Did you like the article?

Showing posts with label Pune. Show all posts
Showing posts with label Pune. Show all posts

Saturday, January 3, 2026

 जोतिबा फुले १८८२ साली सर विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर दिलेल्या जबानीत म्हणतात :

“शैक्षणिक विषयांतील माझा अनुभव प्रामुख्याने पुणे शहर व आसपासच्या गावांपुरताच मर्यादित आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पुण्यात मिशनरींनी मुलींसाठी एक शाळा सुरू केली होती; परंतु त्या वेळी देशी (स्थानिक) मुलींची एकही शाळा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मला अशी शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्या शाळेत मी व माझी पत्नी अनेक वर्षे एकत्र काम केले.”
आपल्या जबानीत फुले पुढे म्हणतात :
“स्त्री-शाळा सुरू केल्यानंतर एका वर्षाने मी खालच्या वर्गांसाठी—विशेषतः महार व मांग समाजासाठी—एक देशी मिश्र शाळाही सुरू केली. पुढे या वर्गांसाठी आणखी दोन शाळा काढण्यात आल्या.. मी सुमारे नऊ-दहा वर्षे या कार्यात कार्यरत होतो; या स्त्री-शाळा आजही अस्तित्वात आहेत. समितीने त्या शिक्षण खात्याकडे सुपूर्त केल्या असून त्या सध्या मिसेस मिचेल यांच्या व्यवस्थापनाखाली आहेत.”
कोण आहेत या मिसेस मिचेल?
शिक्षणपद्धतीबाबत आपले मत मांडताना, त्याच जबानीतील पुढील परिच्छेदात फुले म्हणतात :
“महार व मांग समाजासाठी एक शाळा आजही अस्तित्वात आहे; मात्र तिची स्थिती समाधानकारक नाही. तसेच काही वर्षे मी एका मिशनरी मुलींच्या निवासी शाळेत शिक्षक म्हणूनही काम केले आहे.”
जोतिबा फुले हे प्रथम जेम्स मिचेल यांच्या मिशनरी शाळेतील विद्यार्थी होते आणि नंतर १८५० च्या दशकात त्याच शाळेत शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे जेम्स मिचेल व मिसेस मिचेल या मिशनरी दांपत्याचा जोतिबा–सावित्रीबाई फुले या सुधारक दांपत्याशी दीर्घकाळ संबंध राहिला होता.
जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रांत जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांची नावे अनेक ठिकाणी येतात. मात्र या स्कॉटिश मिशनरी दांपत्याने फुले दांपत्याच्या जीवनावर नेमका कसा व किती प्रभाव टाकला, याबाबत फारसा प्रकाश टाकलेला दिसत नाही.
धनंजय कीर यांनी ‘महात्मा जोतिराव फुले – भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक’ या चरित्रात लिहिले आहे :
“जोतिराव आणि त्यांची पत्नी कोणताही मोबदला न घेता निष्ठेने व नि:स्वार्थपणे शाळांमध्ये सेवा देत होते. या कार्यात ते काही वर्षे पूर्णपणे गुंतून राहिले होते. या कामासाठी अखंड लक्ष देणे आवश्यक होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून हाकलून दिले होते आणि आता त्यांना नोकरीची गरज भासू लागली. म्हणून त्यांनी पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. ही शाळा जुलै १८५४ मध्ये मिशनच्या आवारात सुरू झालेली मुलींची निवासी शाळा होती. या संस्थेत अनाथ व निराधार मुलांसाठी आश्रम तसेच धर्मांतरित पालकांच्या किंवा ज्यांची योग्य काळजी घेता येत नव्हती अशा मुलांसाठी निवासी शाळा होती.”
या शाळांच्या कार्याबाबतच्या अहवालात पुढील निरीक्षण नोंदवले आहे :
“सध्या आमच्याकडे १३ निवासी विद्यार्थिनी आहेत. दिवसा त्यांच्यासोबत ४० दिवसाळू विद्यार्थिनी येतात. पुण्यातील अत्यंत उत्साही व कुशल शिक्षकांपैकी एक—ज्योती गोविंदराव फुले—यांची आम्हाला दररोज सुमारे चार तास अध्यापनासाठी मदत मिळते, याचा आम्हाला आनंद आहे. स्त्रीशिक्षण व खालच्या जातींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले चिकाटीचे प्रयत्न शिक्षण मंडळ व सरकार यांनीही विशेष प्रशंसनीय ठरवले आहेत. आमच्या त्यांच्याबद्दल मोठ्या अपेक्षा आहेत. मुलींची प्रगती अत्यंत समाधानकारक आहे.”
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी स्थापन केलेल्या स्त्री-शिक्षक प्रशिक्षण शाळेत शिक्षण घेतले होते. फुले दांपत्याच्या जीवनाशी संबंधित अनेक दस्तऐवजांत याची नोंद आढळते. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका म्हणून गौरवले जाते.
जेम्स मिचेल यांचा जन्म स्कॉटलंडमधील स्टर्लिंग परिसरात १८०० साली झाला. परदेशात सुवार्ता प्रसारित करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात होती, जरी त्यांच्या नातेवाइकांचा त्याला विरोध होता. पुरेसे शैक्षणिक प्रशिक्षण घेतल्यानंतर ऑगस्ट १८२२ मध्ये भारतासाठी मिशनरी म्हणून त्यांची दीक्षा झाली. त्यांना स्कॉटिश मिशनरी सोसायटीच्या वतीने पश्चिम भारतात पाठवण्यात आले.
जुलै १८२६ मध्ये जॉन कूपर, जॉन स्टीव्हन्सन व अलेक्झांडर क्रॉफर्ड यांच्यासह ते मुंबईत आले. डोनाल्ड मिचेल काही महिने आधी आले होते; परंतु त्यांचा काळ फारच अल्प ठरला.
`पुणे शहरचे वर्णन' या नारायण विष्णू जोशी यांनी १८६८ साली लिहिलेल्या पुस्तकात जोतिबा फुले यांचे शिक्षक असलेल्या स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले हयात असताना हे पुस्तक प्रसिद्ध झालेले असल्याने या पुस्तकातील माहिती अधिक विश्वासार्ह आहे.
ना, वि. जोशी यांनी लिहिलेला हा पुढील मजकूर मुळातून वाचण्यासारखा आहे.
इंग्लिशांची कारकीर्द. (१८३१-१८५४) स्कॉटिश मिशनची स्थापना- मिशन शाळा- मुलांच्या व मुलींच्या-मिशन विद्यालयाची सांप्रतची स्थिति- बोर्डिंग स्कूल- आंधळे, पांगळे, रोगी यासाठीं धर्मशाळा.
या शहरांत इंग्रजी अंमल बसून बरेच दिवस झाल्यावर सन १८३१ या साली स्कॉटिश मिशनाकडून दोन मिशनरीं (पाद्रीं)ची नेमणूक झाली. त्यांचीं नावे रेव्हरंड जेम्स मिचल आणि रेव्हरंड डॉक्टर स्टिविनसन. हे उभयता येथे आल्यावर त्यांनी आपला उपदेश करण्याचा क्रम चालविला.
पण त्यांचा उपदेश ऐकण्यास लोक जमत नसत. जरी कोणी हिंदु त्या वेळेस त्यांच्या धर्मात आला नाही, तरी त्यांनी तसेच दिवस त्यांच्या शास्त्रांतल्या एका ओवीवर नजर देऊन काढले. ती ही की "आपण बरे करितांना थकू नये. न थकलो तर यथा काळी पीक पावू.’’

