Did you like the article?

Friday, January 22, 2021

 खुशवंत सिंग - पत्रकारितेतील 'पहिल्या बॉस 'चे 'पहिले बॉस '

"खुशवंत सिं"खुशवंत सिंगांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले. शवंत सिंगांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले. गांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले. शवंत सिंगांनीं सुवर्णमंदिरात झालेल्या सैनिकी कारवाईचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान सरकारला परत केला आहे," असं म्हणत आणि टेलीप्रिंटरवर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भेंडोळे घेऊन आमचे एक उपसंपादक संपादकांच्या केबिनकडे धावले. मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलेली ती बातमी ऐकताच आमच्या पणजी येथील नवहिंद टाइम्सच्या ऑफिसमधले वातावरण एकदम बदलले.

खुशवंत सिंगांनीं आपला सन्मान निषेध म्हणून परत करणे आमच्या दृष्टीने एक मोठी बातमी होती. पीटीआयची ती बातमी पाहताच ऑफिसमधले वातावरण बदलणे साहजिकच होते.
ते १९८४ साल होतं. नवहिंद टाइम्स या गोव्यातल्या इंग्रजी दैनिकातील मी एक तरुण वार्ताहर ऑफिसातील ते पेटलेले वातावरण आणि त्या अनुषंगाने झालेले गरमा-गरम संभाषण अगदी कुतूहलाने ऐकत होतो.
खुशवंत सिंग यांच्याविषयी ती बातमी ऐकल्यानंतर नवहिंद टाईम्समधील न्युजरूम मधील सर्वांनी उत्तेजित होणे तसे अगदी साहजिकच होते. खुशवंत सिंग यांच्याविषयी त्या दैनिकातील आम्ही बातमीदार आणि डेस्कवरची मंडळी गेली काही वर्षे खूप काही ऐकत होतो. इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाचे संपादक म्हणून खुशवंत सिंग यांची कारकिर्द देशभर गाजली होती.
त्या काळी बेनेट अँड कोलमन ह्या टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक असणाऱ्या कंपनीच्या मालकीच्या द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाला देशातील सर्वांत लोकप्रिय साप्ताहिक बनविण्यात संपादक खुशवंत सिंग यांचा मोलाचा वाटा होता. खुशवंत यांनी इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया'चे संपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केल्यावर ते एकदम प्रकाशझोतात आले. इल्लस्ट्रेटेड विकली या पूर्णतः कौटुंबिक आणि पारंपरिक नियतकालिकाचे वितरण कित्येक पटींनी वाढविण्यास खुशवंत यांनी मोठा हातभार लावला. हे साप्ताहिक जास्तीत-जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक अपारंपरिक पद्धतीचा वापर केला. तोडक्या कपड्यांतील युवतींचे छायाचित्र त्यांनी `इलेस्ट्रेटेड विकली'त छापले तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. त्या जमान्यात हे साप्ताहिक जवळ-जवळ सर्व नामांकित शिक्षणसंस्थांत तसेच अभिजन वर्गात वाचले जात असे.(आता बंद पडलेल्या साप्ताहिकाच्या काही मोजक्या कृष्णधवल प्रती माझ्याकडे अजूनही आहेत.)
खुशवंत सिंग यांच्या 'विथ मॅलिस टुवॉर्डस वन अँड ऑल' या सिंडिकेटेड आणि देशभरातील विविध भाषांतील वृत्तपत्रांत दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या स्तंभलेखनाने त्यांना देशभर लोकप्रियता मिळवून दिली होती. बल्बमध्ये बसलेले खुशवंत सिंग पानाच्या भेंडोळ्यावर लिहित आहेत असे एक चित्र या स्तंभलेखासह प्रसिद्ध व्हायचे. देशातील इतर दैनिकांप्रमाणे नवहिंद टाइम्ससुद्धा खुशवंत सिंग यांचे हे सदर दर सोमवारी छापत असे. अनेक मराठी वर्तमानपत्रांतही हे सदर प्रसिद्ध व्हायचे.
