Did you like the article?

Saturday, May 29, 2021

``ऐ मेरे अहमदनगर, मेरा सलाम कबूल कर !'' 

पोर्तुगीज राजवटीतून गोवा १९६१ साली मुक्त झाला तेव्हापासून गोव्याची राजधानी पणजी  (Panaji)  या अधिकृत नावाने ओळखली जाऊ लागली, सरकारी ऑफिसांवर, कागदपत्रांत पणजी हेच नाव देवनागरी आणि इंग्रजीत म्हणजे रोमन लिपीत लिहिले जाते.

मात्र आजही गोव्यातल्या इंग्रजी दैनिकांनी आणि अनेक नागरीकांनी गोव्याच्या या राजधानीचे नाव  Panjim  असेच राखून ठेवले आहे. 

पत्रकारितेची मी जेथे सुरुवात केली त्या नवहिंद टाइम्स या वृत्तपत्रात शहराचे नाव Panjim  असेच लिहायचे असा अलिखित नियम होता, आजही आहे. पूर्वी पोर्तुगीज भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या आणि आता इंग्रजीत प्रसिद्ध होणाऱ्या हेराल्ड ने सुद्धा शहराच्या Panjim  नावाच्या स्पेलिंगमधे बदल करण्यात ठाम नकार दिला आहे.

गोव्यात म्हापसा, मडगाव, कलंगुट  वगैरे ठिकाणी बस स्टॅण्डवर खासगी बसचे कंडक्टर कोकणी  भाषेत  ''पोणजे, पोणजे'' असे मोठ्याने ओरडत प्रवाशांना आकर्षित करत असतात.  

मागे बार्देसकरांच्या इतिहासावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये मी बेळगाव शहराऐवजी `बेळगावी'  हे नाव वापरले तेव्हा मोठा गदारोळ उडाला होता.

ट्रोलिंग म्हणजे काय हे मी तेव्हा पहिल्यांदा अनुभवले.आणि मी काही मिनिटांत सीमावर्ती भागांतील लोकांच्या भावना ओळखून माफी मागून लगेचच बेळगाव अशी  दुरुस्ती केली होती.

आज अहमदनगरचा ५३१ वा स्थापनादिन ! आमचे कुटुंब मूळचे मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातले पण माझा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचा. मी महाराष्ट्र सोडून गोव्याला गेलो १९७७ ला,  तोपर्यंत अहमदनगर हे शहर अहमदनगर म्हणूनच ओळखले जायचे.

१९९०च्या दशकात मी महाराष्ट्रात परतलो तेव्हा या जिल्ह्यात नव्यानेच सुरु झालेल्या दैनिकांच्या आवृत्त्यांनी अहमदनगर या शहराचे `नगर' असे `सुटसुटीत'  नाव ठेवले आहे असे मला दिसले.

विशेष म्हणजे मराठीतील सर्व प्रमुख दैनिकांनी अगदी `एकमताने' या शहराचे असे नामकरण केले आहे.

म्हणजे गोव्यात जशी परिस्थिती आहे त्याच्या अगदी उलट.

आज अहमदनगरच्या स्थापनेनिमित्त सोशल मिडियावर लिहिणाऱ्या म्हणजे आनंद शितोळे, अनुपमा निरंजन उजगरे वगैरेंनी मात्र या शहराचा उल्लेख अहमदनगर असाच केला आहे हे विशेष. 

`काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर' असे आनंद शितोळे यांनी वर्णन केले आहे.

अहमदनगर हे मलिक अंबर, चांदबिबीचे शहर, इथेच संभाजीपुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या तुरुंगात होते, इथेच औरंगजेबाचा मृत्यू  झाला, 

इथेच तुरुंगात असताना पंडित नेहरुंनी `डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 

इथले भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी स्थापलेले अहमदनगर कॉलेज हे या जिल्ह्यातील पहिले उच्च शिक्षणाचे केंद्र. अहमदनगर शहर हे ख्रिस्ती मिशनरींच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे महत्त्वाचे केंद्र.

अमेरिकन मिशनच्या मिस सिंथिया फेरार यांनी मुलींच्या शाळा येथे सुरु करुन स्त्री शिक्षणाबाबत अत्यंत महत्त्वाचे कार्य येथे केले. 

या शहरात मुक्काम करण्याचा मला कधी  योग आला नाही.  माझ्या  प्रवासाची वाट मात्र कायम या शहरातूनच राहिलेली आहे हे मी कधीही विसरत नाही.      

``ऐ मेरे अहमदनगर,

मेरा सलाम कबूल कर !''

असे  अनुपमा निरंजन उजगरे यांनी लिहिले आहे.

माझ्या भावना अगदी अशाच आहेत.

Saturday, May 22, 2021

 

डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना ‘अमेरिकेचे महात्मा गांधी’ संबोधले जात असले, तरी त्यांचे चरित्र आणि कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिक जवळचे आहे!
‘अक्षरनामा’  पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • Fri , 14 May 2021
  • पडघमसांस्कृतिकडॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर)Martin Luther KingJr.डॉ. बाबासाहेब आंबेडकरBabasaheb Ambedkarवर्णभेदApartheidअस्पृश्यताUntouchabilityजातीयताCasteismमहात्मा गांधीMahatma Gandhi

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कोकणी साहित्यिक रवीन्द्र केळेकर यांनी एका लेखात म्हटले आहे -  “मी भाग्यवंत गोवेकर. खूप मोठमोठी माणसं जवळून पाहण्याचं भाग्य लाभलं मला. काही जणांच्या अगदी जवळही पोहोचलो. त्यातलाच एक मार्टिन ल्युथर किंग. १९५८-५९ सालातील गोष्ट. (गांधीवादी विचारवंत) आचार्य काकासाहेब कालेलकर अमेरिकेचा दौरा करून आले होते. आल्यानंतर अमेरिकेत आपण काय पाहिलं, ते भेटायला आलेल्या आपल्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं होतं- ‘नायगाराचा धबधबा पाहिला आणि तिशीतला एक निग्रो वीर पाहिला. दक्षिण आफ्रिकेत कार्य करणाऱ्या बापूंचाच अलीकडचा अवतार वाटला. त्याच्याकडे जाऊन राहिलो. बापूंच्याच प्रेरणेने तो तिथे निग्रोंमध्ये कार्य करत आहे.’ ”

कालेलकरांनी मार्टिन ल्युथर किंग यांच्या कार्याविषयी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी चर्चा केली आणि गांधी निधीच्या वतीने त्या तरुणाला भारतभेटीसाठी येण्या-जाण्याची तिकिटे पाठवून दिली. केळेकर लिहितात – ‘त्याप्रमाणे मार्टिन पत्नीला आणि सोबत्याला घेऊन हिंदुस्थानात आला. खूप ठिकाणी फिरला. खूप जणांना भेटला.’

निग्रोंच्या हाल अपेष्टांबद्दलही केळेकर यांनी लिहिले आहे, ‘‘अमेरिकेतील निग्रोंनी गोऱ्यांचा खूप त्रास सहन केला आहे. आपल्या दलित बांधवांनी सोसला त्याच्यापेक्षा थोडाही कमी नाही. जास्तच म्हटलं तरी चालेल. मार्टिन ल्युथरच्या नेतृत्वाखाली या लोकांनी गांधीजींच्या मार्गाने आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार केला. मार्टिनच्या आत्मकथेत त्यांच्या या छळाची वर्णने आली आहेत आणि त्याच्या प्रतिकारासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा वृत्तांतही आलेला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. इतकं असूनही अन्याय करणाऱ्यांविषयी मार्टिनच्या लेखनात एकही वाईट शब्द आलेला नाही. गांधीजींच्या वाटेने तो आपल्या सोबत्यांना घेऊन एक-एक विजय मिळवत पुढे गेला आणि गांधीजींसारखीच शरीरावर गोळी झेलून एक दिवशी त्याने मरणाला मिठी मारली.”

या डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना ‘अमेरिकेचे महात्मा गांधी’ संबोधले जाते. असे असले तरी त्यांचे चरित्र आणि कार्य गांधींपेक्षा डॉ. आंबेडकरांच्या अधिक जवळचे आहे असे मला वाटते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ या पुस्तकाचे लेखन मी पूर्ण केले, तेव्हा माझा असा ठाम विश्वास निर्माण झाला. 

‘बाबासाहेब आंबेडकरांचे जीवित कार्य नि:संशय ऐतिहासिक स्वरूपाचे होते. त्यांना आपले कार्यक्षेत्र सापडावे लागले नाही. ते जन्मत:च त्यांच्या वाटेला आले होते. त्यांनी ते उघड्या डोळ्यांनी निःशंकपणे स्वीकारले.’’ असे गं. बा. सरदार यांनी म्हटले आहे.