मिचेल साहेब उपदेशास बाहेर निघाले म्हणजे लोक त्यांचे फार हाल करीत, शिव्या देत, टोपी उडवीत, हुयों हुर्यो करीत, त्यांच्या पाठीस लागत, धोंडे मारीत, कोणी थापट्या मारीत, कोणी शेणमार करीत, तरी ते इतके सहनशील होते की कोणास चकार शब्दही न बोलता उलटे त्यांस चांगल्या गोष्टी सांगत, त्यावर होईल तितकी दया करीत, त्यांचे बरे इच्छीत, त्यांना आपले घरी बोलावीत. त्यांस शास्त्रांतील काही पुस्तके वाचण्यासाठी बक्षीस देत. मिचल साहेबापासून बूक उपटून आणले नाही, असा पुरुष पुण्यात विरळा सापडेल.
मिचेल साहेब इतक्या सहनशीलतेने चालले म्हणूनच या वेळेच्या लोकांत त्यांचा टिकाव झाला. त्यांची सहनशीलतेची गोष्ट अशी एक पहाण्यात आहे की ते रस्त्यांत उपदेश करीत असता कोणी टोपी उडविली तर उभे राहून रागावल्यासारखे करून म्हणत की आता वेळ नाहीं, उद्या चार वाजता तुम्ही सर्व लोक येथे जमा, म्हणजे शिपाई येऊन तुम्हास घेऊन जाईल.
आणि तेथून निघून पुढे काही अंतरावर एक जागा पाहून तेथे बसून उपदेश करीत. ते उपदेशास बाहेर निघाले म्हणजे राग हा काय पदार्थ है विसरून जात.
येथले लोग मिशनरीचा इतका द्वेष करणारे होते तरी त्यांच्या मुलांस व मुलींस शिकविण्याच्या त्यांनी अकरा शाळा घातल्या व त्यांस दोन प्रकारची विद्या देऊ लागले. हे साहेब येथे आले तेव्हा इंग्रेजी शाळा येथे नव्हती; ती प्रथम यांनीच स्थापिली. ती थोडेच दिवस त्यांच्या ताब्यांत होती. पुढे सरकाराने त्यापासून मागून घेतली. तेव्हां त्यांनी लष्करांत एक मराठी शाळा घातली ती अद्याप आहे.
नंतर इंग्रेजी शाळा स्थापिली तीही लष्करांतच होती. पुढे शहरांत इंग्रजी शाळा केली व मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा स्थापिली, मग मराठी तीन चार शाळा घातल्या.
या सर्व शाळा या वेळेस चांगल्या चालत नव्हत्या. मुले व मुली जमत नसत. थोरली जी इंग्रेजी शाळा तेथेही शंभरांहून अधिक मुले नव्हती. अभ्यासही बराबर चालत नसे. कारण शिक्षक चांगले मिळत नसत. ज्यास स्वतः आपल्या शिकण्याची काळजी नाही अशी टवाळखोर पोरे येत. मग काय बिगारीचा घोडा आणि तरवडाचा फोक याप्रमाणे होई.
यांची पुस्तके ही सरकारी शाळेतील नव्हती. शाळेत मुले फुकट घेत. काही मुलांस पगार देत, बुके देत. इतके करीत तरी मुले जमत नसत. पण त्यांनी पिच्छा सोडला नाही. शनै:शनै: आपले काम चालविले, मिशनरींची शाळा म्हटली म्हणजे मुले निघून जात, पंतोजी ओ, ना, म्या, देखील मिळणे कठीण पडे. कारण, त्या वेळचे लोक मिशनरी म्हणजे पोतेऱ्याप्रमाणे समजत असत. त्यांच्या घरी जायाचे नाही. शाळेत जायाचे नाही. त्यांची चाकरी करायाची नाही. त्यांचा उपदेश ऐकावयाचा नाही. जर उपदेश कोठे रस्त्यांत चालला असला तर मात्र तेथे थट्टा करायास काही लोक जमत.’’
नारायण विष्णू जोशी यांनी जेम्स मिचेल यांच्या शाळांविषयी पुढील शब्दांत लिहिले आहे :
``पुण्यात अगदी पहिली अशी इंग्रजी शिकण्याची शाळा रेव्हरंड जेम्स मिचेल साहेब, मिशनरी नेस्बिट स्कॉटिश मिशन यांची होती, ती सरकाराने मागून घेऊन बुधवारच्या वाड्यात घातली. तेथे मूले फार नव्हती व मुलांपासून दरमहा फी घेत नसत, पण योग्यतेच्या मुलांस उत्तेजन येण्यासाठी दरमहा पगार देत. वार्षिक परीक्षेचे वेळेस शेलापागोटे बुके इत्यादि फार चांगली बक्षिसे देत.
पुढे थोडीसी लोकांस शिकण्याची गरज दिसल्यावर दर मुलास आठ आणेप्रमाणें फी बसविली. त्यात मराठी शाळेत शिकून तयार झालेल्या मुलास मात्र फुकट घेत, ही चाल अद्याप चालत आहे. याप्रमाणे विद्येचा प्रसार होत चालला.
या वेळेस या शाळेत ख्रिस्ती शास्त्र शिकवीत असत, परंतु ते बंद करण्याचे कारण असे ऐकण्यात आहे की पापी लोकांच्या हातात पवित्र शास्त्र देणे ही गोष्ट चांगली नाही असे इंग्लिश चर्चच्या एका पाद्रीचे मत होते. सन १८३३ या साली सरकारी इंग्रेजी व मराठी शाळेत भूगोल, खगोल, सिद्धपदार्थविज्ञान इत्यादी विषय शिकवू लागले. याचे अगोदर पुण्यातील लोकांस त्यांच्या ज्योतिषात भास्कराचार्याने केलेले जे खगोलाचे सिद्धांत ते मात्र माहीत होते; तेही सर्वांस माहीत नव्हते, जेवढे जोशी तेवढ्यासच माहीत होते.
भूगोलाविषयीं तर पुराणातील कहाण्या म्हणजे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे, नऊ खंडें सप्तसमुद्र आहेत येवढी कायती माहिती होती. सिद्धपदार्थविज्ञान म्हणजे काय विद्या आहे, हे तर मुळीच माहित नव्हते.
या शाळेवर इजदेल साहेब प्रोफेसर होते. यांनी फार श्रम घेऊन शाळा चालविली होती. कारण इंग्रजी शिकणे हे यावेळच्या लोकांस अगदी आवडत नसे. इंग्रजी शिकले म्हणजे मोठ्या पगाराच्या जागा मिळतील म्हणून शिकत असत. विद्येची अभिरुची नव्हती. ''