या स्तंभात खुशवंत सिंग आपल्या खुसखुशीत शैलीत कुणाचाही मुलाहिजा न ठेवता विविध क्षेत्रांत संचार करत चौफेर टोलेबाजी करत असत. त्याकाळी एकाच वेळी अनेक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होणारे (सिंडिकेटेड) ते सर्वांत लोकप्रिय सदर होते. मला वाटते त्यांच्या या स्तंभलेखासारखा इतर कुठलाही स्तंभलेख त्याआधी इतका गाजला नव्हता आणि आताही त्यांच्या तोडीचा देशपातळीवरचा दुसरा स्तंभलेखक माझ्या नजरेसमोर नाही.
आचार्य अत्रे यांच्याप्रमाणेच विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ऑबिट किंवा मृत्युलेख लिहिताना खुशवंत यांची प्रतिभा अधिक बहरत असायची. जिवंत असताना ज्या व्यक्तीला आपल्या अग्रलेखातून धारदार टीकेने झोडपले अशा काही व्यक्तींच्या निधनानंतर आचार्य अत्रे यांनी मृतलेखांत त्यांचे खूप गुणगान केले आहे. अत्रे यांनी तर पंडित नेहरूसारख्या अनेक लोकांवर मृत्युलेखांची मालिकाच लिहिली आहे.
याच्या अगदी उलट खुशवंत सिंगांची पद्धत.
खुशवंत सिंगांची मृत्युलेखाची शैलीच अफलातून होती. मृत व्यक्तींचे अनेक वादग्रस्त किस्से आणि विविध लफडी ते या मृत्युलेखातून बाहेर काढायचे. मृत व्यक्ती बदनामीचा दावा दाखल करू शकत नाही, अशी त्यांची यावरची मल्लीनाथी असायची. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रजनी पटेल यांच्यावरच्या खुशवंत यांच्या मृत्युलेखाने तर १९८२ साली मोठे वादळ निर्माण केले होते. खुशवंत यांच्यावरील चरित्रलेख रजनी पटेल यांच्यावरील त्या गाजलेल्या मृत्युलेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
पण खुशवंत सिंग यांच्या पद्मभूषण किताब परत करण्याच्या बातमीने आमच्या वृत्तपत्र ऑफिसातले वातावरण तापण्याचे कारण दुसरेच होते.
माझ्या बीए परिक्षेचा निकाल लागायच्या आधीच नवहिंद टाइम्स मध्ये बातमीदार म्हणून मी ऑगस्ट १९८१ला रुजू झालो होतो. त्याआधी जेमतेम काही महिने आधी बिक्रम व्होरा संपादक म्हणून आणि एम. एम. मुदलियार वृत्तसंपादक ही जोडगोळी गोव्याबाहेरुन आली होती. या दरम्यानच्या काळात आम्हां सर्वांना माहित झाले होते कि संपादक बिक्रम व्होरा यांनी पत्रकारितेची सुरुवात खुशवंत सिंग यांच्या हाताखाली केली होती. व्होरा यांनी ' इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया'त १९७० च्या दशकात काम केले होते आणि तेथे खुशवंत सिंग हे त्यांचे पहिले बॉस होते.
सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या लष्करी कारवाईचा निषेध म्हणून पद्मभूषण हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान परत करण्याचा खुशवंत सिंग यांचा निर्णय योग्य कि नाही यावर आमच्या दैनिकातील पत्रकारांत चर्चा सुरु झाली होती. खरे पहिले तर याबाबत मुळी दुमत नव्हतेच. आमच्या दैनिकातील न्युज डेस्कच्या लोकांत आणि बातमीदारांत सुवर्णमंदिरात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या लष्करी कारवाईला पूर्ण समर्थन होते. या पवित्र स्थानी अतिरेक्यांनी कबजा घेतल्याने या कारवाईची गरज होती, असेच सर्वांचे म्हणणे होते.
पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचे कट्टर समर्थक असलेल्या खुशवंत सिंग यांना मात्र शीख समाजाच्या या अतिपवित्र स्थानाच्या अगदी गाभाऱ्यात शिरुन केलेली लष्करी कारवाई मुळीच आवडली नव्हती. त्या रागात त्यांनी तडकाफडकी पद्मभूषण परत करण्याचा निर्णय घेतला होता. अलिकडच्या काळात सरकारी मानसन्मान परत देऊन सरकारच्या काही निर्णयांचा निषेध करण्याची टूम निघाली असली तरी खुशवंत सिंग यांचा हा त्यावेळचा निर्णय नक्कीच धक्कादायक होता. मला वाटते स्वातंत्र्योत्तर काळात असे पहिल्यांदाच घडत होते. (त्यानंतर बऱ्याच काही वर्षांनी अण्णा हजारे यांनी आपली पदमश्री परत करण्याची धमकी देण्याचे आणि ९ ऑगस्ट क्रांतिदिनीं उपोषण सुरु करण्याचे सत्र सुरु केले.)