ही वाक्ये मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनाही लागू पडतात. हे महान नेते बहुसंख्य समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील कुटुंबात जन्माला आले. या दोन्ही नेत्यांच्या समाजाला प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा हक्क नाकारला गेला होता. एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी कायद्याने रद्द केली होती. विसाव्या शतकाच्या अखेरीस मोहनदास करमचंद गांधी या भारतीय व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवून समानतेच्या हक्कासाठी पुढे दीर्घकाळ चालणाऱ्या या लढ्यासाठी शिंख फुंकले होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अस्पृश्‍य समाजाच्या लोकांना ज्या प्रकारच्या मानहानीची वागणूक मिळत असते, त्याच प्रकारे अमेरिकेत काळ्या वर्णाच्या लोकांना अत्यंत वाईट प्रकारे वागवले जात असे. डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेमुळे अस्पृश्‍यता पाळणे कायद्यानुसार गुन्हा झाला.

त्यानंतरही दोन दशके म्हणजे १९६५पर्यंत पुढारलेल्या, एक जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत काळ्या मुलांसाठी वेगळ्या शाळा, काळ्या लोकांसाठी वेगळे बगीचे, वेगळ्या वस्त्या, वेगळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वेगळे थिएटर आणि बसमध्ये मागे बसण्याची जागा असायची.

आता इतिहासकाळात जमा झालेल्या अस्पृश्‍यता पद्धतीविषयी आणि जाती-पोटजातींनी निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेविषयी आपल्याकडे बरेच लिखाण झाले आहे. मात्र अमेरिकेसारख्या प्रगत देशाने चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी केली, तोपर्यंत तिथे काळ्या लोकांना बसमध्ये गोऱ्या लोकांच्या रांगेत बसण्याची, बगीच्यात किंवा चित्रपटगृहांत बसण्याची आणि मतदान करण्यास कायद्याने बंदी होती, हे वाचून धक्काच बसतो.

विसाव्या शतकाच्या पाचव्या-सहाव्या दशकात रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांनी अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांच्या नागरी हक्कांसाठी संघर्ष केला. रोझा पार्क्स या काळ्या महिलेने १९५५ साली माँटगोमरी शहरात बसमधील आपली जागा गोऱ्या प्रवाशास खाली करून देण्यास नकार दिला, तेव्हा काळे लोक एकत्र आले. माँटगोमरी शहरातील बससेवेवर काळ्या लोकांनी बहिष्कार टाकला. हा बहिष्कार तब्बल वर्षभर चालू राहिला. एक वर्षांनंतर बसमध्ये काळ्या प्रवाश्‍यांना गोऱ्या प्रवाश्‍यांप्रमाणे समानतेची वागणूक मिळण्याचा हक्क आहे, असे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आणि या लढ्याची यशस्वी सांगता झाली. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) हा नेताही या लढ्यातूनच उदयास आला.

एक ख्रिस्ती धर्मगुरू या नात्याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांची अहिंसा तत्त्वावर पूर्ण श्रद्धा होती. प्रथम मॉटगोमेरी बस बहिष्कार प्रकरणात आणि नंतर विविध आंदोलनांत किंग यांची अहिंसेंवरची श्रद्धा कधीही ढळली नाही. येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपला वर्णविरोधी लढा हिंसक होणार नाही, याची किंग यांनी सतत पुरेपूर काळजी घेतली. यामुळे त्यांना अनेकदा आपल्या अनुयायांचा, चळवळीतील लोकांचा रोष पत्करावा लागला.

डॉ. आंबेडकरांनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनात आणि दीर्घकाळ चाललेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरात बाबासाहेबांच्या अनुयायांना डिवचण्याचे, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहण्याचे अनेक प्रसंग घडले. अहिंसा तत्त्व शिकवणाऱ्या गौतम बुद्धाच्या तत्त्वप्रणालीचा बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात स्वीकार केला. मात्र त्याआधी काही दशके त्यांनी आपले लढे सनदशीर मार्गाने लढवले.

डॉ. आंबेडकर ‘कायदेपंडित’ होते. कुठल्याही प्रथेला कायदा वा समाजाची मान्यता असली तरी ती प्रथा वा तो कायदा न्याय्य असतोच असे नाही, याची त्यांना कायदेपंडित या नात्याने जाणीव होती. अस्पृश्‍य समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी अनेक सनदशीर मार्ग हाताळले. गोलमेज परिषदांसारख्या बैठकीत त्यांनी अस्पृश्‍यांचे प्रतिनिधित्व केले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या राजवटीत गव्हर्नरांच्या कौन्सिलात त्यांनी मजूरमंत्री म्हणूनही काम केले. या सनदशीर मार्गाचा कळस म्हणून शेवटी त्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करून हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अस्पृश्‍यता प्रथेचे कायमचे उच्चाटन केले. सनदशीर, कायदेशीर मार्गाचा यशस्वी वापर करण्याचे डॉ. आंबेडकरांसारखे दुसरे असे कोणते मोठे उदाहरण दाखवता येईल?

महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक चळवळीचा आणि त्यांच्या सत्याग्रह या अस्त्राचा किंग (ज्युनियर) यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता. किंग यांनी पत्नी कॉरेटा हिच्यासह १९५९ साली भारताला भेट दिली, त्या वेळी डॉ. आंबेडकरांचे निर्वाण होऊन केवळ तीन वर्षे झाली होती. वर्णभेदाविरुद्ध लढा देणाऱ्या किंग यांना तशाच प्रकारच्या सामाजिक विषमतेविरुद्ध म्हणजे अस्पृश्‍यतेविरुद्ध यशस्वी लढा लढणाऱ्या डॉ. आंबेडकरांविषयी फारसा परिचय नव्हता असे दिसते. अन्यथा मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना तेच अधिक जवळचे वाटले असते. राजघाट, साबरमती आश्रम वगैरे ठिकाणी भेट देताना त्यांनी आपल्या भारत दौऱ्यात चैत्यभूमीला नक्कीच भेट दिली असती!

डॉ. आंबेडकरांनी सामाजिक विषमतेविरुद्ध चालवलेल्या लढ्याची डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना फारशी कल्पना नसावी वा या लढ्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले नसावे, हेसुद्धा साहजिकच आहे. याचे कारण म्हणजे हिंदुस्थानातील परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध चाललेल्या लढ्याकडे जगाचे जितके लक्ष गेले, तितके या देशातील गावकुसातील आणि गावकुसाबाहेरच्या लोकांमधील विषमतेविरुद्ध चाललेल्या संघर्षाकडे जागतिक पातळीवर फार चर्चा झाली नाही.

कृष्णवर्णीयांनी वर्णभेदाविरुद्धचा आपला लढा काव्य, कथा-कादंबरीसारख्या साहित्याच्या माध्यमातून आणि तेही इंग्रजी भाषेतून मांडून आपली व्यथा संपूर्ण जगासमोर मांडली. हिंदुस्थानातील अस्पृश्‍यतेच्या प्रश्‍नावर त्यामानाने इतक्या मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर जागृती केली गेली नव्हती. या संदर्भात जे काही लिहिले गेले, साहित्यनिर्मिती केली गेली, ती हिंदुस्थान पातळीवर, स्थानिक भाषांपुरती मर्यादीत राहिली. जागतिक पातळीवर या प्रश्‍नाचे गांभीर्य प्रकर्षाने मांडले गेले नाही. त्यामुळे या प्रश्‍नाची जगानेही तितक्या प्रखरतेने दखल घेतली नाही.

महात्मा फुले यांनी सर्वप्रथम आणि त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी हा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात मांडला. त्याची समाजाला, तत्कालीन राज्यकर्त्याला दखल घेणे भाग पाडले. किंबहुना अस्पृश्‍यतेच्या प्रश्‍नाला जागतिक स्तरावर मानवी हक्काचा मुद्दा म्हणून उभारण्यास अनेकदा आपल्या देशातूनच नेहमीच प्रखर विरोध झाला आहे. त्यामुळे आपल्या देशाची, संस्कृतीची नाचक्की होते, अशी काही जणांची भावना असते.

किंबहुना हिंदुस्थानात हजारो वर्षांपासून चालत आलेली जन्मावर आधारित जातिनिष्ठ सामाजिक विषमतेविरुद्ध दीर्घकाळ लढा करून आणि नंतर राज्यघटनेद्वारे ही विषमता कायद्याने दूर करणाऱ्या डॉ. आंबेडकरांची ‘आधुनिक मनू’ ही प्रतिमा तोपर्यंत प्रकर्षाने जगासमोर आलीच नव्हती. अन्यथा रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग यांच्याप्रमाणेच डॉ. आंबेडकरांनाही नोबेल हे जागतिक स्तरावरचे पारितोषिक नक्कीच प्रदान झाले असते!

डॉ. आंबेडकर आणि किंग (ज्युनियर) या दोघांचाही लढा मानवजातीच्या समानतेसाठी होता. स्वत:स श्रेष्ठ म्हणवून घेतल्या जाणाऱ्या समाजघटकांनी इतर समाजघटकांना वाळीत टाकल्यामुळे या उपेक्षित घटकातील लोकांना काय वेदना भागाव्या लागतात, याचा या दोन्ही महान नेत्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. दोघांनी दोन वेगळ्या देशांत विषमतेविरुद्ध संघर्ष केला. या दोन्ही नेत्यांचा प्रवास मानवजातीत समता स्थापन करण्यासाठी समांतर दिशेने चालू होता.

