Did you like the article?

Showing posts with label Lisbon. Show all posts
Showing posts with label Lisbon. Show all posts

Thursday, December 21, 2023

 फ्रान्सिस्को लुईस गोम्स

गोव्यात पणजीला तुम्ही गेला तर दयानंद बांदोडकर मार्गावर कला अकादमीजवळ कंपाल गार्डनमध्ये एक पूर्णाकृती पुतळा दिसतो.
पणजीत असे पुतळे फार कमी आहेत, पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा असलेल्या बहुतेक जुन्या पुतळ्यांची रवानगी खूप वर्षांपूर्वी वस्तूसंग्रहालयात करण्यात आली आहे.
आदिलशहा पॅलेस किंवा जुन्या सेक्रेटरीएटजवळ असलेला ऍबे फरिया यांचा पुतळा त्यातून वाचला, तसाच कंपाल गार्डनमधला हा पुतळासुद्धा.
दोन्हीबाबत कारण एकच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या दोन्ही व्यक्ती `निज गोंयकार' आहेत.
पणजीला नेहेमी येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींचे कंपाल गार्डनमधील या पुतळ्याकडे सहसा लक्ष नाही. अनेक वर्षे मी मिरामार बिचजवळ आणि नंतर ताळगावला राहिलो, बसने आणि दुचाकीने येता-जाताना या पुतळ्याविषयी कुतूहल वाटायचे.
अगदी गोव्यातील अनेक लोकांनासुद्धा या फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याविषयी फार माहिती असण्याची शक्य कमीच आहे. हा पुतळा शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९२९ साली पोर्तुगाल राजवटीतच गोम्स यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उभारला गेला होता.
गोव्यात आणि भारताच्या इतर भागांत पोर्तुगालची साडेचारशे वर्षे सत्ता होती. या काळात गोव्यातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते.
पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून लिस्बनला दोनदा गेले होते.
त्यानंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीला दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेचे सदस्य म्हणून निवडले गेले होते.
नौरोजी हे ब्रिटिश संसदेवर निवडून गेलेले एकमेव भारतीय. त्यानंतर ब्रिटिश भारतात स्थानिक संसदीय मंडळे स्थापन झाली.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स ( `फ्रान्सिश्कु लुईश गॉमीश' असा पोर्तुगीज भाषेत उच्चार) यांच्याप्रमाणेच अनेक गोमंतकियांना पोर्तुगाल संसदेचे सदस्य होण्याचा सन्मान मिळाला, काही जण पोर्तुगीज मंत्रीमंडळात होते.
सद्याचे पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा ( पोर्तुगीज भाषेत आंतोनियु कॉश्ता) तर मूळचे गोंयकार, मडगावचे.
काल पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तिथे ओलिव्हियानो जे एफ गोम्स (ओलीव्हिन्यु गॉमीश) यांनी फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे लिहिलेले, नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले, हे चरित्र दिसले आणि पटकन विकत घेतले.
वाचल्यानंतर लिहिन त्यांच्यावर.
आज डिसेंबर १९ गोवा मुक्तीदिन.. गोंय मुक्ती दिसाची परबीं....
Camil Parkhe

Friday, July 14, 2023


Portugal Citizenship: फक्त गोवेकरांनाच नाही इतर भारतीयांना सुद्धा पोर्तुगालच्या नागरीकत्वाची संधी

Portugal citizenship for Indian: गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही' नागरिकांना, - सर्वांना नव्हे -  पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगाल इंडियाचे भाग होते.दिनांक १९ डिसेंबर १९६१ ला पोर्तुगालची भारतातली सत्ता   संपृष्टात आली,.       

 मात्र १९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकते, पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे. खूप काळापूर्वी म्हणजे  सतराव्या शतकात पोर्तुगीजांचे राज्य असलेल्या वसईतील किंवा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या  आणि ब्रिटिशांना लग्नात आंदण म्हणून मिळालेल्या सात बेटांच्या मुंबईतील लोकांना अर्थात ही सुविधा मिळणार नाही .

गोवा आणि पोर्तुगीजांची जुन्या वसाहती असलेल्या भारतातील इतर प्रदेशांतील अनेक लोकांनां माहित नसलेला हा विषय आता चर्चेला  आला आहे. तसे गोव्याबाबत इतर भारतीयांना अनेक गोष्टी माहित नसतात, जसे कि २०२४ च्या निवडणुकीसाठी धार्मिक ध्रुवीकरणाच्या उद्दिष्टाने भाजपतर्फे चर्चेला आणला गेलेला  युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा इथे गेली एक शतकापासून विनातक्रार अंमलात आहे ! 

पोर्तुगालने आपल्या जुन्या वसाहतीतील लोकांना किंवा त्यांच्या वंशजांना  पोर्तुगालचे नागरिकत्व बहाल करण्याचा हा विषय आता चर्चेला येण्यासाठी एक निमित्त घडले आहे. आयरिश रॉड्रिग्स या गोव्यातील कार्यकर्ता आणि वकील असणाऱ्या व्यक्तीने लिस्बन येथील आपल्या भेटीत पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरिकत्व  स्वीकारले आणि गोव्यात आणि भारतात या चर्चेला नव्याने तोंड फुटले.

इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला  पान एकवर अँकरची बातमी या विषयाला धरुन छापली होती.  बातमीचा मथळा होता :

Of 70,000 surrendered passports in Idia in a decade, 40% were in Goa 

तर हे आयरिश रॉड्रिक्स नक्की आहेत तरी कोण कि ज्यांच्या नागरिकत्व बदलाच्या निमित्ताने या मुद्द्यावर राष्ट्रपातळीवर चर्चा व्हावी?