सुवर्णमंदिरातील कारवाईवरील मुद्द्याची जागा आता दुसऱ्याच एका वादाने घेतली. आता कळीचा मुद्दा असा होता कि खुशवंत सिंग हे आपला पद्मभूषण 'किताब परत देत आहेत ही बातमी आमच्या दैनिकात कुठल्या पानावर घ्यावी.
नवहिंद टाइम्स किंवा त्याकाळात बहुतेक सर्वच स्थानिक आणि प्रादेशिक वृत्तपत्रांत पान एकवर बहुतांश वेळेस राष्ट्रीय म्हणजे दिल्लीतल्या आणि अगदी आंतरराष्ट्रीय बातम्यांनाच जागा मिळायची. त्याकाळात वृत्तपत्राचे पान एक आणि संपादकीय पान ही दोन्ही पाने अत्यंत महत्त्वाची म्हणजे पवित्र मानली जात असत. गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक असलेल्या आमच्या नवहिंद टाइम्स मध्ये पान एकवर स्थानिक बातम्या क्वचितच असायच्या. आम्हा बातमीदारांना आमच्या बातम्यांना पान एकवर जागा मिळाली तर त्या दिवशी फार काही कमावले असे वाटायचे.
खुशवंत सिंग यांची पुरस्कार वापसीची ( 'घर वापसी' मुळे तयार झालेला हा शब्द त्याकाळी अर्थातच रुढ नव्हता) बातमी देऊन त्यांचे उगाचच उदात्तीकरण होईल आणि सुवर्णमंदिरावरील कारवाई अयोग्य होती असा संदेश दिला जाईल असा त्या न्यूजरुममधील मतप्रवाह होता.
चिरुट ओढणाऱ्या आणि बिक्रम व्होरांपेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे असणाऱ्या आमच्या वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांनी सौम्यपणे म्हटले कि ही बातमी आतल्या पानावर घ्यावी. तेथे उपस्थित असलेल्या इतरांनीही त्यांच्या म्हणण्याला ताबडतोब पुस्ती जोडली.
संपादकांच्या केबिन मध्ये उपस्थित असलेल्या जवळ-जवळ सर्वांचं याबाबत एकमत होतं कि खुशवंत सिंगांची पद्मभूषण परत करण्यासंबंधीची बातमी आतील पानावर इतर राष्ट्रीय बातम्यांबरोबर घ्यावी.
संपादक बिक्रम व्होरा यांना मात्र ही बातमी पान एकच्या लायकीची आहे असे वाटत होते. पण संपादकिय बैठकीत असे मत असणारे ते एकटेच होते. ते अल्पमतात गेले होते.
अखेरीस बिक्रम व्होरा यांनी हताशपणे आपले हात वर केले आणि संपादक या नात्याने आपल्याकडे असणारे ब्रह्मास्त्र आपण आता वापरणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.
"कम ऑन एव्हरी वन , हॅव्ह सम हार्ट ! तुम्हा सगळ्यांना चांगलं माहित आहे कि खुशवंत सिंग हे पत्रकारितेतील माझे पहिले बॉस होते. आणि तरीसुद्धा तुम्ही सगळे एक होऊन ही बातमी आतल्या पानावर ढकलण्याचा प्रयत्न करताय का? ठीक आहे, तर मग मी माझा नकाराधिकार वापरत आहे. ही बातमी उद्याच्या अंकात पान एक वर जाईल, पानाच्या फोल्डच्या खाली पण फक्त कॉलम विथ खुशवंतस फोटो !" त्यांनी जाहीर केले. आता यावर चर्चा शक्य नव्हती.
संपादक बिक्रम व्होरा आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले मुदलियार हे आमच्या दैनिकातील स्वभावाने आणि वृत्तीने दोन अगदी दोन विरुद्ध टोके असली तरी ती दोन आपसांत सतत भांडणारी सत्ताकेंद्रे नव्हती. व्होरा यांच्या व्हेटो वापरण्याच्या निर्णयावर सर्वानी अगदी हसत हसत शिक्कामोर्तब केले आणि सगळे आपापल्या कामाला लागले.
