Did you like the article?

Sunday, December 18, 2022

Gurudas Singbal,

Sometimes you need to be tactful rather than be hard working or just doing the paper works. That's what I learnt (Not sure whether I have practiced it ) when I was young - 26 years to be exact - and the general secretary of Goa Union of Journalists (GUJ) .

The year was 1987 and those were surely heady days. I was filled with the missionary zeal to work for the rights of the journalists and other workers in the newspaper industry. I had recently returned from the Soviet Russia and Bulgaria belonging to the Soviet Block. I had also appeared before the Bachchawat Wage Commission of the Journalists and Non-journalist newspaper workers.
And so when the management of the Marathi daily Gomantak issued termination notices to its 19 workers, I, as the GUJ, secretary, immediately rose to the occasion, filed a case with the Labour Commissioner of the Goa, Daman and Diu Union Territory, objecting to the move.
The Gomantak management replied and agreed to a discussion.
Some of the senior reporters belonging to the GUJ core members and the Gomantak labour department ( there was no such thing as HR department then) met at the small GUJ office, located on the second floor of the Junta Building on the 18th June Road in Panjim.
The tea and biscuits were kept at the small table and as GUJ Secretary who had initiated this move and raised the dispute, I was expected to lead the discussion.
It was then that Gurudas Singbal, the GUJ President who at that time was Goa correspondent of Indian Express, lit the cigarrate, smiled in his peculiar way and asked the Gomantak Labour Officer.
``Kitye Zalye Asa ?’’
``Guru, Problem Kahi Na.. Tuka Kitye Jai Tye Sang…’Gomantak labour officer replied.
This immediately broke the ice. There was a remarkable reduction in the tension in the air.
‘’Come, let’s have the tea before it gets cold,’’ was the reaction Gurudas Singbal.
It so happened that the Gomantak Labour Officer ( I forget his name now) was known to Gurudas Singbal and other senior GUJ memers including Balaji Gaunekar, Pramod Khandeparker, and Ambaji Kamat, Gurudas Sawal (perhaps also Suresh Kankonkar) who were all present at this meeting.
This labour officer was earlier Goa, Daman and Diu Labour Comissioner and recently quit the post and joined as the labour officer with the Chowgle group of companies, the owners of the Gomantak daily.
Myself and James Paes were the only younger GUJ leaders at the meeting who did not know this new Chauwugle group Labour Officer .
By the way, all of us at the GUJ and the IFWJ (Indian Federation of Working Journalists) referred to each other as ‘Comrade’ and our union flags were always Red. The IFWJ president was K. Vikram Rao, a close associate of trade unionist George Fernandes and National Union of Journalists (NUJ) was led by CITU president Com S Y Kolhatkar. Both George Fernandes as well as K Vikram Rao were accused in the now famous Baroda Dynamite Case.
The role played by friendly Gurudas Singbal paved the way for successful negotiations and we at the GUJ Managed to give the retrenched workers betters pay packets than offered initially.
The Gomantak management had clearly told us GUJ office-bearers that there was no way of retaining these workers after the introduction of automation (computerisation!!) at Gomantak daily.
An agreement was signed and the labour dispute was settled. This agreement will be in the GUJ records.
Two of the retrenched workers however did not sign th\e agreement and decided to fight the labour dispute at the appropriate level.
Soon after signing this agreement, I quit The Navhind Times where I was the campus reporter and also handled the crime and high court beats and soon returned to Maharashtra.
I continued my trade unionism in the newspaper industry in Aurangabad and also in Pune for a few more years. To this date, I recall the success in giving a better financial deal to the 19 retrenched Gomantak workers.
This morning I recalled that day’s incident when I read here that Gurudas Singbal is no more.
Salute to Comrade Gurudas Singbal !!

Tuesday, November 22, 2022

अँजेला त्रिनदाद Nuestra Senora Del Rosario भारतीय रुपात



 आपल्या बाळाला घेऊन दुसऱ्या हातात जपमाळ घेतलेली ही स्त्री आहे मदर मेरी.

गोव्यातल्या चित्रकार अँजेला त्रिनदाद (१९०९ - १९८०) यांनी बाळ येशूसह मारियेला म्हणजे `अवर लेडी ऑफ रोझरी' ( Nuestra Senora Del Rosario ) भारतीय रुपात रेखाटली आहे.