स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थानातील अस्पृश्‍यांची सामाजिक स्थिती आणि त्या काळातील अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची स्थिती यामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळेच येथील दलित चळवळीला निग्रो लोकांनी आपल्या हक्कांसाठी चालवलेल्या लढ्याचे आणि निग्रो लोकांच्या विद्रोही साहित्याचे अप्रूप वाटले. रेव्ह. किंग यांचे चरित्र वाचताना हिंदुस्थानात डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या आणि नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशलढ्यांचे स्मरण होते. हे दोन्हीही संघर्ष शांततामय मार्गानेच लढवण्यात आले होते.  

नरहर कुरूंदकर म्हणतात, “व्यापक करुणेचे नैतिक अधिष्ठान असल्याशिवाय समता आणि स्वातंत्र्याचा लढा चालवता येत नाही, एरव्ही हा लढा फक्त द्वेष आणि कटुता वाढवणारा, हिंसा आणि अत्याचार वाढवणारा, विध्वंस आणि विभाजन वाढवणारा ठरतो. तुम्ही नाव बुद्धाचे घ्या, गांधींचे घ्या, बाबासाहेबांचे घ्या अगर किंगचे घ्या, कोणत्या वंदनीय नेत्याचे नाव आपण घेतो हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मुद्दा एकात्म राष्ट्रवादात गृहीत असणाऱ्या बंधुत्वाचा व त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या व्यापक करूणेचा आशय आपणास मान्य आहे काय, हा आहे.”

हिंदुस्थानात अनेक शतकांपासून चालत असलेली अस्पृश्‍यता आणि जागतिक पातळीवर अनेक देशांत काळ्या लोकांना दिली जाणारी वंशभेदाची वागणूक, या दोन्हीं बाबींना एकाच पारड्यात टाकता येणार नाही, असे अनेकदा म्हटले जाते. तरीदेखील अस्पृश्‍यता आणि काळ्या लोकांना त्यांच्या वर्णामुळे दिली जाणारी वागणूक यात गुणात्मक काहीही फरक नाही हे वास्तव मान्य करायलाच हवे.

रावसाहेब कसबे यांनी डॉ. आंबेडकरांच्या या व्यक्तिमत्त्वाचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे - “बाबासाहेबांचा विचार दोन पातळ्यांवर करावा लागतो. एका पातळीवर त्यांनी अस्पृश्‍यवर्गाच्या हक्कासाठी केलेले संघटन, प्रबोधन, चळवळ आणि संघर्ष अभ्यासावे लागतात, तर दुसऱ्या पातळीवर संपूर्ण भारतीयांसाठी आणि अंतिमत: एकूण मानवजातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान समजून घ्यावे लागते. यापैकी कोणत्याही एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले तर बाबासाहेबांचे एकारलेले, संकुचित, विकृत चित्र रंगवले जाण्याचा धोका असतो.”

डॉ. आंबेडकरांच्या कार्याविषयी गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे- “अस्पृश्‍यतानिवारणाचा प्रश्‍न बाबासाहेबांनी दयाधर्माच्या, उद्धाराच्या, पापक्षालनाच्या वा सेवाभावाच्या पातळीवरून हक्काच्या पातळीवर नेला. याचकधर्म सोडून देऊन स्वत:च्या बळावर आपले नैसर्गिक हक्क प्राप्त करून घेण्याची त्यांनी शिकवण दिली. आपण दलित समाजाला विशेषाधिकार मागत नाही, केवळ समान हक्क आणि अधिकार मागत आहोत, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. चवदार तळ्यातील पाणी म्हणजे काही अमृत नव्हे की ते प्राशन करण्यासाठी अस्पृश्‍यांची मने हपापलेली होती, तसेच मंदिरप्रवेशासाठीचा आग्रह हा काही स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षप्राप्तीसाठी नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, हिंदू समाजाचे घटक आहोत, तेव्हा स्पृश्‍यांच्या बरोबरीने विहिरी, देवालये, शाळा, बाजारहाट यासारख्या सर्व सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे प्रवेश करण्याचा आम्हाला हक्क आहे असे बाबासाहेबांचे म्हणणे होते.’’ 

रेव्ह. मार्टिन किंग यांचीही भूमिका याहून काही वेगळी नव्हती. अमेरिकेचे समान नागरिक म्हणून ते कृष्णवर्णीयांना शाळात, सार्वजनिक वाहनात, बागबगीच्यात आणि प्रेक्षागृहात प्रवेशाची मागणी करत होते. आपल्याला काही विशेषाधिकार द्यावेत, अशी या कृष्णवर्णीयांनी कधीही मागणी केली नव्हती.

किंग (ज्युनियर) आणि डॉ. आंबेडकर या दोघांमधील आणखी एक साम्यस्थळ म्हणजे हे दोन्ही सामाजिक नेते उपेक्षितांचे अनभिषिक्त राजे होते. या दोघांनाही आपल्या समाज बांधवांचे खूप  प्रेम लाभले. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून डॉ. आंबेडकरांनी दलितांचे एक आघाडीचे नेते म्हणून कार्य केले. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या चाहत्यांची, अनुयायांची संख्या अमर्याद राहिली आहे. दलितांच्या हृदयात त्यांच्याइतके आदराचे स्थान इतर कुणाही नेत्यास त्या काळी वा नंतरही कधी मिळाले नाही.

भारताच्या तुलनेत अमेरिकेत सणानिमित्त वा राष्ट्रनेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांची संख्या अगदी कमी आहे. ‘आय जस्ट काल्ड टू से आय लव्ह यू’  हे गाणे म्हणणारे लोकप्रिय अंध गायक स्टिव्ही वंडर यांनी किंग (ज्युनियर) यांच्या जन्मदिनानिमित्त अमेरिकेत सुट्टी जाहीर करावी, यासाठी १९८०च्या दशकात मोहीम लढवली. १५ जानेवारी हा मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांचा जन्मदिन. त्यामुळे जानेवारी महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मार्टिन ल्युथर किंग यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेत ‘सार्वजनिक सुट्टी’ असते!  

अमेरिकेत वर्णभेदाविषयीचा लढा शिगेला पोहोचला होता. तेव्हा म्हणजे १९६३ साली सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्तीचे आणि समानतेविषयी स्वप्न पाहणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी ‘आय हॅव अ ड्रीम’ (माझे एक सुंदर स्वप्न आहे) या शीर्षकाचे भाषण दिले होते. कातडीच्या रंगावरून कुणाही व्यक्तीचे मूल्य ठरवले जाणार नाही, अमेरिकेतील वर्णभेद संपून पूर्वाश्रमीच्या काळ्या गुलामांचे वंशज आणि या गुलामांच्या मालकांचे वंशज यांना समान वागणूक मिळेल, असे स्वप्न व्यक्त करणाऱ्या किंग यांच्या त्या शीर्षकाच्या भाषणाचा चिरंतन मूल्य असणाऱ्या भाषणांमध्ये समावेश केला जातो. वयाच्या ३५व्या वर्षी शांततेचे नोबेल पारितोषक देऊन किंग (ज्युनियर)  यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय किंवा आफ्रो-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारी २००९ रोजी शपथविधी घेण्याच्या आदल्या दिवशी बराक ओबामा यांनी मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांच्या ५०व्या स्मृतिदिनानिमित्त वर्णभेदाविरुद्ध लढा उभारणाऱ्याया नेत्यास आदरांजली वाहिली.  

बराक ओबामा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली, तो क्षण म्हणजे मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी त्या दिवशी पाहिलेल्या स्वप्नाची ती प्रतीकात्मक पूर्तताच होती असे म्हणावे लागेल. कारण त्या देशात अनेक शतके अस्तित्वात असलेल्या वर्णभेदाची भिंत प्रतीक स्वरूपात ढासळली.

मानवी हक्कांच्या चळवळीत अमेरिकेतील निग्रो लोकांचा नागरी हक्कांसाठी चाललेला प्रदीर्घ लढा एक महत्त्वाचे प्रकरण आहे. त्यानंतरही पुढे अनेक वर्षे दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाची प्रथा चालूच राहिली होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नेल्सन मंडेला यांनी तब्बल २७ वर्षे तुरुंग कोठडीत राहून जागतिक पातळीवरील वर्णभेदाचा हा लढा अखेरीस जिंकला.

हिंदुस्थानातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील, दक्षिण आफ्रिकेतील किंवा इतर राष्ट्रांतील वर्णभेद यांमध्ये फरक नाही. दोन्ही पक्षपाती प्रथांची दाहकता सारखीच होती. त्यामुळेच अस्पृश्‍यता प्रथेविरुद्धच्या लढ्यात एकांडे शिलेदार असूनही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवी समानतेसाठी लढणारे नेते म्हणून अब्राहाम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) आणि डॉ. नेल्सन मंडेला यांच्या बरोबरीने जागतिक पातळीवर स्थान असायला हवे.

Monday, May 17, 2021

आधुनिक तंत्रज्ञान असतानाही पत्रकारांना बेमालूम चकवा दिला जातोच! 