या सर्व निर्णयप्रक्रियेत सर्वात ज्युनियर असल्याने माझा काहीही सक्रिय सहभाग नसला तरी एक साक्षीदार म्हणून माझी भूमिका होती. चार दशकांपूर्वी त्यादिवशी हे जे काही घडले ते मला आजही असे ठळकपणे आठवतेय. .
खुशवंत सिंग यांनी जरी १९८४ साली पद्मभूषण सन्मान परत केला होता तरी भारत सरकारने २००७ साली त्यांना देशातील द्वितीय सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला.
माजी राज्यसभा सदस्य खुशवंत सिंग यांचे २०१४ साली वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी मी ऐकली तेंव्हा हा सारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. बिक्रम व्होरा हे पत्रकारितेतील माझे पहिले बॉस होते. १९८५ साली त्यांनी ते गोव्याचं दैनिक सोडलं आणि आखाती देशात खलीज टाइम्स आणि इतर अनेक प्रतिष्ठेच्या दैनिकांत त्यांनी अनेक वर्षे मोठ्या पदांवर काम केले. आजही `टाइम्स ऑफ इंडिया'त ते स्तंभलेख लिहित असतात. .
खुशवंत सिंग यांनी पत्रकार आणि लेखक म्हणून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे. एक पत्रकार आणि लेखक म्हणून खुशवंत सिंग त्यांच्या आयुष्यात एक असामान्य व्यक्तित्व होते. ते खूपच वादग्रस्त होते. जीवनविषयक त्यांचा दृष्टीकोण आणि त्यांच्या लिखाणासाठी त्यांचा जेव्हढा तिरस्कार केला गेला, अगदी तेव्हढेच प्रेमदेखील त्यांना मिळाले.
खलिस्तानी नेते जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि इतर खलिस्तान्यांच्या हिटलिस्टवर खुशवंत सिंग होते. त्यामुळे त्यांना खूप वर्षे सुरक्षा पुरवण्यात आली होती. टीकेबाबाबत खुशवंत यांनी कोणालाही मोकळे सोडले नाही, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांचे ते कडवे समर्थक आणि स्वयंघोषित चाहते होते, (नंतर मनेका गांधी यांचे ते पाठीराखे बनले ). मात्र त्यांनी या व इतर राजकीय नेत्यांचाही कधी मुलाहिजा ठेवला नाही.
खुशवंत सिंग आजच्या घडीला एक संपादक, स्तंभलेखक, लेखक असते तर त्यांना किती गोष्टींना सामोरे जावे लागले असते याची नुसती कल्पनाच केलेली बरे. समाज माध्यमांवर ते किती 'ट्रोल' झाले असते, त्यांच्यावर किती वेळा बदनामीचे आणि राष्ट्रद्रोहाचे खटले चालविले गेले असते वा न्यायालयांचा अवमान केल्याप्रकरणी चौकशीस सामोरे जावे लागले असते याचा नुसता अंदाज करता येईल.
खुशवंत सिंग एक सृजनशील लेखक होते. मला त्यांची पुस्तके वाचल्यानंतर त्यांच्याविषयी बरेच काही समजले आणि माझी खात्री झाली कि ते लोक समजत तसे अथवा त्यांनी स्वतःविषयी लिहिले तसे व्यक्तिमत्व नव्हते. त्यांची दिनचर्या ठरलेली असे व याबाबत ते खूप काटेकोर असत. रात्री नऊला झोपायला जाऊन पहाटे लवकर उठून ते लिखाण करत असत. त्यांची ही दिनचर्या पाळण्यासाठी आणि आगंतुक लोकांपासून त्यांचे सरंक्षण करण्याबाबत त्यांच्या पत्नीने मोलाची भुमिका पार पाडली. नव्वदी पार केल्यानंतरसुद्धा खुशवंत स्विमिंग पूलमध्ये पोहत असत. त्यांची शंभरी केवळ एका वर्षाने हुकली !
खुशवंत सिंग हे पत्रकारितेतील माझ्या पहिले बॉस असलेल्या बिक्रम व्होरा यांचे पहिले बॉस होते. हा खरे तर खुशवंत सिंगांशी माझा ओढूनताडून जोडलेला म्हणजे बादरायण संबंध वा व्हेरी रिमोट कनेक्शन ! पण खुशवंत सिंग आणि बिक्रम व्होरा या दोघांनीही पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले म्हणून त्यांच्याशी असलेले माझे हे संबंध माझ्या दृष्टीने अभिमानानेच आहे. खुशवंत सिंग हे खरे तर सर्व पत्रकारांचे आणि संशोधनात्मक लिखाण करणाऱ्या सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि आदर्श आहेत.