भारतीय रुपात आणि प्रतिकांसह अँजेला त्रिनदाद यांनी ख्रिस्ती धर्मातले इतरही अनेक विषय आणि पात्रे साकारली आहे. ख्रिस्ती धर्मांतील सांस्कृतिकरण (Inculturation) असे या प्रक्रियेला संबोधले जाते.
साठीच्या दशकात भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनुसार सांस्कृतिकरणाला अधिकृत मान्यता मिळाली.
१९७२ पर्यंत श्रीरामपूरला आणि हरेगावसारख्या खेड्यापाड्यांत कॅथोलिक चर्चेसमध्ये मिस्साविधी आणि प्रार्थना लॅटिन भाषेत व्हायच्या, पुस्तकात समोरासमोरच्या पानांवर रोमन आणि देवनागरी लिपींत लिहिलेल्या या लॅटिन प्रार्थना आम्ही म्हणायचो, मराठीचा वापर नंतर सुरु झाला यावर आता कुणाचा विश्वासही बसणार नाही !
असे असले तरी त्याआधीही सांस्कृतिकरणाची प्रक्रिया जगभर वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवर अनेक शतकांपासून चालूच होती.
आपल्याकडं सतराव्या शतकात गोव्यात `ख्रिस्तपुराण'कार फादर थॉमस स्टीफन्स आणि मागच्या शतकात रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरेंनीं सांस्कृतिकरणाची ही प्रक्रिया अत्यंत प्रभावीरित्या राबवली
नव्या धर्मातही आपली जुनी संस्कृती, परंपरा चालू ठेवणारा ( नाव, आडनाव, काही विशिष्ट सणवार वगैरे ) महाराष्ट्रातला मराठी ख्रिस्ती समाज हा या सांस्कृतिकरणाचं एक स्थानिक आणि उत्तम उदाहरण.
मीसुद्धा याच समाजाचा एक प्रतिनिधी.

हे चित्र गोव्यातले फेसबुक मित्र Parag Hede यांच्या सौजन्यानं

Camil Parkhe

Wednesday, November 2, 2022

धर्मांतर कशासाठी ? आत्मसन्मानासाठी कि विद्रोहासाठी ?  



