर्मतत्त्वसार, आर्त द लिंग्वा कानारी हे कोकणी भाषेचे व्याकरण आणि क्रिस्तपुराण यांचा फादर स्टीफन्स यांच्या साहित्यसंपदेत समावेश होतो.
या साहित्यकृतीपैकी दौत्रिना क्रिस्ता हे पुस्तक कॅथेकिझम स्वरूपाचे म्हणजे कॅथोलिक धर्माची मूळ तत्त्वे समजावून सांगणारे आहे. मात्र गोमंतकीय कोकणीचे हे पहिलेच ज्ञानपुस्तक असल्याने भाषिक इतिहासाच्या संदर्भात हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. दौत्रिना क्रिस्ता लिंग्वा ब्रामण कानारी या शीर्षकाखाली हे पुस्तक सर्व प्रथम 1622 साली छापण्यात आले. 
 
या आवृत्तीची एक प्रत सध्या पोर्तुगालमधील लिस्बन सरकारी ग्रंथालयात असून दुसरी प्रत रोमच्या व्हॅटिकन ग्रंथालयात आहे.
 
कोकणी भाषेतील पहिले व्याकरण लिहिण्याचे श्रेय फादर स्टीफन्स यांना दिले जाते. ‘आर्त द लिंग्वा कानारी’ या नावाने हे व्याकरण प्रसिद्ध आहे. ‘कानारी’ म्हणजे कन्नड भाषा नव्हे. त्याकाळात कोकणी भाषा कानारी म्हणून ओळखली जात असे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांची भाषा म्हणजे कानारी भाषा असे स्पष्टीकरण इतिहाससंशोधक अ.का. प्रियोळकर यांनी दिले आहे. अतिपूर्वेकडील भाषेचे एका युरोपियन व्यक्तीने रचलेले हे पहिलेच व्याकरण. 
 
‘क्रिस्तपुराण’ ही फादर थॉमस स्टीफन्स यांची सर्वात महत्त्वाची साहित्यकृती. पूर्णतः भारतीय पारंपरिक शैलीत लिहिलेल्या या क्रिस्तपुराणामुळे फादर स्टीफन्स यांचे नाव मराठी भाषेच्या इतिहासात चिरंतन राहणार आहे. या पुराणाचे लेखन फादर स्टीफन्स यांनी 1614 साली पूर्ण केले आणि या ग्रंथाची पहिली आवृत्ती 1616 साली छापण्यात आली.
त्याकाळात देवनागरी लिपीत मुद्रणकला विकसित न झाल्याने हा ग्रंथ त्यांना रोमन लिपीत छापावा लागला. 
 
क्रिस्तपुराण ज्यांच्यासाठी लिहिले गेले त्यांना मूळचा आशियाई असणाऱ्या परंतु पाश्चात्यांमार्फत भारतात पोहोचलेल्या ख्रिस्ती धर्माचा परिचय व्हावा यासाठी फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाला पूर्ण भारतीय पेहराव दिला. या पेहरावामुळे ख्रिस्ती धर्माची ओळख करून घेण्यास स्थानिक लोकांना अडचण आली नाही. 
 
उदा. स्वर्ग, सैतान, नरक या संकल्पना स्थानिक जनतेला समजणे शक्यच नव्हते. फादर स्टीफन्स यांनी त्यासाठी वैकुंठ, देवचर, यमपुरी अशा सर्वांनाच सुपरिचित असलेल्या संकल्पनांचा वापर करून वाचकांशी अधिक जवळीक साधली. 
 
येशूच्या नावाचे देशीकरण करण्यासाठी या ग्रंथकर्त्याने स्वामी, तारक, आनंदनिधी, परमेश्वर, जगद्गुरू, मोक्षराज, गोसावी अशा अनेक उपाधींचा आधार घेतला.
फादर स्टीफन्स यांनी आपल्या पुराणाची सुरुवात पुढील ओवींनी केली आहे.
 
ओ नमो विश्वभरिता । देवा बापा सर्वसमर्था ।
परमेश्वरा सत्यवंता । स्वर्ग पृथ्वीचा रचणारा ॥1॥
तूं ॠद्धिसिद्धिचा दातारू । कृपानिधी करूणा करू
तूं सर्व सुखाचा सागरू । आदि अंतु नातुडे ॥2॥
तूं परमानंदु सर्वस्वरूपु । विश्वव्यापकु ज्ञानदिपु ॥
तूं सर्वगुणी निर्लेपु । निर्मळू निर्विकारू स्वामिया ॥3॥
तूं अदृष्टु तूं अव्यक्तू ।समदयाळू सर्वप्राप्तु ।
सर्वज्ञानु सर्वनितीवंतू । एकूची देवो तूं ॥4॥
तू साक्षात परमेश्वरू । अनादसिद्धू अपरांपरू ।
आदि अनादि अविनाशु अमरू । तुजें स्तवन त्रिलोंकी ॥5॥
 
शांताराम बंडेलू संपादित क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 962 ओव्या आहेत, तर लंडन येथील स्कूल ऑफ ओेरिएंटल ॲन्ड आफ्रिकन स्टडीज येथील विल्यम मर्सडन यांच्या संग्रहातील क्रिस्तपुराणात एकूण 10 हजार 641 ओव्या आहेत.
 
या पुराणग्रंथात ग्रंथकर्त्याने ओवी छंदाचा वापर केला आहे. ओवी छंदात चार पंक्ती असून पहिल्या तीन पंक्तीत यमक साधलेले असते.
 
गोव्यातील वादग्रस्त ठरलेल्या इन्क्विझिशनच्या काळात प्रत्येक साहित्याचा मजकूर काळजीपूर्वक तपासला जात असे, आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब नष्ट केला जाई. इन्क्विझिशन मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठलाही मजकूर प्रसिद्ध करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे इन्क्विझिशन मंडळाची परवानगी मिळाल्यानंतरच क्रिस्तपुराण छापण्यात आले. 
 
इंग्रजी भाषेतील अनेक म्हणी आणि वाक्‌प्रचारांचे क्रिस्तपुराणातील मराठी भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. उदा. ‘Rome was not built in a day' े’ या सुपरिचित म्हणीचे क्रिस्तपुराणात ‘एके दिवशी रोमनगरी । उभविली नाही’ असे भाषांतर करण्यात आले आहे. ‘वार्म लव्ह’ या वाक्‌प्रचारास ‘उन्हु मोहो’ असे संबोधण्यात आले आहे.
 
फादर स्टीफन्स यांनी आपल्या या पुराणाच्या तीन आवृत्त्या 1616,1649 आणि 1654 साली प्रसिद्ध केल्या. आज यापैकी कुठल्याही आवृत्तीची एकही प्रत कुठेही उपलब्ध नाही. 
 
गोव्याचा व्हाईसरॉय फ्रान्सिस द लाव्होर याने 1648 साली कायदा करून तीन वर्षांच्या आत गोव्यातील सर्व स्थानिक भाषांची हकालपट्टी करून सर्व व्यवहार पोर्तुगीज भाषेतच करण्याचा निर्णय घेतला. या धोरणानुसार मराठी भाषेतील सर्व पुस्तके जप्त करण्यात आल्यामुळे फादर स्टीफन्स यांचे क्रिस्तपुराणही लोकांच्या नजरेआड झाले. पोर्तुगीजांच्या या धोरणामुळे क्रिस्तपुराणाच्या वापरावर बंदी आली. 
 
व्हॉईसरॉयच्या या आदेशामुळे गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषेची आणि त्याचबरोबर तेथील मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचीही वाढ खुंटली. 
 
क्रिस्तपुराणाच्या आणि मराठी भाषेच्या सुदैवाने गोव्याबाहेर मेंगलोर वगैरे भागातील ख्रिस्ती समाजात क्रिस्तपुराणाचे वाचन आणि निरूपण कायम राहिले आणि या साहित्यिक ऐवजाचे अशाप्रकारे जतन झाले. या क्रिस्तपुराणाची अनेक हस्तलिखिते तयार झाली. अशी अनेक हस्तलिखिते जमवून त्यांच्या साहाय्याने 1907 साली मेंगलोर येथे जोसेफ साल्ढाणा यांनी क्रिस्तपुराणाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली.
 
क्रिस्तपुराणाच्या वरील चारही आवृत्त्या रोमन लिपीत छापलेल्या होत्या. त्यामुळे मराठीतील या श्रेष्ठ साहित्यकृतीकडे मराठी सारस्वतांचे लक्ष गेले नव्हते. त्यामुळे क्रिस्तपुराण मराठी साहित्यक्षेत्रात पूर्णतः दुर्लक्षित राहिले. 
 
दरम्यान पुणे धर्मप्रांताचे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांनी क्रिस्तपुराणातील येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील काही भाग देवनागरी लिपीत आणला. आर्चबिशप डोरिंग हे मूळचे जर्मनीचे. आर्चबिशप डोरिंग यांनी क्रिस्तपुराणाच्या देवनागरीत आणलेल्या काही भागांच्या तीन पुस्तिका छापल्या होत्या. 
 
