Did you like the article?

Showing posts with label Pandita Ramabai. Show all posts
Showing posts with label Pandita Ramabai. Show all posts

Thursday, May 1, 2025

राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन

कोण असतील बरे या वेगवेगळ्या वेशभूषेतील मुली?

पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणाऱ्या त्या शालेय मुलींची उत्सुकता लपत नव्हती.
बुधवारच्या 12 February 2025 नगर येथील ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनातील ग्रंथ दिंडीतील या तीन व्यक्तिरेखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्या तीन व्यक्तिरेखा होत्या:
समाजसुधारक, विदुषी पंडिता रमाबाई,
भारतात विशेषतः महाराष्ट्रात मुंबई आणि नगर येथे स्त्रीशिक्षणाची मुहुर्तवेढ रोवणाऱ्या सिंथिया फरार
आणि अर्थातच मदर तेरेसा..

अलीकडे मराठी विश्वात वेगवेगळी संमेलने होताहेत.
काही विश्व संमेलने असतात जिथे विश्वातल्या अतिश्रीमंत लोकांना रक्कम मोजुन येण्यासाठी आवतण दिले जाते.
काही साहित्य संमेलने मराठी नगरीचियेची सीमा पार करुन थेट देशाच्या राजधानीत भरवली जातात.
अशा संमेलनांचा थाट खास असतो आणि यात सहभागी होणाऱ्या निमंत्रित लोकांची खूप चांगली ठेप राखली जाते असे ऐकून आहे.
कालच दिल्लीतल्या साहित्य संमेलनाची लांबलचक कार्यक्रमपत्रिका पाहिली, विविध सत्रांमधल्या निमंत्रित लोकांची नावे वाचली आणि डोळे दिपले.
दोनेक दिवसांपूर्वी मी एका संमेलनाला हजर होते ते मात्र पूर्णतः वेगळ्या स्वरुपाचे होते.
ग्रामीण साहित्य संमेलन असल्याने आपला खास गावरान आब राखून होते.
नगरला १२ फेब्रुवारीला झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाविषयी मी हे सांगतो आहे.
नावातच `ग्रामीण' बिरुद अभिमानाने मिरवत असल्याने या मांडवाखालची सगळीच मंडळी रांगडी होती, `आत एक आणि बाहेर दुसरे' असे काही त्यांचे वागणे नव्हते.
एक उदाहरण देतो.
या ग्रामीण संमेलनाला नगर शहराबाहेरुन आलेल्या लोकांची संख्या बऱ्यापैकी होती तरी त्यापैकी कुणालाही - अगदी विविध सत्रांच्या अध्यक्षांनाही - येण्याजाण्यासाठी मानधन दिले नव्हते.
मला स्वतःलाही आमंत्रण नव्हते.
पण आमच्या मूळ जिल्ह्यात होणाऱ्या संमेलनाची माहिती मिळाल्यावर मी आपणहून आयोजकांशी संपर्क साधला आणि स्वतःसाठी निमंत्रण मिळवले होते.
संमेलनाच्या आदल्या रात्री राहण्यासाठी फक्त दोन रुम्स बुक करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी एका रूममध्ये मी राहिलो होतो.
बाकी सर्व जण - पुणे, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर वगैरे ठिकाणांहून स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने आले होते.
इथेही काव्यवाचन करायला अनेक हौशी आणि नवोदित कवी होते, त्यापैकी काहींच्या नावांवर एकही काव्यसंग्रह नव्हता.
श्रोत्यांतले रसिक मात्र त्यांना मनापासून दाद देत होते.
या ग्रामीण संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुपारच्या जेवणाला एकच मेन्यू होता.
तो म्हणजे मांसाहारी.
भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खाद्यपदार्थ अर्थातच चिकन बिर्याणी.
या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाला येणाऱ्या सर्वांची खाद्य संस्कृती समान असेल, आणि त्यापैकी प्रत्येकाला चिकन बिर्याणी आणि सोबत खोशिंबर हमखास आवडेल, हे आयोजकांनी गृहीतच धरले होते.
भुकेल्या पोटी चिकन बिर्याणी आणि कोशिंबरीचा आस्वाद घेताना आयोजकांच्या या गृहितकाला मी मनापासून दाद दिली.
इकडच्या ग्रामीण लग्न आणि इतर समारंभांत असणारे इतर खाद्यपदार्थ म्हणजे शिरासुद्धा अर्थातच होता.
बस्स तेव्हढेच, जेवणानंतर आईस्क्रीम किंवा तोंड रंगवण्यासाठी पान वगैरे कुछ नाही.
जेवण्याच्या ठिकाणी हातातल्या पत्रावळीत हे खाद्यपदार्थ घेऊन पाहुणेमंडळी दिसेल तिथे फतकल मारुन किंवा पत्रावळी उंचवट्यावर ठेऊन उभ्याउभ्याने गप्पा मारत जेवत होती.
प्रस्थापित संमेलनादी कार्यक्रमांत मान्यवर व्यासपीठावरचा आपला सहभाग संपला कि ठरलेल्या बिदागीचा चेक घेऊन तत्परतेने तेथून पाय काढत असतात.
इथे मात्र उशिरा संध्याकाळपर्यंत तेथून पाय काढता घेणे नकोसे वाटत होते.
पुण्यात रामवाडी स्टेशनमधली रात्रीची शेवटची मेट्रो चुकेल म्हणून मी तेथून जरा लवकर निघालो होतो.
गावाकडच्या मंडळींनी अशी संमेलने वारंवार घ्यावीत.