अलीकडच्या काळात धर्मांतर हा कायद्याच्या दृष्टीने फार मोठा गंभीर गुन्हा केला गेला असला आणि धर्मांतर (धाकटपटश्यानं, आमिषानं वगैरे वगैरे .) घडवून आणणाऱ्या व्यक्तीला मोठी शिक्षा होत असली तरी मानवी इतिहासात शतकोनुशतको धर्मांतरे होत आली आहेत. अव्वल इंग्रजी अमदानीत देशभर भल्याभल्या लोकांना ख्रिस्ती धर्माने आकर्षित केलं होतं. धर्मांतरांची कारणं मात्र व्यक्तिगणिक आणि समाजागणिक वेगवेगळी होती. पंडिता रमाबाई आणि नारायण वामन टिळक अशा संस्कृत पंडितांनी ख्रिस्ती धर्म कवटाळला त्यामागची कारणं वेगळी आणि समाजातील बहिष्कृत घटकांनी हा धर्म सामुदायिकरीत्या स्वीकारला यामागची कारणं पूर्णतः वेगळी होती.
केरळमधल्या नाडर समाजाने ख्रिस्ती धर्म का स्वीकारला यामागच्या सामाजिक कारणांची समाजमाध्यमात चर्चा झाली. थोड्याबहुत अशाच कारणांनी महाराष्ट्रात आणि देशातील इतर प्रदेशांत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे जर्मन जेसुईट फादर ओटो वाईसहौप्ट हे हातात घंटी घेऊन गावातल्या मुलांना आपल्या शाळेत शिकण्यासाठी बोलावत असत. काळ होता १८९२चा. विशेष म्हणजे ही शाळा समाजातल्या सगळ्या घटकातील मुलांमुलींसाठी खुली होती, महार, मांग, चांभार आणि धनगर यांच्यासाठीसुद्धा !
असाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात फ्रेंच धर्मगुरु फ्रांसलियन फादर गुरियन जाकियर यांच्या घोगरगावच्या आणि आजूबाजूंच्या शाळांत होता. संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात त्याकाळात हजारो कुटुंबांनी सामुदायिकरीत्या ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला याबद्दल मग आश्चर्य कसले ?
पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात, मराठवाड्याच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात सामुदायिक धर्मांतरे झाली. त्यामागे केवळ आध्यात्मिक प्रेरणा होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पंडिता रमाबाई, रेव्ह्. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, रेव्ह. नीळकंठशास्त्री नेहेम्या गोर्हे, बाबा पदमनजी वगैरे सुशिक्षित व्यक्तींच्या धर्मांतरात अध्यात्मिक परिवर्तन घडले हे नि:संशय. अस्पृश्य जातीजमातींच्या सामुदायिक धर्मांतराबाबत मात्र असे म्हणता येणार नाही.
ज्या लोकांच्या वैयक्तिक वा सामाजिक जीवनात देव-धर्म, देऊळ, धर्मग्रंथ या संकल्पनांना कधीही प्रवेश नव्हता, अशा समाजातून वाळीत टाकलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचे अध्यात्म आधी समजून घेऊन नंतर हा धर्म स्वीकारला असे म्हणणे वास्तव्यास धरून होणार नाही.
धर्मांतरे का होतात? आपल्या वाडवडिलांपासून आलेला धर्म सोडून दुसरा धर्म कवटाळण्याची पाळी एखाद्या व्यक्तीवर वा समाजावर का येते? व्यक्तीगत धर्मांतर अर्थातच पूर्णत: त्या व्यक्तीशी संबंधीत असलेल्या मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. मात्र जेव्हा एखादा मोठा समूह आपला धर्म सोडून दुसर्या धर्मात जातो, त्यावेळी या धर्मांतरामागची कारणे समजून घेणे आवश्यक ठरते. .
धर्मांतरामागची कारणे आणि प्रेरणा यांचे अविनाश डोळस यांनी पुढील शब्दांत विश्लेषण केले आहे.
“धर्मांतर हा आपल्या देशातील एक युगा-युगापासून चालत आलेला प्रयोग आहे. हिंदू धर्माच्या जाचाला कंटाळून आपल्या उध्दारासाठी अनेकांनी धर्मांतर केले आहे. मुस्लिम राजवटीत अस्पृश्यांतील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारून समतेकडे धाव घेतली. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवटीत अनेकांनी जातीव्यवस्थेने दिलेले नीचपण झुगारून त्यातून मुक्त होण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. अनेक आदिवासी लोकांनीही शिक्षणासाठी, आपुलकीच्या मिळणार्या वागणुकीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. मिशनरी लोकांनी उपेक्षित, गरीब लोकांसाठी डोंगरदर्यात शाळांची स्थापना करून त्यांच्यापर्यंत शिक्षण नेऊन एक ऐतिहासिक कार्य केले आहे. या सार्यांचा परिणाम म्हणून भारतात अधिकाधिक दलित, आदिवासी मंडळी ख्रिस्ती झाली आहेत. ” 1
दुसर्या एका लेखात डोळस यांनी असे म्हटले आहे: ”वेगवेगळ्या राजवटीतील धर्मांतराचा संदर्भ बदलला तरी त्यामागील धर्मांतरितांची भावना एकसारखीच राहत आली आहे. जातिव्यवस्था, अस्पृश्यता, शूद्र या जोखंडातून मुक्त होण्यासाठी लोकांनी धर्मांतरे केली. कधी ते मुस्लीम झाले, कधी ते ख्रिश्चन झाले. नंतर डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. समतेची शिकवण व वागणूक जेथे मिळेल त्या धर्माला आपलेसे करून या लोकांनी प्रस्थापित धर्माविरुध्दचा आपला निषेध नोंदविला आहे.”2