संपूर्ण क्रिस्तपुराण मराठीच्या देवनागरी लिपीत प्रकाशन होण्यासाठी मात्र 1956 साल उजाडावे लागले. त्यावेळी शांताराम बंडेलू यांनी संपादित केलेली ही देवनागरी आवृत्ती य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनने प्रसिद्ध केली.
 
फादर स्टीफन्स यांचे वयाच्या 70 व्या वर्षी ओल्ड गोव्यातील बॉम जेजू या चर्चच्या आवारातील धर्मगुरू निवासात निधन झाले. संत फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष असलेल्या या चर्चशेजारील हे धर्मगुरू निवास अजूनही आपल्याला पाहायला मिळते. 
 
फादर स्टीफन्स यांच्या स्मारकाची मात्र नक्कीच गरज नाही. ‘क्रिस्तपुराण’ या आपल्या वाङ्मयकृतीमुळे मराठी साहित्यात त्यांना चिरंतन स्थान लाभले आहे.

^^^

शांताराम बंडेलूकृत 'क्रिस्तपुराण' ग्रंथाचे कव्हर - मूळ चित्र " द मास्टर - अँजेलो डी फोन्सेका 
 
---
`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ - लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन- २००३) या पुस्तकातील एक प्रकरण
 
Camil Parkhe 

Wednesday, September 21, 2022

Pope Francis elevates Goa archbishop Filipe Neri Ferrao as a Cardinal

 

Pope Francis elevates Goa Archbishop Filipe Neri Ferrao as a Cardinal in Vatican City 

Christianity in Goa is over 450 years old but it was only on Saturday, August 27, 2022 , that a `Real Goan’ Goa and Daman Archbishop Filipe Neri Antonio Sebastiao De Rosario Ferrao was appointed as a cardinal in the Catholic Church. 
 
I said `Real Goan’ because many Pogo or Persons of Goa Origin have been appointed as cardinals in the past. (By the way, Persons of Goa Origin (Pogo) Act, a private member’s Bill was recently moved in Goa Assembly to define Goans).
 
Filipe Neri Antônio Sebastiâo Do Rosario Ferrão is such a long name, but that is the style of Goan Catholic names. And Mind you, these are the person's names, not of the father or the middle names.
Like his name, the new cardinal also has a long list of his designations. 
 
Besides Goa, he is also the archbishop of Daman, located near Gujarat and far off from Goa - and he is also the Patriarch of the East Indies. 
 
Pope Francis elevated Archbishop Filipe Neri Ferrao as Cardinal during a consistory for creation of Cardinals held at St. Peter's Basilica at Vatican City. He was among 20 new cardinals including Archbishop Anthony Poola of Hyderabad. 
 
Mumbai Archbishop and later Cardinal Valerian Gracias was the first Asian to be appointed as a Cardinal by Pope Pius XII in 1952, a few years after India achieved her Independence. Born in Karachi, Cardinal Gracias was a Person of Goa Origin, hailing from from Navelin near Margaon. 
 
Pune Bishop late Valerian D’Souza, though born in Pune, was also a native of Goa, hailing from Parra near Porvorim. Goa has given several bishops and archbishops - and thousands of priests and nuns - to the Catholic Church. 
 
Pakistan’s first Cardinal Joseph Marie Anthony Cordeiro, also hailed from Goa. As a staff reporter of the Panjim-based English daily, `The Navhind Times' , I had met and interviewed Cardinal Cordeiro when he had visited Goa in early 1980s. 
 
Cardinal Simon Pimenta, the first Marathi-speaking Cardinals of Mumbai was another cardinal I have interviewed. 
 
The post of cardinals in the Catholic Church is very important. These senior ranking clergies with Red Hat were in the past referred to as Princes of the Church. 
 
It is among these College of Cardinals that a new Pope is elected whenever there is a vacancy. (This is a very rare situation that for the past over a decade we have two popes, Pope Francis and Pope Emeritus Benedict XVI. 
 
Those cardinals less than 80 years old are entitled to participate and - also to be candidates - in the secret elections held at the historic Sistine Chapel in Vatican City to elect the new Pope. Incidentally, the number in the College of Cardinals does not exceed 120. 
 
The number of cardinals from India has remained static to six during the past many years. 
 
However this does not reduce the chance of an Indian cardinal being elected to the papacy. 
 
Camil Parkhe 
^^


Wednesday, April 6, 2022

 `टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती.

टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा.
अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो.
तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यूज डेस्ककडे सोपवून झाल्यावर ''पान दोनसाठी एडिटिंग करण्यासाठी अजूनही काहीच स्टोऱ्या नाही'' असे आपले दोन्ही हात वर उंचावून उपसंपादक संजय पेंडसे याने मोठ्याने सांगितले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता माझा तो मजकूर आतल्या पानासाठी नसून पान एकच्या अँकरची ती बातमी आहे असे तो म्हणाला.
''बातमीचा पहिला पॅरा वाचताच ती पान एकचे मॅटर आहे हे कळाले , इट इज अ पेज वन मटेरियल ! पण एडिट मिटिंगमध्ये काय होते ते पाहू,'' असे तो म्ह्टल्यावर पान दोनसाठी मी दुसरे मजकूर तयार करू लागलो.
पत्रकारितेत तोपर्यंत दोन तपांहून अधिक काळ घातलेले असल्याने मी मनातल्या मनात संजय पेंडसेच्या न्यूज सेन्सबद्दल कौतुक केले.
आणि अखेर संजय म्हणाला होता तसेच झाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दाखल झाल्यानंतर पान एकवर प्रसिद्ध झालेली माझी ती पहिली बातमी.
त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियात डेस्कवर काम करणाऱ्या उपसंपादकाने व इतरांनी पान एकसाठी बायलाईनची बातमी लिहिल्यास उत्तेजनार्थ वाढिव दिडशे रुपये पगारासोबत मिळायचे. शिवाय फोटोसाठी पन्नास रुपये वेगळे ! या वाढिव मानधनाऐवजी टाइम्स ऑफ इंडिया'च्या पान एकवर बायलाईनची बातमी छापून येण्याचे अधिक अप्रूप होते.
काय होती ती पान एकची बातमी ?
Marathi monthly Niropya enters 100th year
Camil Parkhe,TNN | Dec 26, 2002
''पुणे: एका जर्मन जेसुईट फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका आडवळणाच्या खेड्यात - राहुरीजवळच्या वळण या गावात - १९०३ साली सुरु केलेल्या मराठी मासिकाने 'निरोप्या'ने आज मराठी नियतकालिकांत एक वैशिष्ठपूर्ण स्थान मिळविले आहे. पुणे शहरातून प्रकाशित होत असलेले हे मासिक शतक पूर्ण केलेल्या मराठीतील काही अगदी मोजक्या नियतकालिकांपैकी आहे.
या मासिकाचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरींग यांची नंतर पुण्याचे बिशप आणि काही काळ जपानमधील हिरोशिमा शहरात व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली होती.''
टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत २६ डिसेंबर २००२च्या अंकात म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध झाली. टाइम्सच्या आर्किव्हमधून आजही ही बातमी वाचता येते.
या बातमीबरोबर बिशपमहोदयांचा अर्धा कॉलम रंगीत फोटोही छापण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पान एक आणि शेवटचे पान रंगीत छापण्यास त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती.
( माझ्या इतर बायलाईनच्या अनेक बातम्यांप्रमाणे याही बातमीचे कात्रण मी आजही जपून ठेवले आहे. इतरांच्या दृष्टीने ही जीर्ण झालेली कात्रणे तद्दन रद्दी असली तरी फ्लॅटच्या माळ्यावर मी ती ठेवली आहेत. )
वृत्तपत्रीय जगतात विविध पानांच्या पानांच्या वेगवेगळ्या ढंगात लिहिल्या जातात. त्यातही कुठली बातमी आपल्या वाचकांना आवडेल याचे काही खास निकष असतात. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात होणाऱ्या गुलाबाच्या उत्पादनाची आणि युरोपला निर्यात होणाऱ्या फुलांच्या मी दिलेल्या बातम्या दरवर्षी महाराष्ट्र हेराल्ड- नंतर सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकात कायम पान एकवर अँकर म्हणून वापरल्या जातात. या काळात दैनिकाचे संपादक बदलले तरी व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट शैलीत लिहिलेल्या ह्या बातम्या पान एकवरच अँकरच्या जागा पटकावत असत !
टाइम्स ऑफ इंडिया'त त्या दिवशी पान एकवर छापून आलेल्या माझ्या त्या पहिल्या बायलाईनचे कारण म्हणजे जर्मन असलेल्या बिशप डोरींग यांचे मराठी पत्रकारितेतील आणि मराठी भाषेतील महत्त्वाचे योगदान.
'निरोप्या' या मासिकाने मराठीतल्या अजूनही हयात असलेल्या नियतकालिकांत अगदी वरचा क्रमांक मिळवलेला आहे.
मराठी पत्रकारितेचा इतिहास १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेल्या `दर्पण' पासून सुरु होतो. त्यानंतर सुरु झालेली अनेक मराठी नियतकालिके अल्पजीवी ठरली. शतकायुषी असून आजही प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मराठी नियतकालिकांत १८८१ सालापासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' चा समावेश होतो. मात्र यापैकी बहुतेक नियतकालिके ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरवर तग धरुन आहेत.
या एप्रिल २०२२ महिन्यात निरोप्याने ११९ वर्षे पूर्ण करुन १२० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. या मासिकाच्या रंगीत पानभर जाहिराती पाहून या नियतकालिकाने आर्थिकदृष्ट्या चांगलेच बाळसे धरले आहे येऊ लक्षात येते.
स्थापनेपासून म्हणजे १९०३ पासून 'निरोप्या' हे मासिक सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट्स) वा येशूसंघीय फादरांच्या संस्थेतर्फे चालविले जाते. पुण्याचे दुसरे बिशप म्हणून डोरींग यांची १९०७ साली नेमणूक झाल्यावर हे मासिक पुण्यातून प्रसिद्ध होऊ लागले. पोपमहाशयांना भेटण्यासाठी बिशप डोरींग रोमला गेले आणि पहिले महायुद्ध सुरु झाले. ते जर्मन असल्यामुळे ब्रिटिश भारतात त्यांचे परतणे अवघड झाले. कारण जर्मनी व इंग्लंड ही शत्रुराष्ट्रे होती. याकाळात डोरींग यांची जपानमध्ये हिरोशिमाचे आर्चबिशप पदावर व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली. आता त्यांना आर्चबिशप पदावर बढती मिळाली होती. त्यांच्या अनुपस्थितीत `निरोप्या'चे प्रकाशन थांबले.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला १९२६ साली परतले. पुणे धर्मप्रांत मुंबई-नागपूरप्रमाणे आर्चडायोसिस नसला तरी त्यांचे आर्चबिशप हे वैयक्तिक सन्मानपद म्हणून कायम राहिले. वसईचे सद्याचे प्रमुख आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांच्याबाबतीत असेच आहे, नाशिक धर्मप्रांताचें बिशप म्हणून नेमणूक होण्याआधीच व्हॅटिकन सिटीत असताना त्यांना आर्चबिशप पद मिळाले होते, ते पद आता कायम राहिले आहे
आर्चबिशप डोरींग यांनी याकाळात बंद पडलेल्या आणि आपले अपत्य असलेल्या ‘निरोप्या’ मासिकाचे १९२७ साली पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून आजतागायत ‘निरोप्या’चं प्रकाशन (अलिकडचा कोरोना काळाचा अपवाद वगळता) अखंडितपणे चालू आहे.
पुण्यातल्या रामवाडी इथल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पेपल सेमिनरीचे रेक्टर असलेले फादर भाऊसाहेब संसारे हे जेसुईट धर्मगुरु निरोप्याचे आताचे संपादक आहेत. नारायण पेठेत स्नेहसदन येथे निरोप्याचे कार्यालय आहे.
.
ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स लिखित महाकाव्य 'ख्रिस्तपुराण' हे मराठीतील पहिलेवहिले मुद्रित साहित्य. हे मराठी महाकाव्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात १६०४ साली रोमन लिपीत छापले गेले, कारण त्यावेळी देवनागरी छपाई साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या 'ख्रिस्तपुराणा'तील काही भाग रोमन लिपीतून देवनागरी लिपीत छापण्याचे श्रेय आर्चबिशप डोरींग यांच्याकडेच जाते.
मात्र संपूर्ण ख्रिस्तपुराण रोमन लिपीतून देवनागरीत आणण्यास १९५६ साल उजाडले. लिप्यांतराचे हे महत्त्वाचे काम अहमदनगरच्या प्राध्यापक शांताराम बंडेलू यांनी आणि पुण्याच्या य. गो. जोशींच्या `प्रसाद प्रकाशना'ने केले.
निवृत्त आर्चबिशप डोरींग यांचे १९५१ साली वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.
व्हॅटिकन सिटीतले सेंट पिटर्स बॅसिलिका ही पहिले पोप आणि येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या सेंट पिटर याच्या कबरीवर बांधली आहे. या चर्चच्या भव्य संग्रहालयातच अनेक पोप चिरनिद्रा घेत आहेत,. या भव्यदिव्य सेंट पिटर्स बॅसिलिकाला भेट देण्याचा मला योग आला याचा आजही आनंद वाटतो
आर्चबिशप डोरींग यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी माहिती देतोो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.
मी लिहिलेल्या `ख्रिस्ती मिशनरीचे योगदान' या मराठी (सुगावा प्रकाशन ) आणि इंग्रजी (गुजरात साहित्य प्रकाश - २००३) या पुस्तकात आर्चबिशप हेन्री डोरींग यांच्यावर एक प्रकरण आहे.
आणि आता ही मन कि बात .
निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली. वि स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीच्या रुपाने मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्याविषयी १९७४ साली `निरोप्या'त माझा पन्नासेक शब्दांचा लेख प्रसिद्ध झाला, ती माझी पहिली बायलाईन.
त्यावेळी भविष्यात पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा पोटापाण्याचा व्यवसाय असेल याची मी कल्पनाही केली नव्हती.

Sunday, March 27, 2022

गोवा  आणि दादरा, नगर हवेली, दमण  येथील पोर्तुगीज संस्कृती  


Our Lady of Piety Church, Silvassa 

मागच्या आठवड्यात मी दादरा, नगर हवेली, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेशात होतो. अनेकांना हा प्रदेश किंवा ही शहरे भारताच्या नकाशात कुठे आहेत ते माहितही नसेल, दोनेक वर्षांपूर्वी मलासुद्धा माहित नव्हते. गोव्याचे या दादरा-नगर हवेली दमण आणि दिव या केंद्रशासित प्रदेशाशी खूप जुने म्हणजे पाच शतकांपासूनचे नाते आहे. एकमेकांपासून शेकडो मैल दूर असल्याने बोलीभाषा, पेहराव, संस्कृती भिन्न असली तरी या प्रदेशांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे तेथे साडेचार शतके असलेली पोर्तुगीज सत्ता.

