Did you like the article?

Showing posts with label Lok Sabha. Show all posts
Showing posts with label Lok Sabha. Show all posts

Friday, December 6, 2024

 

हे. ऐंशीच्या दशकातली. आधीची नगर परिषद जाऊन महापालिका बनलेले पिंपरी चिंचवड शहर नव्याने आकार घेत होते.
मुंबई-पुणे हमरस्त्यावर चिंचवडमध्ये असलेल्या कॅथोलिक चर्चच्या कल्याण केंद्राने या परिसरातील लोकांसाठी एमआयडीसी परीसरात एका शेडमध्ये नवी शाळा सुरु केली होती. उद्योगनगरीत स्थायिक होणाऱ्या लोकांसाठी शाळा सुरु करणे आवश्यक होते.
नव्यानेच सुरु केलेल्या या शाळेसाठी खोल्या बांधण्याची परवानगी महापालिकेकडून घेणे गरजेचे होते. कल्याण केंद्रात नेमणूक झालेले तरुण फादर साल्वादोर उर्फ सालू पिंटो त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यालयात नियमितपणे जात होते. मात्र महापालिकेचे अधिकारी मात्र त्यांना तशी परवानगी देण्यास टाळाटाळ करत होते.
असे अनेक दिवस गेले. फादर साल्वादोर पिंटो महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांना भेटून शाळेसाठी बांधकाम करण्यासाठी वेगवेगळे अर्ज देत होते. त्यांच्या फायलीत अर्जांचा आणि इतर कागदपत्रांचा गठ्ठा वाढत चालला होता. मात्र शाळेसाठी बांधकाम करण्याची परवानगी मिळेल अशी काही चिन्हे दिसत नव्हती.
फादर पिंटो यांनी मात्र आपला धीर आणि संयम सोडला नव्हता. चिकाटीने ते महापालिकेच्या इमारतीतील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना भेटत राहिले. आपल्या शाळेतील मुलांमुलींना शाळेत सुरक्षित छत असणे आवश्यक आहे हे अधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न फादर सालू करत होते.
शाळेच्या बांधकामासाठी परवानगी मिळवण्यासाठी महापालिकेच्या कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याला लाच देण्यास मात्र फादर सालू पिंटो तयार नव्हते.
एक दिवस मात्र फादर सालू पिंटो यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वोच्च अधिकारी असलेल्या आयुक्तांची यासाठी भेट घेण्याचे ठरवले. त्यांना यासाठी थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रवेश सुद्धा मिळाला.
त्यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त होते श्रीनिवास पाटील.