महाराष्ट्रातील वा इतर कुठल्याही ठिकाणी सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे अद्यात्मिक परिवर्तनाने झाली असा दावा खुद्द ख्रिस्ती धर्मगुरू किंवा चर्चही करत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील प्रेषितकार्याचा इतिहास लिहिणार्या फादर डॉ ख्रिस्तोफर शेळके यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे:
”कॅथोलिक श्रध्देचा निरनिराळ्या भागात कसा प्रारंभ झाला हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. क्वचित प्रसंगीच अध्यात्म्याने सुरूवात झालेली दिसते असे खुद्द पवित्र शुभसंदेशातही आपल्याला दुसरं दिसत नाही. लोक येशूच्या भोवती गर्दी करू लागले. कारण त्याने आजार्यांना बरे केले, मेलेल्यांना पुन्हा उठविले, अशुध्दांना त्याने शुध्द केले आणि भाकरी वाढविल्या. लोकांचा जमाव त्याच्याकडे आल्यानंतरच त्याने त्यांचे लक्ष शाश्वत मुल्यांकडे ओढून घेतले. ”तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता म्हणून तुम्ही माझ्याकडे आला असे नाही, तर मी तुम्हांला भाकर दिली म्हणून तुम्ही आलात.” त्यानंतरच मग येशू अध्यात्म्याकडे वळून ’नश्वर अन्नासाठी झटू नका. त्याऐवजी चिरकालीन अन्नासाठी प्रयत्न करा’ असे त्या लोकांना सांगतो.”3 ख्रिस्ती मिशनरींनी सर्वप्रथम भुकेल्या लोकांची भूक भागविली, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले आणि नंतरच ते अध्यात्म्याकडे वळाले. ’आधी पोटोबा, मग विठोबा’ अशी म्हण या भागात प्रचलित आहे. ती म्हण या मिशनरी लोकांनी आपल्या प्रेषितकार्यात प्रत्यक्षात उतरविली.
धर्मांतरामागची कारणमीमांसा स्पष्ट करताना एकोणिसाव्या शतकात सामाजिक अन्यायाचे, छळवणुकीचे बळी ठरलेल्या दलित समाजाच्या दृष्टीने ख्रिस्ती मिशनरी देवदूतच ठरले असे नाशिकच्या फिलोमिना बागूल यांनी म्हटले आहे.
त्या म्हणतात: ” मिशनरींनी आम्हाला ख्रिस्ताबरोबर ऐहिक सुखाचा मार्ग दाखविला. दोन हजार वर्षापुर्वी प्रभू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, मिशनरींनीही आमच्यासाठी अनेक चमत्कार केले. त्यानी प्रतिकूल परिस्थितीत केलेले कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा क़मी नव्हते. प्रभू ख्रिस्ताने लोकांना जेवण देऊन तृप्त केले. त्याचप्रमाणे मिशनरींनी अनेकांना अन्न देऊन तृप्त केले. प्रभू ख्रिस्ताने अंधांना दृष्टी दिली,त्याचप्रमाणे मिशनरींनी ज्ञान देऊन आम्हाला नवदृष्टी दिली. प्रभू ख्रिस्ताने मुक्यांना वाचा दिली, त्याचप्रमाणे मिशनरींनी हजारो वर्षे वाचा बंद असलेल्या आम्हाला वाचा दिली. ख्रिस्ताने दुखणाइतांना बरे केले, तद्वत मिशनरींनी औषधोपचारांनी रोग्यांना बरे केले. प्रभू ख्रिस्ताने मेलेल्यांना जिवंत केले. मिशनरींनी मृत्युपंथास टेकलेल्यांना जीवदान दिले. मिशनरींचे हे कार्य आमच्यासाठी एकाएका मोठ्या चमत्काराप्रमाणेच होते. मिशनरींनी आम्हाला क़ाय दिले नाही? त्यांनी आम्हाला विश्वास दिला, प्रेम दिले, धर्म दिला, भाकर दिली, आत्मविश्वास दिला, स्वाभिमान दिला, आत्मसन्मान दिला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उच्चवर्णिर्याच्या गुलामगिरीतून मुक्त करुन आमचा कोंडलेला श्वास मुक्त केला.”4
उच्चवर्णियांनी पायंदळी तुडवलेल्या, रोजची भाकरी मिळवण्यासाठी धडपडणार्या अस्पृश्य लोकांना परदेशी मिशनरींनी मायेने जवळ केले. दुष्काळाच्या आणि दोन महायुध्दांच्या काळात आणि इतरही वेळी अन्नपाणी, कपडालत्ता पुरवला. गावाच्या वेशीबाहेर हाकललेल्या या दलित लोकांच्या दृष्टीने तर हे मिशनरी देवदूतच ठरले. या मिशनरींनी दाखवलेल्या देवाचा, धर्माचा आणि ग्रंथाचा त्यांनी कुठल्याही शंकाकुशंका न काढता स्वीकार केला. अशाप्रकारे अनेक गावांतील सर्वच्या सर्व महार वा मांग कुटुंबे काही वर्षांच्या काळात ख्रिस्ती झाली.
गोव्यात ज्या पध्दतीने धर्मांतर झाले तसे महाराष्ट्रात झाले नाही असे अनुपमा उजगरे यांनी म्हटले आहे. ” कोणी बाप्तिस्मा द्या म्हटलं तर मिशनरी त्याला आतून पारखून घेत. तसंच, बाहेर काही काळंबेरं तर नाही ना हेही तपासून बघत. जातिभेदाच्या छळापायी जीव मेटाकुटीला आलेल्या तळागाळातल्यांना, मिशनरींनी देऊ केलेल्या जीवनस्तराचा मोह झाला. त्यामुळे सामूहिक धर्मांतरंही झाली.’‘5