पणजीतल्या मिरामार समुद्रकिनारी असलेल्या धेम्पे कॉलेजात सत्तरच्या दशकात मी बीए च्या पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा  एक चष्माधारी,कुरळ्या केसांचा आयरीश बारावीला होता. मी कॉलेजच्या आर्ट सर्कल या भित्तिपत्रकाचा संपादक होतो, कॉलेजच्या स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सक्रिय होतो आणि त्यामुळे कॉलेजच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये  आणि अख्ख्या स्टाफमध्ये  पूर्ण परिचित होतो.  कॉलेजच्या वेगवेगळ्या शाखांतील आणि वर्गातील विद्यार्थ्यांशी/ विद्यार्थिनींशी माझाही संपर्क असायचा.

तर तेव्हा हा बंडखोर स्वभावाचा हा मुलगा लक्षात राहिला. नंतरच्या काळात गोवा आणि द नवहिंद टाइम्स सोडून मी पुण्याला आलो, इथल्या इंग्रजी दैनिकांत कामालालागलो तरी  आयरीशचे  नाव गोव्यातल्या बातम्यांतून वाचत राहिलो.

मागे काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवर मी त्याच्यावर लिहिले होते. विषय राष्ट्रपातळीवरचा होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीयांच्या मुलीच्या संदर्भात गोव्यातल्या एका हॉटेलच्या परमिटबाबत वाद होता आणि सामाजिक कार्यकर्ता तसेच वकील या नात्याने आयरीश रॉड्रीक्सने हा मुद्दा लावून धरला होता.

तर गोव्यात एक परिचित नाव असलेल्या  सामाजिक/  माहिती अधिकार  कार्यकर्ता आयरीश रॉड्रीक्सने पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारावे हा अनेकांना धक्का होता, आणि या घटनेला साहजिकच बातमीचे मूल्य होते. वेगवेगळ्या माध्यमांतून, दैनिकांच्या सदरांतून आयरिश रॉड्रीक्स यांच्या या बदललेल्या नागरिकतत्वावर  आणि भारतातील (आणि इतर जुन्या वसाहतींतीलही) लोकांना पोर्तुगालच्या या नागरिकत्व देण्याबाबत लिहिले जात आहे.

गोव्यात मी द नवहिंद टाईम्सला असताना `गोमंतक’ दैनिकात असलेल्या  वामन प्रभू यांनी ``पोर्तुगीज पासपोर्टचे मायाजाल ! याविषयी लिहिले आहे. 

``ॲड आयरिश रॉड्रिग्ज यांच्यासारखा फायरब्रॅन्ड सामाजिक कार्यकर्ताही नुकताच या मायाजालात अडकल्यानंतर नजिकच्या काळात अजून किती गोमंतकीय नागरिक भारतीय नागरिकत्व आणि मताधिकार डावलून तोच मार्ग स्वीकारतील याचा आताच अंदाज बांधता येणार नाही.

पोर्तुगीज पासपोर्टच्या मायाजालात सापडलेल्या अनेकानी त्या संधीचे सोने करून आपली आणि कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारली असेलही परंतु आज सहा दशकानंतरही गोमंतकीयांचे पोर्तुगीज पासपोर्टचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही वा होणारही नाही हेच स्पष्ट चित्र पुढे येत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून ऊपलब्ध करण्यात आलेल्या एका आकडेवारून दिसून येते. २०११ ते २०२२ दरम्यानच्या अकरा वर्षांच्या काळात सत्तर हजारांहून अधिक भारतीय नागरिकानी आपले पासपोर्ट देशातील वेगवेगळ्या विभागीय पासपोर्ट कार्यालयात 'सरेंडर ' केल्याचे ही आकडेवारी सांगते आणि यामध्ये गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू , दिल्ली आणि चंदिगढ या आठ प्रदेशातील नागरिकांची संख्या ९० टक्क्याहून अधिक भरते आणि त्यातही विशेष असे की भारतीय नागरिकत्व सोडून देऊन पोर्तुगीज पासपोर्ट धारण करणाऱ्यांमध्ये गोमंतकीय नागरिकांची संख्या तब्बल ४0 टक्क्याहून अधिक आहे.

 जगातील जवळपास १८८ देशांचा व्हिसा पोर्तुगीज नागरिकत्व मिळवल्यानंतर आपसूकच विनायासे ऊपलब्ध होतो याच कारणावरून जर भारतीय नागरिकत्व झिडकारून पोर्तुगीज पासपोर्ट त्यानी घेतला असेल तर या पासपोर्टमुळे युरोप वा अन्य काही देशातील मिळणाऱ्या रोजगाराच्या वा अन्य संधी साध्य करून घेण्यासाठी युवा पिढीने पोर्तुगीज पासपोर्ट मिळवला तर त्यांचे चुकतेय असे म्हणता येणार नाही

वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो यावरही आयरिश रॉड्रिग्ज यांनी आपण स्वीकारलेल्या पोर्तुगीज नागरिकत्वाचे समर्थन करताना स्पष्ट केल्याने अनेकांचा ऊत्साह बळावलाही असेल,

पोर्तुगीज पासपोर्ट हा कोणालाही अनेक युरोपियन आणि अन्य ब-याच देशात व्हिसामुक्त प्रवेश देणारा आधार तर आहेच पण त्याचबरोबर पात्रतेच्या वा अफाट गुणवत्तेच्या आधारे कोणीही आपले करियर करायची महत्वाकांक्षा बाळगून योग्य ती संधी साधण्याचा प्रयत्न करत असेल तर पोर्तुगालचे महाद्वार त्यासाठी खूपच ऊपयुक्त ठरू शकते .‘

पोर्तुगालची भारतातली राजवट संपून दहाबारा वर्षे लोटल्यानंतर गोव्यात मी शिकत असताना माझ्या हॉस्टेलमधली काही मुले पोर्तुगीज होती, म्हणजे त्यांचे आईवडील पोर्तुगाल किंवा युरोपात होते आणि या मुलांचे पासपोर्ट्स पोर्तुगीज होते. सज्ञान झाल्यानंतर त्यांना भारतात राहायचे असल्यास पोर्तुगीज पासपोर्टचा त्याग करावा लागणार होता. 