जेम्स मिचेल यांनी १८४५ साली सदर बझार (कॅम्प बझार) आणि शहरातील शाळा तात्पुरत्या एकत्रित केल्या तेव्हा या दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या १२५ पासून ९० पर्यंत घसरली होती. कॅम्प बझार शाळेत १८४९च्या जुलैत ९० विद्यार्थी होते तर शहरातल्या शाळेत ५० विद्यार्थी होते.
स्कॉटिश मिशनच्या पुण्यातल्या या दोन शाळांपैकी कॅम्प (सदर) बझारमधील किंवा मुख्य शहरातील एका इंग्रजी शाळेत जोतिबांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शिक्षण झालेले असणार हे उघड आहे.
जेम्स मिचेल यांचे एक चिरंजिव विल्यम किंनैर्ड मिचेलसुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे धर्मगुरु बनले आणि नंतर स्कॉटिश मिशनच्या पुणे केंद्रात आपल्याबरोबर काम करत होते असे जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
विल्यम किंनैर्ड मिचेल यांचा पुण्यातल्या स्कॉटिश मिशनस्थानासाठी धर्मगुरु म्हणून १० ऑगस्ट १८५२ रोजी दिक्षाविधी झाला आणि २० जानेवारी १८५३ रोजी आपल्या पत्नीसह त्यांचे पुण्यात आगमन झाले. रेव्हरंड विल्सन किंनैर्ड मिचेल यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार १८५६च्या अखेरीस युरोपला जावे लागले आणि त्यानंतर ते परत भारतात कधी परतले नाहीत.
पुणे स्कॉटिश केंद्राच्या मिशनकार्यातली जेम्स मिचेल यांची आपल्या पुत्राबरोबरची अल्पकालीन भागीदारी अशाप्रकारे संपृष्टात आली. जेम्स मिचेल आणि मार्गारेट शॉ मिचेल या दाम्पत्याला सात मुले होती. विल्यम किंनैर्ड मिचेल यांची जागा रेव्हरंड जेम्स वॉर्डरोप गार्डनर यांनी घेतली.
जेम्स मिचेल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात स्कॉटिश शाळांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मिचेल यांनी १८५५ साली लिहिले कि आता त्यांच्या शाळांत २५० विद्याथी आहेत. मराठी शाळांतील विद्यार्थ्यांसह एकूण संख्या ९०० पर्यंत होती. मात्र या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या इमारती अपुऱ्या पडत होत्या.
जेम्स मिचेल यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना १८६० मध्ये स्कॉटलंडला जावे लागले होते. जेम्स मिचेल यांनी स्कॉटलंडच्या या दौऱ्यात आपल्या मायदेशाचे घेतलेले दर्शन अखेरचेच असणार होते,
जेम्स मिचेल यांचे मदतनीस म्हणून रेव्हरंड जेम्स वॉर्डरोप गार्डनर १८५६ पासून पुण्यात स्कॉटिश मिशनकेंद्रात कार्य करु लागले. जॉन मरे मिचेल आणि रेव्हरंड गार्डनर यांच्याबद्दल नारायण विष्णू जोशी यांनी आपल्या `पुणे शहरचे वर्णन' मध्ये पुढील शब्दांत लिहिले आहे:
``पण पुढे जसजसे लोक सुधारु लागले तसतसी मुले शाळेत जमू लागली, मुले जमतात असे वाटल्यावर त्यासही चांगली व्यवस्था करण्याचे उत्तेजन आले. व जसी दुधात साखर तसे या समयास महाविद्वान डॉक्टर (जॉन) मरे मिचल साहेब यांची नेमणूक येथे झाली. त्यांनी तर मिशनरी शाळा फारच चांगले योग्यतेस आणली. मुले घेणे म्हणजे चांगली, विद्या शिकण्यास दक्ष अशी पाहून घेऊ लागले. उगीच टवाळखोर पोरे घेणे बंद केले. त्यावर थोडीसी फी साडेतीन आणे बसविली. जेव्हा थोडेसे पैसे पडू लागले, तेव्हा अर्थातच मुलांस काळजी लागली. असे काही दिवस चालवून शाळा बरीच उदयास आणली व आठ आणेपर्यंत फी चढविली.
त्यांच्या मागे रेव्हरंड गार्डनर साहेब यांची नेमणूक झाली. हे स्वतः मेहनती, हुशार, ज्यास सर्व विषयांची सारखी माहिती, असल्या विद्वान पुरुषाचे हाती ही शाळा आल्यावर यांनी तर या शाळेचे रुपच बदलून तिला महाविद्यालयाचे रूप आणले; या कारणाने मुलेही फार वाढली, एक वेळ तर या शाळेत सहाशे मुले हजर झाली. त्यास ही जागा पुरेना म्हणून दुसरी जागा घ्यावी लागली. मुलांची भरती इतकी झाली की, मुले घेत नाही, असे म्हणणे या दयाळू साहेबास भाग पडले.
असे कोणी मनात आणू नये की बायबल शिकविणे बंद केले असेल म्हणून मुले येऊ लागली असतील तर असे नाही. ही शाळा घातल्यापासून जो त्यांचा क्रम आहे तोच आहे. किंबहुना जास्ती म्हणण्यास चिंता नाही. आता या विद्यालयात सुमारे पाचशे मुलें आहेत. प्रत्येकापासून आठ आणेप्रमाणे फी घेतात. अभ्यास फारच चांगला चालतो.’’
``गार्डनर साहेबांच्या वेळीच प्रथम मुले मुंबईत युनिव्हर्सिटीमध्ये पसार (उत्तीर्ण) होऊ लागली. एक वेळ तर या विद्यालयांतील अकरा असामी परीक्षेस गेले होते त्यापैकी दहा पास झाले. या मानाने त्या वर्षी सरकारी कोणतेही विद्यालयांतील विद्यार्थी पसार (म्हणजे उत्तीर्ण) झाले नाहीत. गार्डनर साहेब इतकी मेहनत घेत होते की शाळेत मुलांस शिकविण्यास वेळ मिळेना म्हणून एक वर्ग घरी केला होता. अशी मेहनत चालवून ही शाळा उदयास आणली. याच वेळेस तिला सरकारी मदत मिळाली.’’
``याच मिशनचे एक अनाथ मुलींचे बोर्डिंग स्कुल आहे, हे (जेम्स) मिचेल साहेब यांनी स्थापून सुमारे पंधरा वर्षे झाली. या शाळेत सर्व जातीच्या मुली घेतात. या शाळेत सर्व जातीच्या मुली घेतात. पोरक्या मुली व ज्यांस आईबाप आहेत अशा मुलींसही घेतात. त्यास दरमहा तीन रुपये द्यावे लागतात. या शाळेत सुमारे पन्नास मुली आहेत. त्यास अन्नवस्त्र तेथे मिळते. त्यास राहाण्यासाठी एक जागा रेव्हरंड गार्डनर साहेबांनी बांधली आहे. तेथे त्यास घरी गेल्यावर उपयोगी पडणारी कामे शिकवितात; खेरीज इंग्रेजी व मराठी या दोन्ही विद्या शिकवितात; आणखी शिवण, जाळ्या, नाना त-हेचे कशिदे, टोप्या, मोजे इत्यादि कामे फारच चांगली शिकवितात व त्यास सुंदर व मनोरंजक असी भक्तिपर व इतर प्रकारची गाणी शिकवितात.
येथे देखरेख करण्यास एक मॅडम नेमली आहे. व विद्या शिकविण्यास शिक्षक आहेत व याखेरीज मुख्य मिशनरीची व त्यांच्या मॅडमेची वरचेवर देखरेख आहेच.