तर मागच्या आठवड्यात या केंद्रशासित प्रदेशात असताना एका मासिक स्मृती म्हणजे `मन्थस माईंड' या विधीसाठी इथल्या चर्चमध्ये अचानक जावे लागले. झटपट तयार होऊन मी त्या चर्चमध्ये पोहोचलो आणि थोडासा शरमिंदा झालो तरी थोडक्यात बचावलो अशीही भावना झाली.
त्या चर्चमध्ये जमलेले सर्व स्त्री-पुरुष हे `मोर्निंग क्लोथ्स' च्या ड्रेस कोडमध्ये म्हणजे सफेद शर्ट किंवा फ्रॉक आणि काळ्या रंगाची पॅन्ट किंवा स्कर्ट, काळ्या रंगाचे पॉलीश केलेले चकाकते बूट किंवा सँडल्स आणि अशाच पद्धतीच्या सुतक दर्शवणाऱ्या पेहेरावात होते. मी स्वतः सफेद शर्ट घातला होता तरी पॅन्ट मात्र करड्या रंगाची होती आणि बुटसुद्धा पूर्णतः काळ्या रंगाचे नव्हते. त्या काँग्रीगेशनमध्ये मी एकटाच अशा पेहेरावात असले तरी हे चालून घेण्यासारखे होते, मी भडक लाल, हिरवा किंवा पिवळा शर्ट घातला नव्हता याबद्दल मी स्वतःलाच मनोमन धन्यवाद दिले.
त्या संध्याकाळी त्या मासिक स्मृतीच्या संपूर्ण मिस्साविधीमध्ये सर्व गायने पोर्तुगीजमध्ये होती ! गिटार, किबोर्ड आणि इतर संगीतवाद्यांच्या साथीत गाणाऱ्या चर्चच्या कॉयर ग्रुपने या गायनासाठी भरपूर मेहनत घेतली होती ते जाणवत होते. त्या पोर्तुगीज गायनाचे शब्द माहित नसल्याने मी लगेचच समोरच्या बाकातल्या शेल्फमधले गायनपुस्तक काढून त्या पोर्तुगीज गायनात सहभागी झालो.
चर्चमधला विधी संपला आणि नंतर त्या दिवशी त्या मिस्साविधीमधली सर्व हिम्स म्हणजे गायने पोर्तुगीज भाषेतली का होती याचा उलगडा झाला.
मागच्या महिन्यात वयाची ऐंशी पार करुन निधन पावलेली महिला त्या चर्चच्या गायकवृदांची सदस्य होती, दमण आणि सिल्व्हासा येथील अनेक ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच पोर्तुगीज बोलणारी होती. त्यामुळॆ त्या महिलेला आदरांजली म्हणून सर्व गायने पोर्तुगीज भाषेतील निवडण्यात आली होती. शक्य असले तर संपूर्ण मिस्साविधी आणि प्रार्थनासुद्धा पोर्तुगीज भाषेत झाल्या असत्या, मात्र तेथे जमलेले फादर आणि सर्व भाविकांना आता पोर्तुगीज येत नसल्याने तसे झालो होते.
भारतातील जनमताच्या रेट्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिणामाची चिंता न करता पंतप्रधान पंडित नेहरू यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी केलेल्या लष्करी कारवाईनंतर गोवा, दमण आणि दीव इथली पोर्तुगीज सत्ता संपली. त्याआधी म्हणजे १९५४मध्ये दादरा-नगर हवेली हे गुजरातच्या सीमेलगतचे चिमुकले प्रदेश भारतात सामिल झाले होते. काश्मीरप्रश्नी चूक केल्याबद्दल पंडित नेहरूंना सतत धारेवर धरले जाते, मात्र गोवा, दमण आणि दीव विना रक्तपात रातोरात पोर्तुगिजांच्या सत्तेतून मुक्त करून भारतात सामिल केल्याबद्दल मात्र त्यांचे कधी कौतुक केले जात नाही.
अलिकडेच म्हणजे २०१९ साली अस्तित्वात आलेल्या या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दमण त्या आहे तर आधीची राजधानी असलेले सिल्व्हासा हे एक मोठे शहर आहे. इथे सांगण्याचे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या केंद्रशासित प्रदेशाचा सर्व भाग साडेचारशे वर्षे पौर्तुगीज वसाहत होती, तर दमण आणि दिव हे १९६१ ते १९८७ पर्यंत गोवा, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेशाचा भाग होते.
सिल्व्हासा हे नगर हवेलीमधले मुख्य शहर. पोर्तुगीज काळात दादरा-नगर हवेलीची ती राजधानी होती. विशेष म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले दमण हे समुद्रकाठी असल्याने समुद्रमार्गे पोर्तुगीजांचा या शहराशी थेट संपर्क असे. दादरा-नगर हवेली मात्र समुद्रकिनारी नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भूमीवरून या पोर्तुगीज प्रदेशात जाणे-येणे भाग असायचे. तरीसुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अगदी १९५४पर्यंत दादरा-नगर हवेली हा छोटासा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला, हे विशेषच.
वास्तविक पाहता दमणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले दादरा-नगर हवेली हे प्रदेशसुद्धा गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे भाग झाले असते, मात्र गोवा मुक्तीआधी केवळ सात वर्षांपूर्वी दादरा-नगर हवेली भारतात सामील झाले आणि गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश लष्करी कारवाईनंतर १९६१ साली.
पणजीतल्या धेम्पे कॉलेजातून मी १९७८ साली बारावीची परीक्षा दिली. त्यामुळे माझ्या बारावीच्या बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आणि प्रमाणपत्रावर गोवा, दमण आणि दीव बोर्डाचे नाव आणि शिक्का आहे. भारताच्या नकाशावर एक नजर टाकून गोव्याचे आणि दमण व दीवचे भौगोलिक स्थान पाहिले तर कुणालाही धक्काच बसेल. गोवा हे एका जिल्ह्याच्या आकाराचे आहे, तर दमण व दीव हे तालुक्याच्या आकाराचे आहेत. हे तीन चिमुकले प्रदेश एकमेकांपासून शेकडो किलोमीटरच्या अंतरावर आहेत.
१२ तालुक्यांचा मिळून एक जिल्हा बनलेल्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे दमण व दीव हे दोन तालुके असायचे. या केंद्रशासित प्रदेशाचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेल्या दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर, त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर आणि प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून कधी या दोन तालुक्यांना भेट दिली असेल, याबद्दल शंका वाटावी इतके ते गोव्यापासून दूर आहेत.
दमण हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यापाशी आणि गुजरातच्या सीमेशेजारी आहे. गोव्याहून रस्तामार्गे दमणला येण्यासाठी १५ तास लागतात, तर दमण येथून दीव येथे जाण्यासाठी आणखी १५ तास लागतात. ते गुजरातच्या दुसऱ्या टोकाला आहे.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे अस्तित्व जेमतेम २५ वर्षांचे म्हणजे डिसेंबर १९६१ ते जून १९८७पर्यंतचे. या काळात माझे गोव्यात उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. माझ्या पत्रकारितेचा पाया तेथेच घातला गेला. त्यामुळे गोवा, दमण आणि दीव माझ्या भूतकाळाचा नव्हे तर आयुष्याचाच एक भाग बनला. गोवा स्वतंत्र राज्य झाल्यावर या केंद्रशासित प्रदेशाचे १९८७ साली विभाजन झाले, हे तीन प्रदेश एकमेकांना परके झाले. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी (२०२०) मी दमण येथे पाऊल ठेवले, सिल्व्हासा येथे पोहोचलो, तेव्हा मी भावूक होणे साहजिकच होते.
गोवा आणि दमण येथे खूप जुनी म्हणजे ३००-४०० वर्षांपूर्वी बांधलेली चर्चेस असली तरी सिल्व्हासातले ‘अवर लेडी ऑफ पायटी’ हे त्या मानाने अलीकडच्या काळातले म्हणजे केवळ १२५ वर्षांपूर्वी, १८९७ साली बांधलेले चर्च आहे. पोर्तुगीजांनी दादरा-नगर हवेलीची राजधानी दादराहून सिल्व्हासाला हलवली, त्यानंतर लगेचच हे चर्च बांधण्यात आले.


या चर्चचे युरोपियन गॉथिक शैलीचे बांधकाम अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. चर्चच्या एका लांबलचक आडव्या आणि उघडताना घडी करता येण्यासारख्या पाच-सहा मीटर अंतराच्या धातूच्या दारावर येशू ख्रिस्ताचे आपल्या बारा शिष्यांबरोबरच्या शेवटच्या भोजनाचे म्हणजे ‘द लास्ट सपर’चे अप्रतिम चित्र आहे. या चर्चचे नूतनीकरण आणि विस्तार करण्यात आला, तेव्हा आल्तार म्हणजे वेदी, जुने प्रवेशद्वार आणि इतर काही भाग जसाच्या तसा ठेवण्यात आला. वास्तुशास्त्रीय आणि ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत कॅथोलिक चर्चचा हा सगळीकडे आढळणारा गुण निश्चितच कौतुकास्पद वाटतो.
‘ला पिएता’ हे नाव ऐकल्यावर जगप्रसिद्ध शिल्पकार मायकल अँजेलो यांच्या नावाजलेल्या कलाकृतीची आठवण येते. त्यांच्या खूप गाजलेल्या शिल्पांमध्ये याचा समावेश होतो. ‘पायटी’ (Piety) हा मूळचा लॅटिन शब्द, ‘ला पिएता’ म्हणजे करुणा. ‘अवर लेडी ऑफ पायटी’ या नामाधिनाचे मराठी रूपांतर ‘करुणामय माता’ असे होईल.
रोममधील व्हॅटिकन सिटीच्या सेंट पिटर्स बॅसिलिकामधील तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. युरोपच्या सहलीवर असताना व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या भव्य प्रवेशदारात मी पत्नी-मुलीसह पोहोचलो होतो. अनेक वर्षे ज्या ऐतिहासिक वास्तूविषयी खूप काही वाचले-ऐकले होते, तेथे पोहोचल्यावर प्रचंड औत्सुक्य होते. उंच खांब असलेल्या प्रवेशदारातून आत शिरलो, उजव्या बाजूला नजर गेली आणि मी थबकलोच. माझा विश्वासच बसत नव्हता.

जॅकलिनचा हात पकडून तिचेही मी तिकडे लक्ष वेधले. तेथे अँजेलोचे ‘ला पिएता’ हे संगमरवरातले शिल्प होते. आपल्या पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे कलेवर मांडीवर घेऊन मारियामाता बसली आहे, असे हे शिल्प.
आपल्या पुत्राचे मृतशरीर न्याहाळणाऱ्या आईचे शिल्प म्हणून ‘ला पिएता’ हे त्याचे नाव. वयाच्या २३व्या वर्षी अँजेलोने संगमरवरी दगडातून ही कलाकृती साकारली. आपल्या तरुण पुत्राचे निस्तेज, अचेतन कलेवर मांडीवर घेऊन शोक करणाऱ्या मारियामातेची भावमुद्रा याविषयी खूप काही लिहिले गेले आहे. जगातील सर्वांत सुंदर आणि अत्यंत मौल्यवान असणाऱ्या कलाकृतींमध्ये या शिल्पाचा समावेश होतो. मात्र १९७२ साली एका माथेफिरू इसमाने हातोड्याच्या साहाय्याने हे शिल्प तोडण्याचा प्रयत्न केला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे शिल्प असलेल्या आल्तारासमोर आता बॅलेटप्रुफ काच बसवण्यात आली आहे.
‘The Last Supper' किंवा येशू ख्रिस्ताचे आपल्या शिष्याबरोबरचे शेवटचे भोजन हा प्रसंग अँजेलोचा समकालीन असलेल्या लिओनार्दो दा व्हिन्सी या चित्रकारानेही रेखाटला आहे. ‘द लास्ट सपर’ या घटनेला अनेक चित्रकारांनी रेखाटले आहे, अनेक ख्रिस्ती कुटुंबांत जेवण्याच्या खोलीत ‘द लास्ट सपर’ हे चित्र असते. त्याचप्रमाणे या घटनेवर आधारित अनेक चित्रे आणि शिल्पे अनेक चर्चेसमध्ये दिसतात. सिल्व्हासामधील चर्चमध्येही आल्तारावर एक वेगळ्या शैलीतले शिल्प आहेच.