मात्र वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच ही मुले भुर्रकन उडून परदेशात गेली. त्यानंतरही माझ्या बरोबर शिकणारी अनेक मुलेमुली अशाचप्रकारे भारत सोडून पोर्तुगालला आणि नंतर इतरत्र स्थायिक झाली आहेत.  अनेक नातेवाईकांनी पोर्तुगालने दिलेल्या या सुविधेचा वापर करुन युरोपात नागरिकत्व मिळवले आहे.  चारपाच वर्षांनंतर ते गोव्यात, भारतात भेटीगाठीसाठी येत असतात.

कॉमनवेल्थचे सभासद म्हणून किंवा एकेकाळी इंग्लंडची वसाहत असलेल्या भारतातील नागरिकांना युनायटेड किंगडमचे नागरिक  म्हणून हक्क बहाल करण्यात आले तर काय होईल? आपल्या देशातील किती नागरिकांना ब्रिटिश पासपोर्ट म्हणजेच ब्रिटिश नागरीकत्व  घेणे आवडेल?

आमच्या कॉलनीत विसेक इमारती आहेत आणि प्रत्येक इमारतींमध्ये किमान एका  घरातली एक व्यक्ती युरोपात, अमेरिकेत किंवा इतर राष्ट्रांत आहे. यापैकी कुणाचाही कायमस्वरुपी मायदेशी परतण्याचा इरादा नाही. मुंबईत छोट्या घरात राहणारी व्यक्ती ग्रामीण महाराष्ट्रात जेथे पिण्याचे पाणी आठवडातून एकदोनदा येते विजपुरवठ्याबाबत सतत बोंबाबोंब असते  त्या आपल्या गावी परतण्याचा विचारही करत नसतात अगदी तसेच.   

त्याशिवाय अनेक जण या देशांत जाण्याची वाट पाहत आहेत  ते वेगळेच. इकडच्या भेटीत ही मंडळी त्या देशातल्या सार्वजनिक वर्तनाबाबत, शिष्टाचार, सरकारी कामकाज, वगैरेंबाबत कौतुक करत भारतातल्या भ्रष्टाचारावर, सरकारी कामकाजावर आगपापड  करत  असतात.

अशा परिस्थितीत इंग्लंडने भारतीयांसमोर नागरिकत्वाचा प्रस्ताव ठेवला तर काय होईल असे मी विचारले आहे. मला वाटते हे  नागरीकत्व मिळवण्यासाठी रांगच रांगा लागतील, चेंगराचेंगरीही होईल. आयरिश रॉड्रीग्स प्रकरणानंतर हा विषय चर्चेला आला आहे हे खरेच आहे.

 आता पुढच्या गोवा दौऱ्यात आयरिशला मुद्दाम भेटावे असे वाटू लागलेय.  

 https://www.esakal.com/global/portugal-goa-india-citizenship-passport-diu-daman-dadra-dnb8577

Wednesday, February 23, 2022

गोवामुक्तीचे हिरकमहोत्सवी वर्ष आणि अंतोनियो कोस्टा पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी


Caption : Portuguese\ Prime Minister Antonio Costa during his Goa visit in 2017

गेल्या महिन्यात पोर्तुगालच्या मतदारांनी अंतोनियो कोस्टा यांना बहुमताने पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून दिले आहे.

पोर्तुगिजांची तब्बल साडेचारशे वर्षे वसाहत असलेल्या गोव्यात तसेच दमण आणि दीव येथे भारतीय लष्कर पाठवून पंतप्रधान पंडित नेहरुंनी हा चिमुकला प्रदेश भारतीय संघराज्यात सामील केला, या घटनेससुद्धा गेल्या डिसेंबरात साठ वर्षे पूर्ण झाली.
गोवामुक्तीचे यंदाचे हे हिरकमहोत्सवी वर्ष आणि अंतोनियो कोस्टा यांची पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी फेरनिवड यात एक महत्त्वाचा संबंध आहे.
कोस्टा यांची पंतप्रधानपदी निवड ही केवळ गोव्यातील नव्हे तर तमाम भारतीयांना अभिमान वाटेल अशीच घटना आहे. युरोपातील या देशातील निवडणुकीच्या या बातमीने गोव्यातसुद्धा जल्लोष केला गेला.
याचे कारण म्हणजे पंतप्रधान अंतोनियो कोस्टा उर्फ बाबुश हे मूळचे गोव्यातले आहेत. `बाबुश’ गोव्यातील एक आवडते टोपण नाव आहे. उदाहरणार्थ, पणजी मतदारसंघातून निवडणूक लढणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 'बाबुश' मोन्सेरात आहेत आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपचे बंडखोर उमेदवार मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर आहेत.
अंतोनियो कोस्टा सरचिटणीस असलेल्या सोशालिस्ट पार्टीला पोर्तुगालच्या या मध्यावधी निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाले आहे. पंतप्रधान कोस्टा यांनी गोव्याला २०१७ साली भेट दिली तेव्हा मडगाव येथील त्यांच्या वाडवडिलांच्या घरी ते गेले होते, आपल्या जवळच्या नातेइकांना ते भेटले होते.

Portuguese Prime Minister Antonio Costa during his visit to Mangueshi in Goa in 2017