फादर साल्वादोर पिंटो यांनी आपले मत आयुक्तांसमोर थोडक्यात आणि स्पष्टपणे मांडले.
त्यांनी आयुक्तांना सांगितले कि या क्षणाला कल्याण केंद्राच्या या शाळेसाठी इमारत बांधण्यासाठी परवानगी देणे शक्य नसल्यास निदान शाळेतील विद्यार्थिनीसाठी स्वच्छतागृह बांधण्याची परवानगी देण्यात यावी.
मुलींसाठी शाळेत स्वच्छतागृह असणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी सहानुभूतीची भूमिका ठेवून त्यासाठी बांधकामास परवानगी देण्यास यावी असे फादर पिंटो यांनी महापालिका आयुक्त पाटील यांना विनंती केली.
महापालिका आयुक्तांनी फादरांना विचारले कि यासंदर्भात आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे देण्यात आली आहेत काय?
फादर सालू यांनी तत्क्षणी आपल्या जवळ असलेली अर्जाची आणि कागदपत्रांची जाडजूड फाईल आयुक्तांना दाखवली.
``मी संबधित अधिकाऱ्यांशी याबाबत बोलतो आणि योग्य तो निर्णय घेतो'' असे आयुक्तांनी फादरांना आश्वासन दिले आणि लगेचच संबंधित सर्व विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बैठकीसाठी बोलावले.
फादर साल्वादोर अर्थातच या बैठकीला होते.
बैठक सुरु होताच कल्याण केंद्राच्या या शाळेसाठी परवानगी मागणाऱ्या अर्जाचे काय झाले असा थेट प्रश्न आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना विचारला. या बैठकीत नगर अभियंता (सिटी इंजिनियर), आरोग्य, बांधकाम, वगैरे खात्यांचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.
या सर्व विभागांत जाऊन या अधिकाऱ्यांना फादर पिंटो अनेकदा भेटले होते.
आयुक्तांनी या अर्जाबाबत जाब मागितल्याने सर्वच अधिकऱ्यांची गाळण उडाली होती.
परवानगी का दिली जात नाही असे विचारल्यावर आयुक्तांना थातुरमातुर उत्तर देणे त्यांना शक्यच नव्हते. सर्व कागदपत्रे असल्याने बांधकामास परवानगी देण्यास तशी काहीच अडचण नव्हती.
``शाळेसाठी बांधकाम करण्याची परवानगी देण्यास काही अडचण नाही असे दिसते. त्यामुळे आज संद्याकाळपर्यंत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी फादरांना आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी देणारी पत्रे द्यावीत,'' असा आदेश महापालिका आयुक्त श्रीनिवास पाटील यांनी दिला आणि बैठक संपली.
शाळेच्या खोल्यांच्या बांधकामासाठी अंतिम परवानगी मिळण्यास मात्र एक मोठी अडचण .होती.
सकाळी झालेल्या महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सिटी इंजिनीयर नव्हते आणि त्यांच्या विभागाची परवानगी यासाठी सर्वात आवश्यक होती.
मात्र यावर लगेचच तोडगा निघालासुद्धा.
इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी सिटी इंजिनियर साहेबांना सांगितले कि महापालिका आयुक्तांनी शाळेच्या बांधकामासाठी आज संद्याकाळपर्यँत सर्व परवानग्या देण्याचे आदेश दिले आहेत.
अशी परवानगी देण्यास काही कायदेशीर आणि इतर अडचणी असल्यास सिटी इंजिनियर याबाबत खुद्द आयुक्तांना तसे सांगू शकतील असेही सिटी इंजिनियरांना सांगण्यात आले.
ही मात्रा लगेच लागू पडली आणि शाळेसाठी बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानगीचे कागदपत्र सही आणि शिक्क्यांसह फादर साल्वादोर पिंटो यांच्या हातात त्या दिवशी संघ्याकाळीच पडली.
नागरिकांच्या हितांसाठी आवश्यक ते निर्णय धडाडीने घेणारे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीनिवास पाटील यांनी त्यानंतर राज्य प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या,
श्रीनिवास पाटील यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यांचे हरहुन्नरी व्यत्क्तिमत्व अनुभवण्याची मला संधी मिळाली ती १९९१ लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणींच्या वेळी.
त्यावेळीही आपल्या झुबकेदार मिशीने ते सर्वांचे लक्ष वेधून घेत असत.
त्या जमान्यात आजचे वादग्रस्त ठरलेले इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन किंवा ईव्हीएम नव्हते. प्रत्यक्ष मतदान पत्रिका मोजल्या जायच्या आणि हे काम दिवसभर आणि क्वचित रात्रभर सुद्धा चालायचे.
त्यावेळी मी इंडियन एक्सप्रेसला बातमीदार होतो. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ आणि भाजपचे लक्ष्मण सोनोपंत तथा अण्णा जोशी उमेदवार होते. त्याविषयी सविस्तर नंतर कधीतरी.
तर त्यावेळी जिल्हाधिकारी या नात्याने श्रीनिवास पाटील निवडणूक अधिकारी होते आणि माईकवर सतत बोलून आपल्या प्रगल्भ आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची आम्हा पत्रकाराना आणि मतमोजणी केंद्रात हजर असलेल्या लोकांना अनुभूती देत होते.
लोकप्रिय कविता आणि शेरोशायरी.. चपखल टिपण्णी वगैरे..आजही मतमोजणी केंद्रातील ते दहाबारा तास माझ्या नजरेसमोर आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले श्रीनिवास पाटील पुढे लोकसभेवर सुद्धा निवडले गेले आणि नंतर सिक्कीमचे राज्यपाल बनले.
तो अलीकडचा इतिहास सर्वांना ठाऊक आहेच.
चिंचवडच्या कल्याण केंद्रातर्फे सुरु करण्यात आलेली मुलांमुलींची शाळा आज सेंट अँड्रयूज स्कुल म्हणून नावारूपास आली आहे.
कल्याण केंद्र आज मुंबई-पुणे हायवेवर जयश्री टॉकीजच्या दुसऱ्या टोकाला असलेले सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्च या नावाने ओळखले जाते.
फादर साल्वादोर पिंटो यांनी आता वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली आहेत.
पुण्याचे बिशप आणि शनिवारीच मुंबईचे आर्चबिशप ओसवाल्ड ग्रेशियस यांचे वारसदार म्हणून नेमणूक झालेले पुण्याचे बिशप जॉन रॉड्रिग्स यांच्या हस्ते त्यांचा यानिमित्त रविवारी संध्याकाळी सत्कार झाला. पुणेरी पगडीसह !!
फादर सालू पिंटो याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
Camil Parkhe December 2, 2024

Thursday, July 11, 2024


निलेश लंके  महाराष्ट्रातल्या निवडणुकीतला एक जायंट किलर

महाराष्ट्रातून लोकसभेच्या निवडणुका लढलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या आणि निवडून आलेल्या लोकांच्या नावांकडे नजर फिरवली तर यापैकी बहुतेक जण प्रस्थापित आहेत हे सहज लक्षात येते.
बहुतेक उमेदवारांना कौटुंबिक राजकीय वारसा होता.
या नव्या ४८ खासदारांमध्ये केवळ एक जण जायंट किलर ठरला आहे.
हे नवे खासदार आहेत अहमदनगर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आलेले निलेश लंके.
पारनेर येथील आमदार म्हणून याआधी निवडून आलेल्या लंके यांनी अहमदनगरचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे यांचा अत्यंत अटीतटीच्या लढाईत २९ हजार मतांनी पराभव केला आहे.
राज्यात मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या राधाकृष्ण विखे यांचे सुजय विखे हे चिरंजीव.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ आता आरक्षित असल्याने विखे याचे घराणे आपल्याच बालेकिल्ल्यात विस्थापित झाले आहे.
काँग्रेसचे नेते म्हणून महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांनी आपल्या मुलाला अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 2019 साली काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले होते.
ते शक्य होईना तेव्हा अखेरीस ते सरळसरळ भाजपात सामिल झाले होते आणि मग भाजपच्या तिकिटावर अहमदनगरमधून डॉ सुजय विखे निवडून आले होते.
यावेळीसुद्धा सुजय विखे यांचा विजयाचा मार्ग खूप सुकर होता, मात्र अचानक निलेश लंके यांची एन्ट्री झाली.
अजित पवार राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार असलेल्या लंके यांना पक्षाची उमेदवारी मिळेना तेव्हा त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली.
डिट्टो विखे कुटुंब स्टाईलने.
इतिहासाची पुनरावृत्ती या मतदारसंघात झाली होती.
निलेश लंके यांना फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही अशी सुजय विखे यांनी टीका केली होते आणि हे वाक्य या निवडणुकीच्या आखाड्यात खूप गाजले.
फाडफाड इंग्रजी बोलू शकणाऱ्या डॉ सुजय विखे यांना अहमदनगर मतदारसंघाच्या शहरी भागांत मतांची मोठीं आघाडी मिळाली तर निलेश लंके यांना पारनेर, श्रीगोंदा, कर्जत अशा ग्रामीण भागांत मताधिक्य मिळाले.
लंके यांचा विजय आणि सुजय विखे यांचा पराभव हा राज्यातील भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे.
याआधी १९९२च्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत डॉ सुजय विखे यांच्या आजोबांचा - अपक्ष बाळासाहेब विखे यांचा- काँग्रेसचे यशवंत गडाख यांव्याकडून पराभव झाला होता.
जायंट किलर लंके यांनी आता इंग्रजीचे धडे गिरवण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
Camil Parkhe.