‘अक्षरनामा’   पडघम - देशकारण

कामिल पारखे



प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 11 May 2021
  • पडघममाध्यमनामापत्रकारपत्रकारिताचुकीची बातमीशहानिशाखुलासाश्रद्धांजली

साधारणतः १९८२चा काळ. गोव्यात पणजीतल्या The Navhind Times ‘नवहिंद टाइम्स’चा ‘कॅम्पस रिपोर्टर’ म्हणून मी नुकतीच सुरुवातकेली होती. पणजीतले धेम्पे आर्टस् आणि सायन्स कॉलेज, डेम्पो कॉमर्स कॉलेज, बांबोळीचे गोवा मेडिकल कॉलेज, फार्मागुडीचे सरकारी गोवा इंजिनियरिंग कॉलेज, मडगावचे दामोदर कॉमर्स कॉलेज, म्हापशाचे डीएमसी आणि वॉस्कोचे एमईएस कॉलेज, अशी काही मोजकीच पदवी आणि व्यावसायिक महाविद्यालये तेव्हा गोव्यात होती. आठवड्यातून या प्रत्येक महाविद्यालयात जाऊन गरजेनुसार तेथील प्राचार्यांना, काही शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांच्या नेत्यांना भेटून शिक्षणक्षेत्रातील बातम्या दररोज किंवा ‘कॅम्पस रिपोर्टर’ या प्रत्येक सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक सदरात द्यायच्या, हा माझा नेहमीचा शिरस्ता होता.

त्याशिवाय नोकरी करत असतानाच मी एम.ए.च्या तत्त्वज्ञान विषयाचा विद्यार्थी म्हणून नियमितपणे लेक्चर्सला हजर राहत असे. त्या वेळी मुंबई विद्यापिठाचे पदव्युत्तर केंद्र पणजीतल्या १८वा जून रोडवरील सुशिला बिल्डिंगमध्ये होते. गोवा विद्यापीठाची स्थापना होण्यास अजून अवकाश होता. या पोस्ट-ग्रॅज्युएशन (पीजी) केंद्रामधले अभ्यागत व्याख्याते गोव्यातल्या विविध महाविद्यालयांतले शिक्षक असत. त्यामुळे या केंद्राममधून मला गोव्यातल्या महाविद्यालयांच्या आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या बातम्या मिळायच्या. 

‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ ही मुंबईतली इंग्रजी-मराठी दैनिके दुपारच्या विमानाने पणजीत पोहोचत. मांडवीच्या तीरावरल्या गोवा सचिवालयाच्या प्रेस रूममध्ये चारच्या आसपास ही वृत्तपत्रे यायची. त्या काळात मुंबई विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम. वगैरे पदवी परीक्षेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि अंतिम वर्षांचा निकाल लागला, अशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या मुंबई आवृत्तीत छोटीशी बातमी प्रसिद्ध होत असे. आणि त्याच आधारावर मी आमच्या दैनिकात ती बातमी देत असे. माहितीची मोजकीच साधने असलेल्या त्या काळात अशा बातम्यांची विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आतुरतेने वाट पाहत असत.  


तर एके दिवशी गोव्यातली एक विद्यार्थिनी मुंबई विद्यापिठात एम.ए. (पहिले वर्ष) परीक्षेत कुठल्या तरी विषयात पहिली आली, अशी बातमी मिळाली. आणि मग ‘नवहिंद टाइम्स’मध्ये कुठल्या तरी पानावर दोन-तीन ओळींची ती बातमी छापून आली. ८०च्या दशकात गोव्यात ‘नवहिंद टाइम्स’ हे सर्वाधिक खपाचे आणि एकमेव इंग्रजी दैनिक होते. या काळात ‘वेस्ट कोस्ट टाइम्स’ या नावाने सुरू झालेले इंग्रजी दैनिक अल्पजीवी ठरले होते आणि ‘ओ हेराल्डओ’ या पोर्तुगीज नियतकालिकाचा इंग्रजी अवतार सुरू होण्यास अजून खूप अवकाश होता. 

ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर सातआठ दिवसानंतर दोन जण ऑफिसात आले आणि वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांना भेटले. सुदैवाने त्या वेळी मी ऑफिसातच होतो. त्यांचे म्हणणे ऐकताच मुदलियारसाहेबांनी टेबलावरची घंटी वाजवून मला बोलावून घेतले. त्या दोन जणांपैकी एक मुलगी आपल्या डोळ्यांतले पाणी रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.  ती मुलगी माझ्या वयाचीच होती. त्या दोघांना मी कधीही भेटलेलो नव्हतो. 

``Camil, Just listen to what these people have to say...

मी आल्यावर मुदलियारसाहेबांनी जे काही सांगितले, ते ऐकून मी हबकलोच. गेल्या आठवड्यात जी बातमी मी केली होती, ती याच मुलीविषयीची होती. पण अत्यंत वाईट बाब म्हणजे त्यात काहीच तथ्य नव्हते. कारण ही विद्यार्थिनी चक्क नापास झालेली होती!

आता रडण्याची पाळी माझी होती.

त्यांच्यासमोर माझ्यावर चिडण्याचे मुदलियारसाहेबांनी टाळले. त्याऐवजी नक्की काय झाले, ती बातमी कशाच्या आधारावर दिली, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. तोपर्यंत माझी खरेच भंबेरी उडाली होती. ती बातमी नक्की कुणी दिली, ते आठवतही नव्हते.

कुणीतरी मला अमुकअमुक विद्यार्थिनी अमुक विषयात मुंबई विद्यापिठात विद्यार्थिनी आली आहे, असे सांगितले, तेव्हा तिचे नाव आणि विषय मी नोटपॅडवर लिहून घेतले होते आणि त्या आधारावर बातमी दिली होती. तिचे मार्कशीट मी शहानिशा करण्यासाठी मागितले नव्हते. याआधीही अनेकदा समोरच्या व्यक्तीवर पूर्णतः विश्वास ठेवून अशा बातम्या मी केल्या होत्या. त्यामुळे कुणी मुद्दामहून असा काही खोडसाळपणा करील, अशी कल्पना आली नाही.

ऐंशींच्या दशकात कुठल्याही दस्तऐवजाच्या दोन-तीन प्रती काढण्यासाठी टाईपरायटरमधील सफेद कागदांमध्ये निळे किंवा काळे कार्बन कागद ठेवले जात. त्यातली तिसरी प्रत अस्पष्ट असायची. एखाद्या कागदपत्राची हुबेहूब नक्कल काढणे किंवा फोटोकॉपी करण्याचा काळ येण्यास अजून खूप अवधी होता. त्या वेळचे सर्वांत प्रगत तंत्रज्ञान म्हणजे टाईपरायटरवर टेन्सिल कट करून त्याच्या शंभराच्या आसपास सायक्लोस्टाईल प्रती काढणे. हे नवे तंत्रज्ञान दहा-पंधरा वर्षांतच कालबाह्य झाल्याने नव्या पिढीला कदाचित ही परिभाषा आज कळणारही नाही.

तर सांगायचे म्हणजे मी फार मोठी घोडचूक केली होती. ती मुलगी व तिचे कुटुंब केवळ मराठी दैनिक वाचत होते. त्यामुळे त्यांनी आमच्या इंग्रजी वृत्तपत्रातील ती बातमी वाचली नव्हती. त्यांच्या परिचयातील एक-दोन जणांनी तिचे अभिनंदन केले, त्यानंतरच त्यांना बातमी समजली. 

त्या विद्यार्थिनीच्या परिचयातील कुणा तरी व्यक्तीने, बहुधा तिच्या वर्गातील किंवा महाविद्यालयातील कुणीतरी हा खोडसाळपणा केला होता!

वृत्तसंपादक मुदलियार हे माझे गॉडफादर. ते अतिशय संयतपणे वागले. त्यांनी त्या दोघांजवळ मनापासून खेद व्यक्त केला. पण आता यावर उपाय काय, त्यांची अपेक्षा काय आहे, असे त्यांनी त्यांना विचारले. सुदैवाने त्या मुलीच्या घरात, तिच्या शेजारीपाजारी, तिच्या नातेवाईकांत आणि समाजात आमचे इंग्रजी दैनिक वाचले जात नव्हते. त्यामुळे तिच्याविषयीची ती बातमी फार कुणी वाचली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

हाच धागा पुढे पकडून मुदलियार म्हणाले, आमचे दैनिक याबाबत खुलासा आणि माफी प्रसिद्ध करू शकते, मात्र त्यामुळे काय साध्य होणार? ‘’ती मुलगी प्रथम क्रमांकाने पास झाली नसून नापास झाली आहे’’ अशी स्पष्टीकरणाची बातमी देण्याने उलट अधिक नाचक्की होईल उलट अधिक नाचक्की होईल. मात्र यापासून धडा घेऊन यापुढे अशी बातमी प्रसिद्ध होणार नाही, याबाबत आम्ही अधिक जागरूक राहू. त्यावर त्यांचे समाधान झाल्याचे दिसले. हे प्रकरण तेवढ्यावरच मिटले, मात्र ते मला खूप शिकवून गेले. 

उदा. कुठलीही बातमी करण्याआधी तिच्या सत्यतेविषयी शहानिशा करणे, संबंधित कागदपत्रांची मागणे करणे, दुसऱ्या किंवा विरुद्ध बाजूकडून बाजू ऐकून घेणे. त्यामुळे बातमीची विश्वासार्हता वाढते आणि नंतर खुलासे, दावे-प्रतिदावे झाले तरी बातमीदाराच्या निरपेक्षतेबद्दल शंका घेण्याची शक्यता कमी होते.     