कोस्टा यांची २०१५ला पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदा निवड झाली होती. त्यावेळी त्यांचे सरकार अल्पमतातले होते. एकेकाळी एक बलवान राष्ट्र असलेले पोर्तुगाल आज युरोपमधले एक सर्वांत गरीब राष्ट्र गणले जाते. पंतप्रधान झाल्यानंतर कोस्टा यांनी पोर्तुगालची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केलेली उपाययोजना खूप लाभदायक ठरली. मात्र त्यानंतर युरोपातल्या कोविड साथीमुळे या देशातील अर्थव्यवस्थेतर खूप वाईट परिणाम झाला आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी पोर्तुगालला आजही युरोपियन युनियनच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे .
मूळचे गोव्यातील असलेल्या व्यक्तीची पोर्तुगालच्या मंत्रिमंडळात निवड होण्याची मात्र ही पहिलीच वेळ नाही. ऐंशीच्या दशकात मी गोव्यात पणजी येथे बातमीदार असताना मूळचे गोमंतकीय असलेले पोर्तुगालचे मंत्री किंवा खासदार गोव्याच्या दौऱ्यावर येत असत तेव्हा त्यांच्या या भेटीच्या बातम्या मी अनेकदा दिल्या आहेत. हे पोर्तुगीज मंत्रीमहोदय किंवा संसदसदस्य कुटुंबियांबरोबर आपल्या पूर्वजांच्या घरी आल्यावर नातेवाईकांना भेटत, स्थानिक चर्चला प्रार्थनेला जात अशा बातम्या आणि फोटो आम्ही वृत्तपत्रांत छापत असू.
पोर्तुगालची वसाहत असलेल्या `पोर्तुगीज इंडिया' म्हणून ओळखल्या गोवा, दमण आणि दीव येथील नागरिकांना पोर्तुगालचे नागरिक म्हणून हक्क होते. गेल्या तिनशे-चारशे वर्षांच्या पोर्तुगीज वसाहतीच्या काळात गोव्यातील अनेक लोक विविध कारणांनी पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे गेले, तेथेच स्थायिक झाले किंवा तेथून इतर युरोपियन देशांत गेले.
पंतप्रधान अंतोनियो कोस्टा यांचे आजोबा गोव्यातल्या मडगाव इथले, अंतोनियो यांचा जन्म पोर्तुगालमध्ये झाला होता, त्यांचे वडील ओर्लांदो यांचा जन्म पोर्तुगालची दुसरी वसाहत असलेल्या मोझाम्बिक येथे झाला होता.
माझ्याबरोबर पणजी येथे कॉलेजला शिकणाऱ्या माझ्या अनेक मित्रांकडे पोर्तुगीज पासपोर्ट होते. त्यापैकी नंतर काही जण पोर्तुगालला गेले आणि तेथून मग इतर पाश्चात्य राष्ट्रांत स्थायिक झाले आहेत.
विदेशांत जन्मलेल्या व्यक्तींविषयी किंवा इतकेच नव्हे भारतातल्याच मात्र मूळचे इतर राज्यांतल्या व्यक्तीविषयी आपली मते फारशी सहिष्णू नसतात. मात्र भारतीय वंशाच्या व्यक्तीने परदेशात महत्त्वाचे पद मिळवल्यास आपल्याला अभिमान वाटतो.
जन्माने इटालियन असलेल्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस २००४ साली सत्तेवर आली. त्यावेळी खासदार असलेल्या सोनिया या घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधान होणार हे निश्चित झाल्यावर सत्तेतून पराभूत झालेल्या भाजपच्या खासदार सुषमा स्वराज आणि उमा भारती यांनी काय वक्तव्ये केली हे जाणून घेण्यासाठी त्याकाळची वृत्तपत्रे पुन्हा चाळता येतील.
गोव्यातही आज काय वास्तव आहे ? तिथे 'भायलो' ही संज्ञा आजही वारंवार ऐकायला येतेच. दहा मार्चच्या निवडणुकीनंतर गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन 'भायलो' आमदार असण्याची शक्यता सोशल मिडीयावर व्यक्त केली गेली आहे कारण दोन संभाव्य आमदार दाक्षिणात्य आडनावांचे आहेत, मात्र. जन्माने ते गोमंतकीय आणि कोकणी बोलणारे आहेत !
दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय सदस्य. ब्रिटिश काळातच गोपाळ कृष्ण गोखले यांची निवड मुंबई विधिमंडळावर आणि केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली होती, म्हणून त्यांना `नामदार' हे संबोधन वापरले जाते..
ब्रिटनचे पंतप्रधान बॉरीस जॉन्सन यांचे आईवडील ब्रिटिश, मात्र बॉरीस जॉन्सन हे जन्माने अमेरिकन आहेत ! भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी सूत्रे हाती घेतली. अमेरिकेत, इंग्लंडमध्ये आणि इतर युरोपियन राष्ट्रांतसुद्धा भारतीय वंशाच्या अनेक व्यक्ती विविध महत्वाच्या पदांवर आहेत.
पोर्तुगालमध्ये मात्र ही परंपरा फार जुनी आहे. पंतप्रधान अंतोनियो कोस्टा यांच्याच मंत्रिमंडळात मूळ गोव्याच्या इतर दोन व्यक्ती आहेत.
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गोवा या चिमुकल्या राज्यात सहलीसाठी, पर्यटनासाठी अनेक लोक जात असतात. समुद्रकिनारी असलेला एक सुंदर प्रदेश अशीच गोव्याची ओळख असली तरी गोव्याविषयीच्या अनेक नाविन्यपूर्णगोष्टी आपण कधी ऐकलेल्याही नसतात.
उदाहरणार्थ, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकदाच आणि केवळ गोवा, दमण आणि दीव येथेच सार्वमत घेण्यात आले आहे. हा प्रदेश पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केल्यानंतर या प्रदेशाचे भवितव्य काय असावे याबाबत तेथील लोकांचे मत जाणून घेण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत १९६७च्या जानेवारीत तिथे चक्क मतदान घेण्यात आले होते.
गोव्याचे महाराष्ट्रात विलीन करावे कि गोवा स्वतंत्र असावा याबाबत बहुसंख्य लोकांनी स्वतंत्र गोव्यासाठी अनुकूल मतदान केले. महाराष्ट्रात विलीन न होता गोवा अशाप्रकारे स्वतंत्र प्रदेश राहिला.
गोव्याबाबतची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे संपूर्ण भारतात केवळ याच राज्यात समान नागरी कायदा किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड गेल्या शतकापासून अस्तित्वात आहे.
येथील हिंदू, ख्रिस्ती, मुस्लीम व इतर कुठल्याही धर्माच्या लोकांना लग्न, घटस्फोट, वारसाहक्क वगैरे विविध कायदेकानूंसाठी हा समान नागरी कायदा लागू आहे.
शंभर वर्षांपूर्वी पोर्तुगाल राजवटीने गोव्यात हा कायदा आणला आणि आतापर्यंत तो बिनबोभाट, विनातक्रार पाळला जात आहे. धर्मविरहित आणि लिंगाधारित भेद न करणारा समान नागरी कायदा भारताच्या एका राज्यात खूप वर्षांपासून अस्तित्वात आहे याची देशातील अनेक लोकांना कल्पनाही नसेल.
पणजीला मी कॉलेजात आणि नोकरीला असताना अनेकदा मित्रमैत्रिणींकडून ऐकायचो कि त्यांचे `सिव्हिल मॅरेज’ झाले आहे आणि एकदोन महिन्यांत चर्च मॅरेजही होईल. नंतर लक्षात आले कि युनिफॉर्म सिव्हिल कोडनुसार गोव्यात सिव्हिल मॅरेज वा नोंदणी विवाह बंधनकारक होता.
भारताच्या उर्वरित राज्यांतही आता लग्नाचे नोंदणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
गोवा म्हणजे सुंदर समुद्रकिनारे, हिरवागार निसर्ग,सुट्टी आणि पर्यटनासाठी एक उत्तम आणि जवळचा प्रदेश अशी अनेकांची समजूत असते. गोवा याहून खूप काही आहे, गोव्याची स्वतःची अशी खास संस्कृती आहे, इतिहास आहे. साहित्य, संगीत, क्रीडा वगैरे अनेक क्षेत्रांत गोव्याने खूप मोठे योगदान दिले आहे.
सत्तरच्या दशकात `बॉबी' या गाजलेल्या चित्रपटात राज कपूरने गोव्यातील `देखणी' या लोकप्रिय लोकगीतातील 'घे घे घे घेरे, घेरे सायबा' या ओळी वापरल्या होत्या. चित्रकार मारिओ मिरांडा यांनी आपल्या कुंचल्याच्या रेषांतून गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला असणाऱ्या मंदिरांची आणि चर्चेसची तसेच या प्रदेशाच्या बहुअंगी संस्कृतीची देशभर आणि जगभर ओळख करुन दिली.
गोव्याच्या बहुअंगी सांस्कृतिक अंतरंगात डोकावून पाहिले तर अशा कितीतरी गोष्टींची ओळख होते
गोवामुक्तीचा यावर्षी सुवर्णमहोत्सव साजरा करणारे गोव्यातील लोक गेली काही आठवडे एका वेगळ्याच म्हणजे लोकशाहीच्या उत्सवात गर्क होते.
१४ फेब्रुवारी रोजी गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले आणि यावेळी इतर पक्षांप्रमाणेच तृणमूल काँग्रेस आणि आप आदमी पक्ष सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
`गोवाके लोग अजिब है'' असे पंडित नेहरुंचे वाक्य प्रसिद्ध आहे. दहा मार्चला जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालात पंडितजींच्या विधानाचे कसे पडसाद पडतात हे आता पाहायचे .
`दिव्यमराठी' तला लेख