Wednesday, August 8, 2018

आठवण शरद पवारांच्या दिल्ली उड्डाणाची





BBC Reporter Sam Miller

आठवण पवारांच्या दिल्ली उड्डाणाची
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८कामिल पारखे
राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाची माळ महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या गळ्यात पडू शकेल अशी शक्यता होती. त्यावेळी घेतलेल्या पवारांच्या मुलाखतीची ही आठवण.

''शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेत म्हणून बीबीसीचे दिल्लीतील वार्ताहर पुण्यात आले आहेत. उद्या पुणे आणि बारामतीच्या  लोकसभा निवडणूक मतदानाच्या बातम्या ते देणार  आहेत. त्यांना एक स्थानिक बातमीदार मदतीला हवाय. तुला हे काम करायला  आवडेल काय?" पुण्यातील एका इंग्रजी दैनिकाच्या वार्ताहराने मला विचारले आणि मी ताबडतोब होकार दिला. बीबीसीचे दिल्लीतील प्रतिनिधी सॅम मिलर यांच्या पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या वृत्तसंकलनाच्या कामात असा मी सहभागी झालो. 
ही  घटना जून १९९१ मधली आहे. दिनांक २० मेला लोकसभा निवडणुकांच्या मतदानाच्या पहिल्या फेरीतील  मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीव गांधींची हत्या झाली  होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने  मतदानाच्या  उरलेल्या दोन फेऱ्या पुढे ढकलल्या होत्या. पुढील मतदान १२ आणि १५ जूनला होणार होते. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसचे अध्यक्षपद रिते  झाले आणि या पक्षाला पंतप्रधानपदासाठीही  उमेदवार राहिला नाही. या अनपेक्षित घडामोडींमुळे राजीव गांधींशी फारसे पटत नसल्याने राजकीय विजनवासात गेलेले आणि राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते  पी. व्ही. नरसिंह राव अचानक काँग्रेसचे अध्यक्षच बनले. आधीच राजकीय संन्यास जाहीर केल्यामुळे किंवा पक्षाचे लोकसभेसाठी  तिकीटच न मिळाल्याने नरसिंह राव  त्यावेळी लोकसभा निवडणूकही लढत नव्हते. मात्र आता त्यांच्याच अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्ष १९९१च्या पुढे ढकललेल्या लोकसभा निवडणुका लढवित होता. राजीव गांधींनंतर आता काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाल्यास पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असतील याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे त्याकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शरद  पवार हे बारामती  लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही  लढत होते.  काँग्रेसला सत्ता मिळाल्यास आपण पंतप्रधानपदासाठी उमेदवार असू शकतो हे पवारांनी जाहीर केले होते. त्यामुळे बारामती मतदारसंघातून लढणाऱ्या पवारांवर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित झाले होते.  बीबीसीचे सॅम म्युलर याच्याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या अनेक नियतकालिकांचे आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी त्यामुळे पुण्यात दाखल झाले होते. 
मतदानाच्या दिवशी बारामतीला जाण्यापूर्वी पुण्यातील लोकसभा मतदानाचे बाइटस सॅम मिलरला  घ्यायचे होते. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अण्णा जोशी यांच्या सदाशिव पेठेतील  घरी सकाळी सात वाजता आम्ही दोघे गेलो. अण्णा जोशी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव गाडगीळ यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. पूजा केल्यानंतर औक्षण स्वीकारून अण्णा मतदानाला निघाले आणि त्याआधी बीबीसीशी बोलले. त्यांचे बोलणे झाल्यांनतर आम्ही पुन्हा सॅम उतरला  होता त्या हॉटेलात आलो. तेथे  अण्णा जोशी यांचा बाईटच्या आधी त्यांची ओळख करून देताना सॅम म्हणाला. ''दिस इज अँना जोशी, भारतीय जनता पार्टीज कँडिडेट इन पूना.. अँड  अँना  जोशी इज नॉट अ वूमन बट अ  मॅन....!"   
सॅम मिलर टाईप करत होता त्या छोटयाशा नाजूक यंत्राकडे मी आश्चर्याने पाहत  होतो. माझ्याकडे छोटासा पोर्टेबल टाईपरायटर होता पण इलेक्ट्रिक प्लग असलेले हे उपकरण मी पहिल्यांदाच पाहता होतो. लॅपटॉप काय असते हे तेव्हा मी पहिल्यांदा पाहिले. बीबीसीच्या लंडनच्या  कार्यालयाशी हॉटेलातून बोलणे  झाल्यानंतर आम्ही कारने बारामतीकडे कूच केले. 