Thursday, April 6, 2023

कुठल्याही घटनांकडे आणि व्यक्तीकडे नव्या उपलब्ध माहितीनुसार पाहायला हवे,

 सत्तरच्या दशकात आमच्या शालेय पाठ्यपुस्तकांत प्राचीन काळापासून तो थेट अर्वाचीन काळातल्या विविध विषयांवर आणि व्यक्तींवर धडे होते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास इतिहास आणि मराठी भाषा यामध्ये मध्ययुगीन काळापासून म्हणजे महानुभाव पंथाच्या स्वामी चक्रधर यांच्या ` लिळाचरित्र’' पासून तो त्या काळातल्या हयात असलेल्या अनेक लोकांविषयी आणि लोकांचे लेख या पाठ्यपुस्तकांत होते. स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, इरावती कर्वे (परिपूर्ती) दुर्गा भागवत, विनायक दामोदर सावरकर, आनंदीबाई शिर्के, वि द घाटे वगैरेंचे लेख होते. संत कवी आणि पंत कवीच्या रचना पद्म विभागात होत्या

पद्म विभागात केशवसुतांपासून भा रा तांबे, बा भ बोरकर, नारायण वामन टिळक (क्षणोक्षणी पडे.), बा. सी. मर्ढेकर (गणपत वाणी, पिपात मेले ओल्या उंदिर) असे नामवंत कवी होते. गोव्यात माझ्या कॉलेजातल्या मुंबई विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात नारायण सुर्वे यांच्या `ऐसा ग मी ब्रह्म' आणि `माझे विद्यापीठ' या काव्यसंग्रहांचा समावेश होता.
नामदेव ढसाळ वगैरेचा नंतरच्या काळात उदय झाला. मराठी आणि संपूर्ण भारतीय साहित्यात क्रांती करणाऱ्या ढसाळ यांच्या कविता आणि काव्यसंग्रह आता शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत असतात कि नाही याबाबत मला माहिती नाही.
पण या शालेय आणि महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत पोर्तुगीज इंडियात म्हणजेच गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनीं रचलेल्या `ख्रिस्तपुराण' या महाकाव्याविषयी मी एकही ओळ वाचली नव्हती.
याचे कारण बहुधा हे मराठी महाकाव्य पोर्तुगीज गोव्यात चक्क रोमन लिपीत छापले छापले गेले होते. मराठीतले हे पहिले मात्र रोमन लिपीत छापले गेलेले पुस्तक (इ स १६१६). पोर्तुगीजांनीं स्थानिक भाषांची आणि संस्कृतीची गळचेपी करायला सुरुवात केल्याने या महाकाव्याकडे गोव्यात आणि महाराष्ट्रातसुद्धा दुर्लक्ष झाले. हे महाकाव्य देवनागरी लिपीत आणले ते अहमदनगरच्या शांताराम बंडेलू आणि पुण्यातील प्रसाद प्रकाशनाच्या य. गो. जोशी यांनीं १९५६ साली. तोपर्यंत गोवा पोर्तुगिजांच्याच ताब्यात होता.
थॉमस स्टीफन्स मराठी भाषेची स्तुती खालील शब्दांत वर्णिली आहे
" जैसी हरळांमाजी रत्नकिळा | रत्नामाजी हिरा निळा |
तैसी भाषांमाजी चोखळा | भाषा मराठि ||
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी | की पदिमळांमजी कस्तुरी
तैसी भाषांमाजि साजिरी | मराठिया ||
पाखिया माजी मयोरू | वृखियांमाजि कल्पतरू |
भाषांमाजि मानु थोरु | मराठियेसी ||
तारांमध्ये बारा रासी | सप्तवारांमाजि रवी शशी |
या दीपाचेआ भाषांमध्ये तैसी | बोली मराठिया || "
ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या माझ्या पुस्तकात फादर स्टीफन्स यांच्या या काव्यपंक्ती मुखपृष्ठावर आहेत.