गोव्यात त्या काळात आमच्या दैनिकात दुसऱ्या पानावर प्रसिद्ध होणारे ‘श्रद्धांजली’ (Obit) हे सदर कॅथोलिक समाजामध्ये सर्वाधिक वाचले जायचे. मृत हिंदू व्यक्तीचे दहन शक्यतो निधनानंतर काही तासांतच केले जाते, कॅथोलिक समाजातील मृत व्यक्तीचे दफन दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीही केले जाते. कॅथोलिक समाजातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास शेवटचा मिस्साविधी आणि दफनक्रिया कुठल्या चर्चच्या दफनभूमीमध्ये कोणत्या दिवशी, कधी होईल ही माहिती त्या श्रद्धांजली सदरात मृत व्यक्तीच्या फोटोसह दिली जाई. त्याशिवाय मृत व्यक्ती कुणाचे आजी/आजोबा, आई/वडील, पती/पत्नी, मुलगा/मुलगी, आत्या/मामा वगैरे माहितीही त्यात असायची. आजही अशा ऑबिट्स गोव्यात आणि इतरत्र प्रसिद्ध होत असतात, ती वाचून वाचकांना मृत व्यक्ती आपली नातेवाईक, आप्त किंवा मित्र आहे असे कळायचे आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी किंवा नंतर होणाऱ्या अंत्यविधीस सुतकाच्या ठरलेल्या पोशाखात जाण्याबाबत निर्णय होई. छोट्या जाहिरातींवरून एखाद्या नियतकालिकाच्या खपाचा आणि लोकप्रियतेचा अंदाज येतो, तसे त्या काळात गोव्यातील दैनिकाच्या ‘श्रद्धांजली’ सदरावरून त्याची लोकप्रियता कळायची!

त्या काळात वृत्तपत्रांत छायाचित्रं छापण्यासाठी आधी त्याची निगेटिव्ह बनवून नंतर शिसाच्या धातूपासून छायाचित्राचा ब्लॉक बनवला जायचा आणि छपाईसाठी तो वापरला जाई. दरदिवशी एक किंवा दोन-तीन निधनाच्या जाहिराती असत, इतर श्रद्धांजलीच्या जाहिराती सातवा दिवस, मासिक, वार्षिक स्मृती अशा असत.       

तेव्हा मोबाईल, आधारकार्ड आणि पॅनकार्ड नव्हते. जमिनीचा सातबारा, रेशनकार्ड आणि भाडेघर पावती हीच लोकांच्या अस्तित्वाची नामनिशाणी असायची… तर श्रद्धांजलीचा हा मजकूर स्वीकारताना समोरच्या व्यक्तीच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला जायचा. नंतरच्या काळात त्या दैनिकांत काम करणाऱ्या वा जाहिरात स्वीकारणाऱ्या व्यक्तीला परिचित असणाऱ्या व्यक्तींचीही पुष्टी यासाठी पुरेशी मानली जायची. आज सोशल मीडियावर असंख्य फेक अकाऊंट असणाऱ्या जमान्यात दुसऱ्याविषयी कधी काळी असा विश्वास बाळगला जायचा, हे नक्कीच अविश्वसनीय समजले जाईल. मात्र काळाच्या ओघात अशा जाहिराती स्वीकारताना खबरदारी म्हणून सर्वच दैनिकांत मृत्यूचा दाखला, दहन/दफनसाठीची परवानगी, अशी कागदपत्रे मागितली जाऊ लागली. 

मला आठवते, ‘श्रद्धांजली’ सदराच्या जाहिराती अपवाद म्हणून उशिरापर्यंत स्वीकारल्या जायच्या. पुण्यात अशा प्रकारचे श्रद्धांजली सदर ‘पूना हेराल्ड’, ‘महाराष्ट्र हेराल्ड’ या इंग्रजी दैनिकांत लोकप्रिय असायचे. ‘इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने पुण्यात आपल्या आवृत्त्या सुरू केल्या, तेव्हा वाचक पळवण्याच्या हेतूने काही दिवस ‘श्रद्धांजली’ या सदरातील मजकूर विनामूल्य छापला जाई. ‘या दुःखाच्या काळात आम्ही तुमच्याबरोबर आहोत’, अशी मखलाशीही केली जायची!  

नव्याने सुरू झालेल्या मराठी आणि इंग्रजी दैनिकांच्या आवृत्त्यांमध्ये काही वर्षांपूर्वी ‘बाळाचा वाढदिवस’ हे सदर सुरुवातीला असेच विनामूल्य असायचे. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून, मजकुराच्या सत्यतेविषयी कुठलाही पुरावा न मागता, अशी सदरे बिनदिक्कत चालायची. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. कुठल्याही कामासाठी समोरच्या व्यक्तीच्या आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाईल क्रमांक वगैरेची नोंद केली जाते आणि त्यानंतरच बातमी, जाहिरातीसाठी पुढील कार्यवाही  केली जाते.  

दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्याकडे रात्रंदिवस बातम्यांची चॅनेल्स सुरू झाली, तेव्हा कोल्हापूरकडच्या एका खेड्यातील झोपडीत राहणाऱ्या मुलाची अमेरिकेतल्या नासा या विख्यात संस्थेने निवड केली, अशी बातमी एका स्थानिक वृत्तपत्रात आली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील व देशभरातील प्रसारमाध्यमांत त्या मुलाचे कौडकौतुक झाले होते. कुणा एका पत्रकाराने नासाकडे शहानिशा केली, तेव्हा नासाचे पत्र बोगस निघाले. पण तोपर्यंत अनेक बातमीदार आणि राज्य-राष्ट्र पातळीवरील दैनिके त्या मुलाच्या फसवणुकीला बळी पडली होती. 

कुठल्याही गोष्टींची, दाव्यांची आणि प्रसंगांची लागलीच शहानिशा करण्यासाठी हल्ली आपल्याकडे मोबाईल, इंटरनेट वगैरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सेवासुविधा असतानाही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आजही बेमालूम चकवा दिला जातो आहेच. सर्वांत आधी बातमी देण्याच्या हव्यासापायी त्या सापळ्यात ‘मी मी’ म्हणणारी भलीभली पत्रकार मंडळीही अगदी अलगदपणे अडकतात, हे अलीकडच्या अनेक घटनांतून दिसले आहे. एक-दोन दिवसांनी वा हप्ताभराने सत्य, वास्तव स्थिती उघडकीस येईपर्यंत एक तर संबंधितांचे ईप्सित साध्य झालेले असते किंवा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे वृत्त देण्यात पुरेशी खबरदारी न घेणारे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तोंडघशी पडतात, त्यांचे हसे होते!

आपला स्वार्थ साधण्यासाठी वा हितसंबंध राखण्यासाठी अनेक व्यक्ती किंवा समूह नव्या तंत्रज्ञानाचा हव्या त्या पद्धतीने वापर आणि गैरवापर करणार यात शंकाच नाही. याबाबत चोरमंडळी पोलिसांपेक्षा एक पाऊल नेहमी पुढे असतात, हे लक्षात ठेवून प्रसारमाध्यमातील लोकांना त्या दृष्टीने नेहमीच सतर्क राहावे लागणार आहे. 

Tuesday, May 4, 2021

Bardeskars – The Native Goans


Se Cathedral, venue of decennial exposition of relics of St. Francis Xavier, at Old Goa. (Photo by Camil Parkhe )

Soon after appearing for the SSC examination, I left my family in Shrirampur and joined Fr. Prabhudhar at his `Snehasadan' residence in Karad as a step to become a Jesuit priest like him. This was in June 1976. This introduced me to a new Christian community. Fr. Prabhdudhar took me around to Ichalkaranji, Gadhinglaj, Ajara, Chandgad talukas of Kolhapur district and Belgaum district in neighbouring Karnataka state.