गोवा, दमण, दीव आणि दादरा, नगर हवेली येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाजाचा धर्म, पेहराव, आहारपद्धती, भाषा आणि संस्कृती पोर्तुगीज राजसत्तेचा वारसा आहे. गोव्याचे दमणशी साडेचारशे वर्षे असलेले नाते संपलेले असले तरी त्याचा एक बारीकसा धागा अस्तित्वात आहे. तो म्हणजे गोव्यातील कॅथोलिक चर्च. आजही दमण आणि दादरा, नगर हवेली हे प्रदेश गोवा आर्चडायोसिस म्हणजे महाधर्मप्रांताचा भाग असून गोव्याचे आर्चबिशप व पॅट्रियार्क दमण आणि दादरा, नगर हवेली येथील चर्चमधील धर्मगुरूंची नेमणूक करतात.
गोव्याचे आर्चबिशप यांच्या या प्रदेशात वेळोवेळी भेटी होत असणार. कारण कॅथोलिक पंथामध्ये कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार किंवा सांक्रामेंत या विधीचे पौराहित्य फक्त बिशपच करू शकतात.
कॅथोलिक चर्चअंतर्गत ज्युरिसडिक्शन म्हणजे सीमाहद्द हा नेहमीच गंमतीदार आणि तितकाच वादग्रस्त विषय राहिलेला आहे. यासंदर्भात दुसरे माधवराव पेशवे यांनी दिलेल्या जमिनीवर १७९२ साली बांधण्यात आलेल्या पुण्यातल्या सिटी चर्चचे उदाहरण देता येईल. मराठा सैन्यात असलेल्या गोव्यातल्या पोर्तुगीज किंवा कॅथोलिक सोल्जरांसाठी हे चर्च बांधण्यात आले होते. भारतावर ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतरही पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्यातील चर्चचा या सिटी चर्चवरचा मालकीहक्क कायम राहिला. या चर्चच्या धर्मगुरूंची नेमणूक गोव्यातल्या बिशपांकडून व्हायची. हा प्रकार १९५३पर्यंत चालू होता. त्यानंतरच हे चर्च पुणे धर्मप्रांताचा भाग बनले.
दमण आणि सिल्व्हासा येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाज आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक वारसा टिकवून धरण्याचा एक क्षीण, केविलवाणा प्रयत्न या नॉव्हेना प्रार्थनेच्या दरम्यान करत होता. त्या प्रसंगास मी अनपेक्षितपणे साक्षीदार होतो. तो प्रसंग खरे तर खूप आनंददायी होता. तरी पण ऐतिहासिक वारशासंदर्भातला जुना इतिहास, गेल्या काही दशकातील त्याबाबतचा अनुभव आणि भविष्यातले अटळ सत्य यांची जाणीव होऊन माझे मन गलबलून गेले होते.
नॉव्हेनाच्या वेळी दररोज रोझरी प्रार्थना म्हणजे पवित्र माळेची प्रार्थना होते. त्यात येशू आणि आई मारिया यांच्या जीवनासंबंधीच्या पाच घटनांची (रहस्यांची) उजळणी केली जाते. त्यातल्या चार प्रार्थना इंग्रजीत झाल्यानंतर पाचवी प्रार्थना गायनाने सुरू झाली. आणि ती चक्क पोर्तुगीज भाषेत होती.
‘Ave Maria ...’ अशी सुरुवात ऐकताच ती ‘नमो मारीया’ किंवा इंग्रजीतील ‘Hail Mary ’ ही प्रार्थना होती हे माझ्या लक्षात आले. पोर्तुगीज आणि लॅटिन भाषेतील काही शब्द माहीत असल्याने ती मला समजत होती.
पाचही कवने पोर्तुगीज भाषेत म्हणण्याऐवजी केवळ शेवटचे कवन म्हणण्याचे कारण सहज समजण्यासारखे होते, तेथे जमलेल्या सर्वच कॅथोलिक भाविकांना पोर्तुगीज अवगत नव्हती. बहुधा गोव्यातून नेमणूक होणाऱ्या त्या चर्चच्या धर्मगुरूंनासुद्धा पोर्तुगीज येत असेल याचीही मला शंकाच आहे. कारण गोवामुक्तीनंतर १०-१५ वर्षांतच तिथून पोर्तुगीजचे उच्चाटन करण्यात आले. दमण, दादरा आणि नगर हवेली येथे मात्र आजही कॅथोलिक समाजात पोर्तुगीज बोलली जाते. दादरा, नगर हवेली, दीव आणि दमण येथली स्थानिक भाषा गुजराती आहे.
दमणमध्ये पोर्तुगीज भाषा ख्रिस्ती शाळांतून अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे २००५पर्यंत दुसरी भाषा म्हणून शिकवली जायची, आता तेही बंद झाले आहे. नव्या पिढीला ही भाषा लिहिता आणि वाचता यावी यासाठी ही भाषा निदान शाळांत तरी शिकवणे आवश्यक असते. गोव्याप्रमाणेच इथेही पोर्तुगीज भाषा शाळा-कॉलेजांच्या अभ्यासक्रमांतून हद्दपार झाली आहे.
डिसेंबर १९६१च्या आधी दमणमध्ये जन्मलेल्या सर्वांना पोर्तुगीज पासपोर्ट मिळायचा. या सुविधेचा लाभ घेऊन अनेकांनी पोर्तुगालमार्गे युरोपियन राष्ट्रांचे नागरिकत्व मिळवले आहे, आजही त्या प्रयत्नात शेकडो जण असतात. गोव्यातही असाच प्रकार मी अनुभवला आहे. आपण फार वेगाने अल्पसंख्य होत चाललो आहोत आणि काही काळानंतर या प्रदेशातील आपले अस्तित्व व संस्कृती दखल घेण्यासारखी राहणार नाही, अशी भावना गोव्यातील कॅथोलिक लोकांमध्ये आढळते. कारण या समाजातील लोक मोठ्या संख्येने युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत स्थायिक झाले आहेत.
दमण आणि दादरा, नगर हवेलीमध्ये नेमणूक झालेल्या फादरांना पोर्तुगीजचे धडे शिकावे लागायचे. कारण येथील कॅथोलिक भाविक पोर्तुगीज बोलणारे, त्यांच्या प्रार्थना आणि इतर धार्मिक व्यवहार पोर्तुगीजमध्येच असायचे. मात्र गोव्यात आता या भाषेचा मागमूसही दिसत नाही. त्यामुळे ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ या न्यायाने गोव्यातून नेमणुकीवर येणाऱ्या धर्मगुरूंना पोर्तुगीजचे ज्ञान नसते. परिणामी दमण आणि सिल्व्हासामधील चर्चमध्ये मिस्सा आणि सर्व प्रार्थनाही इंग्रजीतच होतात.
कुठलीही भाषा नाहीशी होते, तेव्हा ती बोलणाऱ्यांची संस्कृतीही नामशेष होते, असे म्हटले जाते. म्हणूनच काही लोक खानदेशी किंवा अहिराणी भाषा बोलली जावी आणि या भाषेत लिहिले जावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात याविषयी कौतुक वाटते. माझ्या लहानपणी श्रीरामपुरात आमच्या दुकानाच्या मासिक भाड्याची पावती एक म्हातारे `दिवाणजी' मोडी लिपीत देत असत हे आठवते. आज मोडी लिपीचे अस्तित्व नाहिसे झाले आहे.
गोव्यातून पोर्तुगीज भाषा कधीच हद्दपार झाली आहे. पोर्तुगीज संस्कृती आणि इतिहासाचे अनेक अवशेष मात्र गोव्यात आजही आढळतात. दमण आणि दादरा, नगर हवेली येथील परिस्थितीसुद्धा काहीशी अशीच आहे. येथील कॅथोलिक समाजाची संख्या अगदीच कमी असल्याने पोर्तुगीज भाषा आणि इतरही अनेक वारसे येत्या काही वर्षांतच नाहीसे होणार आहेत, असे मला इथे आल्यापासून वाटते आहे.
त्यामुळेच रोझरी माळेचे पोर्तुगीजमधले ते शेवटचे कवन मधुर सुरात गायले जात असताना आणि मासिक स्मृतीनिमित्त पोर्तुगीज गायने गायली जात असताना पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती जपवून ठेवण्याची त्यांची धडपड दाखवत होती. या प्रयत्नांत त्यांना कितपत यश मिळेल याबाबत मात्र मी साशंक आहे.