ह्या बोर्डिंग स्कुलाचे कायदे फारच चांगले आहेत. सकाळी मुलींस मराठी व इंग्रजी शिकवितात. नंतर जेवण झाल्यावर एक शिक्षक ख्रिस्ती शास्त्र त्याजकडून वाचवून त्याचा अर्थ सांगतो व गीत गाऊन ईश्वराची प्रार्थना करितो. नंतर दुपारी त्यास शिवण काम देतात. संध्याकाळीं त्यास खेळायास व फिरायास पुष्कळ वेळ मिळतो. रात्री निजण्यापूर्वी सकाळच्याप्रमाणें ईश्वरभजन होतें,
मोठ्या मुलींच्या दिमतीस लहान मुली दिल्या असतात. त्या त्याची वेणी फणी करितात, व त्यांची साडीचोळी करतात. मुलीच स्वतः आपला स्वैपाक करितात.
अशा विद्यालयापासून देशास केवढे फायदे आहेत हे उघडच आहे. पोरकी मुले यात धर्म, नीती व विद्या मिळून त्या फार चांगल्या स्थितीत येतात. याच मुली जर मोकार राहिल्या असत्या तर कोणी भ्रष्ट बायकांनीं त्यास घेऊन आपला दुष्ट धंदा शिकविला असता, किंवा त्या रस्तोरस्ती हिंडून भामटेगिरी करू लागल्या असत्या. तर त्याच मुली इथल्या शिक्षणाने सगुणी, नम्र, नीतिमान, प्रामाणिक, उद्योगी आणि विद्वान होतात. पुढे त्या घरचारिणी झाल्यावर त्यांच्या कुटुंबाकडून देशास लाभ होणार नाहीं असे कोणाच्याने म्हणवेल ?
याशिवाय शहरांत मुलींच्या व मुलांच्या मराठी शाळा आहेत. व हिंदुस्थानी मुलींची व मुलांची शाळा सन १८५४ साली मिस्टर वझीर बेग नामक एका ख्रिस्ती उपदेशकाने नानाच्या पेठेत घातली ती आता नुकतीच मोडून टाकली.
याच मिशनाच्या ताब्यात आंधळे, पांगळे, महारोगी, जखड ह्यातारे, व ज्या कोणास काम करण्याची शक्ती नाही, अशा लोकांसाठीं एक धर्मशाळा आहे. ही स्थापून सुमारे पंचवीस वर्षे झाली. यातही पाहिजेल त्या जातीचे मनुष्यास घेतात. त्यास येथे दर आठवड्यास शिघा ५। शेर बाजरी, जोंधळे किंवा गहू व अदपावकम शेर डाळ व १८ पैसे इतका देतात, सहा महिन्यांनी कपडे देतात. यावर एक मनुष्य नेमलेला असतो, तो तेथील लोकांस नेमाने नित्य उपदेश करतो. खेरीज धर्मशाळेच्या कारकुनाचेही काम पाहतो. ही जागा लष्करात सदर बाजारात आहे. व येथे सुमारे तीसपासून चाळीसपर्यंत मनुष्ये असतात. हिचा सर्व खर्च लष्करांत राहणारे परोपकारी साहेब लोक व क्वचित इतर लोक पुरवितात.
आता एकंदरींत विचार करून पाहिले असता, असे सहज ध्यानात येते की, पुण्यात प्रथम इंग्रजी शाळा स्थापक मिशनरी, मुलींची शाळा स्थापक मिशनरीच, मराठी शाळा स्थापक मिशनरीच, हिंदुस्थानी शाळा स्थापक मिशनरीच, गरीब लोकांसाठी धर्मशाळा स्थापक मिशनरीच. मिळून सुधारणुकेची व लोककल्याणाची कामे करण्यास हेच मूळ. यावरून असे दिसते की मिशनरी हे पुण्यांतील लोकांचे कल्याण करण्याकरिता ईश्वराने पाठविले आहेत.
पुणे शहरात सरकारी व लोकांची आणि मिशनरींची कल्याणाचीं कामे सारखीच आहेत. म्हणून याविषयीं सरकारापेक्षा मिशनरींस हे अधिक भूषण आहे. सरकारी इंग्रजी शाळा, मिशनरी इंग्रजी शाळा; सरकारी मराठी शाळा, यांची मराठी शाळा. कमेटीची मुलींची शाळा, यांची मुलींची शाळा; कमेटीची महारांची शाळा, यांची महारांची एक व भंग्यांची एक शाळा, त्यांची आंधळे लोकांसाठीं धर्मशाळा, यांची धर्मशाळा; त्यांचे बोर्डिंग स्कूल, यांचे बोर्डिंग स्कूल; यांच्या सभा, त्यांच्या सभा, हे धर्मार्थ पैसा देतात, ते देतात. यांची वाचण्याची पुस्तके, त्यांची पुस्तके; त्यांचे सरकारी इतिहास, यांचे इतिहास; त्यांचे गणित, यांचे गणित; जितकी सरकारी शाळेत चालणारी पुस्तके आहेत, तितकी त्यांची आहेत.
सरकार वर्षास शाळाची परीक्षा घेतात, मिशनरी हे घेतात. सरकार बक्षिसे देते. मिशनरीही देतात, सरकारच्या शाळेत फी घेतात, हेही घेतात, सरकारच्या शाळेतील विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत पसार होतात, यांच्या शाळेतील पसार होतात, खेरीज सरकार व कमेटी यांपेक्षा अधिक हे ईश्वरी ज्ञान शिकवितात, ही तर सर्वांत मोठी गोष्ट आहे.''
``स्कॉटिश मिशनच्या एका मिशनरीचे शैक्षणिक प्रशिक्षण असे फारसे झालेले नव्हते. तरी हा मिशनरी खूप चांगल्या मनाचा, सद्गृहस्थ होता. त्यांनी खूप दीर्घकाळ आपले मिशनकार्य अत्यंत तळमळीने पार पाडले. या मिशनरीबद्दल स्थानिक तसेच युरोपियन लोकांमध्ये खूप आदराची भावना होती,’’ असे जॉन मरे मिचेल यांनी जेम्स मिचेल यांचे वर्णन केले आहे.
रेव्हरंड जेम्स मिचेल यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या भारत देशातच माथेरान येथे २८ मार्च १८६६ रोजी वयाच्या ६६ वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्यावेळी त्यांच्याजवळ त्यांची पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, ज्येष्ठ कन्या डॉ. फ्रेझर आणि रेव्हरंड जॉन स्मॉल उपस्थित होते.