During this tours, I was introduced to the Bardeskar community, the Christians who had migrated from Bardez taluka of Goa about three centuries ago and settled in above places.
The various facets of the Bardeskar community fascinated me. The social, cultural, religious, educational and financial characteristics of this community were drastically different from the Christian community from Aurangabad, Nashik and Ahmednagar districts – a community I represented.
First of all, they spoke a different language in their family and amongst themselves – Konkani, the language of their ancestors from Goa which they had preserved for over 300 years after being cut off from their native land. At that time local Hindus referred them as Bardeskars- an identity of their migration- but gradually switched over to their original family names from Goa like D’Souza, Fernandes, Monteiro, Lobo, Mascarenhas, et al. Now many of the younger members of this community may not like to be referred to Bardeskars. They would prefer to call themselves as natives from Goa.
In addition to the language, their names and surnames, they had also preserved the faith of their ancestors – Christianity, Catholic faith to be precise. In Goa, one does call oneself as a Christian but as a Catholic. This was indeed a feat considering that there were no priests or catechists who introduced them to tenets of the Christian religion.
The strict adherence of the Bardeskars to the Roman Catholic faith - sans presence of the clergy for over a century - astonished me. The presence and role of the priests is very important in a well organised relion like Christianity, especially the Catholic Church. The priests are required to administer the seven sacraments like baptism and wedding in various stages of life of the faithful.
I had experienced how long absence of the priests led to the wiping out of the Christian faith in Marathwada region, Ahmednagar, Nashik and other districts in western Maharashtra. In those regions, people who embraced Christianity under the influence of the European Protestant and Catholic missionaries in 19th and 20th centuries later did not get the adequate pastoral care and had therefore returned to the Hinduism or embraced Buddhism. The Bardeskars community, it seemed, was strongly entrenched into the religious faith of their ancestors.
Once Fr. Prabhudhar took me to Gadhinglaj where J. B. Bardeskar had established Sadhana Vidyalaya. This made me aware of the progress the Bardekars had achieved in social and educational spheres. Bardeskar Sir to whom I met at his residence was at that time one of the tallest and most respectable figures in the Bardeskar community. The other members of the Bardeskar community had also gained a respectable status among the majority populace. Some were teachers in colleges and schools while others were employed in respectable positions in government departments and private firms.
After migrating from Goa two-three centuries ago, Bardeskars in the borderlines of Kolhapur and Belgum districts (adjoining the Western Ghats) have fully assimilated into the local populace, acquiring fluency in local Marathi and Kannada languages, and yet, maintaining their distinct identity with preservation of their mother tongue Konkani and Christian faith. While travelling to Ajara, Watangi, Hebbal, Chandgadh, Santibastwad near Belgaum and other places, I realised that the Bardeskars had also acquired land, built houses in their new, migrated land. Possession of the agricultural land helped them to be one among the other populace and also offered them gainful livelihood.
The English medium school, Rosary School Ajara, Sarvodaya Khanapur and Sadhana Vidyalaya from Gadhinglaj helped the children to acquire fluency in the language of the modern age.
Once I attended a marriage of a Bardeskar couple, perhaps in Watangi near Ajara. There I was introduced to the folklore, marriage rituals and traditions followed in this community. There were Konkani folk songs when the bridegroom and bride left their houses for the marriage ceremony. The men and women joined in singing the Konkani songs as the marriage parade went from one place to the and later reached at the church where a priest administered the wedding sacrament to the couple.
I also attended the ordination ceremony of Fr. Caridade Drago, a Jesuit, at his native place Santibastwad near Belgaum. There were similar rituals and songs prior to the ordination ceremony which was presided over by Belgaum diocese bishop. (Only a bishop or a clergy of a higher rank in the Catholic Church can preside over ordination ceremony of a priest.)
A few years before that, I had also attended the ordination ceremony of Fr. James Shelke, also a Jesuit, at his native village Umbari near Sangamner in Ahmednagar district. In both cases, the local Christian community had hosted meals for the gathered assembly on the occasion. At Fr. Shelke’s ordination ceremony, there were no typical local Christians’ rituals and tradition as Christianity in Ahmednagar district in 1970s was only 100 years old and hardly a couple of priestly ordinations had taken place in this community by that period.
These Konkani folk songs, rituals and other traditions connected to the marriage and other ceremonies were obviously brought along by the Bardeskars when they left their native villages in Bardez in Goa two centuries back. I wondered whether these songs are still sung and this kinds of marriage traditions are followed to this date back in those villages in Goa?
Same also holds true about various Konkani words, Portuguese –origin phrases as well as songs spoken by the Bardeskars now and which may have been now extinct in the vocabulary of people in Goa. Invariably, some Marathi or Kannada words too may have slipped into the vocabulary of the Bardeskars.
It is a known fact that the Konkani spoken among the Catholics, especially among in south Goa, has many Portuguese-origin words like Kadel for chair, whereas the Hindus may use the word Khurchi which is also used in Marathi. Similar other Portuguese-origin words are Kantar for song (Gayan or Gaani in Marathi) Kaajar for wedding (Lagna in Marathi), Igraj for Church, Kapel for chapel, and so on.
These migrated people however took utmost care to retain their umbilical chord with their villages in Goa. They renewed their shares or Zonne in the village Communidade - a cooperative of land holding villagers –which is only seen in Goa and no where else in India. The elders took pains to visit Goa to register the names of their children as heirs as Zonnkar in the communidade, similar to the Index 7/12 form of the British legacy in India.
During the subsequent frequent visits to various villages in Kolhapur district, I realised that the Bardeskars were not exactly a homogenous community as it seemed to outsiders. There was no tradition of marital relations among all families of Bardeskars. Some families from a village would have marital relations with only families of particular villages. This underlined the caste differences among the Catholic Bardeskar community – a legacy of their castes before their conversion to Christianity in Goa 200 or 300 years before.
People belonging to the Saraswat, Kshatriya and various other castes were converted to Christianity after the Portuguese established their political rule in Goa in early 16th century. Despite the Church’s emphatic refusal to accept existence of casteism among the Christians, the practise had nonetheless continued over the past few centuries and the Bardeskars had carried along with them this dubious legacy.
St. Francis Xavier whose relics are kept at Bom Jesu Basilica in Old Goa has also been a factor drawing the Bardeskars to their native place. Even during the Portuguese regime which ended only in 1961, the Bardeskars visited Goa to attend the feast of this Goencho Saiba, falling on December 3.
Goans are spread in different parts of India and also all over the world. What is the definition of a Goan? It is a most debatable and controversial issue just like the definition of Punekar. Books have been written on the true identity of a Goan. Bardeskars are true Goans although often those residing in Goa may scoff at them as being ‘Bhailo’, the outsider.
As a reporter of The Navhind Times English daily at Panjim in Goa in 1983, I covered the news of Fr. Prabhudhar, himself a Bardeskar, leading a team of pilgrims from Kolhapur district to participate in the annual feast of St. Francis Xavier at Old Goa. The pilgrims had covered the distance from Ajara in Kolhapur district to Old Goa on foot and our newspaper had highlighted the news with my byline and a headline ‘’Their ways of reaching Him’’.
This news aroused curiosity of these Goans settled in neighbouring states and there were a couple of letters to the editors in this regards. This further prompted me to write two articles in The Navhind Times on the prevalent social, economic, religious and linguistic situation of the Bardeskars and various theories related to the causes of their migration.
Reading these two articles, then Margao's independent State legislator (MLA) and also a Konkani writer Uday Bhembre, congratulated me on highlighting the hitherto unknown aspects of the Bardeskar community and appreciated the Bardeskars for preservation of their mother tongue in their new land despite many odds. He further added that the Bardeskar community settled outside Goa is a fine case study for researchers in various faculties of knowledge including sociologists, historians, anthropologists, linguistics and others.
There was a long felt need to conduct research on the exodus of the Christian community from Bardes taluka to neighbouring Maharashtra and Karnataka states. As Alphie Monteriro has now written a book on history and culture of the Brdeskar community, entitled ‘’The Bardeskars- The history of migration .
The book will be published today through virtual mode an online ceremony to be attended by Belgaum Bishop Derek Fernandes, Pune Bishop Thomas Dabre and Sindhudurg Bishop Allwyn Baretto. The quest for knowing the roots and origins of the Bardeskar community has led Monteiro to conduct this research. I have known the Pune-based author for the past several years and the issue of various theories about migration of the Bardeskars from Goa invariably featured in our conversation.
In his quest for the right answers, Monteiro has met several people, referred to various books and articles. As a person interested in social history of Bardeskars and also Christians in India, I am happy to be part of this journey searching the root of the Bardeskar community.
To order copy of the book, message on 09370665992 to Alphie Monteiro or 09561083773 to Philo Monteiro ..
This is Se Cathedral, the venue of decennial ex\position of relics of St. Francis Xavier, at Old Goa.

Saturday, May 1, 2021

 

‘सिएस्ता’ला ‘होली अवर’ असे का म्हणायचे, हेही आता समजते आहे…
संकीर्ण - ललित
कामिल पारखे


  • ‘अक्षरनामा’
  • पेंटिंग ‘विकीपीडिया’वरून साभार
  • Tue , 20 April 2021
    • संकीर्णललितसिएस्ताSiestaवामकुक्षीहोली अवरHoly Hour


वयाच्या १७व्या वर्षी गोव्यात मिरामारच्या जेसुईटांच्या पूर्व-सेमिनरी (प्री-नॉव्हिशिएट)मध्ये दाखल झालो. जेसुईटांच्या किंवा इतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संस्थेत सगळा जीवनक्रम शिस्तबद्ध असतो. पहाटे साडेपाच वाजता पितळेची घंटी वाजवून सर्व मुलांना झोपेतून उठवून दिवसाची सुरुवात होई. तयारी करून मनन-चिंतन आणि सकाळचा मिस्साविधी होई आणि रात्री साडेदहा वाजता पुन्हा घंटी वाजून आपापले दिवे मालवून सर्व प्री-नॉव्हिसांना आपल्या मच्छरदाणीच्या बेडमध्ये शिरावे लागे. दिवसाच्या मध्यंतरात म्हणजे हाऊसमधल्या सर्वांनी एकत्रित जेवून आपापली ताटे धुऊन पुढचा अर्धा तास रिक्रिएशन पिरिअड म्हणजे विरंगुळा काळ हा पत्ते, बुद्धिबळ खेळण्यात, गिटार वाजवण्यात, कादंबऱ्या वाचत घालवायचा. बरोबर दीडच्या ठोक्याला बिडलने म्हणजे मॉनिटरने घंटी वाजवल्यावर पुन्हा एकदा आपल्या बेडवर दुपारच्या झोपेसाठी निद्रित व्हायचे!