मी माझी ओळख करून दिल्यानंतर सॅमची प्रतिक्रिया मला अचंबित करून गेली होती.  'ओ  पारखे, महाराष्ट्रीयन सरनेम!'  असे तो म्हणाला होता.. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पेरेशनच्या दिल्ली येथे असणाऱ्या वार्ताहराने हे कसे ओळखले असा माझा प्रश्न होता. त्यावरचे त्याचे  चपखल  उत्तर होते:  'मात्रेने संपणारी आडनावे फक्त महाराष्ट्रातच असतात. उदाहरणार्थ , काळे, देशपांडे, मोरे, सुलाखे, गोरे इत्यादी. उत्तर किंवा दक्षिण भारतात अशी आडनावे नसतात.'' ही  गोष्ट खरीच होती, पण मला तोपर्यंत हे माहीतच नव्हते! त्या दोन दिवसांत सॅमच्या सहवासात त्याचा भारतीय संस्कृतीचा किती गाढा अभ्यास आहे हे त्याच्या संभाषणातून आणि अनेक प्रसंगातून  दिसून आले.    
बारामतीत पोहोचल्यावर तेथील काही ग्रामस्थांशी, पुरुष आणि महिलांशी आम्ही बोललो, त्याचे इंग्रजीत भाषांतर मी केले, रेकॉर्ड केलेले हे संभाषण नंतर पुण्याला जाऊन बीबीसी कार्यालयाला पाठवायचे होते. बारामती येथे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मतदान पार  पडले तेव्हा तेथे जमलेल्या अनेक पत्रकारांमध्ये आम्ही दोघेही होतो. त्यांचे मतदान झाले तसे आम्ही सर्व पत्रकारांनी पवारांना गराडाच  घातला. त्यांनीही हसतहसत आणि नेहेमीच्या सावधपणे सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र यावेळी पवार अत्यंत घाईत होतो. आज केवळ मतदानासाठीच ते बारामतीत थांबले होते. मतदान झाल्यानंतर लगेच त्यांना दिल्लीला निघायचे होते. महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री असले तरी दिल्लीची गादी रिकामी असल्याने आता त्यांचे सर्व चित्त तिकडे खिळले होते. पत्रकारांशी मराठी भाषेतील  बोलणे संपवून ते आपल्या गाडीकडे वळणार तोच सॅम मिलर आणि आमच्याबरोबर असणाऱ्या काही पत्रकारांनी त्यांना इंग्रजीत मुलाखत देण्याची विनंती केली. बीबीसी आणि राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींकडून ही विनंती आल्यावर पवारांनी क्षणभरच विचार केला. ''मी पुण्यातून दुपारच्या विमानाने दिल्लीला जात आहे, त्यामुळे घाईत आहे. तुम्ही असे करा, तुम्ही  माझ्या गाडीतच बसा.  लोहगाव विमानतळापर्यंत माझ्याबरोबर या. प्रवासात आपल्याला बोलता येईल आणि माझे विमानही  चुकणार नाही.' पवार यांनी सुचविले. 
हे ऐकताच आम्ही त्यांच्या गाडीच्या दिशेने अक्षरश: झेपावलोच. पवार स्वतः: गाडीत पुढे ड्रायव्हरशेजारी बसले. त्यांचा स्टेनगनधारी बॉडीगार्ड ड्रायव्हरच्या सटमागे बसला होता. मी स्वत: पवारांच्या मागे, माझ्याशेजारी सॅम आणि पुण्याच्या इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरण बसले होते. मागच्या सीटवर तीनऐवजी आम्ही चारजण दाटीदाटीने बसलो होतो.  हँडबॅगमधून  पटापट आपली नोटबुक आणि पेन बाहेर काढून पुढील 'अॅक्शन' साठी तयार झालो होतो. सॅमचे ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू होते.   
त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्याभोवती सुरक्षेचे दाट आवरण होते. त्यात पंतप्रधानपदाच्या शर्यतीच्या रिंगणात त्यांनी आपलीही हॅट भिरकावली असल्याने एका संभाव्य पंतप्रधान म्हणून त्यांच्या सुरक्षेत लगेचच कितीतरी वाढ झाली होती. त्यामुळे आम्ही पत्रकारांनी पवारांच्या गाडीत बसून प्रवास करावा हे त्यांच्याभोवतीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना अजिबात रुचले नव्हते. तरीसुद्धा पवारांच्या पुढच्या आणि मागच्या गाडींमध्ये या सुरक्षा अधिकाऱ्यांचा ताफा असणार होता. त्याशिवाय वाहनांच्या ताफ्याच्यापुढे नेहेमीप्रमाणे रस्ता सुरळीत करणारी एस्कोर्टची जीप होतीच.
गाड्यांचा ताफा बारामती शहराबाहेर  पडला आणि आमचे संभाषण सुरू झाले. शरद पवार पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत होते वा पहिल्यांदाच दिल्लीच्या राजकारणात पदार्पण करत होते, असे मुळीच नव्हते. याआधी १९८४ साली समाजवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभेत पहिल्यांदा प्रवेश केला होता. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी वाजतगाजत १९८७ साली काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन केला होता आणि त्यानंतर शंकरराव चव्हाण केंद्रात परतून १९८८ला पवार महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते. काँग्रेस केंद्रात सत्तेतून पायउतार झाल्यांनतर पुन्हा एकदा पवार यांना दिल्लीच्या राजकारणाची ओढ लागली होती. राजीव गांधींच्या हत्येनंतर  आता तर साक्षात पंतप्रधानपदच त्यांना खुणावत होते.   