Thursday, June 27, 2019

Goa's great son : Abe de Faria

 

 

   आधुनिक संोहनशास्त्राचे जनक ॅबे (’ादर) ’रिया

 

काि पारखे, पुणे

गोव्यातील पणजीला आपण  जर कधी गेला असाल तर तेथील मांडवी नदीच्या तीरावर असलेला आदिलशाही राजवाडा किंवा जुने सचिवालय तुम्ही नक्कीच पाहिले असेल. अगदी अलिकडच्या काळापर्यंत दरवर्षी फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला पणजीत होणार्या कार्निव्हलची  मिरवणूक पणजी बसस्टॅन्डपासून निघून येथूनच पुढे सरकत असयाची. यावेळी किंग मोमोच्या औट घटकेच्या म्हणजे अवघ्या चार दिवसांच्या राजवटीचे गोव्यात स्वागत करण्यासाठी हजारो लोक येथे उत्साहाने जमले असायचे. गोव्याची राजधानी पणजी शहराचा हा केंद्रबिंदू. मध्ययुगीन काळातील आदिलशाहाच्या या राजवाड्याच्या दोन्हीही बाजूला दोन पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या दोन पुतळ्यांपैकी एक पुतळा गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा आहे. राजवाड्याच्या दुसर्या बाजूला असलेला पुतळा कुणाच्याही मनात कुतुहल निर्माण करेल अशा स्थितीत आहे. या पुतळ्यामधे एक झगाधारी मनुष्य आपले दोन्ही हात उभारून एका स्त्रीला संमोहित करण्याचा प्रयत्न करत आहे असे जवळून निरीक्षण केल्यास दिसून येते. हा पुतळा 18 व्या शतकातील युरोपमधील वैज्ञानिक संमोहनविद्या शास्त्राचे जनक आणि गोव्याचे सुपुत्र ॅबे डी फरिया यांचा आहे.

 

पणजी बसस्टॅण्डवरून पायी चालत तुम्ही या आदिलशाहाच्या पॅलेसकडून दयानंद बांदोडकर मार्गावरुन मिरामार बिचकडे निघाला कि मांडवीच्या काठावर इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या अनेक वास्तू आणि कलाकृती तुम्हाला दिसतीलयात कला अकादमीसारख्या वास्तूशास्त्रज्ञ चार्ल्स कोरीयानिर्मित आधुनिक वास्तूची भर पडलेली आहे. पणजीत आल्यावर या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ॅबे डी फरियाच्या या शिल्पाला भेट द्यायलाच हवी. याचे कारण  म्हणजे ॅबे फरिया या व्यक्तिमत्वाचे कर्तृत्व !