Tuesday, August 3, 2021

 

‘गरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा’ ही तीन व्रते जेसुईट व्रतस्थांना घ्यावी लागतात. 
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • ‘सोसायटी ऑफ जेसुईट’चा लोगो आणि फादर स्टॅन स्वामी
  • Fri , 30 July 2021
  • पडघमसांस्कृतिक‘सोसायटी ऑफ जेसुईटSociety of Jesusफादर स्टॅन स्वामीStan Swamy

ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी म्हटले की, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे, धर्मांतर करणारे लोक अशी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. जेसुईट धर्मगुरू शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात, पण यापैकी अनेकांनी ना कुणाचे धर्मांतर केलेले असते, ना कुणाचा बाप्तिस्मा. ‘गरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा’ ही तीन व्रते जेसुईट व्रतस्थांना घ्यावी लागतात. कुठल्याही जेसुईटाला स्वतःचे घर व मालमत्ता राखता येत नाही. जेसुईट होणे ही प्रक्रिया साधीसुधी नसते. यासाठी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन तत्त्वज्ञान, ईशज्ञान वगैरे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात. त्यामुळे यात गळतीचे प्रमाण प्रचंड असते.     

..............................................

या महिन्यात ‘सोसायटी ऑफ जेसुईट’ किंवा ‘जेसुईट’ (येशूसंघ) या कॅथॉलिक धर्मगुरूंच्या संस्थेचे नाव अचानक भारतातील आणि जगातील प्रसारमाध्यमांत चर्चेला आले. नजीकच्या काळातही काही संघटनांनी चालू केलेल्या आंदोलनामुळे या संस्थेचे नाव चर्चेत राहील अशीच चिन्हे आहेत. याचे कारण म्हणजे झारखंडमध्ये आदिवासी समाजात काम करणारे आणि ‘दहशतवादी’, ‘अर्बन नक्सल’, ‘माओवादी संघटनां’चे हस्तक वगैरे आरोपांखाली तुरुंगात डांबलेले ८४ वर्षांचे फादर स्टॅन स्वामी न्यायालयाकडून जामिनाची वाट पाहत अखेरीस निधन पावले.

फादर स्टॅन स्वामी या जेसुईट संस्थेचे सदस्य होते.

आताचे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेचे पहिलेच धर्मगुरू आहेत.

सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर आणि इतर सहकाऱ्यांसह  १५४० साली ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संस्थेची स्थापना केली आणि कॅथोलिक चर्चमध्ये ‘सुधारणा युग’ सुरू केले असे म्हणतात. सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला (१४९१- १५५६) यांचा सण ३१ जुलै रोजी असतो. जेसुईटांच्या सर्व संस्थांत आणि शाळा-कॉलेजांत हा सण नाताळ आणि ईस्टरच्या खालोखाल मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो.   

जुना गोवामध्ये बाँम जेजू बॅसिलिका येथे सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे अवशेष अजूनही जपून ठेवले आहे. तीन डिसेंबरला सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या सणानिमित्त तिथं मोठी यात्रा भरते. या दिवशी गोवा सरकारतर्फे सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

कॅथोलिक चर्च ही जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. तिचे जाळे जगभर अगदी वरपासून म्हणजे रोमस्थित धर्मप्रमुख पोप यांच्यापासून थेट गावपातळीपर्यंत पोहचलेले असते. चर्च ही संघटना आपल्या डायोसिसन आणि रिलिजियस धर्मगुरूंच्या आणि नन्सच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत असते. कॅथोलिक चर्चसारखे संपर्काचे आणि कार्याचे सर्वदूर जाळे असणारी जगात दुसरी कुठलीही संस्था नसावी.

कॅथोलिक चर्चमध्ये दोन प्रकारचे धर्मगुरू असतात- सेक्युलर आणि रिलिजियस. एका विशिष्ट डायोसिस म्हणजे धर्मप्रांतात काम करणाऱ्या धर्मगुरूंना डायोसिसन किंवा धर्मप्रांतीय धर्मगुरू म्हटले जाते. डायोसिसन धर्मगुरूंना ‘सेक्युलर धर्मगुरू’ असेही म्हटले जाते. प्रत्येक धर्मप्रांताचे प्रमुख बिशप असतात आणि डायोसिसन धर्मगुरू हे या बिशपांच्या अखत्यारीत आणि त्या धर्मप्रांताच्या हद्दीत काम करत असतात. पुणे धर्मप्रांतात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश होतो.   

त्याशिवाय चर्चमध्ये विविध किंवा विशिष्ट कार्यांना स्वतःला वाहून घेणाऱ्या धर्मगुरूंच्या रिलिजियस संस्था-संघटनाही आहेत. त्यांच्या सदस्यांना ‘रिलिजियस धर्मगुरू’ म्हटले जाते. त्यापैकीच इग्नेशियस ऑफ लोयोलाने स्थापन केलेली ‘सोसायटी ऑफ जिझस’ ही संस्था. तिच्या सदस्यांना ‘जेसुईट्स’ असे म्हणतात. त्याशिवाय डॉन बॉस्को यांनी स्थापन केलेली ‘सालेशियन्स ऑफ डॉन बॉस्को’ ही धर्मगुरूंची संस्था प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करते. त्यांची शाळा-महाविद्यालये जगभर नावाजलेली आहेत. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ही मदर तेरेसा यांनी स्थापन केलेली नन्सची संस्था अनाथांसाठी आणि वृद्धांसाठी काम करते.      

शक्यतो डायोसिसन वा सेक्युलर धर्मगुरूंचीच वरच्या बिशपपदावर नेमणूक होते. आर्चबिशप आणि  कार्डिनल ही त्यावरची पदे. जगातल्या ११०च्या आसपास कार्डिनलांमधून एकाची पोपपदावर निवड होते. रिलिजियस संस्थेने परवानगी दिल्यास रिलिजियस धर्मगुरूसुद्धा बिशप होऊ शकतात आणि पोपसुद्धा, आताच्या पोप फ्रान्सिस यांच्याप्रमाणे. अशा प्रकारे नाशिकचे पहिले बिशप थॉमस भालेराव हे रिलिजियस - जेसुईट- धर्मगुरू होते, तर पुण्याचे बिशप थॉमस डाबरे आणि वसईचे बिशप फेलिक्स मच्याडो हे सेक्युलर - डायोसिसन - धर्मगुरू आहेत.          

मध्ययुगीन ख्रिस्ती धर्मात नवचैतन्य आणण्यात जेसुईट फादरांनी अत्यंत मोलाची कामगिरी पाडली आहे. येशूसंघीयांना त्यामुळेच ‘चर्चचे सैनिक’ असे म्हटले गेले. जेसुईट धर्मगुरू हे अत्यंत पुरोगामी आणि शिक्षण, समाजकार्य, साहित्य वगैरे अनेक क्षेत्रांतील जनक मानले गेलेले आहेत. पृथ्वी सपाट आहे आणि विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी व मानव आहे, असे पूर्वी मानले जायचे. त्याविरुद्ध मत मांडणाऱ्या शास्त्रज्ञांकडे मध्ययुगीन काळात चर्चतर्फे वक्रदृष्टीने पाहिले गेले. या पार्श्वभूमीवर खगोलशास्त्रात गेली काही शतके जेसुईट धर्मगुरूंनी फार मोलाची भर घातली आहे, हे सांगितले तर अनेकांना आश्चर्य वाटू शकते.

सम्राट अकबराने आपल्या दरबारात भिन्न धर्माच्या पंडितांना निमंत्रित केले होते. या पंडितांमध्ये त्या काळी गोव्यात असलेल्या युरोपियन जेसुईट धर्मगुरूंचाही समावेश होता. त्या वेळेस पोर्तुगीजांच्या अमलात असलेल्या गोव्यातून युरोपियन असलेले रुडाल्फ अक्वाविवा आणि त्यांचे इतर सहकारी येशूसंघीय धर्मगुरू मुघल दरबारात गेले. मुघल दरबारात १५८० ते १५८३ या काळात आणि नंतरही उपस्थित राहणारे जेसुईटस पहिल्याच युरोपियन, पाश्चात्य व्यक्ती.

सम्राट अकबराने आपल्या धर्माविषयी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली म्हणून हे येशूसंघीय धर्मगुरू खूष होते. अकबर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करील असे त्यांना वाटले. मात्र सम्राट जलालुद्दीन अकबराने त्यांची घोर निराशा केली. मुघल सम्राटाने विविध धर्माच्या पंडितांशी चर्चा जरूर केली, मात्र यापैकी कुठलाही धर्म न स्वीकारता त्याने ‘दिने इलाही’ हा स्वतंत्र धर्म स्थापन केला!    

त्यानंतर गोव्यात कुंकोळी या गावात  पाच जेसुईटांसह इतरांच्या केलेल्या हत्येत सम्राट अकबराच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या जेसुईटांचे प्रमुख असलेल्या रुडाल्फ अक्वाविवा यांचाही समावेश होता. 

 जेसुईटांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज किंवा राजकीयदृष्ट्या असुरक्षित होण्याच्या भीतीने युरोपातील काही राष्ट्रांनी म्हणजे पोर्तुगाल, फ्रान्स, स्पेन वगैरेंनी सोसायटी ऑफ जिझसच्या कार्यावर बंदी घातली होती आणि जेसुईटांना आपापल्या देशांतून हद्दपार केले होते. यात पोर्तुगालच्या ताब्यातील गोव्याचाही समावेश होता. खुद्द कॅथोलिक चर्चतर्फे म्हणजे पोप चौदावे क्लेमेंट यांनीही १७७३ साली आदेश काढून धर्मगुरूंच्या या संस्थेवर बंदी घातली. ‘सप्रेशन ऑफ सोसायटी ऑफ जिझस’ या नावाने ही बंदी ओळखली जाते. ती पोप सातवे पायस यांनी १८१४ साली उठवली. 

श्रीरामपूरला दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी स्वतः गोव्याला जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी गेलो होतो. त्या प्रशिक्षणाच्या पाच वर्षांच्या काळात आणि कॉलेज जीवनात येशूसंघीयांची काम करण्याची तळमळ, धडपड आणि अपार कष्ट घेण्याची, त्रास सहन करण्याची तयारी मी जवळून अनुभवली आहे. जेसुईट जीवन मी जगलो आहे. नंतर मी जेसुईट व्रतस्थ जीवन जगण्याचा निर्णय बदलला तरी ‘वन्स अ जेसुईट, अल्वेज अ जेसुईट’ या म्हणीची काही मित्र मला अजूनही आठवण करून देत असतातच.    

फादर थॉमस स्टीफन्स हे गोव्याच्या भूमीत पाय ठेवणारे पहिले ब्रिटिश जेसुईट. त्यांनी मराठी भाषा शिकून मराठीत ‘ख्रिस्तपुराण’ रचले आणि १६०६ साली ते छापले गेले. गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीस रोमन लिपीत छापला गेलेला ‘ख्रिस्तपुराण’ हा मराठी भाषेतला पहिलावहिला ग्रंथ. पोर्तुगीजांनी गोव्यात छापण्याचे यंत्र आणले, तेव्हा देवनागरी लिपीत छापणे शक्य नसल्याने हे ‘ख्रिस्तपुराण’ रोमन लिपीत प्रसिद्ध झाले. पुण्यात प्रसाद प्रकाशनाच्या य. गो. जोशी यांनी अहमदनगरचे शांताराम बंडेलू-संपादित ‘ख्रिस्तपुराण’ १९५६ साली देवनागरी लिपीत प्रसिद्ध केले. 

भारतात शिक्षणक्षेत्रात जेसुईट्स फादरांचे फार मोठे योगदान आहे. मुंबईचे झेव्हियर कॉलेज, जमशेदपूर येथील झेव्हियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट ही भारतातील अग्रगण्य मॅनेजमेंट शैक्षणिक संस्था आहे. पुण्यातल्या लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट स्कूल या दोन नामवंत शाळा येशूसंघीय धर्मगुरूच चालवतात.  

पुण्यात अहमदनगर रोडवर रामवाडी येथे डी नोबिली कॉलेज यासारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे थियॉलॉजी कॉलेज जेसुईट संस्था चालवते. पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या १९८६च्या भारत भेटीत या संस्थेला भेट दिली होती.

‘गरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा’ ही तीन व्रते जेसुईट व्रतस्थांना घ्यावी लागतात. कुठल्याही जेसुईटाला स्वतःचे घर व मालमत्ता राखता येत नाही. जेसुईट होणे ही प्रक्रिया साधीसुधी नसते, यासाठी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन तत्त्वज्ञान, ईशज्ञान वगैरे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात. त्यामुळे यात गळतीचे प्रमाण प्रचंड असते.     

महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांत जेसुईट्स धर्मगुरूंच्या कार्यांचा, मिशनरी व्रताचा आणि नि:स्वार्थ सेवापद्धतीचा फार गाढा प्रभाव पडला आहे. जेसुईटाचे अनेक क्षेत्रांत चाललेले काम जवळून पाहिले म्हणजे ‘मिशनरी सेवावृत्तीने काम’ असे का म्हटले जाते, ते कळते.  

महात्मा गांधी यांचे गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना केली तेव्हा या संस्थेच्या घटनेसाठी त्यांनी ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संस्थेची घटना आधारभूत मानून आपल्या संस्थेसाठी तशी कार्यपद्धती स्वीकारली. पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी आधुनिक शिक्षणसंस्था स्थापन केल्या, त्या जेसुईट मिशनरींच्या मिशनरी कार्याने प्रभावित होऊनच. लोकमान्य टिळकांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मानधन, पगारी सेवा यांविषयी अनेकदा वाद होई, याचे कारण म्हणजे  संस्थेच्या विश्वस्तांनी संन्याशी असलेल्या जेसुईटांच्या मिशनरी वृत्तीने सेवा करावी, असा टिळकांचा आग्रह असायचा आणि हे विश्वस्त होते प्रापंचिक मंडळी. लोकमान्य टिळकांचे चरित्रकार नरसिंह चिंतामणी केळकर यांनी याविषयी विस्तृतपणे लिहिले आहे.

लोकमान्य टिळक यांच्या एका इंग्रजी चरित्रात टिळक आणि आगरकर यांना ‘इंडियन जेसुइट्स’ असे उल्लेखून त्यावर एक पूर्ण प्रकरणच आहे. हे प्रकरण वाचले म्हणजे जेसुईटांचा महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक  प्रबोधनावर पडलेल्या प्रभावाची कल्पना येते.        

जेसुईट्स संस्थेची कार्यपद्धती, एकत्र भोजन पद्धती आणि अविवाहित राहून नि:स्वार्थपणे सेवा करण्याची पद्धत अनेकांना भावली आहे. त्यामुळे भारतात अनेक संस्था आणि संघटनांनी आपल्या कार्यासाठी जेसुईटांचे अनुकरण केले आहे. 

जेसुईट संस्थेच्या धर्मगुरूंची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे आणि त्या खालोखाल भारतात. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रांत आज अनेक व्यक्ती आघाडीवर काम करत आहेत. त्यापैकी अनेक जण जेसुईट संस्थांत शिकलेले असतील. अशा लोकांच्या नावाची यादी खूप मोठी असेल.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेसुईटांनी अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, सोनगाव, केंदळ गावांत शाळा उघडल्या, तेव्हा स्पृश्य आणि अस्पृश्य जातींच्या मुलांसाठी पहिल्यांदाच एकत्रितपणे शिक्षण दिले जाऊ लागले होते. जेसुईट धर्मगुरू हातातली घंटी वाजवत गावातल्या मुलांना शाळेत बोलावत असत. त्याआधी खालच्या जातींतील मुलांना शाळेत येण्याचे असे आमंत्रण कुणीच दिले नव्हते.

आज स्वित्झर्लंडमध्ये शंभरीत असलेले जेसुईट फादर हार्मन बाखर यांनी महाराष्ट्रात अहमदनगर  जिल्ह्यात १९६० आणि ७०च्या दशकांत ग्रामविकासाची मुहूर्तमेढ रोवली होती हे विशेष. अण्णा हजारे आणि इतरांचे ग्रामविकास कार्य त्यानंतर कितीतरी वर्षांनंतरचे.        

मराठीत काही मोजक्याच नियतकालिकांनी शंभरी पूर्ण करून आजही प्रकाशन चालू ठेवले आहे. जर्मन जेसुईट धर्मगुरु हेन्री डोरींग यांनी अहमदनगर जिल्ह्यात राहुरीजवळ केंदळ या गावी ‘निरोप्या’ हे मासिक १९०३ साली सुरू केले, ते आजही जेसुईटांतर्फे पुण्यातून ‘स्नेहसदन’ येथून प्रसिद्ध होत आहे. डोरींग १९०७ साली पुण्याचे दुसरे बिशप बनले. रोमला पोप यांच्या भेटीला गेले असताना पहिले महायुद्ध सुरू झाल्याने जर्मन असल्याने त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतात परतणे अशक्य झाले. त्या काळात ‘निरोप्या’चे प्रकाशन खंडित झाले होते. महायुद्ध संपताच तोपर्यंत आर्चबिशप बनलेले डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला परतले आणि ‘निरोप्या’चे प्रकाशन पुन्हा सुरू केले, ते  अलीकडचा करोनाकाळाचा अपवाद वगळता आजतागायत सुरू आहे.   

पुण्यातील स्नेहसदन या आंतरधर्मीय संशोधन केंद्राचे संस्थापक मॅथ्यू लेदर्ले हेसुद्धा जेसुईट होते. पुणे शहराच्या साहित्य, सांस्कृतिक, रंगभूमी, वैचारिक, शैक्षणिक वगैरे अनेक क्षेत्रांत ‘स्नेहसदन’ने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.