’कॅथोलिक मिशनरींकडे लोक प्रथम वळले ते धर्म भावना मनात ठेवून नव्हे’ असे पुण्यातील सेंट विन्सेंट स्कूलचे माजी प्राचार्य फादर केनेथ मिस्किटा आणि फादर थॉमस साळवे यांनीही ’जेसुईट 2005’ या वार्षिक अंकात स्पष्ट म्हटले आहे.
मिशनरींकडे वळण्याचा त्यांचा हेतू पोटापाण्याचा व सामाजिक मानसन्मान हा होता असे या धर्मगुरूंनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे ऐहिक आणि सामाजिक प्रश्न हाताळण्याचा मिशनरींनी प्रयत्न केला. अहमदनगर हा कायमचा दुष्काळी जिल्हा. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेसाठी मिझरियोर, कारितास, सीआरएस यासारख्या सेवाभावी संस्थांच्या मदतीने मिशनरींनी विहिरी खोदण्यास, पंप आणि बियाणे खरिदण्यास स्थानिक लोकांना मदत केली. सामाजिक आणि धार्मिक कामांची गल्लत होऊ नये, आध्यात्मिक बाबींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सामाजिक कामांसाठी प्रथम श्रीरामपूर येथे आणि नंतर अहमदनगर येथे सोशल सेंटरची स्थापना करण्यात आली.
लोकांच्या गरजा भागवून, त्यांच्याविषयी आस्था दाखवून जर्मन आणि एतद्देशीय येशूसंघीय व्रतस्थांनी येथील लोकांची श्रध्दा जोपासली. ’प्रारंभी शाळेसाठी एकही विद्यार्थी मिळत नसे. पण आज नगर जिल्ह्यातील येशूसंघीयांच्या व धर्मप्रांतियांच्या शाळात हजारो काथोलिक व अख्रिस्ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पहिल्या महायुध्दाच्या सुरुवातीस नगर जिल्ह्यात 10,000 ख्रिस्ती होते व फक्त चार मिशन स्टेशन होती. आज वीस मिशन स्टेशन आहेत व 60,000 ख्रिस्ती लोकांची व अख्रिस्ती जनतेची आध्यात्मिक व ऐहिक गरज भागविली जाते,” असे फादर मिस्किटा आणि साळवे यांनी या लेखात म्हटले आहे.6
धर्मांतरामागची कारणे काहीही असोत, ही सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक मोठी सामाजिक क्रांती होती. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्दचा तो एक मोठा विद्रोह होता. त्यावेळच्या अन्याय्य स्थितीतून सुटका करून घेण्याचा धर्मांतर एक मार्ग होता.
विशेष म्हणजे या दलितांना मुक्तीचा हा मार्ग दाखविणारा त्यांच्यामध्ये कुणीही मोझेस नव्हता. एका गावात एक धर्मांतर झाले आणि त्या धर्मांतराचे ऐहिक, सामाजिक आणि आर्थिकही फायदे त्याच्या नातेवाईकांना, भाऊबंदांना लक्षात आले आणि त्यांनीही तोच मार्ग पत्करला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतराची ही लाट महाराष्ट्रात वर नमूद केलेल्या जिल्ह्यांत चालू राहिली.
खेड्यापाड्यांत, आडवळणाच्या छोट्याशा वस्तींवर अहिंसेच्या मार्गाने अगदी संथपणे झालेल्या या क्रांतीची त्यावेळच्या उ?वर्णियांनी साधी दखलही घेतली नाही. या सामाजिक क्रांतीमागची बहुविविध कारणे, त्याचा समाजाच्या इतर घटकांवर झालेला परिणाम आणि वरच्या जातींच्या अरेरावीस आणि सर्वच क्षेत्रांतील मक्तेदारीस अनेक शतकांनंतर पहिल्यांदाच मिळालेले आव्हान याचे समाजशास्त्रज्ञांनी व इतर संशोधकांनी आतापर्यंत विश्लेषण केलेले नाही.
हे धर्मांतर रोखण्यासाठी त्या अस्पृश्य जातींना त्यांना हवा तो आत्मसन्मान द्यावा किंवा अन्याय्य समाजव्यवस्था बदलावी असेही त्यावेळच्या समाजधुरिणांना वाटले नाही.
त्यानंतर काही वर्षांनंतर येवल्यात 1935 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची गर्जना केली तेव्हाही हे सामुदायिक धर्मांतर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीच. धर्मांतराच्या घोषणेनंतर अखेरीस दोन दशकांनंतर बुध्द धर्माचा स्वीकार करून डॉ आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी एक अभिनव सामाजिक स्थित्यंतर घडवून आणले.
संदर्भ:
1) अविनाश डोळस, ”आंबेडकरी चळवळ: परिवर्तनाचे संदर्भ” , सुगावा प्रकाशन( पान 46), 2) उपरोक्तप्रमाणे, (पान 136)
3) फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके, ’ निरोप्या’ मासिक, ऑक्टोवर 1977 (पान क्रमांक 33)
4) फिलोमिना बागूल, ’मिशन कार्य 150 वर्षे: सामाजिक विकास’, नाशिक कॅथोलिक धर्मप्रांत स्मरणिका (1878-2003), पान 23)
5) डॉ. अनुपमा उजगरे, ’मराठी प्रोटेस्टंट ख्रिस्ती समाज’, प्रकाशक: ग्रंथाली ज्ञानयज्ञ, , (पान 22)
6) ’जेसुईटस 2005’, इयर बुक ऑफ द सोसायटी ऑफ जिझस, प्रकाशक : सोसायटी ऑफ जिझस, (पान 135), आणि ’ निरोप्या’ मासिक, फेब्रुवारी 2005 (पान 26)
^^^
(गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज - लेखक कामिल पारखे , चेतक बुक्स, पुणे मधील एक प्रकरण _