 

1980 च्या दशकात मी पणजीतील दि नवहिंद टाइम्स या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करीत होतो. तेंव्हा हा एकमजली कौलारी छत असलेला आदिलशाहाचा राजवाडा तात्कालीन गोवा, दमण आणि दीव या केंंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय वा मंत्रालय होते. या मंत्रालयाच्या एका कोपर्यात असलेली एक खोली आम्हा पत्रकारांसाठी एक प्रेस रुम म्हणून दिली होती. आम्हा इंग्रजी दैनिकातील पत्रकारांसाठी एक छोटेसे टेबल आणि टाईपरायटरची  सोय होतीमुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, त्यांचे इतर सहकारी मंत्री, मुख्य सचिव इतर अधिकाऱ्यांना आम्हा पत्रकारांशी कधीही  बोलायचे असल्यास आम्हाला त्यांना भेटायचे असल्यास ही प्रेस रूम खूपच सोयीस्कर ठरायची. ''आता राणेंक मेळु या, 'सभापती दयानंद नार्वेकरांने आपयले आमकां'  `रमाकांत खलप (त्यावेळचे विरोधी पक्षनेता ) आयलो मरे' असे म्हणत आम्ही प्रेसरुममधून पहिल्या मजल्यावर बातमीच्या शोधात जात असू.

 

काही दिवसांपूर्वी गोव्यात गेलो तेव्हा कुतुहलाने मुद्दाम या प्रेस रुमकडे वळालो तेव्हा एक सुखद धक्का बसला. या आदिलशाहा राजवाड्यातून  गोवा राज्याचे सचिवालयाचे काही वर्षांपूर्वी पोरवोरीम येथे स्थलांतर झाले असले तरी या मध्ययुगीन राजवाड्यातील त्या छोट्याशा खोलीवर आजही प्रेसरुम असा फलक आजही कायम आहे ! ते पाहून आणि खरेच आनंदून बायकोला सांगून तिथे त्या फलकासह मी माझे स्वतःचे  एकदोन  फोटो स्मरणरंजनाचा एक भाग म्हणून पटापटा काढून घेतले. तर या आमच्या त्या जुन्या प्रेस रुमच्या अगदी काही फुटांच्या अंतरावर ॅबे  फरिया यांचा हा पुतळा आहे. मी गोवा सोडून  तीस वर्षे झाली असली तरी या ॅबे फरिया यांच्या या पुतळ्याबाबतचे  माझ्या मनातील आकर्षण आजही कमी झालेले नाही. याचे कारण म्हणजे ॅबे फरिया याचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व

 

सन 1961 च्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लष्करी कारवाई करुन त्याकाळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा,दमण आणि दीव  मुक्त केला आणि हा छोटासा प्रदेश भारतसंघराज्याचा भाग बनला. गोवामुक्तीनंतर गोव्यातील अनेक मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दर्यावर्दी वास्को गामा, अफांसो दि अल्बुकेर्क सारख्या  पोर्तुगीज  गव्हर्नर जनरल आणि व्हॉईसरॉय इतर अधिकाऱ्यांच्या पुतळ्यांची उचलबांगडी होऊन त्यांची वस्तुसंग्रहालयात रवानगी करण्यात आली. मात्र पणजीत 1945 साली म्हणजे पोर्तुगीज राजवटीतच उभारण्यात आलेला ॅबे डी फरिया यांचा हा पुतळा या ठिकाणी आजही सन्मानपूर्वक राहिला आहेयाचे कारण म्हणजे ॅबे डी फरिया यांचे कर्तृत्व युरोपात म्हणजे रोम, पोर्तुगाल आणि फ्रान्स येथे फुलले असले तरी ते गोव्याचेच सुपुत्र आहेत.

 

दहा फूट उंचीचा ॅबे डी फरिया यांचा हा कांस्य पुतळा पाहून या परिसरात जाणार्या येणार्या लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल निर्माण होते. जोस कस्टडिओ फरिया किंवा ॅबे डी  फरिया यांचा जन्म गोव्यात बार्देस तालुक्यातील समुद्रकिनार्यावर असलेल्या कांदोळी या गावात 31 मे 1756 मध्ये झाला. या  गोमंतकियाने नंतर युरोपात एक कॅथोलिक धर्मगुरु म्हणून नाव कमावले. ॅबोट किंवा मठामध्ये राहणार्या ख्रिस्ती धर्मगुरुस फ्रेंच भाषेत ॅबे म्हणतात. पॅरीसमध्ये असताना ॅबे डी फरिया यांनी संंमोहनशास्त्रात मॊल्यवान योगदान दिले, संंमोहनशास्त्रावर फ्रेंच  भाषेत त्यांनी  ग्रंथ लिहिला, गोव्यातील पोर्तुगीज राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न करणार्या प्रसिध्द पिंटो उठावातही त्यांचा सहभाग होता, हे विशेष. अलेक्झांडर ड्युमास याच्या ' काऊंट ऑफ मोन्त क्रिस्टो' या गाजलेल्या कादंबरीत एका धर्मगुरुचें पात्र ॅबे डी फरिया यांच्यावर बेतलेले आहे. या कादंबरीवर आधारीत काही आणि मूळ कादंबरीइतकेच गाजलेले चित्रपटही आहेत. ॅबे डी फरिया यांच्या व्यक्तिमत्वाने अशाप्रकारे इतिहासकारांना आणि इतरांनाही आकर्षित केलेले आहे

जोस कस्टडिओचे म्हणजे ॅबे डी फरियाचे वडील कैतानो व्हितोरिनो डी फरिया हे मूळचे बार्देस तालुक्यातीलच कोलवाले या गावचे. सोळाव्या शतकाच्या अखेरीस अनंत शेणई या सारस्वत ब्राह्मणाने ख्रिस्ती धर्माचा  स्वीकार केला होता. कैतानो हे या अनंत शेणई यांचे वंशज होते.