आता अशी भाषाशैली असलेले आणि सतराव्या शतकात लिहिले गेलेले मराठी महाकाव्य शाळा-कॉलेजांत शिकवले गेले पाहिजे कि नाही ?
` विज्ञानात `स्टेट्स को ‘किंवा `जैसे थे’ स्थिती कधीच नसते. नवे संशोधन आधीच्या संशोधनाची पुढची पायरी असते. नवनवे संशोधन येते, तसे आपले व्यक्ती, जुन्या घटना याविषयीचे आपले मत बदलत जाते. त्यासाठी इतिहासात सतत खोदत राहावे लागते. मागे मी लिहिलं होते कि गोव्यात मी तत्त्वज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत होतॊ तेव्हा महात्मा जोतिबा फुले यांचा विचार आमच्या कुठल्याही विद्याशाखेच्या अभ्यासक्रमातच नव्हता.
याचे कारण म्हणजे जोतिबा फुले यांचे पहिलेवहिले आधारभूत धनंजय कीरकृत चरित्र लिहिले गेले ते १९६४ साली, तेसुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी धनंजय कीर यांचे याबाबत संभाषण झाल्यामुळे. जोतिबांच्या मृत्यूनंतर सात दशकांनी. पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी त्याआधी १९३७ साली एक छोटेखानी मात्र अत्यंत मोलवान असे जोतिबांचे चरित्र लिहिले होते.
जोतिबांकडे संशोधकांचे आणि विचारवंतांचे झालेले हे दुर्लक्ष अलीकडेच माझ्या लक्षात आले आणि ही जाणिव अचंबित करणारी होती.
महाराष्ट्रात आणि संपुर्ण भारतातही विदुषी आणि प्रकांड पांडित्यपण असलेल्या अगदीच मोजक्या, एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या महिला आहेत. क्षणभर ही नावे पटकन आठवतात का पाहा. या मोजक्या विदुषींमध्ये पंडिता रमाबाई हे नाव अग्रस्थानी आहे. इंग्रजी, संस्कृत, कन्नड, मराठी वगैरे भाषांवर प्रभुत्व असलेल्या रमाबाईंनी अनेक पुस्तके इंग्रजीत लिहिली आहेत जी आजही वाचली जातात, संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात.
इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशनात सहभागी होणाऱ्या पहिल्या काही महिलांमध्ये असणाऱ्या भारतातल्या या आद्य महिला ख्रिस्ती मिशनरीचे पहिले आधारभूत चरित्र कुणी लिहिले हे ठाऊक आहे का?
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी !
मात्र या पंडिता रमाबाई यांच्या चरित्रावर किंवा लिखाणावर आधारित एकही धडा माझ्या पाठ्यपुस्तकांत कधीही नव्हता, आता आहे का ? रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून त्यांची खूप परवड आणि उपेक्षा झाली, वैतागून बाईनीं मग पुणे सोडून दूर केडगावात आपले कार्य चालू ठेवले. पंडिता रमाबाईंच्या कार्यांची उपेक्षा आजही चालूच आहे, कारण अर्थातच तेच, जुनेच आहे.
मागे मी एकदा इरावती कर्वे यांच्यावर `अक्षरनामा' मध्ये लेख लिहिला होता. त्यामध्ये मी म्हटले होते कि १९४५ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या इरावतीबाईंच्या `परिपूर्ती' या पुस्तकाच्या कितीतरी आवृत्त्या निघालेल्या आहेत, त्यावरून या पुस्तकाच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकेल.
त्यावर इथेच प्रतिक्रिया सदरात एकाने म्हटले कि पुस्तकांच्या आवृत्या आणि लोकप्रियता याचा असा संबंध लावणे या पुस्तकाच्या बाबतीत तरी लागू होणार नाही याचे कारण म्हणजे हे पुस्तक अनेकदा विद्यापीठांत अभ्यासक्रमाला होते. या कारणाने वेळोवेळी या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत गेल्या !