Monday, January 18, 2021

“पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग बरोबर मुलाखत

पंतप्रधानांची आचारसंहिता : पक्षीय आणि शासकीय कार्यक्रम   

पडघम - देशकारण
कामिल पारखे

  • विश्वनाथ प्रताप सिंग
  • Sat , 23 March 2019
  • पडघमदेशकारणविश्वनाथ प्रताप सिंगVishwanath Pratap Singhइंदिरा गांधीIndira Gandhiनरेंद्र मोदीNarendra Modiजनता दलJanta Dal

“पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आज दुपारी बारा वाजता पुणे विमानतळावर काही वेळ थांबणार आहेत. त्यांना भेटायचं असेल तर लगेच अमुक अमुक ठिकाणी पत्रकारांसाठी वाहन व्यवस्था व्यवस्था केली आहे. तिथं ताबडतोब या!” एका रविवारी सकाळी हा निरोप मला मिळाला. त्या वेळी म्हणजे १९९० मध्ये मोबाइल फोन नव्हते. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या त्यावेळच्या पुणे कॅम्पातील अरोरा टॉवर्सच्या ऑफिसात हा निरोप मिळाल्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलो. माझ्याबरोबर  ज्येष्ठ  बातमीदार मुकुंद संगोराम होते. पण ठरलेल्या जागी प्रेस इन्फॉरर्मेशन ब्युरो (पीआयबी)चे कुणीही अधिकारी नव्हते आणि विमानतळाकडे पत्रकारांना नेण्यासाठी वाहनही नव्हतं. थोडा वेळ वाट पाहून नंतर आम्ही दोघांनी संगोराम यांच्या दुचाकीनंच विमानतळावर जाण्याचं ठरवलं.

विमानतळावर आम्ही पोहोचलो आणि पत्रकार म्हणून आम्हाला लगेच तेथील व्हीआयपी कक्षाकडे नेण्यात आलं. त्या वेळी म्हणजे तीस वर्षांपूर्वी विमानतळावर आजच्यासारखी कडक सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्या व्हीआयपी कक्षात पोहोचलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या अत्यंत छोट्याशा काचेच्या कक्षात दोनच व्यक्ती बसल्या होत्या. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आणि जनता दलाच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा मृणाल गोरे!