Thursday, October 13, 2022

  लालुजींची भेट झाली नव्हतीमुलाखत घेतली गेली नव्हतीच.  


हे कामिल, नाईस टू सी यु हिअर.... पंधरा सोळा वर्षांनी भेटतो आहोत आपण.... आय हॅव्ह रोमड अल्मोस्ट ऑल ओव्हर वर्ल्ड डुरिंग दिस पिरियड... हो, जगभ्रमंती झाली या गेल्या काही वर्षांत.... तू कुठेकूठे हिंडलास, कुठल्याकुठल्या न्यूजपेपर्समध्ये काम केलेस या काळात....? "

त्य प्रश्नांच्या सरबत्तीने मी क्षणभर गप्पगार  राहिलो. काय उत्तर देणार होतो मी त्या माझ्या जुन्या पत्रकार सहकाऱ्याला?

एका इंग्रजी दैनिकात मी काम करत होतो तेव्हाची म्हणजे चारपाच वर्षांपूर्वीची ही घटना. सिनियर सब-एडीटर किंवा ज्येष्ठ उपसंपादक या ज्युनियर  पदावर मी काम करत होतो. उपसंपादक आणि बातमीदार हे पत्रकारितेतली सर्वांत कनिष्ठ पदे आणि मला वरील प्रश्न विचारणारे हे महाशय आमच्या वृत्तपत्र समूहाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर म्हणजे एमडी साहेबांच्या केबिनशेजारी बसत होते, एका प्रकल्पाचे `एडीटर’ या पदावर त्यांची नेमणूक झाल्याचे मला कळाले होते.

आम्ही काही वर्षांपूर्वी एकत्र काम केले होते तरी या मोठया पदावर त्याची नेमणूक झाल्यानंतर आमची जुनी ओळख आणि सलगी दाखवण्याचा प्रयत्न मी केला नव्हता.स्वतःची इज्जत राखायची असल्यास असे करणे शहाणपणाचे नसते हे एकदोन अनुभवावरुन मी शिकलो असतो. आपले जुने मित्र आणि सहकारी वरव्या पदावर पोहोचल्यावर आपल्याशी सुदाम्याबरोबर वागणाऱ्या कृष्णासारखे नाही तर द्रोणाशी वागणाऱ्या द्रुपदासारखे वागत असतात.  प्रत्येकाला आपली इज्जत आणि सन्मान प्यारी असते हे ओळखले तर मग आपल्या पायरीची जाणीव ठेवून तशी वागणूक केली कि असे मन:स्पादाचे प्रसंग टाळता येतात.