मिचेल यांचा पार्थिव देह माथेरानहून पुण्यात आणण्यात आला आणि तेथेच त्यांना चिरविश्रांती देण्यात आली. या अंत्ययात्रेला मुंबईहून डॉ. जॉन विल्सन आले होते आणि पुण्यातील विविध स्तरांतील अनेक लोक या मिशनरीला अखेरची मानवंदना देण्यासाठी हजर होते.
अलीकडेच म्हणजे दोनेक महिन्यांपूर्वी मला एक सुखद धक्का बसला. रेव्हरंड जेम्स मिचेल हे पुण्यातील क्वार्टर गेटपाशी असलेल्या लक्ष्मी रोडवरील ख्राईस्ट चर्चचे संस्थापक आहेत असा मला अचानक शोध लागला.
जोतिबांचे शिक्षक जेम्स मिचेल याच ख्राईस्ट चर्चचे १८३४ ते १८६३ या दीर्घकाळात धर्मगुरू होते. चर्चच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी असलेल्या त्या संगमरवरी फलकावर त्यांचे अगदी पहिलेच नाव आहे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे हे या ख्राईस्ट चर्चचे सदस्य आहेत.
सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या या ज्येष्ठ मिशनरी व त्यांच्या पत्नी मिसेस मिचेल यांच्या पाऊलखुणा येथे सापडणे, हा माझ्यासाठी खरोखरच एक आनंददायी अनुभव ठरला.

Camil Parkhe January 3, 2026


Monday, September 22, 2025

 