त्यावेळी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी हवाई दलाच्या खास विमानानं दिल्लीहून पुण्याला येण्यास नकार दिला होता. यासंबंधात आधी दोन दिवस वृत्तपत्रात बातम्या येत असल्यानं त्यामागील कारणांची आम्हाला माहिती होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या एका लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत जनता दलाच्या प्रचारासाठी पंतप्रधान सिंग आले होते आणि हा निवडणूक प्रचार दौरा, हे पक्षाचं काम असल्यानं त्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्यास सिंग यांनी नकार दिला होता. त्यामुळे प्रवासी विमानानं एक सामान्य नागरीक म्हणून ते आले होते. या प्रचारदौऱ्यासाठी एखाद्या जवळच्या ठिकाणी शासकीय भेट आयोजित करून नंतर कारनं ते निवडणूक सभेस जाऊ शकले असते. पण ते सिंग यांनी टाळलं होतं.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ साली रायबरेली मतदारसंघातून राजनारायण यांना प्रचंड मत्तांधिक्यांनी पराभूत केलं होतं, मात्र या निवडणुकीत त्यांनी शासकीय यंत्रणेचा वापर केला या मुद्दयावर अलाहाबाद उच्च न्यायालयानं जून  १९७५ मध्ये त्यांची निवडणूकच रद्द ठरवली होती आणि त्यामुळे इंदिरा गांधींचं पंतप्रधानपदच धोक्यात आलं होतं, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. असं असलं तरी पंतप्रधान सिंग यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीनं आणि देशाच्या कार्यकारी प्रमुखानं आचारसंहिता आणि नीतीमूल्यांच्या नावाखाली नागरी विमान आणि रस्त्यावरील प्रवासात अशा प्रकारे अनेक तास वाया घालावे, यावरही अनेकांनी कडक टीका केली होती.        

विमानतळावर गेल्यानंतर आम्हा पत्रकारांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी नेण्यासाठी प्रेस इन्फॉरर्मेशन ब्युरोचं वाहन का आलं नाही याचा उलगडा झाला. पंतप्रधान पक्षाच्या कामासाठी आल्यानं त्यांच्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावल्यानं आचारसंहितेचा भंग होणार होता. ऐनवेळी बोलावणं आल्यानं आणि वाहनव्यवस्था नसल्यानं इतर पत्रकार आले नव्हते. (त्या वेळी माझ्याकडेही एखादी दुचाकीसुद्धा नव्हती.) व्ही. पी. सिंग यांचं सरकार सत्तेवर आलं, त्यावेळी त्या काळात सुरुवातीच्या काही महिन्यांत सिंग यांनी आपण नैतिक मूल्यांचा मूर्तीमंत पुतळा आहोत, अशीच हवा निर्माण केली होती. ‘मिस्टर क्लीन’ आणि ‘भ्रष्टाचारविरोधी’ अशीच त्या वेळी त्यांची प्रतिमा होती. बोफोर्स तोफेच्या खरेदीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजीव गांधींना सत्ताभ्रष्ट करून ते स्वतः पंतप्रधान बनले होते. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या व्ही पी सिंग यांनी काही उद्योगपतीविरुद्ध धाडींचं सत्र सुरू केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून नंतर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांना पुण्यात एका आर्थिक गैरव्यवहारावरून पुण्यात अटक केली, तेव्हा मोठा गदारोळ उडाला होता.

असो. पंतप्रधान सिंग आणि  मृणालताई गोरेंसमोर आम्ही दोघं बसलो, तेव्हा माझी अगदी अवघडल्यासारखी स्थिती झाली होती. पत्रकारितेत मुकुंद संगोराम  माझ्यापेक्षा कितीतरी अधिक अनुभवी होते. ऐनवेळी ठरवण्यात आलेल्या या मुलाखतीत पंतप्रधानांना प्रश्न तरी काय विचारणार? पूर्वतयारी करायला वेळच मिळालेला नसल्यानं उगीच काहीही प्रश्न विचारून आपलं हसं तर होणार नाही ना, अशी मला भीती वाटत होती. सुदैवानं देशाच्या पंतप्रधानांच्या ऐनवेळी बोलावण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत संगोराम आणि मी असे केवळ दोघंच होतो. पंतप्रधानांसमोर असं आमनेसामने बसण्याचा असा प्रसंग कधी येईल असं कधी वाटलं नव्हतं.