विशेष म्हणजे आतापर्यंत पवार यांची बहुतेक सर्व भाषणे, मुलाखती, प्रश्नोत्तरे मराठीतच होती. नरेंद्र मोदी  पंतप्रधान झाल्यांनतर सुरुवातीच्या काही काळात ते इंग्रजीत कसे बोलतील अशी  एका उत्सुकता निर्माण झाली होती तशीच उत्सुकता त्याकाळी आम्हा पत्रकारांत शरद पवारांविषयी होती. आमच्या  गाडीच्या ताफ्याने बारामती-पुणे रस्त्यावर वेग घेतला. आमच्याकडून इंग्रजीतून प्रश्न येत गेले आणि पवार उत्तरे देत  गेले तसे पुण्यातील आम्ही पत्रकार थक्क होत गेलो. पवारांना इंग्रजी भाषेत बोलताना आम्ही पहिल्यांदाच ऐकत होतो आणि त्यांनी या भाषेवर कमालीचे प्रभुत्व कमावले आहे हे जाणवत होते. आम्हांपैकी  कुणाही वार्ताहराला - अगदी सॅम मिलर या बीबीसीच्या वार्ताहरालासुद्धा -  आपला कुठलाही प्रश्न एकदाही पुन्हा विचारण्याची पाळी आली नव्हती हे विशेष होते.
दीड तासांच्या प्रवासानंतर आम्ही लोहगाव विमानतळावर पोहोचलो तेव्हा आमच्याकडे प्रत्येकाकडे मोठे एक्स्ल्युसिव्ह मॅटर होते यापैकी आम्हा कुणालाही शंका नव्हती. याचे कारण म्हणजे आम्हा चौघांपैकी कुणीही एकमेकांचे बातमीदारीतील प्रतिस्पर्धी नव्हते.  गाडीतून उतरल्यानंतर पवारांचे या आगळ्यावेगळ्या मुलाखतीबद्दल आभार मानल्यानंतर ही मुलाखत लवकरात लवकर आपापल्या दैनिकाला, माध्यमाला देण्यासाठी आमची गडबड सुरू झाली.  
शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत एक दावेदार असल्याने या मुलाखतीला निश्चितच न्यूज व्हॅल्यू होती. सॅमने पाठविलेला वृत्तांत बीबीसी दिवसातून काही काळाच्या अंतराने प्रसारित करत होती, सॅम आणि मी तो ऐकत होतो. मी लिहिलेली पवारांची ही मुलाखत  पणजीतल्या नवहिंद टाइम्सने दोन-तीन दिवसांनी पान एकला अँकर म्हणून वापरली. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे प्लसनेसुद्धा मी लिहिलेला बीबीसी रिपोर्टरच्या वार्तांकनपद्धतीवरचा लेख त्यावेळी छापला होता.  
शरद पवार दिल्लीत पोहोचल्यानंतर मात्र पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पार मागे पडले. राजीव गांधी असताना नरसिंह राव आणि बाळासाहेब विखेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्षाचे १९९१ सालच्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले नव्हते. विखे अहमदनगरमधून अपक्ष म्हणून १९९१ ची लोकसभा निवडणूक लढवित होते.  प्रचारात त्यांनी आघाडीही घेतली होती. त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात टाइम्स ऑफ इंडियाचे अभय वैद्य आणि मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा रात्री एक वाजता ही मुलाखत सुरू होऊन एका तास चालली होती हे आठवते. दिवसभर प्रचाराच्या धामधुमीत असलेले आणि साठी ओलांडलेले बाळासाहेब तरीही या अपरात्री ताजेतवाने दिसत होते. राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशभर  निवडणुकीची हवा बदलली होती. शेवटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत झालेल्या मतदानात सहानुभूतीच्या लाटेने  काँग्रेसला सत्तेच्या अगदीजवळ आणून ठेवले.  बाळासाहेब विखेही ही  निवडणूक हरले. मात्र या निवडणुकीच्या रिंगणातही नसलेले पण राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यामुळे  नरसिंह राव हे पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार बनले. गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे काँग्रेसाध्यक्ष पदामुळे साहजिकच काँग्रेसचे अनेक खासदार त्यांच्याकडे वळाले. शरद पवारांपेक्षा त्यांना या शर्यतीत आघाडी मिळाली. त्यामुळे नरसिह राव पंतप्रधान बनले. बायबलमध्ये एका वचन आहे; " बांधणाऱ्यांनी नाकारलेला  एक  दगड इमारतीचा कोनशिला बनला आहे''. नरसिंह रावांच्या बाबतीत अगदी तसेच घडले होते.  
(पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी आणि  बहुभाषिक असलेल्या नरसिह रावांचे मराठीवर चांगले प्रभुत्व होते. हरी नारायण  आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीचे त्यांनी तेलगुत भाषांतर केले होते.  आंध्र प्रदेशचे ते एकेकाळी  मुख्यमंत्रीही होते. मात्र आंध्र प्रदेश राज्य तेलुगू देशममुळे त्यांना आणि काँग्रेसला असुरक्षित झाल्यामुळे १९८४ आणि १९८९च्या लोकसभा निवडणुकीत नरसिंह राव महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून निवडून गेले होते. पंतप्रधान झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे  भूमीपुत्र म्हणून पोटनिवडणुकीतून  हमखास निवडून येणार अशी खात्री असल्याने त्यांनी नंद्याळ येथून निवडणूक लढविली आणि विक्रमी मताधिक्याने निवडूनही आले. नरसिंह राव यांनी पूर्वीप्रमाणे रामटेक येथूनच पोटनिवडणूक  लढविली असती तर महाराष्ट्रातून निवडून आलेली आणि मराठी भाषा बोलणारी व्यक्ती पंतप्रधान झाली असे म्हणता आले असते. पण असे व्हायचे नव्हते.)