ॅबे फरिया यांच्या आईवडिलांची पार्श्वभूमीही वेगळीच होती. त्याचे वडील कैतानो हे ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत शिकत होते. परंतु धर्मगुरुपदाची दीक्षा होण्याआधीच त्यांनी   सेमिनरी सोडली. कांदोलीच्या रोझ मारिया डिसोझा या युवतीशी त्यांचे लग्न झाले. या दांपत्याला जोस कस्टडिओ हा  मुलगा झाला. कैतानो आणि रोझ या दोघांमध्ये मात्र कधीही सुसंवाद असा नव्हताच. त्यामुळे हे लग्न फक्त सहा वर्षेच टिकले.त्यानंतर ते दोघे पतिपत्नी परस्पर संमतीने वेगळे झाले. परस्परापासून वेगळे झाल्यानंतर कैतानो आणि रोझ मारिया डिसोझा या दोघांनीही सन्यासी धार्मिक व्रत स्वीकारण्यासाठी चर्चची परवानगी   मिळवली. विवाहीत व्यक्तींना अशाप्रकारे सन्यासी व्रतबंध सहसा दिले जात नाही. अशाप्रकारे कैतानो यांनी धर्मगुरुपदाचे शिक्षण घेण्यास पुन्हा सुरुवात केली तर रोझा एक नन म्हणजे धर्मभगिनी होण्यासाठी जुन्या गोव्यातील सेंट मोनिका कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. सेंट मोनिका कॉन्व्हेंट या मठाची भव्य वास्तू अजूनही अस्तित्वात आणि वापरात आहे.

 

सन्यासी धर्मगुरुपदाचे शिक्षण घेणारे वडिल आणि मठामध्ये नन असलेली आई यांचा  मुलगा म्हणून जोस कस्टडिओला स्थानिक समाजाने कलंकित मानले.

संन्यासी दाम्पत्याचा मुलगा म्हणून त्याला खूप मनस्ताप सहन करावा लागला. कैतानो फरिया हे अत्त्यंत महत्त्वाकांक्षी होते. आपल्या मुलाची ही परिस्थिती पाहून गोव्यात राहून तो कधीही प्रगती करु शकणार नाही, असे यांना वाटले. त्यामुळे ते आपल्या मुलासोबत 1771 मध्ये गोवा सोडून पोर्तुगालला गेले. तेथे त्यांचा मुलगा जोस कस्टडिओ धर्मगुरु धर्मगुरु होण्यासाठी एक मठात दाखल झाला. पुढे रोम येथे धार्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 12 मार्च 1780 रोजी त्यांचा धर्मगुरु म्हणून दीक्षाविधी झाला. विशेष म्हणजे रोम येथील विद्यापीठात ईशज्ञान या विषयात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पहिल्या काही गोमंतकिय धर्मगुरुंमध्ये सिनियर आणि ज्युनियर फरिया यांचा समावेश होता. ज्युनियर ॅबे फरियाने नंतर तत्त्वज्ञान विषयात दुसरी डॉक्टरेट मिळविली. ॅबे फरियाने त्यानंतर आपल्या मायभूमीत  कधीही पाऊल ठेवले नाही.

 

एक उत्तम प्रवचनकार म्हणून ॅबे फरिया प्रसिध्द होते. असे म्हटले जाते की रोम येथील प्रसिध्द सिस्टाईन चॅपलमध्ये पवित्र आत्म्याच्या  सणानिमित्त उपदेश करण्यासाठी पोप पायस सहावे यांनी ॅबे फरियांना 1780 साली निमंत्रित केले होते. त्यावेळी ते फक्त 24 वर्षांचे होते. गोव्यातील ऐतिहासिक राशोल सेमिनरीतील प्राध्यापक फादर आयवो सोझा यांनी लॅटिन भाषेतील या प्रवचनाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.

 

ॅबे  फरिया यांच्या जीवनातील एका महत्वपूर्ण धटनेचा त्यांच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडला. असे म्हणतात कि त्या घटनेने त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. रोमहून लिस्बन येथे परतल्यानंतर पोर्तुगालच्या राणीने आपल्या चॅपेलध्ये प्रवचन देण्यासाठी या तरुण धर्मगुरुला निमंत्रित केले. फर्डे वक्ते असलेले ॅबे फरिया प्रवचन देण्यासाठी उंचावर असलेले पुलपीट चढून गेल्यावर बोलण्याआधी त्यांना दरदरुन घाम  फुटला. त्यांचे वडिल त्यावेळी त्या  पुलपीठाजवळच मागे उभे होते. आपल्या चिरंजिवाची ती घाबरलेली अवस्था पाहून त्यांनी त्याच्या कानात आपल्या मातृभाषेत म्हणजे कोकणी भाषेत  फक्त दोनच वाक्य उच्चारली. ती  वाक्ये ऐकताच ज्युनियर  फरियाची भीती पूर्ण गायब झाली. कोकणी भाषेतील त्यांना धीर देणारे ते वाक्य असे होते. ’’पुता, ही सोगली भाजी, कातोर रे भाजी!‘ (अरे बाळा, तुझ्या समोरची ही सगळी आहे पालेभाजी, काप ही सगळी भाजी !‘)  ही दोन वाक्ये ऐकल्यावर आपला आत्मविश्वास कमावल्यावर ज्युनियर ॅबे फरिया यांनी पोर्तुगालची राणी आणि जमलेल्या इतर लोकांसमोर प्रभावी प्रवचन केले.

 

या छोट्याशा घटनेचा तरुण ॅबे फरियावर खोलवर परीणाम झाला. त्या केवळ एका वाक्यामुळे आपल्या  मनातील भीती दूर होऊन या भितीची जागा प्रचंड आत्मविश्वासाने कशी घेतली याचा त्यांना सतत अचंबा वाटत राहिला. यामुळेच पुढे  संमोहनशास्त्राबाबत खोलवर संशोधन करण्याचे बीज त्यांच्या मनात रोवले गेले.

 

सिनियर फरिया आणि ज्युनियर फरिया हे दोघेही 1787 मध्ये गोव्यात घडलेल्या पोर्तुगीज सरकारविरोधी पिंटो बंडात सक्रिय होते. त्याकाळात गोमंतकीय धर्मगुरुंमध्ये आणि स्थानिक लष्करी अधिकार्यांमध्ये पोर्तुगीज सत्तेविरुध्द प्रचंड असंतोष खदखदत होता. ग़ोमंतकीय धर्मगुरुंना आणि लष्करी अधिकार्यांना नेहेमीच सापत्नपणाची वागणूक मिळते, त्यांना डावलले जाते, अशी त्यांची भावना होती. याचीच परिणती 1787 सालच्या पिंटो बंडात झाली, गोव्यातील साम्राज्यवादी पोर्तुगीज सरकारविरोधी स्थानिक लोकांनी केलेला हा दुसरा उठाव होता.