त्या कक्षात पंतप्रधानांचे कुणीही सचिव, शासकीय अधिकारी वा शरीररक्षकही नव्हते. त्या दृष्टीनं ही एक अभूतपूर्ण प्रेस कॉन्फरन्स म्हणावी लागेल! असा अनुभव एखाद्या पत्रकारास क्वचितच आला असेल असं मला वाटतं. यापुढे तर असा प्रसंग कधीही येणार नाही, असं आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आणि सुरक्षेच्या समस्येच्या कारणामुळे वाटतं.  

मात्र मृणालताई गोरे यांचीही अवस्था माझ्यासारखीच अवघडल्यासारखी झालेली असेल, असं नंतर माझ्या लक्षात आलं. मुंबईच्या आमदार आणि खासदार म्हणून अनेक वर्षं काम केलेल्या मृणालताईंचा उत्तर प्रदेशातील काँग्रेसनेते असलेल्या व्ही. पी. सिंग यांच्याशी काही संबंध येण्याची शक्यताच नव्हती. मुंबईत पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे ‘पाणीवाली बाई’ हे बिरुद कमावलेल्या मृणालताई या पूर्णतः समाजवादी कार्यकर्त्या, तर मांडा संस्थानचे राजे असलेले व्ही. पी. सिंग  हे  काँग्रेसी  संस्कृतीत वाढलेले! एके काळी राजीव गांधी यांचे उजवे हात असणाऱ्या सिगांनी काँग्रेस सोडल्यानंतर आधी जन मोर्चा स्थापला आणि नंतर जनता दलाची सत्ता आल्यावर ते पंतप्रधान बनले. जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, मृणाल गोरे वगैरे समाजवादी नेते त्या वेळी जनता दलात असल्यानं आणि मृणालताई महाराष्ट्र जनता दलाच्या अध्यक्षा असल्यानं आता पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिष्टाचार म्हणून त्या जनता दलाच्याच असलेल्या पंतप्रधानांबरोबर होत्या एवढंच.

भिन्न पक्षीय  आणि राजकीय संस्कृतीच्या सिंग यांच्याशी बोलण्यासाठी मृणालताई यांच्याकडे काय समानधागा असणार होता? याउलट इथं सिंग यांच्याऐवजी जनता दलातीलच जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते, मधू लिमये  वगैरे नेते असते तर या साथी मंडळींबरोबर त्यांना संभाषणासाठी विषय कमी पडले नसते. (विशेष म्हणजे जनता दलाची सत्ता येऊनही या पक्षाच्या जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते यांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ समाजवादी नेत्यांना पंतप्रधानपदानं हूल दिली आणि त्यांच्याऐवजी याच पक्षाच्या मात्र काँग्रेसी परंपरेतील चंद्रशेखर आणि कालांतरानं एच.  डी.  देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांना हे पद लाभलं!)  

पंतप्रधान व्ही. पी. सिंग या पोटनिवडणूक दौऱ्यात हवाईदलाचं विमान इतर कुठलीही शासकीय यंत्रणा वापरणार नाही, अशी बातमी आमच्या ‘इंडियन एक्सप्रेस’नं त्याच दिवशी पहिल्या पानावर अगदी ठळकपणे वापरली होती. संभाषणाच्या सुरुवातीला त्या विषयाला धरून काही प्रश्न झाले. मात्र याच मुद्द्यावर चर्चा रेटण्यात काही अर्थ नव्हता. त्यांनतर इतर काही रुटीन विषयांवर प्रश्न झाले. मला अंधुक आठवतं की, पंतप्रधान व्ही. पी. सिंग पुण्यात फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते, हा विषयसुद्धा या संभाषणात निघाला होता. 