जेसुईट संस्थेच्या धर्मगुरूंचे कार्य नेहमीच मूलभूत स्वरूपाचे राहिलेले आहे. ते नेहमी नाविन्याच्या शोधात असतात. त्यासाठी आपण बांधलेली मोठीमोठी मंदिरे, नावाजलेल्या शाळा-संस्था वगैरे सर्व स्थानिक बिशपांच्या धर्मप्रांताकडे, डायोसिसन वा सेक्युलर धर्मगुरूंकडे सोपवून ते नव्या वाटा, नवे आव्हाने स्वीकारण्यासाठी कुठलेही पाश मागे न ठेवता तेथून चक्क निघून जातात, तेथे मालक म्हणून पुन्हा कधीही न येण्यासाठी.

अशा प्रकारची नि:स्वार्थी सेवा आणि मिशनकार्य दुसरीकडे कुठेही सापडणार नाही. पुण्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक चर्चेस आणि शाळा-संस्था जेसुईटांनी स्थापन केल्या आहेत. त्यापैकी बहुतेक सर्व आता डायोसिसन धर्मगुरूंकडे सोपवण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात माझी एक कटू आठवण आहे. हरेगावचे मोठे शिखर असलेले टोलेगंज संत तेरेजा चर्च जर्मन जेसुईट फादर जॉन हाल्दनर यांनी १९६०च्या दशकात बांधले. सप्टेंबर महिन्यात भरणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेसाठी हे तीर्थक्षेत्र आज ओळखले जाते. या यात्रेनिमित्त जेसुईटांतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘निरोप्या’च्या स्टॉलला मी अनेकदा मदत करत असतो. हरेगाव धर्मग्राम आता जेसुईटांकडे नाही, तर डायोसिसन धर्मगुरूंकडे आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे आयोजकांचे उत्पन्नाचे मोठे साधन, हे आता सर्वच धर्मांबाबत झाले आहे. इथेही तो अपवाद नाही.

तर ‘निरोप्या’च्या स्टॉलवर येऊन दीडशे रुपयांची पावती फाडावी, अशी मागणी तेथील स्थानिक डायोसिसन धर्मगुरूने आमच्याकडे केली. चर्चची ती भलीमोठी जागा, तेथील शाळा आणि शेतजमीन ही सर्व जेसुईटांच्या कठोर श्रमांची कमाई… पण जेसुईटांच्या मासिकाच्या दोन दिवसांच्या स्टॉलसाठी फी मागितली जात होती. त्या वेळी मला त्या धर्मगुरूचा राग आणि कीवसुद्धा आली.

ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी म्हटले की, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे, धर्मांतर करणारे लोक अशी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. जेसुईट धर्मगुरू शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात, पण यापैकी अनेकांनी ना कुणाचे धर्मांतर केलेले असते, ना कुणाचा बाप्तिस्मा. बाप्तिस्मा देण्याचे, लग्न लावण्याचे अधिकार फक्त पॅरीश प्रिस्टला म्हणजे चर्चमधील धर्मगुरूंना असतात. 

गेली काही दशके अनेक राष्ट्रांत काम करणारे जेसुईट आणि इतरही कॅथोलिक धर्मगुरू स्थानिक शोषित, पिडीत आणि गांजलेल्या समाजघटकांच्या बाजूने उभे राहत आहेत. लॅटिन अमेरिकेतील तसेच तिसऱ्या जगातील अनेक देशांत ‘मुक्तीचे ईशज्ञान’ (‘लिबरेशन थियॉलॉजी’) या संज्ञेने आणि चळवळीने कॅथॉलिक धर्मगुरूंमध्ये खूप मूळ धरले आहे. सत्ताधारी आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध ‘लिबरेशन थियॉलॉजी’ लढा पुकारते. अनेकदा यापैकी अतिउत्साही, मार्क्सवादाशी जवळीक करणाऱ्या  धर्मगुरूंना वेसण घालणे कॅथोलिक चर्चला भाग पडले आहे.        

मुंबईतील झेव्हियर कॉलेजात इतिहास शिकवणाऱ्या स्पॅनिश धर्मगुरू हेन्री हेरास यांचे प्राच्यविद्याशास्त्र (इंडॉलॉजी) विषयातील संशोधन महत्त्वाचे मानले जाते. फादर कामिल बुल्के हे  बेल्जीयन जेसुईट धर्मगुरू हिंदी भाषेत डॉक्टरेट मिळवणारी पहिली व्यक्ती. अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’  या प्रबंधावर ही पदवी मिळवली. फादर बुल्के यांनी ‘इंग्रजी- हिंदी शब्दकोश’ तयार केला. त्याशिवाय ‘तुलसीरामायणा’वरील त्यांचे संशोधन आजही पायाभूत स्वरूपाचे मानले जाते. 

भारतातील अनेक राज्यांतील, विशेषतः दक्षिणेकडील राज्यांतील अनेक भाषांत जेसुईटफादरांनी मूलभूत स्वरूपाचे योगदान दिले आहे. रॉबर्ट डी नोबिली (१५९७-१६५६) हे जेसुईट धर्मगुरू संस्कृत आणि तामिळ भाषेचे पंडित होते. त्यांनी संस्कृत भाषेतील अभिजात साहित्याची पाश्चात्य जगाला पहिल्यांदाच ओळख करून दिली असे म्हणतात. फादर थॉमस बेस्ची (१६८०-१७४७) यांनी लिहिलेले ‘तंबोवाणी’ काव्य हे तामिळ भाषेतील एक अभिजात साहित्य मानले जाते.      

गेली काही वर्षे अफगाणिस्तानात स्थानिक लोकांना मदत करण्यासाठी तालिबानींच्या दहशतीची पर्वा न करता पुण्यातील फादर स्टॅन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील जेसुईटांची एक तुकडी ‘जेसुईट रेफ्युझी सर्व्हिस’ अंतर्गत तेथे काम करत होती, हेही इथे आवर्जून सांगायला हवे. त्यापैकी एक केरळचे जेसुईट फादर अलेक्सीस प्रेम कुमार यांचे २०१५ साली अपहरण झाले होते आणि भारत सरकारच्या मध्यस्थीने त्यांची नंतर सुटका झाली.

जेसुईटांच्या जगभरच्या कार्याच्या मोठ्या जाळ्यामुळे संस्थेचे प्रमुख असलेले सुपिरियर जनरल यांना चर्चमध्ये पोप यांच्याखालोखाल महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शुभ्रवस्त्रधारी पोप यांच्यासमोर काळा झगा घालणाऱ्या जेसुईट सर्वोच्च अधिकारी सुपिरियर जनरल यांना ‘ब्लॅक पोप’ असेही म्हटले जायचे.

अर्तुरो सोसा हे सोसायटी ऑफ जिझसचे सध्याचे सुपिरियर जनरल आहेत. २०१६ साली व्हेनेझ्युला या देशाच्या सोसा यांची या पदावर निवड झाली तेव्हा `मिशी असलेले' सुपिरियर जनरल म्हणून प्रसारमाध्यमांने त्यांची दखल घेतली. कारण म्हणजे पाश्चात्य देशात दाढीमिशा ठेवण्याची प्रथा असली तरी फक्त मिशा सहसा कुणी ठेवत नाही. मिशाधारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, किंवा पोप अशी कल्पना करुन बघा.

काही वर्षांपूर्वी अडॉल्फो निकोलस हे जेसुईट सुपिरियर जनरल (ब्लॅक पोप) असताना भारतदौऱ्यावर आले, तेव्हा पुण्यात मी त्यांची मुलाखत घेतली होती. 


चर्चच्या इतिहासात आता पहिल्यांदाच पोप आणि ब्लॅक पोप हे दोघेही जेसुईट आहेत!

जेसुईट असलेले सध्याचे पोप फ्रान्सिस आणि जेसुईट संस्थेचे सुपिरियर जनरल यांच्या नाते कसे असेल? जेसुईट संस्थेच्या मेळाव्यात पोप फ्रान्सिस हे आयुष्यभर एक सामान्य जेसुईट असतील, मात्र जेसुईट सुपिरियर जनरल पोप यांना चर्चच्या कारभाराविषयी कुठलाही आदेश देऊ शकत नाही. 


ख्रिस्ती (कॅथोलिक वा प्रोटेस्टंट) धर्मगुरु आपल्या नेहेमीच्या झग्यात नसले कि ते आपल्या कॉलरभोवती पांढऱ्या रंगाची पट्टी अडकवतात. या पट्टीला 'रोमन कॉलर' असे म्हणतात. ख्रिस्ती धर्मगुरुंना ओळखण्याची ही एक खूण. इंग्रजी चित्रपटांत अनेकदा धर्मगुरू असेच दिसतील



या फोटोतील जेसुईट सुपिरियर जनरल सोसा आणि इतर धर्मगुरूंनी रोमन कॉलर लावली आहे.