                                                       सायमन मार्टिन

यंदा फार जुनी परंपरा असलेल्या दोन साहित्य संमेलनांचे बार पुढील वर्षांरंभात लागोपाठ उडणार आहेत.
शतकाच्या उंबरठ्यावरचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला नऊ ते अकरा जानेवारीला होणार आहे.
दोन्ही साहित्य संमेलनांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे.
`पानिपत'कार पाटील यांच्या अलिकडच्या आरक्षणाबाबतच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडीबद्दल साहजिकच संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
असल्या वादांमुळेच खरे तर मराठी साहित्य संमेलनांत रंगत आणि मजा येते असे म्हटले जाते.
माझ्या आठवणीप्रमाणे वादाची ही गौरवशाली परंपरा घोषित आणीबाणीपर्वात कराड येथे दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पुल देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या 1975 सालच्या संमेलनापासून सुरु झाली आहे. असो.
तर मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने आपल्या घटनेनुसार संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करुन, इच्छूक उमेदवारांकडून रितसर अर्ज मागवून, त्यांच्या मुलाखती वगैरे असे सर्व सोपस्कार पार पाडून संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
बीड येथे झालेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आणि परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पौलस वाघमारे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
वसईचे फादर विजय गोन्साल्विस अध्यक्षपदी असलेला नाशिक ख्रिस्ती साहित्य संघ नियोजित सत्ताविसाव्या संमेलनाचा यजमान आहे.
किमान दहा पुस्तके आपल्या नावावर असलेल्या व्यक्तीच यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी पात्र होत्या. याचे कारण एकही साहित्यकृती नसलेले लोक यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेले आहेत.
दुसऱ्या एका अलिखित संकेतानुसार यावेळचे साहित्य संमेलनाध्यक्षपद कॅथोलिक व्यक्तीसाठी राखीव होते. दोन वर्षानंतर होणाऱ्या संमेलनासाठी हे पद प्रोटेस्टंट साहित्यिकांसाठी राखीव असेल.
मार्टिन यांच्याव्यतिरिक्त यंदा दोन इतर साहित्यिक रिंगणात होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक हेमंत घोरपडे आणि वसई येथील आणि संध्या नागालँड येथे कार्यरत असलेले सालेशियन किंवा डॉन बॉस्को संस्थेचे फादर नेल्सन फलकाव यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते.
निवड समितीने यापैकी मार्टिन आणि घोरपडे यांच्या मुलाखती घेतल्या, फादर फालकाव मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत येऊ न शकल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता.
मराठी साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ जयंत नारळीकर यांच्याबाबतीतला अनुभव लक्षात घेऊन आता धट्टाकट्टा, चालताबोलता आणि हिंडूफिरु शकणारा संमेलनाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेनेसुद्धा यावेळी असाच निकष घेतला असावा.
ऐंशीच्या उंबरठ्यावरील घोरपडे यांना त्यांचे वय बहुधा प्रतिकूल ठरले. निवडणुकीचा आग्रह त्यांनी टाळल्याने राज्यातील पात्र मतदारांचा मात्र हिरमोड झाला असेल.
मराठी खिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला एक वेगळेच वलय आहे.
सन १९२७ पासून नाशिक येथूनच सुरु झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद याआधी `स्मृतीचित्रे'कार लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), प्रा. जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), डॉ. सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००) आणि डॉ.अनुपमा निरंजन उजगरे (मुंबई २००५) यांनी भूषविले आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आणि माझा परिचय अगदी अलिकडचा. काही महिन्यांपूर्वीचा.
मात्र साहित्यविश्वातील त्यांच्या कामगिरीबाबत फार आधीपासून मला माहिती आहे.
सायमन मार्टिन यांच्या निवडीमुळे नाशिकमधील नियोजित संमेलन मोठ्या उत्साहात होईल यात शंका नाही.
ख्रिस्ती साहित्य संमेलनांतील माझा सहभाग तसा मर्यादित राहिला आहे.
तिसेक वर्षांपूर्वी कवि निरंजन उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे झालेल्या आणि अशोक आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे २०१२ साली झालेल्या संमेलनास मी एक श्रोता म्हणून हजर होतो.
सातारा आणि नाशिक या दोन्ही साहित्य संमेलनांशी निगडीत असलेल्या बातम्या आणि घडामोडींकडे एक साहित्यप्रेमी म्हणून इतरांप्रमाणे माझेही लक्ष असणार आहे.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

Camil Parkhe September 22, 2025

Saturday, August 9, 2025



याला उत्तुंग ऐसे नाव..

जवळजवळ शंभर वर्षे ही वास्तू पुणे शहराची एक स्काय लाईन, एक ओळख होती. जसे फुले मंडईचा विशिष्ट आकाराची तो मनोरा, पुणे कॅम्पमधले यहुदी किंवा ज्यू लोकांचे ते लाल देऊळ, रेस कोर्सजवळचे जुन्या वानवडीमधले पूर्ण सफेद रंगातले सेंट पेट्रिक केथेड्रल.
.तिकडे पॅरिसमध्ये आजसुद्धा एफेल टॉवरला हे भाग्य लाभले आहे.
आपल्याकडच्या आता गगनचुंबी इमारतींच्या जमान्यात या वास्तूंबाबत तिथेच जवळपास चारपाचदा चौकशी करावी लागते.

त्याच धर्तीवरील पुण्यातील जुन्या वेताळ पेठेतील आणि आताच्या गुरुवार पेठेतील हे पंचहौद चर्च, किंवा पवित्र नाम देवालय.

The Church of The Holy Name

हे ऐतिहासिक चर्च या दिवसांत आपला 140 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

मागे झालेल्या शतकोतोर रौप्य महोत्सवाला मी हजर होतो, तेव्हाही पालकमंत्री असलेले अजित पवार मुख्य पाहुणे होते.

यावेळी दहा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे.

याच ऐतिहासिक वास्तूमध्ये बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती म गो रानडे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे प्रभूतीना गोपाळराव जोशी यांनी खेळी करुन आणि सापळ्यात पकडून ते चहा बिस्किट प्रकरण घडवून आणले होते.

भारतीय पत्रकारितेतील पहिलेवहिले आणि अतिशय यशस्वी, खूप गाजलेले स्टिंग ऑपरेशन.

टिळक चरित्रात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात ग्रामण्य प्रकरण म्हणूनच हे चहाच्या पेल्यातले वादळ प्रसिद्ध आहे.

ख्रिस्ती मिशनरी आणि जोतिबा - सावित्रीबाई फुले यांचे अजोड नाते होते. स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरी यांच्या शाळांत सावित्रीबाई आणि जोतिबा शिकले होते.

तर या पंचहौद चर्चचे - पवित्र नाम देवालयाचे - सचिन मनोज येवलेकर यांना मी लिहीलेले " सावित्रीबाई आणि जोतिबा यांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य " हे पुस्तक दिले.

त्यानंतर हा फोटो घेत असताना काल संध्याकाळच्या सहाच्या ठोक्याला चर्चच्या बेलचा ठण ठण असा घंटानाद चालू होता.

चर्चच्या बेलचा घंटानाद ही काही मला नवलाची बाब नाही.

तरी या त्यावेळी खास इंग्लंडहून मागवल्या गेलेल्या या चर्चबेलच्या ठराविक काळाने होणार्या त्या घंटानादाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

हा घंटानाद खास आहे.