सत्तरच्या दशकात त्याकाळात मध्यमवयाचें पण त्यांच्या ऐन उमेदीत असलेले सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्यावरचे धडे आमच्या पाठ्यपुस्तकांत होते. सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी सांगितले कि गेली अनेक वर्षे सामाजिक चळवळीत असलेल्या आता नव्वदीत असलेल्या डॉ बाबा आढाव यांच्याविषयी एक धडा उच्च माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमात सद्या आहे. आनंदाची बाब आहे.
प्रकांड पंडित असलेले कॉम्रेड शरद पाटील आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार किंवा त्यांच्याविषयीचे लेख पाठ्यपुस्तकांत असतात का? आता लगेच नव्हे, पण आगामी काळात या लेखांचा तसेच नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा शालेय आणि उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांत अंतर्भाव केला जाऊ शकतो काय?
इतिहासात उपलब्ध माहितीनुसार काही व्यक्तींचीच थोरवी गायली जाते, नव्या संशोधनामुळे अनेक मतांची, पूर्वग्रहांची, पूर्वी थोर मानल्या गेलेल्या व्यक्तींची पडझड होते. पूर्वी नाकारले गेलेल्या, उपेक्षित असलेल्या व्यक्तींची नव्याने थोरवी पटते.
महात्मा जोतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची दुर्लक्षित असलेली समाधी शोधून काढली, महाराजांवर पहिलावहिला पोवाडाही लिहिला. त्यामुळे त्याकाळातल्या इतर लोकनेत्यांचेसुद्धा शिवाजी महाराजांकडे लक्ष गेले आणि मग शिवाजी महाराजांच्या चरित्र आणि कार्यावर नव्याने प्रकाशझोत पडू लागला.
जोतिबा फुले यांनी १८५७च्या बंडाबाबत असाच आगळावेगळा, अपारंपरिक दृष्टिकोन घेतला होता.
इतिहासांत आणि सामाजिक जीवनांत असेच सातत्याने व्हायला हवे.
काही वेळेस हे दुर्लक्ष, ही अपेक्षा अज्ञानातून म्हणजे उपलब्ध माहितीच्या अभावी तर अनेकदा अगदी ठरवून, सहेतुक असते. यापैकी दुसरा प्रकार वाईट आणि अन्यायकारक आहे.
सद्य परिस्थितीत अशा नजरेने डोकावले तर खूप काही पूर्वग्रह आणि खूप काही अवास्तव मतधारणा उघडकीस येतील.
आणि वेळोवेळी असे होणे गरजेचे आहे
शालेय अभ्यासक्रमात १९०५ सालच्या बंगालच्या संदर्भात त्यावेळच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनबाबत अतिशय प्रतिकूल मत बनवण्यात आले होते. कर्झन चार काळ कर्दन काळ मानला जाई. नंतर लक्षात आले भारतात सर्वात उत्तम काम केलेल्या लॉर्ड विल्यम बेंटिंगसारख्या गव्हर्नर जनरल मध्ये लॉर्ड कर्झनचाही समावेश होतो. चार वर्षांपूर्वी `सकाळ टाइम्स' च्या वतीने बातमीदार म्हणून एका `जंकेट असाईनमेंट'वर म्हणजे मौजमजेच्या कामगिरीवर कोलकात्याला गेलो होतो तेव्हा तिथे एका प्रमुख स्मारकात लॉर्ड कर्झनचा पूर्णाकृती पुतळा पाहिला आणि यावर शिक्कामोर्तब झाले.
लॉर्ड कर्झनबरोबरच इतरही काही ब्रिटिश अधिकाऱ्यांचा असाच उल्लेख करता येईल.