Monday, May 28, 2018

आर्थिक बळाशिवाय इंदिरांचे सत्तेवर पुनरागमन

आर्थिक बळाशिवाय इंदिरांचे सत्तेवर पुनरागमन
सोमवार , २८ मे, २०१८कामिल पारखे
पैशाशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत असे आज म्हटले जाते. मात्र, आणिबाणीनंतर गमावलेली सत्ता परत मिळवण्याचे शिवधनुष्य इंदिरा गांधी यांनी कोणत्याही आर्थिक बळाशिवाय पेलले होते. 
गोव्यातील पणजी येथील मांडवीच्या तिरावर असलेल्या मांडवी हॉटेलसमोर पन्नास-साठ लोकांच्या घोळक्यात मी उभा होतो. थोड्याच वेळात तेथे आलेल्या एका कारमधून इंदिरा गांधी उतरल्या. ती वेळ संध्याकाळ पाचची असेल. त्यांच्या डोक्यावरील केशसंभार पूर्ण सफेद होता. रोडच्या प्रवासाने त्यांचा चेहरा थकलेला जाणवत होता. तरीही डोक्यावरील पदर सावरीत स्मित करत त्यांनी समोरच्या लोकांना अभिवादन केले आणि विजेच्या चपळाईने मागे वळत आमच्या समोरच त्या हॉटेलच्या पायऱ्या चढू लागल्या. १९७९ सालच्या डिसेंबरची ही घटना आहे. दशकभर देशाच्या पंतप्रधान असलेल्या आणि आणीबाणीनंतर सत्तेतून पायउतार झालेल्या इंदिरा गांधींना अनपेक्षितरित्या अगदी जवळून मी पाहत होतो. त्या वेळेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात जराही आदर नव्हता. काही वर्षांपुर्वी शाळेत असताना बांगलादेश युद्धाच्या काळात आणि  नंतरच्या त्यांच्या  'गरिबी हटाव' या कार्यक्रमामुळे मी त्यांचा फॅन किंवा भक्त बनलो होतो. नंतरच्या आणीबाणीनंतर देशातील इतर लोकांप्रमाणे मीही  त्यांचा कडवा विरोधक बनलो होतो. मात्र आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या नेत्यांनी जनतेची घोर निराशा केली होती. मोरारजी देसाईनंतर पंतप्रधान झालेल्या चौधरी चरणसिंगांनी बहुमत नसल्याने राजिनामा दिला होता आणि देशात अडीच वर्षांतच पुन्हा निवडणुका जाहिर झाल्या होत्या. या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त इंदिरा गांधी पणजीत आल्या होत्या. 
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पणजीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या मांडवी हॉटेलात उतरल्या यामागे काही कारणे होती. सत्तेत नसल्याने डोना पावला येथून जवळ असलेल्या काबो राज निवास येथे त्यांना आतिथ्य मिळणे अशक्य होते. आणीबाणी पर्वानंतर इंदिरा गांधीविषयी लोकमानसांत प्रचंड घृणा निर्माण  झाली होती आणि राजकीयदृष्टया त्या अस्पृश्य बनल्या होत्या. सन १९८० आधी गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. 
हॉटेल मांडवी हे पणजीतील एक मोठे हॉटेल होते. त्या संध्याकाळी मिरामारशेजारील कंपाला ग्राउंडवर इंदिरा गांधी यांची सभा होती. निवडणूक प्रचारासाठी कारने लांबचा प्रवास केल्यानंतर सभेपूर्वी फ्रेश होण्यासाठी मांडवी हॉटेलमध्ये त्या उतरल्या होत्या. 
आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाचा भारताच्या उत्तरेतील नऊ राज्यात पार धुव्वा उडाला होता. तेथे या पक्षाला लोकसभेची एकही जागा न मिळाल्याने मोरारजी सरकारने तेथील राज्य सरकारे तडकाफडकी बरखास्त करून नव्याने निवडणुका घेतल्या होत्या. त्या सर्व राज्यांत जनता पक्षाची सरकारे निवडूनही आली होती. इंदिरा गांधी सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी म्हणजे के ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण वगैरेंनी त्यांना पक्षातून काढून टाकले होते. केंद्रातील आणि महत्वाच्या राज्यातून सत्तेबाहेर झाल्याने इंदिरा काँग्रेस या आपल्या नव्या पक्षाचा इंदिरा गांधी प्रचार करता होत्या. काँग्रेस पक्षाची अगदी मूठभर नेतेच त्यांच्याबरोबर राहिली होती.
केंद्रातील आणि महत्वाच्या राज्यांतील सत्ता गमावल्यामुळे इंदिरा गांधींना निवडणूक प्रचारासाठी आर्थिक चणचण भासत होती. त्यांना आर्थिक मदत करण्यास कुणी तयार नव्हते इतक्या त्या राजकीयदृष्ट्या बदनाम झाल्या होत्या. चार्टर्ड फ्लाईट सोडाच पण थोड्या अंतरावर जाण्यासाठी हेलिकॉप्टर घेणेही आर्थिकदृष्ट्या मुश्किल होते. त्यामुळे प्रवासी विमानाने किंवा अनेक किलोमीटरचा प्रवास त्या मोटारीने करता होत्या. त्या काळात दिवसाच्या चोवीस तासांपैकी अनेक  तास त्या प्रवासात असत, या प्रवासातच झोपून सभेपूर्वी ताजेतवाने होऊन त्या पुढील सभेच्या तयारीत लागत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण देश अक्षरश: पिंजून काढला होता. त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षात दुसरा प्रभावी असा नेता नव्हताच.  अशाच एका निवडणूक  सभेपूर्वी मला त्यांना जवळून पाहण्याचा योग आला होता.  
त्यानंतर एका तासातच इंदिराजींचे भाषण  ऐकण्यासाठी कम्पाला ग्राऊण्डवर मी हजर होतो. इंदिरा गांधी या अटल बिहारी वाजपेयी किंवा नरेन्द्र मोदी यांच्यासारख्या वक्त्या नव्हत्या. मात्र त्यांचे भाषण अगदी घणाघाती होते. इंदिराजी आपल्या भाषणात कुठल्याही एका व्यक्तीचे कधीही नाव घेत नसत. आपल्या भाषणात त्यांनी  सत्ताधारी जनता पक्षाच्या अंतर्गत लाथाळ्यांवर आणि  नाकर्तेपणावर हल्ला चढवत आपणच देशाची स्थिती सुधारू शकतो हे श्रोत्यांला पटवले. ते भाषण ऐकण्याआधी मी त्यांचा कट्टर विरोधक होतो पण त्यांचे भाषण संपल्यानंतर मी त्यांचा कट्टर समर्थक झालो होतो हे कबूल करायलाच हवे. तेव्हा  मी बी. ए. च्या  शेवटच्या वर्षाला  होतो,  एकवीस वर्षे पूर्ण केली नसल्याने मला मतदानाचा अधिकार नव्हता. नाहीतर माझे मत इंदिराजींच्या पक्षालाच दिले असते.  त्याकाळात देशातील राजकीय स्थिती पाहता कुणीही इंदिराजींवर विश्वास ठेविलच अशी परिस्थिती होती. त्यानंतर निवडणुका पार पडल्या आणि आणीबाणीत अगदी पानिप[त झालेल्या इंदिरा गांधींच्या पक्षाला आधी कधीही मिळाल्या नव्हत्या इतक्या लोकसभेच्या जागा मिळाल्या. इंदिराजी पुन्हा पंतप्रधान बनल्या.  
त्यानंतर कॉमनवेल्थच्या ३९ राष्ट्रप्रमुखांची अनौपचारिक बैठक (रिट्रीट)  गोव्यात १९८३ साली पार पडली.  तेव्हा 'द नवहिंद टाइम्स' या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्राचा बातमीदार या नात्याने या परिषदेच्या आणि परिषदेच्या यजमान पंतप्रधान इंदिरा गांधींच्या संदर्भात अनेक बातम्या मी लिहिल्या. सुरक्षेच्या कारणास्तव त्यावेळी तीन-चार दिवस गोव्यात ताज व्हिलेज येथे असलेले  इंदिराजी तसेच ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, झिम्बाब्वे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान बॉब हॉक वगैरेंना जवळून भेटण्याचा योग मात्र आला नाही. त्यावेळी तीनच वर्षांपूर्वी इंदिराजींना अगदी जवळून  न्याहाळण्याची संधी कशी मिळाली याचे सतत आठवण यायची.    
आज पैशाच्या बळाशिवाय निवडणुका जिंकणे शक्य नाही असे म्हटले जाते. वृत्तपत्रांत पहिल्या पानांवर सतत जाहिराती, न्यूज चॅनेल्सवर जाहिरातींचा भडीमार  याशिवाय निवडणुका जिंकता येईल का अशी शंका येते. मात्र प्रचंड परिश्रम, विरोधकांच्या मर्मस्थळांवर हल्ला करण्याची  हातोटी, जनतेमधील असंतोषास वाट देऊन लोकमानस आपल्या बाजुने वळवण्याची कला या जोरावर इंदिराजींनी राजकीय आणि आर्थिक सत्तेचे पाठबळ नसता केंद्रात सत्तेवर दमदार पुनरागमन करून दाखवले होते.   