तर वरचा तो प्रश्न ऐकल्यावर मी काही क्षण गप्प राहिलो त्या काही क्षणाच्याच काळात गेल्या एक तपातील त्या काही घटना माझ्या नजरेसमोर तरळून गेल्या होत्या.

तथाकथित फ्री-लान्सिंग किंवा मुक्त पत्रकारिताचा कटु आणि आर्थिकदृष्ट्या भयानक अनुभव असल्याने  वृत्तपत्र उद्योगक्षेत्रातील कामगार संघटना किंवा ट्रेंड युनियनगिरी आता माझ्या दृष्टीने भूतकाळ होता. आता हातातली नोकरी टिकवून अर्थार्जन करत राहणे हे माझे एकमेव उद्दिष्ट राहिले होते आणि या उद्दिष्ट्याशी मी खरेच प्रामाणिक राहिलो हे आता मागे वळून लक्षात येते.

तर आता माझा कामगार नेत्याच्या भूमिकेचा भूतकाळ अशाप्रकारे गाडून गेली अनेक वर्षे नोकरी करत असताना माझ्यासमोर हे सद्गृहस्थ मला मी गेल्या पंधरा-सोळा वर्षांत कुठेकुठे  म्हणजे जगाच्या कुठल्या भागांत आणि कुठल्या वृत्तपत्रसमुहांत मी काम केले आहे असे विचार होते  

आता या समोर ठाकलेल्या व्यक्तीविषयी सांगायलाच हवे.

एका राष्ट्रीय पातळीवरच्या इंग्रजी दैनिकाची  पुणे आवृत्ती सुरु झाल्यावर तेथे अनेक पत्रकारांची तेथे भरती झाली होती. हे दैनिक कितीही मोठ्या वृत्तपत्रसमूहाचे असले तरी इंग्रजी पत्रकारितेतील रितीमुळे अनेक जण त्याहीपेक्षा अधिक हिरव्या कुरणांकडे -मी अधिक पगार देणाऱ्या -  दैनिकांकडे आकर्षित होत होते. नवे तरुण येत होते, त्यापैकीच एक असलेला हा तरुण. त्याकाळात  या दैनिकाच्या दोन प्रकारच्या आवृत्तींत काम करणारे पत्रकार होते. मी स्वतः 'बातम्या' देणाऱ्या'  मुख्य आवृत्तीत काम करत होतो तर हा पत्रकार सॉफ्ट बातम्या देणाऱ्या शहर पुरवणीत काम करायचा. आजच्याप्रमाणेच तेव्हाही या पुरवणीतला मजकूर  `बातम्या' रुपातल्या जाहिराती असायच्या.

हा पत्रकार माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप ज्युनियर असला तरी त्याचा पगार माझ्यापेक्षा कितीतरी अधिक असणार हे सांगण्याची गरज नव्हती. तो ऑक्सफर्ड कि केम्ब्रिज विद्यापीठातून शिकून आला होता, हे त्यामागचे एक कारण होते.

त्याच्या अगदी उलट माझी पार्श्वभुमी.  श्रीरामपुरसारख्या अडवळणी भागात मी मराठी शाळेत गेलेलो आणि  गोव्यात आल्यानंतर बारावीनंतर इंग्रजी माध्यमात आलेलो आणि चार वर्षांतच नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकात बातमीदार झालेलो.  गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा सरचिटणीस असताना  अखिल भारतीय श्रमिक पत्रकार महासंघाने लखनौ येथे आणि नंतर युरोपात बल्गेरिया आणि रशिया येथे दौरा आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी माझी निवड केली तेव्हा या दैनिकाने मला आठ महिन्यांची पगारी सुट्टी दिली होती!        

मात्र युरोपातल्या माझ्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा मी माझ्या बायोडेटात समावेश करणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्याचा प्रकार झाला असता. कारण त्यामुळे वृत्तपत्र उद्योगातील कामगार चळवळीतला नेता म्हणून माझी ओळख झाली असती आणि दुसऱ्या कुणी दैनिकात मला घेण्याचे धाडस मूर्खपणा कुणी केला नसता ! 