या सक्तीच्या झोपेच्या वेळेत कुणालाही कसलाही आवाज करण्याची मुभा नसायची. दुपारची ही झोप म्हणजे ‘सिएस्ता’. एक तासानंतर अडीचला घंटी वाजल्यावर उठून कॉलेजच्या अभ्यासाला लागायचे. आम्ही सर्व प्री-नॉव्हिस मुले मिरामारला धेम्पे आर्टस्-सायन्स कॉलेजात किंवा पणजीतल्या डेम्पो कॉमर्स कॉलेजात शिकत होतो. या काळात दुपारच्या जेवणानंतर गाढ ‘सिएस्ता’ घेण्याची सवय लागली, ती आजपर्यंत सुटलेली नाही.

गोव्यात हा एक अगदी संवेदनशील, जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या वेळी कुणालाही भेट देणे, फोन करणे शिष्टाचारविरोधी समजले जाते. दुपारी चारनंतर दैनंदिन व्यापार पुन्हा सुरू होतात. पत्रकारितेच्या व्यवसायात हा शिष्टाचार मी नेहमीच पाळत आलो आहे. रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी कुणाही व्यक्तीला दुपारी फोन करणे शक्यतो या कारणासाठीच टाळत आलो आहे.

भारतात सगळीकडे ख्रिस्ती मिशनरींच्या जीवनात ‘सिएस्ता’ एक महत्त्वाची बाब असायची. बहुतेक ख्रिस्ती धर्मगुरूंच्या दिनचर्येत हे अनुकरण आजही होतेच. त्या एक तासाला ‘होली अवर’ असे म्हटले जाते.  

श्रीरामपूरला लहानपणी सूर्य उगवण्याआधीच उठून बसायची सवय होती. माझ्याआधीच दादा उठून ‘पवित्र क्रुसाच्या खुणेने’ असे म्हणत कपाळावर, छातीवर आणि खांद्यांवर क्रुसाची खूण करत अर्धा तास सकाळची प्रार्थना करायचे. पण जागा होऊन चुळबूळ करत असलेल्या मला पाहून ‘सकाळीच असे भुतासारखे उठून काय बसायचे?’ असे बाई चिडून म्हणायची, पण जाग आल्यावर बिछान्यावर पडून राहणे, लोळणे कधी जमलेच नाही. घरी दुपारी झोप येणे तर अशक्यच.

पदवीधर झाल्यानंतर फादर होण्याचा निर्णय मी बदलला अन अगदी अपघाताने पत्रकार झालो. १९८०च्या दशकात आम्ही सर्व बातमीदार मंडळी सकाळी साडेनऊच्या आसपास मांडवीच्या तीरावरील मध्ययुगीन आदिलशहाच्या राजवाड्यात असलेल्या गोवा सचिवालयाच्या प्रेस रूममध्ये जमायचो. (गोवा सचिवालय आता पर्वरीला गेले असले तरी तळमजल्यावरच्या अगदी कोपऱ्यातल्या प्रेसरूमचा तो बोर्ड अजूनही आहे.) सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स, मंत्र्यांच्या नि सचिवांच्या भेटीगाठी आटोपून बारापर्यंत आम्ही आपापल्या दैनिकांच्या ऑफिसांत पोहोचायचो. तेथे बातम्या टाईप करून दुपारी एकच्या आसपास घरी निघायचो. सिनिअर पत्रकारांची पर्वरीला पत्रकार कॉलनीत घरे होती. मी सान्त इनेजच्या टोकापाशी ताळगावला राहायचो. पंधरा मिनिटांत जो तो आपापल्या घरी फिश-करी-राईस खायला हजर. नंतर मस्तपैकी सिएस्ता आणि परत फ्रेश होऊन चारला प्रेसरूमला येऊन तेथे किंवा एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चहापानाला हजर.

दुपारच्या त्या झोपेने दिवसभर मरगळ जाणवायची नाही. विशेष म्हणजे पणजीतील आणि गोव्यातील म्हापसा, मडगाव अशा इतर काही शहरांतील अनेक दुकानदारसुद्धा या सिएस्तासाठी आपली दुकाने दुपारी एक-दोन तास बंद ठेवत असत.

गोव्यात ४५० वर्षे असलेल्या पोर्तुगीज राजवटीचा सिएस्ता हा आणखी एक भलाबुरा सांस्कृतिक वारसा! पोर्तुगिजांनी गोव्यात तसे अनेक सांस्कृतिक वारसे मागे ठेवले आहेत. कामावरून संध्याकाळी किंवा रात्री घरी परतल्यावर पेयपान आणि जेवणाआधी अंघोळ करून ताजेतवाने व्हायचे, ही गोव्यातील अनेक लोकांची सवय हा त्यापैकीच एक. आजही मी रात्री जेवणाआधी अंघोळ करतो. त्यामुळे ‘दुपारी एक ते चार दुकान बंद’ अशी चैन किंवा मक्तेदारी केवळ पुण्यातच चालते असे म्हणण्यात काही अर्थ नाही.

खरे पहिले तर सिएस्ता म्हणजेच वामकुक्षी, पण तरीही या दोन्ही संज्ञा दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय आहेत. जसे पुण्यातली ‘वामकुक्षी’ आणि गोव्यातली ‘सिएस्ता’. भाषेनुसार वेगळे सांस्कृतिक संदर्भ आहेत.

गोवा सोडले तरी पुण्यातील ‘इंडियन एक्सप्रेस’च्या बातमीदारांच्या कामकाज पद्धतीने ‘सिएस्ता’ची सवय कायम राहिली. पत्रकार आणि वृत्तपत्र कामगार कायद्यानुसार पत्रकाराला दिवसा सहा तास आणि रात्री साडेपाच तास काम करावे लागे. त्यामुळे आम्ही सर्व बातमीदार दुपारी अडीच-तीनच्या सुमारास पुणे कॅम्पातील अरोरा टॉवर्समधील ऑफिसात यायचो, रात्री नऊच्या सुमारास काम संपत असायचे.  या काळात मी चिंचवडगावात राहायला आलो होतो, घरी दुपारी जेवून सिटी बसने पुण्याला शिवाजीनगरपर्यंत यायचो, तेव्हा बसमध्ये अर्धा तास मस्तपैकी पेंगून सिएस्ता पूर्ण व्हायची. अनेकदा बस कंडक्टर किंवा सहप्रवासी शेवटच्या स्टॉपवर मला जागे करायचे. दुपारच्या किंवा कुठल्याही वेळेचे अशा प्रकारचे झोपेचे सुख केवळ नेहमी बस किंवा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच माहीत असते. 

‘टाइम्स ऑफ इंडिया’त जॉईन झालो, तेव्हा पुणे आवृत्तीचे ऑफिस शिवाजीनगरहून फर्ग्युसन कॉलेज रोडवर हॉटेल वैशालीपाशी स्वतःच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरीत झाले होते. कामाचे तास दुपारी अडीच ते रात्री दहा. त्यामुळे चिंचवडगाव ते मॉडर्न महाविद्यालयाच्या बस स्टॉपपर्यंत माझा सिएस्ताचा सिलसिला कायम राहिला. तेथून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर ‘टाइम्स`चे ऑफिस आहे. अधूनमधून उशीर झाल्यास बसस्टॉपवरून रिक्षाने मी ऑफिसला जात असे. एकदा बालगंधर्व चौक ओलांडल्यावर पाठमोऱ्या आरश्यामधून माझ्याकडे पाहत रिक्षा ड्रायव्हर म्हणाला, ‘तुम्ही ‘घेतली’ आहे, हे मला माहीत आहे.’ थक्क होऊन मी त्याला यामागचे कारण विचारले, तर तो म्हणाला, ‘तुमचे लालबुंद डोळेच सर्व काही सांगतायत.’ मी रिक्षाच्या आरशात पाहिले तर माझे डोळे खरेच तसे होते. बसमधल्या त्या अर्ध्या तासाच्या गाढ झोपेचा तो परिणाम, पण त्या रिक्षा ड्रायव्हरला काय सांगणार?

‘महाराष्ट्र हेराल्ड’ व ‘सकाळ टाइम्स’ या ‘सकाळ’ माध्यमसमूहाच्या इंग्रजी दैनिकांसाठी १६ वर्षे न्यूज डेस्कवर आणि नंतर न्युज ब्युरोत बातमीदार म्हणून काम केले. तेव्हासुद्धा बहुतांश काळ कुणालाही हेवा वाटेल, अशी या सिएस्ताची चैन उपभोगली.