 

Thursday, February 23, 2017

NCP chief Sharad Pawar completes 50 years of Parliamentary career

NCP chief Sharad Pawar completes 50 years of Parliamentary career
CAMIL PARKHE | Wednesday, 22 February 2017 AT 11:50 PM IST
Send by email    Printer-friendly version
Pune: Former Union Minister and Nationalist Congress Party (NCP) Chief Sharad Pawar, one of the tallest political figures in the state for the past few decades,  completed 50 years of his Parliamentary career on Wednesday, February 22.

Fifty years ago on this day, Pawar was elected as a member of the State Legislative Assembly from Baramati constituency. Since then, he has been a public representative for five consecutive decades, serving Maharashtra and also the nation in various important positions.

Pawar was appointed as minister of state for home at the age of 32 years in 1972 and appointed a cabinet minister two years later. He became Maharashtra’s chief minister at the age of 38 in 1978 and to this date, he continues to hold the record of being the youngest chief minister of Maharashtra.

He was sworn as the state chief minister four times (1978, 1988, 1990 and 1993). He has also served as the leader of the opposition in the State Assembly.  >>Contd on P2

And aslo servged as defence minister in the PV Narasimha Rao government and as agriculture minister in the two terms of the UPA government. He was recently chosen for the Padma Vibhushan award.

While continuing with his political career,  Pawar has also been associated with various other fields including the cooperative movement, an educational body like the Rayat Shikshan Sanstha and cricket.

No other person in the state has had a varied types of interest in different spheres, a fact which has been acknowledged even by his critics.

One of the senior most politicians in the country, Pawar has been praised for his administrative skills, an in-depth knowledge of the issues he deals with and friendship with leaders cutting across the political barriers.