तर हे  `फॉरेन एज्युकेटेड' बातमीदार एके दिवशी ऑफिसात आले तेच मुळी हाफ पॅन्ट, टी-शर्ट आणि स्पोर्ट शुजमध्ये ! भारतात काही इंग्रजी नियतकालिकांत असा ड्रेस-कोड चालायचा असे मी ऐकले आहे.  मात्र   आल्याआल्या  दारापाशीच आमच्या निवासी संपादक मॅडमने त्यांना या अवतारात पहिले आणि त्या खवळल्या. ``गो बॅक  अँड कम इन डिसेन्ट ड्रेस. धिस इज अन ऑफिस, नॉट या जिम !''  असं त्या म्हणाल्या आणि हे महाशय आल्या पावली घरी परतले.     

तर समोरचा हा इसम या राष्ट्रीय पातळीच्या या दैनिकातून एके दिवशी अचानक गायब झाला त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी मला पुन्हा दिसला होता, पूर्वीपेक्षा अधिक भारदस्त स्वरुपात, मोठ्या पगारावर आणि हुद्द्यावर आणि आमच्या वृत्तपत्रसमुहाच्या  कॉर्पोरेट जगताच्या आतल्या वर्तुळात तो आता होता.

तर हा इसम त्या  इंग्रजी  दैनिकातून एके दिवशी अचानक गायब झाला त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी मला पुन्हा दिसला होता, पूर्वीपेक्षा अधिक भारदस्त स्वरुपात, मोठ्या पगारावर आणि हुद्द्यावर आणि आमच्या वृत्तपत्रसमुहाच्या  कॉर्पोरेट जगताच्या आतल्या वर्तुळात तो आता होता.

या पत्रकारास मी चांगला ओळखून आहे हे मात्र मी आमच्या दैनिकातील कुणाही सहकाऱ्यास जाहीररीत्या किंवा खाजगीत कधी सांगितले नव्हते.  दैनिकाच्या कार्यालयातून तो अचानक गायब कशामुळे झाला तेही मी गुलदस्त्यात ठेवले होते.,  आता पहिल्यांदाच ते मी सांगत आहे.       

तर एका दिवशी या आमच्या पत्रकार सहकाऱ्याने लिहिलेली मुलाखत अँकर म्हणून प्रकाशित झाली.  बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव त्यावेळी पुण्यात दौऱ्यावर असताना कुठल्यातरी हॉटेलात  येणार होते, त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्याचे असाईनमेंट या पत्रकाराला दिली गेली होती.

ज्या दिवशी लालू प्रसाद यादव यांची ही मुलाखत प्रसिद्ध झाली त्या दिवशी मी कार्यालयात आलो तेव्हा तिथे एकदम सन्नाटा होता.

कारण लालू प्रसाद यादव यांनी आपला नियोजित पुणे दौरा लवकर उरकावला होता आणि त्यामुळे ते त्या हॉटेलांत आलेच नव्हते.

याचा अर्थ त्या बातमीदाराची आणि लालुजींची भेट झाली नव्हती, त्यामुळे मुलाखत घेतली गेली नव्हतीच.  

लालूजींनी पुण्यातला आपला दौरा अचानक आवरता घेतला हे या पत्रकाराला माहितच नव्हते. नाहीतर त्या  मुलाखतीची `टेबल न्यूज' त्याने दिलीच नसती.

दैनिकाच्या कार्यालयातून त्या  दिवसापासून तो कायमचा गायब होण्यामागचे वा संपादकांनी त्याला कायमचे गायब होण्यास सांगण्यामागे ते कारण होते.    

आणि आज हे पत्रकार महाशय मला सांगत होते कि गेल्या काही वर्षांत ते जगाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन आले आहेत आणि मला विचारत आहेत कि या काळात मी कुठेकुठे जाऊन आलो आहे ते !

``मी या दैनिकात माझ्या या जागी दहाबारा वर्षे स्थिर आहे'' असे मी सांगितले आणि आमची ही `मुलाखत' संपली.

त्यानंतर एके दिवशी हे महाशय जसे आले होते तसेच पुन्हा अचानक  गायब झाले.  

 

Camil Parkhe