Did you like the article?

Showing posts with label Matmauli. Show all posts
Showing posts with label Matmauli. Show all posts

Friday, September 1, 2023

हरेगाव प्रकाशझोतात

 सप्टेंबरच्या सुरुवातीला दरवर्षी श्रीरामपूरपाशी असलेले हरेगाव गजबजलेले आणि प्रकाशझोतात असते.

यावेळीसुद्धा आहे. नेहेमीपेक्षा अधिकच.
त्याबाबतचे कारण तसे फारसे अभिमानास्पद नाही.
``आम्ही हरेगावकर'' या समाज माध्यमवरच्या ग्रुपचा मी सभासद आहे.
इकडच्या दैनिकांतसुद्धा त्याबाबत बातम्या किंवा टिकाटिपण्णी होत नाहीये. परवा हरेगावातल्या त्या अमानुष घटनेतील फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना पुण्यात अटक केली तर पुण्यातल्या एका दैनिकात ही बातमी एका आतल्या पानावर संक्षिप्त वृत्तसदरात दोन वाक्यांत दिली होती.
वृत्तवाहिन्या याबाबत बातम्या देताहेत कि नाही हे मला माहित नाही.
आपल्याकडे कुठलीही अभिमानास्पद किंवा लांच्छनास्पद घटना घडली कि आधी त्या घटनेतील व्यक्तींचा आधी धर्म, नंतर जात, त्यानंतर पोटजात पहिली जाते आणि मग त्यानुसार लोक व्यक्त होत असतात.
याबाबतीत सुद्धा तसेच झाले.
प्रत्येक बाबतींत जातीचा आणि धर्माचा संबंध का जोडायचा, असे विचारणे साहजिकच आणि योग्य आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या आणि विशेषतः अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या कोपरगाव लोकसभा मतदारसंघातील सामाजिक परिस्थितीची माहिती असणे त्यासाठी आवश्यक असते.
याचे एक कारण आहे. इथले दलित एकाच कुटुंबातले, नात्यागोत्यातले आणि भाऊबंद असले तरी ते सगळे जण केवळ एकाच धर्मातले असतीलच असे नाही. त्यासाठी अगदी खोलात जाण्याची गरजही नाही.
यांपैकी कुणावरही अन्याय आणि अत्याचार झाला तर आंबेडकरवादी, डाव्या, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी संघटना, कार्यकर्ते आणि पक्ष आणि नेते लगेच धावून येतात, आपले पाठबळ पुरवतात.
यावेळीसुद्धा तसे होत आहे.
पिडीत तरुण दलित आहेत याबाबत अर्थातच शंका किंवा वाद नाही. आपले पोट भरण्यासाठी कोंबडी, शेळी किंवा कबुतर चोरण्याची वेळ वरच्या जातींतील मुलांवर कधीही येणार नाही, तसे त्यांचे संस्कारही नसतात, हे सर्वांनाच मान्य होईल.
दुसरे म्हणजे तसे झाले तरी भर वस्तीत वरच्या जातींतील तरुणांना असे अर्धनग्न अवस्थेत झाडाला टांगून मारण्याची टाप कुणाची कधीही होणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये याच मुद्दा मांडला आहे.
असे दुर्भाग्य केवळ खालच्या जातींतील - काही बाबतीत अल्पसंख्य समाजातील - लोकांसाठी आरक्षित असते.
पिडित व्यक्तींमध्ये दलित आहेत, तसेच मध्यम स्तरांतील जातींतील मात्र दलित पिडीतांसारखाच आर्थिक स्तर असलेले आहेत.
गुन्हयांमधील दोन मुख्य आरोपींसाठी काम करणारे आणि प्रत्यक्ष मारहाणीत सहभागी असणाऱे काही जण दलित आहेत.
आरोपींनी बनवलेल्या व्हिडीओमुळेच घटनेला वाचा फुटली.
हातपाय एकत्र बांधून झाडाला उलटे टांगून ठेवलेल्या त्या तरुणाचा फोटो काल मी पाहिला. कल्पना करा,एक तरुण पोर सकाळी दहापासून संध्याकाळी सहा lपर्यंत त्या टांगलेल्या अवस्थेत अधांतरी लटकून होते. फोटो पाहावत नाही, त्यामुळे इथे शेअर करण्याजोगा नाहीये. इंटरनेटवर चेहेरा झाकून उपलब्ध आहे.
घटनेचा व्हिडीओ नसता तर ही घटना उघडकीस आलीही नसती.
तर सद्या हरेगावला येणाऱ्या लोकांची रांग लागली आहे.
परवाच २९ तारखेला हरेगावच्या मतमाऊलीच्या आगामी यात्रेनिमित्त संत तेरेजा देवळासमोर नोव्हेना प्रार्थनानिमित्त ध्वजउभारणी झाली.
यावर्षी ८ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या या यात्रेचे ७५वे वर्ष आहे. नऊ दिवसांच्या नोव्हेना प्रार्थनेसाठी गावोगावचे भाविक दररोज या तिर्थक्षेत्री येत आहेत.
महाराष्ट्रातील विविध पक्षांतील नेतेमंडळी त्या दुदैवी घटनेसंदर्भात श्रीरामपूर आणि हरेगावला भेट देताहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपूरला दवाखान्यात जखमी झालेल्या तरुणांना भेट दिली आहे.
माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी हरेगावला भेट दिली आहे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज हरेगावला जाणार आहेत तर प्रकाश आंबेडकर उद्या शुक्रवारी १ सप्टेंबरला तेथे जाणार आहेत अशा बातम्या आहेत.
मतमाऊली यात्रेवर यंदा त्या घटनेचे या चित्रात दिसते तसे गडद सावट असणार आहे.

Thursday, August 20, 2009

Matmauli pilgrimage in Haregaon starts today


Saturday, September 18, 1999

Indian Express
Matmauli pilgrimage starts today

Camil Parkhe

PUNE, Sept 17: Preparations are in full swing for theannual yatra of Matmauli which will be held at Harigaon inShrirampur taluka of Ahmednagar district on September 18and 19. Over a lakh Christians from different parts ofMaharashtra are expected to assemble at the pilgrim centre,described as the Pandharpur of the Marathi-speakingChristians in the state.The feast celebrations are organised every year tocommemorate the birthday of Mother Mary which falls onSeptember 8. For the convenience of outstation pilgrims,the yatra is held on the Saturday and Sunday succeedingSeptember 8. This year, the yatra was postponed by a weekon account of polling on September 11.
The annual feast of Mount Mary, held at Bandra in Mumbaion September 8, is the largest congregation of the Christiancommunity living in the urban areas of the State. TheHarigaon yatra, on the other hand, is the largest assembly ofthe Marathi-speaking Christians in the State. Christianity inwestern Maharashtra is over 140 years old. The goldenjubilee anniversary celebrations of the Matmauli yatra wereheld last year.The yatra of Matmauli or Blessed Virgin Mary was startedon September 8, 1948 by Fr. Gerhard Baader, a German Jesuit who was the then parish priest at Harigaon village. He hadstarted the yatra for the convenience of poor Christians iwho could not afford to attend the Mount Mary feast celebrations at Bandra. This yatra has become one of themost important events for Christians. Fr. Baader died 18months ago at the ripe age of 94. The main event will be themass concelebrated by Bishop of Nashik Thomas Bhaleraoand over 100 priests on the evening of September 18