हा घंटानाद या उत्तुंग मनोर्यातील सात मोठ्या घंटांमधून येत असतो. सात घंटा आणि संगीतातले सात सूर.. सा रे ग म किंवा दो रे मी.....

त्यामुळे या घंटानादातून डिसेंबरात नाताळाच्या सणाला मंजुळ स्वरांत Christmas carols म्हणजे नाताळाची ख्रिस्त जन्माची गाणी ऐकवली जातात.

आणि भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्टला " जन गण मन अधिनायक " या राष्ट्रगीताचीही धून या घंटानादातून ऐकवली जाते..

Camil Parkhe August 7, 2025 

Sunday, July 27, 2025

 

Former Union Minister and veteran leader Sharad Pawar released a Marathi book written by me in Pune on July 3, 2025

The book is entitled ‘Savitribai, Jotibanche Shikshak Mitchell Dampatya Aani Stree Shikshanatil Purwasuri ( The Mitchell couple who taught Savitribai and Jotiba Phule and pioneers in female education).
Savitribai and Jotiba Phule had studied in schools run by the American and Scottish missionaries at Ahilyanagar and Pune.
The recently released Hindi film ‘Phule’ has depicted the arrival of the Phule couple in a buggi (horse-ridden cart) at Miss Cynthia Farrar’s school in Ahilyanagar to seek admission for Savitribai at the teachers training school run by the American missionary there.
The first few scenes of the Marathi film “Satyashodhak’ include young Jotiba studying in the Pune-based school run by Scottish missionary James Mitchell (1800-1866).
Incidentally Jotiba Phule in his memorandum to the Sir William Hunter Education Commission in 1882 has described his long association with the Christian missionaries.
Jotiba says the schools run by missionaries inspired him to start schools for girls and untouchables.
He says one of his schools is now run by Mrs (Margaret Shaw) Mitchell, wife of Rev. James Mitchell.
Jotiba also says that he has also been as a teacher in a mission female boarding school.
Let us see this information in Jotiba’s words:
The very first paragraph of the memorandum to the Hunter Commission states:
‘’My experience in educational matters is principally confined to Poona and the surrounding villages.
About 25 years ago, the missionaries had established a female school at Poona, but no indigenous school for girls existed at the time.
I, therefore, was induced, about the year 1851, to establish such a school, and in which I and my wife worked together for many years.
After some time I placed this school under the management of a committee of educated natives. Under their auspices two more schools were opened in different parts of the town.
A year after the institution of the female schools, I also established an indigenous mixed school for the lower classes, especially the Mahars and Mangs.
Two more schools for these classes were subsequently added, Sir Erskine Perry, the president of the late Educational Board, and Mr. Lumsdain, the then Secretary to Government, visited the female schools and were much pleased with the movement set on foot, and presented me with a pair of shawls.
I continued to work in them for nearly 9 to 10 years, but owing to circumstances, which it is needless here to detail, I seceded from the work.
These female schools still exist, having been made over by the committee to the Educational Department under the management of Mrs. Mitchell.
A school for the lower classes, Mahars and Mangs, also exists at the present day, but not in a satisfactory condition.
I have also been a teacher for some years in a mission female boarding school. My principal experience was gained in connection with these schools. ''
However, there is little information on the lives and works of Cynthia Farrar, James Mitchell, his wife Margaret Shaw Mitchell, Principal of the Pune-based Sanskrit College (now Deccan College) John Murray Mitchell who shaped the lives of Savitribai and Jotiba Phule.
My new book throws light on the lives of this great missionaries.
The book, published by Chetak Books, Pune, is available online.
(Photo Caption: Deepak Girme, Sharad Pawar, Camil Parkhe, former Pune Mayor Ankush Kakade, Former MLC Jaideo Gaikwad and senior journalist Arun Khore
Camil Parkhe July 4

Thursday, May 1, 2025

राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन

कोण असतील बरे या वेगवेगळ्या वेशभूषेतील मुली?

पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणाऱ्या त्या शालेय मुलींची उत्सुकता लपत नव्हती.
बुधवारच्या 12 February 2025 नगर येथील ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनातील ग्रंथ दिंडीतील या तीन व्यक्तिरेखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्या तीन व्यक्तिरेखा होत्या:
समाजसुधारक, विदुषी पंडिता रमाबाई,
भारतात विशेषतः महाराष्ट्रात मुंबई आणि नगर येथे स्त्रीशिक्षणाची मुहुर्तवेढ रोवणाऱ्या सिंथिया फरार
आणि अर्थातच मदर तेरेसा..