आजवर ही चैन उपभोगू शकलो, यामागे एक कारण आहे. ते म्हणजे पुण्यात आल्यापासून दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर न करता नेहमीच सिटी बसने प्रवास केला. त्यामुळेच घरच्यांचा रोष पत्करून आणि सहकारी पत्रकारांच्या अवहेलनात्मक, कुत्सित प्रतिक्रियांना न जुमानता माझा हा चिंचवडगाव-शिवाजीनगर निद्रिस्त बसप्रवास तब्बल तीन दशकांपासून चालू आहे. 

हा प्रवास तसा फार सुखाचा नव्हता. १९९०च्या दशकात माझ्या घरासमोरून जाणाऱ्या १२२ क्रमाकांच्या चिंचवडगाव–पुणे मनपा बस २० किंवा ३० मिनिटांच्या अंतराने यायची. आज ३० वर्षानंतरही तीच परिस्थिती आहे. अनेकदा बस गच्च भरलेली असल्यास पुढे सीट न मिळणार नाही आणि सिएस्ताचा लाभ घेता येणार नाही, या जाणिवेने ती सोडून द्यावी लागे. आणि पुढच्या बसची आणखी अर्धा तास वाट पहावी लागे. निद्रादेवीच्या या आराधनेसाठी अनेकदा चिंचवडगावात मागे जाऊन जागा पटकावण्याचा द्राविडी प्राणायाम केला आहे.

मुंबईत लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी यात विशेष असे काही नसणार. ऑफिसला ठराविक वेळेवर पंचिंग करण्याची गरज नसल्याने तसे टेन्शन नसायचे. मात्र उशीर होऊ नये म्हणून प्रवासासाठी वाढीव वेळ मी नेहमीच गृहीत धरत असे. एकदा नेहमीची आरामदायक सीट पकडली की, बॅग छातीपाशी ठेवून डोळे मिटले की, काही क्षणांत ब्रह्मानंदी टाळी लागत असे. यापेक्षा दुसरे स्वर्गसुख कुठले!     

मात्र कधीतरी भरलेल्या बसमध्ये शिरावे लागे. अशा वेळी व्हीआयपी व्यक्तीच्या मागे बॉडीगार्ड ज्या नजरेने सगळीकडे टेहळणी करत असतो, त्याप्रमाणे कुठली सीट लवकरच रिकामी होणार आहे, याकडे लक्ष देऊन चपळाईने ती जागा बळकावी लागते. अनुभवाने यात सराईतपणा येतो. अर्ध्या प्रवासानंतर अशी सीट मिळाली तर होणारा आनंद अवर्णनीय असतो. अशा वेळी पाच-दहा मिनिटांची डुलकीही फ्रेश होण्यासाठी पुरेशी असते. यदाकदाचित संपूर्ण प्रवासात क्षणभराच्या डुलकीसाठी सीट मिळाली नाही तर चिडचिडपणा व्हायचा,  डोके भणभणायला लागायचे. ऑफिसात शिरल्यावर काम सुरू करायला उत्साह नसायचा. 

मी सिटी बसने प्रवास करतो, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. बस स्टॉपवर पाहून अनेकदा ओळखीचे लोक लिफ्ट देऊ पाहतात. घरी दुचाकी, चारचाकी आहे, तरी मला सिटीबसनेच प्रवास करायला आवडते, आणि तेसुद्धा दुपारच्या झोपेच्या सुखासाठी… निद्रादेवीच्या आराधनेच्या माझ्या या हव्यासापायी अनेकदा काही गंमतीजमतीही व्हायच्या. घरासमोरच्या बसस्टॉपवर बसची वाट पाहत असताना शेजाऱ्याची चारचाकी माझ्यासमोर येऊन थांबली. तो म्हणाला, ‘शिवाजीनगरला चाललोय, चला माझ्याबरोबर.’ मी चक्क नाही म्हणालो. मला पीएमटी बसनेच जायचे आहे, असे मी त्याला सांगितले. त्याच्यासोबत गेलो असतो तर लवकर पोहोचलो असतो, पण दुपारच्या झोपेचे खोबरे झाले असते!

माझ्या या हट्टाहासाची कल्पना असलेल्या दुसऱ्या एका स्नेहाने कारमध्येच झोपण्याचा सल्ला दिला, तो अव्यवहार्य म्हणून मी नाकारला होता. स्नेही कार चालवत असताना त्याच्या शेजारच्या किंवा मागच्या सीटवर स्वस्थ झोप येणे शक्य झाले नसते! आणि समजा डोळा लागला तरी काही मिनिटांतच आम्ही पुण्याला पोहोचलो असतो.  

हा, मात्र कारमध्ये असतानासुद्धा बससारखेच आरामात सिएस्ताचा लाभ घेण्याचे अनुभवाने मी शिकलो. अलिकडच्या काळात ‘बिझिनेस’ ही अत्यंत आकर्षक आणि मोहदायी बीट माझ्या वाट्याला आली. या बिटच्या कार्यभागानुसार चाकण औद्योगिक क्षेत्रात व इतरत्र उद्योगकंपन्यांना भेटी द्याव्या लागायच्या, दुपारच्या पेयपान आणि जेवणानंतर तेथून दुपारी पुण्याला परतावे लागे. विशेष म्हणजे बहुतांश वेळेस मला एकट्याला प्रवासाला स्वतंत्र टॅक्सी असायची. अशा वेळी मागच्या सीटवर अगदी कमरेला सीट बेल्ट लावून त्या वातानुकूलित कारमध्ये मस्तपैकी सिएस्ता व्हायची. शिवाजीनगरला न.ता. वाडीला पोहोचल्यावर ड्रायव्हरने आवाज दिल्यावरच निद्राभंग व्हायचा. पण तोवर मस्तपैकी झोप होऊन अगदी फ्रेश वाटायचे. 

प्रवास करताना निद्रासुख घेण्याचे प्रसंग पुण्यातून चिंचवडला रात्री उशिरा परतताना अनेकदा आले. असेच एकदा रात्री निगडी बस स्टॉपवर उतरून मी चालत होतो, तो मागच्या एका कारमधून हॉर्न ऐकू आला, चिडून मी रस्त्याच्या आणखी कडेने चालू लागलो, तरी हॉर्नचा आवाज वाढतच होता. शेवटी ती कार अगदी मला खेटून उभी राहिली. आणि सुहासने, माझ्या शेजाऱ्याने गाडीत बसायला सांगितले.

त्या रात्रीच्या वेळी घरापासून लांब असलेल्या रस्त्यावरून चालताना माझ्या गोंधळलेल्या स्थितीवरून बहुधा सुहासला आणि त्याच्या बायकोला काहीतरी अंदाज आला असावा. गाडीत बसल्यावर शेवटी त्यांना सांगावेच लागले की, बसमध्ये डुलकी लागल्यामुळे चिंचवड कधी मागे पडले ते कळलेच नाही आणि कंडक्टरने निगडीला शेवटच्या बस स्टॉपवर जागे! त्या स्पष्टीकरणावर गाडीत मोठा हास्यकल्लोळ झाला! सुहासच्या मुलाला – आरुषला - मात्र मी बसमध्ये असा झोपलोच कसा हा प्रश्न पडला!  

या घटनेपासून पुणे मनपा बस स्टॅन्डवरून रात्री उशिरा घरी येताना चिंचवडमार्गे देहूरोड मुक्कामी बसने कधीही यायचे नाही, असा कानाला खडा लावला. नाहीतर या तीर्थक्षेत्री रात्री मुक्काम करावा लागला असता !

असेच एकदा रात्री साडेनऊला शिवाजीनगरहून चिंचवडमार्गे जाणारी लोणावळा लोकल पकडली. गर्दी नव्हतीच. लोकलने वेग घेतला अन रात्रीच्या थंड वाऱ्यात कधी डोळा लागला ते समजलेच नाही. पिंपरी रेल्वेस्टेशनवर लोकांची गडबड ऐकली अन खाड्कन जागा झालो. नाही तर रात्री अकराच्या आसपास लोणावळा गाठले असते. त्यानंतर लोणावळा लोकलने कधी प्रवास केला नाही.

करोनामुळे ऑफिस सुटून ‘वर्क फ्रॉम होम’ करताना तर सिएस्ता अत्यंत गरजेची झाली आहे आणि त्यासाठी थोडा वेळ अधिक खर्चिला जात आहे. त्या दिवशी कुणी एकाने झूम मिटिंगसाठी दुपारची तीन ही वेळ निवडली, तेव्हा तिडीक आली होती. मात्र झूम मिटिंगसाठी परदेशांतील लोकही असणार म्हणून बहुतांश लोकांना सोयीस्कर अशी ही वेळ, असे कळल्यावर मी शांत झालो.   

पत्रकारितेच्या व्यवसायात ज्या काही थोड्याबहुत चांगल्या गोष्टी उपभोगता आल्या, त्यापैकी या सिएस्ताला मी अगदी वरच्या क्रमांकाची जागा देईल. इंग्रजी पत्रकारितेतील एक पत्रकार म्हणून बऱ्यापैकी मासिक वेतन आणि इतरांना न मिळणाऱ्या कैक सुविधा मिळत असतानाच सिएस्तासारख्या स्वर्गसुखाचा आनंद दुसऱ्या कुठल्याही व्यवसायात भोगता आला असता, असे वाटत नाही. सिएस्ताला ‘होली अवर’ असे का म्हणायचे, हेही आता समजते आहे.