सिंग आणि मृणालताई यांनी उत्तरं दिल्यावर काही मिनिटांत पंतप्रधानांनी आम्हा दोघांना आमच्यासमोर ठेवलेल्या चहा आणि बिस्किटं घेण्याचा आग्रह केला. बोलण्याचे विषय संपले होते! पंतप्रधानांचे विमान लागण्यास अजून बराच वेळ होता. त्यामुळे त्यांनतर काही वेळ चक्क हवापाण्याविषयी बोलणं झालं... 

मात्र पंतप्रधानांच्या विमानाची वेळ होईपर्यंत तिथं थांबून राहणं प्रशस्त नव्हतं. जवळपास अर्ध्या तासानंतर पंतप्रधानांची आणि मृणालताईंची रजा घेऊन आम्ही त्या कशाबाहेर आलो आणि आमच्या कार्यालयाकडे निघालो. 

आजच्या युगात अशा प्रकारची पंतप्रधांनांबरोबर पत्रकारांची मुलाखत होणं अशक्यच बनलं आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रकार परिषदेचंच वावडं आहे ही गोष्ट अलाहिदा! त्यामुळे गेल्या पाच वर्षांत देशातील पत्रकारांची सध्याची पिढी विद्यमान पंतप्रधानांशी हस्तांदोलन, परदेश दौऱ्यावरून परतताना पत्रकारांचा पंतप्रधानांशी विमानप्रवासातील होणारी तो वैशिष्टपूर्ण चर्चा-संवाद, पत्रकार परिषदेतील सवाल-जबाब यासारख्या त्यांच्या व्यवसायातील एका फार दुर्मीळ  आणि महत्त्वाच्या अनुभवाला मुकली आहेत.  

वरील घटनेनंतर काही महिन्यातच पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचा जनता दल पक्षनेता म्हणून नव्हे तर पंतप्रधान या नात्यानं पुण्यात एका  कार्यक्रमाला  मी ‘इंडियन एक्सप्रेस’चा  बातमीदार म्हणून हजार होतो. तिथंही समाजवादी नेते मात्र पक्षीय राजकारणातून अलिप्त  झालेले डॉ. बाबा आढाव यजमान होते. डॉ. आढाव यांनी मार्केटयार्डातील माथाडी भवनात पंतप्रधानांचा माथाडी कामगारांबरोबर रात्री जेवणाचा कार्यक्रम ठरवला होता. 

यावेळेस मागच्या काही महिन्यापूर्वीच्या घटनेपेक्षा अगदी उलट परिस्थिती होती. इथं अत्यंत कडेकोट बंदोबस्त होता. पीआयबीनं आणि पुणे पोलीस खात्यानं खास बनवलेल्या ओळखपत्राच्या आधारेच आत प्रवेश मिळाला. इथं पत्रकारांना हस्तांदोलन, मुलाखत वा प्रश्नोत्तरांना मुळीच वाव नव्हता. पंतप्रधानांच्या बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांना मुख्य राजकीय बातमी मिळालीच  होती. पंतप्रधानांची माथाडी भवनमध्ये सर्वसामान्य लोकांबरोबर जेवणाची पंगत, ही तशी आतल्या पानावरची फोटोसह जाणारी सॉफ्ट बातमी असणार होती. 

त्या भोजनावळीचं सर्व पत्रकारांना आमंत्रण असलं तरी वेगवेगळ्या दैनिकांत काम करणाऱ्या आम्हा पत्रकारांना जेवणाचा आस्वाद घेणं शक्यच नव्हतं. पंतप्रधान आणि इतर व्हीआयपी मंडळी तिथं जेवण करताना पंतप्रधानांच्या थाळीत कुठले पदार्थ आहेत, कुठला पदार्थ त्यांना अधिक आवडला, याकडेच आमचं सर्वाधिक लक्ष होते. जेवण करून पंतप्रधान सिंग माथाडी भवनाच्या बाहेर पडले आणि त्यांच्यापाठोपाठ बातमी  देण्याची डेडलाईन गाठण्यासाठी आम्हीही सर्व पत्रकार घाईनं बाहेर पडलो.