अलीकडे मराठी विश्वात वेगवेगळी संमेलने होताहेत.
काही विश्व संमेलने असतात जिथे विश्वातल्या अतिश्रीमंत लोकांना रक्कम मोजुन येण्यासाठी आवतण दिले जाते.
काही साहित्य संमेलने मराठी नगरीचियेची सीमा पार करुन थेट देशाच्या राजधानीत भरवली जातात.
अशा संमेलनांचा थाट खास असतो आणि यात सहभागी होणाऱ्या निमंत्रित लोकांची खूप चांगली ठेप राखली जाते असे ऐकून आहे.
कालच दिल्लीतल्या साहित्य संमेलनाची लांबलचक कार्यक्रमपत्रिका पाहिली, विविध सत्रांमधल्या निमंत्रित लोकांची नावे वाचली आणि डोळे दिपले.
दोनेक दिवसांपूर्वी मी एका संमेलनाला हजर होते ते मात्र पूर्णतः वेगळ्या स्वरुपाचे होते.
ग्रामीण साहित्य संमेलन असल्याने आपला खास गावरान आब राखून होते.
नगरला १२ फेब्रुवारीला झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाविषयी मी हे सांगतो आहे.
नावातच `ग्रामीण' बिरुद अभिमानाने मिरवत असल्याने या मांडवाखालची सगळीच मंडळी रांगडी होती, `आत एक आणि बाहेर दुसरे' असे काही त्यांचे वागणे नव्हते.
एक उदाहरण देतो.
या ग्रामीण संमेलनाला नगर शहराबाहेरुन आलेल्या लोकांची संख्या बऱ्यापैकी होती तरी त्यापैकी कुणालाही - अगदी विविध सत्रांच्या अध्यक्षांनाही - येण्याजाण्यासाठी मानधन दिले नव्हते.
मला स्वतःलाही आमंत्रण नव्हते.
पण आमच्या मूळ जिल्ह्यात होणाऱ्या संमेलनाची माहिती मिळाल्यावर मी आपणहून आयोजकांशी संपर्क साधला आणि स्वतःसाठी निमंत्रण मिळवले होते.
संमेलनाच्या आदल्या रात्री राहण्यासाठी फक्त दोन रुम्स बुक करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी एका रूममध्ये मी राहिलो होतो.
बाकी सर्व जण - पुणे, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर वगैरे ठिकाणांहून स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने आले होते.
इथेही काव्यवाचन करायला अनेक हौशी आणि नवोदित कवी होते, त्यापैकी काहींच्या नावांवर एकही काव्यसंग्रह नव्हता.
श्रोत्यांतले रसिक मात्र त्यांना मनापासून दाद देत होते.
या ग्रामीण संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुपारच्या जेवणाला एकच मेन्यू होता.
तो म्हणजे मांसाहारी.
भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खाद्यपदार्थ अर्थातच चिकन बिर्याणी.
या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाला येणाऱ्या सर्वांची खाद्य संस्कृती समान असेल, आणि त्यापैकी प्रत्येकाला चिकन बिर्याणी आणि सोबत खोशिंबर हमखास आवडेल, हे आयोजकांनी गृहीतच धरले होते.
भुकेल्या पोटी चिकन बिर्याणी आणि कोशिंबरीचा आस्वाद घेताना आयोजकांच्या या गृहितकाला मी मनापासून दाद दिली.
इकडच्या ग्रामीण लग्न आणि इतर समारंभांत असणारे इतर खाद्यपदार्थ म्हणजे शिरासुद्धा अर्थातच होता.
बस्स तेव्हढेच, जेवणानंतर आईस्क्रीम किंवा तोंड रंगवण्यासाठी पान वगैरे कुछ नाही.
जेवण्याच्या ठिकाणी हातातल्या पत्रावळीत हे खाद्यपदार्थ घेऊन पाहुणेमंडळी दिसेल तिथे फतकल मारुन किंवा पत्रावळी उंचवट्यावर ठेऊन उभ्याउभ्याने गप्पा मारत जेवत होती.
प्रस्थापित संमेलनादी कार्यक्रमांत मान्यवर व्यासपीठावरचा आपला सहभाग संपला कि ठरलेल्या बिदागीचा चेक घेऊन तत्परतेने तेथून पाय काढत असतात.
इथे मात्र उशिरा संध्याकाळपर्यंत तेथून पाय काढता घेणे नकोसे वाटत होते.
पुण्यात रामवाडी स्टेशनमधली रात्रीची शेवटची मेट्रो चुकेल म्हणून मी तेथून जरा लवकर निघालो होतो.
गावाकडच्या मंडळींनी अशी संमेलने वारंवार घ्यावीत.

Sunday, December 8, 2024

आचारसंहितेचा भंग


पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रायबरेली मतदारसंघातून १९७१ साली झालेली निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९७५ साली रद्द ठरवली ती निवडणुक प्रचारात त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून आणि आचारसंहितेचा भंग झाला होता म्हणून.

त्यानंतर मोठा गदारोळ झाला, त्याचीच परिणती आणीबाणी लादण्यात झाली हे सर्वांना माहिती आहेच.
त्यानंतर इंदिराबाईंचा निवडणुकीत पराभव झाला पण त्या हिरीरीने परत जनतेकडे गेल्या.
त्यावेळी १९७९च्या डिसेंबरात या खवळलेल्या जखमी वाघिणीला गोव्यात पणजीतल्या हॉटेल मांडवीपाशी मी खूप जवळून पाहिले.
नंतर मिरामार बिचजवळच्या कंपाल ग्राऊंडवर त्यांचे भाषण ऐकले.
आजी आणि माजी पंतप्रधान असलेल्या इंदिराबाई यांच्यासह राजीव गांधी, व्ही पी सिंग, चंद्रशेखर, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी हस्तांदोलन करण्याची, पत्रकार परिषदेत संवाद साधण्याची आणि सभेत त्यांचे भाषण ऐकण्याची मला संधी मिळाली आहे.
मात्र पंतप्रधानपदी असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याबरोबर अर्धा पाऊण तास पुणे विमानतळावरच्या एका छोट्याशा केबिनमध्ये बोलण्याची संधी मला मिळाली.
बरोबर फक्त ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम होते, आणि पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्र जनता दलाच्या अध्यक्ष मृणाल गोरे होत्या.
साल होते १९९०.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग एअर इंडियाच्या प्रवाशी विमानाने पुण्याला आले होते.
निवडणुक आचार संहितेचा भंग होऊ नये म्हणून.
सोलापूर जवळ कर्नाटकमधील एका पोटनिवडणुकीच्या आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी ते आले होते. पंतप्रधान म्हणून सरकारी विमानाचा वापर त्यांनी टाळला होता.
दिल्लीचे विमान संध्याकाळी होते म्हणून पंतप्रधान विमानतळावर ताटकळत बसले होते.
पंतप्रधान आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी आले असल्याने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) पत्रकारांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी वाहन व्यवस्थाही केली नव्हती.
त्यावेळी मी इंडीयन एक्स्प्रेसला होतो. मुकुंद संगोराम यांच्या स्कूटर वर बसून त्या रविवारी दुपारी एकच्या आसपास घाईघाईत मी विमानतळावर पोहोचलो होतो.
बोफोर्स प्रकरण उचलून धरणारे सिंग हे त्याकाळी `मिस्टर क्लीन' म्हणून प्रसिद्ध होते.
प्रवाशी विमानाने प्रवास करून पंतप्रधानांनी आपला वेळ वाया घालवू नये असे त्यावेळी काही वृत्तपत्रांनी म्हटले होते.
लोकशाही प्रथेत निवडणुक आचार संहिता हा तसा एक खूप मोठा प्रभावी वचक आहे..
Camil Parkhe