 

पोतुर्गीज सरकारने हे बंड मोडून काढले. पोर्तुगीज सरकारकडून त्यांच्याविरुध्द कारवाई टाळण्यासाठी ज्युनियर ॅबे फरिया लिस्बनहून फ्रान्सला पळून गेले. त्यानंतर फ्रान्स हीच त्यांची कर्मभूमी बनली. फ्रान्समध्ये त्यांनी संमोहनशास्त्राचा अभ्यास करुन या कलेचे प्रात्यक्षिक करुन तेथे मोठे  नाव कमावले. एक कॅथोलिक धर्मगुरु संमोहनशास्त्राचे समर्थन करतो हे अनेक धर्मगुरुंना आणि चर्चच्या धर्माधिकाऱ्यांना आवडले नाही. संमोहन करणे हे चेटूकगिरी, ब्लॅक मॅजिक आणि सैतानाचे कृत्य आहे असे चर्चमधील त्यांच्या विरोधकांचे म्हणणे होते.

 

मात्र  संमोहन विद्या आणि कॅथोलिक चर्चची शिकवणी परस्परविरोधी नाही असे ॅबे फरिया यांचे म्हणणे होते. संमोहनविद्येत सहभागी होण्यास नकार देणार्या व्यक्तींना संमोहित करणे अशक्यच असते, त्यामुळे संमोहन विद्यामध्ये कुणावरही कसल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही, असा त्यांचा दावा होता. असे म्हटले जाते की ॅबे फरिया यांनी आपल्या संमोहनविद्येचे सुमारे 5000 लोकांवर प्रयोग केले आणि या प्रयोगातून त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या  मानसिक रोगांतून बरे केले होते.

 

ॅबे फरिया यांचे  ३० सप्टेंबर १८१९ रोजी निधन झाले. फ्रेंच भाषेत प्रकाशित झालेल्या त्यांच्या  या पुस्तकात संमोहन विद्येची अनेक मार्गदर्शक तत्वे त्यांनी मांडली होती. त्यांच्या मृत्युपूर्वी  काही दिवस आधी हा ग्रंथ  (ऑन कॉज ऑफ ल्युसिड स्लीप इन स्टडी ऑफ नेचर ऑफ मॅनप्रकाशित झाला होता. मात्र त्यांच्या  मृत्युनंतर एका शतकानंतर ॅबे फरिया यांना आधुनिक संमोहनविद्येचे जनक म्हणून मान्यता मिळाली. गोव्याचे सुपुत्र असलेल्या ॅबेरिया यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कार्यावर आधारित बहुतेक सर्व पुस्तके फ्रेंच वा पोर्तुगीज भाषांत आहेत. ॅबे फरिया यांच्या फ्रेंच भाषेतील महान ग्रंथाचा कोकणी कवी आणि फ्रेंच भाषेतील विद्वान मनोहरराय सरदेसाई यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहेत.

 

पणजी येथील ॅबे फरिया यांचा हा पुतळा गोमंतकीय जेष्ठ शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांनी घडवलेला आहे. दिनांक 20 सप्टेंबर 1945 रोजी या शिल्पाचे अनावरण झाले. प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा कास्य पुतळाही शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांचीच कलाकृती आहे. दक्षिण गोव्यातील मडगाव शहरातील एक महत्त्वाचा रस्ता ॅबे फरिया यांच्या नावाने ओळखला जातो. रुआ ॅबे डी फरिया हे त्या रस्त्याचे नाव. ॅबे फरियांच्या 250 व्या जयंतीनिित्त 2006 साली पोर्तुगाल सरकारने गोव्याच्या या सुपुत्राच्या पणजीतील पुतळ्याच्या छायाचित्रावर आधारीत एक खास पोस्टकार्डाचेही अनावरण केले होते.

 

ॅबे फरिया यांचे फ़्रान्समध्ये निधन झाले आणि त्यांची कबर पॅरिस शहरातील मोन्तमार्त्र  परिसरात कुठेतरी आहे असे म्हटले जाते. पॅरिसमधला  मोन्तमार्त्र हा परिसर तेथील  टेकडीवर असलेल्या भव्य  सेक्रेड हार्ट बॅसिलिकासाठी प्रसिध्द आहे. अलीकडेच आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या नोत्र डेम ऑफ पॅरीस या चर्चइतकीच इतकीच सेक्रेड हार्ट बॅसिलिका प्रसिद्ध आहे. अभिजात आणि आधुनिक चित्रकलेचे रसिक असलेल्या लोकांचेही  मोन्तमार्त्र  हे आवडते स्थळ आहे.

काही वर्षापूर्वी कुटुंबियाबरोबर युरोपच्या सहलीवर असताना पॅरिसमध्ये आमचे  मोन्तमार्त्र येथेच एक आठवडाभर वास्तव्य होतेमोन्तमार्त्रच्या गजबजलेल्या रस्त्यांवर फिरताना, तेथील जमिनीवरील आणि भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना तेथेच कुठेतरी ॅबे फरिया या गोमंतकीयाच्या  चिरसमाधीची जागा  असू शकेल असा विचार माझ्या मनात येत असे. गोव्याच्या या महान सुपुत्राची पॅरीसमधली कबर कदाचित कधीही सापडली जाणार नाही. मात्र संमोहनविद्येच्या क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान आणि त्यांचा वारसा कधीही विस्मृतीत जाणार नाही.

 

    The plaque on the northern side reads: JOSÉ CUSTODIO FARIA (ABADE FARIA) FUNDADOR DE DOUTRINA E METODO DA HIPNOSE PELA SUGESTÃO (José Custodio Faria, Abbé Faria founder of the Doctrine and Method of Hypnosis by Suggestion).