In a comment posted on social media on Wednesday, the NCP chief has remarked: “I have completed 50 years of my parliamentary career today. It was on this day, that I was elected by the people of Baramati as a member of Maharashtra Legislative Assembly with a thumping majority. Since then, I have got the opportunity to serve  uninterrupted as a member of the State Assembly, the Legislative Council, the Lok Sabha and the Rajya Sabha. I am grateful to the people in this regard. In the past 50 years, I have experienced many ups and downs and have faced many challenges as well. But, because of the strong support of the common masses and colleagues, I was able to work in the public life. Henceforth too, I will keep working for the development of labour class, farmers, women, workers, those neglected and the new generation. I would prefer to be in their debts for the entire life.”

Sunday, February 15, 2015

AAP Ki Dilli and aftermath

The AAP victory has created a political history in the whole country. The pollsters were off the mark when all of them predicted just a comfortable majority to the Aap Aadmi Party, forecasting over 20 seats for the BJP and almost writing off the Congress. The voters in Delhi have set off an avalanche. If 2014 Lok Sabha polls experienced a Modi tsunami, there is no word to describe AAP's victory in 67 of the total 70 assembly seats.

The debate on what exactly led to the AAP avalanche, Waterloo of the BJP and decimation of the Congress in the national capital will continue for next few weeks. The army of the Sangh Parivar, scores of Union ministers and nearly 150 MPs in the Delhi poll arena were outsmarted by the thousands of the AAP volunteers drawn from all over the country who had been tirelessly working in bylanes, slums and other areas of the walled city since a few months prior to the polls.

The poll verdict of the Delheites will indeed have a lasting impact on the national politics. Kiran Bedi who was 'paradropped' as the BJP's chief ministerial nominee failed to improve the BJP's sagging poll fortune. But when the party could just win three seats of the 70 seats, the blame has been fully shifted to Prime Minister Narendra Modi and BJP president Amit Shah.

The Delhi poll debacle have left tremors in the BJP hierarchy as well as in the Congress camp. The second rung of party leaders in the BJP who had been totally sidelined for almost for a year in the process of decision making are now likely to be heard. The BJP was able to retain its core votes base but the AAP succeeded in attracting the votes shares of the Congress and other parties. This is a warning bells for all the traditional parties who have hitherto banked on castes, religion or region to win the votes. The AAP has indeed shattered all these barricades to win an unprecedented nearly 95 percent of the assembly seats. The Delhi success has now encouraged the AAP volunteers to undertake similar massive campaign in Mumbai and other metropolitan cities having polls in the next couple of years.

BJP's poll debacle has prompted its ally in Maharashtra, Shiv Sena, to take pot shots at Prime Minister Narendra Modi,  indicating the strained relationship in the saffron alliance government. Indeed there was always a tug of war even within the Congress-NCP government but it had become a matter of public concern only at the fag end of the third term of the government when NCP supremo Sharad Pawar charged that the state government was affected by a 'paralysis' of indecisiveness. Fireworks have began in the BJP-Shiv Sena government soon after completion of just 100 days in power.

If things are not sorted out by both parties well in time, the state may face fresh polls. Arvind Kejriwal succeeded in winning majority of seats in the assembly in the second attempt. Both BJP and Shiv Sena are keen on having their own government with a majority support in the state assembly and either of them may be tempted to follow Kejriwal's example to opt for the gamble and adventurism of fresh polls. If they have no such intentions, the two parties should bury the hatchets and work to fulfill the promise of clean governance and development.  

Thursday, May 22, 2014

Times of India: Prithviraj Chavan continues family legacy

The Times of India
Pune

The Times of India
You are here: Home » City » Pune

Prithviraj Chavan continues family legacy

pune: prithviraj chavan, who is among the seven persons elected unopposed from maharashtra to the upper house of parliament on monday, enjoys a unique family tradition in the history of parliament. he is the third member of his family to have found a berth in parliament uninterruptedly for over four decades, barring the last two-and-a-half years, a distinction probably surpassed only by the gandhi-nehru family. although this will be chavan's first term as a member of the elders' house, he has been elected to the lok sabha from the karad constituency in satara district for three consecutive terms since 1991. his father, former union deputy minister for defence and law dajisaheb chavan was an mp for 16 years and later, prithiviraj's mother, premalabai chavan, was also an mp for 17 years. dajisaheb was first elected to the bombay state assembly on a peasants and workers party in 1954. he was elected from the karad parliamentary constituency in 1957, defeating veteran congress leader swami ramanand bharati. he was later re-elected to the lok sabha on congress tickets from karad in 1962, 1967 and 1971 and was a deputy union minister from 1962 until his death in 1973. after dajisaheb's death, his wife premalabai was elected unopposed to the lok sabha in a by-poll in 1973. she was re-elected from the karad constituency for the next three terms. after the post-emergency split in the congress, when many party veterans in the state aligned with the congress led by devraj urs, premalabai chose to side with indira gandhi and also served as the congress(i) state president at that time. when indira came back to power with a resounding victory, she awarded premalabai with a rajya sabha seat in 1981. she was re-elected to the lok sabha from karad in 1989. premalabai, fondly referred to as kaki, retired from politics in 1991 when rajiv gandhi asked her son prithviraj, a us-trained engineer, to continue the family's political legacy in parliament. prithviraj, who was re-elected to lok sabha in 1996 and 1998, tasted defeat in 1999 when the nationalist congress party swept both the assembly and parliamentary polls in satara district. incidentally, this was also the first time since 1957 that a congress candidate was defeated in karad constituency. since creation of the karad parliamentary constituency in 1957, till 1999, this congress bastion has always been represented by the chavan clan, except from 1980-84 when co-operative leader yashwantrao mohite represented the constituency and premalabai was a rajya sabha member during that period. during his decade-long career as a parliamentarian, 56-year-old prithviraj chavan has served as the congress parliamentary party's deputy whip, party general secretary and also as spokesperson.
More from The Times of India