कुठल्याही घटनांकडे आणि व्यक्तीकडे नव्या उपलब्ध माहितीनुसार पाहायला हवे, चिकित्सक वृत्ती जोपायला हवी आणि त्यानुसार आपण आणि आपली मते बदलायला हवी. जसजसे नवे लेखक, नवे लिखाण, नवी माहिती समोर येते तसतशी आपले पूर्वग्रह, आवडीनिवडी बाजूला ठेवायला हवेत. संजय मेणसे यांचे ` ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे ’ हे पुस्तक वाचल्यानंतर हे मला विशेषतः जाणवले.
अर्थात हे पुस्तक वाचून पुलंबद्दल माझा आदर तीळभरही कमी झाला नाही. याचे कारण म्हणजे अनेकदा मी स्वतः सुद्धा माझा समोरचा वाचक लक्षात ठेवून तसे आवडणारे किंवा अप्रिय नसणारे लिखाण करत असतो हे मेणसे यांचे पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आले. त्यामुळे यासंदर्भात अगदी याउलट आपल्या स्वतःच्या संस्कृतीबाबत ठाम भूमिका घेणाऱ्या, प्रतिवाद करणाऱ्या औरंगाबादचे शाहू पाटोळे यांचे निश्चितच कौतुक वाटते.
`बहिष्कृत’ आणि `त्रिशंकू’ कादंबऱ्या लिहिणारे अरुण साधू, मालती बेडेकर (विभावरी शिरुरकर), `शाळा’ लिहिणारे मिलिंद बोकील, `बनगरवाडी’ लिहिणारे व्यंकटेश माडगूळकर यांचे साहित्य अब्राह्मणी आहे असे मेणसे यांनी म्हटले आहे. तर `स्वामी’ आणि `श्रीमान योगी’ लिहिणारे रणजित देसाई, अशा ब्राह्मण नसलेल्या लेखकांचीसुद्धा मेणसे यांनी ब्राह्मणी मानसिकतेच्या लेखकांत गणना केली आहे.
इतकेच नव्हे तर लेखक बहुजन आणि नायक बहुजन असलेल्या भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' कादंबरीचा आशय मात्र ब्राह्मणी असे धक्कादायक विधान मेणसे करतात. बहुजन समाजातले असलेल्या इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा आशय पूर्णपणे ब्राह्मणीच असतो हे मेणसे यांचे असेच आणखी एक दुसरे विधान आहे. अशी कितीतरी उदाहरणे या पुस्तकात आहेत.
एखाद्या ऐतिहासिक घटनेबाबत किंवा व्यक्तींबाबत पुर्वग्रह असणे साहजिकच आहे. मात्र बदललेल्या , नव्याने समोर आलेल्या पुराव्यांनुसार हे पूर्वग्रह आणि मते बदलायला हवीत आणि त्यानुसार योग्य ती पावले उचलायला हवीत. कुणाही व्यक्तींवर अगदी ठरवून अडगळीत ठेवले, त्यांच्यावर अन्याय केला आणि काही व्यक्तींना निष्कारण, देव्हाऱ्यात किंवा अल्ट्रारावर ठेवले असे होता कामा नये.
Camil Parkhe, March 29, 2023

Wednesday, April 27, 2022

मनोरमा मेधावींना महत्त्वाचे स्थान आहे.


 एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पंडिता रमाबाईंच्या रूपाने महाराष्ट्रात एक वादळ आले होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक, संस्कृती आणि साहित्य या क्षेत्रात हे वादळ चार दशके घोंघावत राहिले. रमाबाई डोंगरे यांचे कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण असलेले कुटुंब कर्नाटकात स्थायिक झाले होते. आई-वडिलांबरोबर मद्रास इलाख्यात गेल्यानंतर बंगाल आणि ओरिसामार्गे हे वादळ महाराष्ट्रात आले तेव्हा आपल्याबरोबर एक छोटीशी पणतीही घेऊन आले होते.

रमाबाईंनी आपल्या कार्यासाठी पुण्यात स्थायिक होण्याचे ठरविले तेव्हा त्यांच्या लाडक्या कन्येने, मनोरमाने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले होते. आपल्या मायेच्या पंखाखाली या पणतीला घेऊन देशात, परदेशात संचार करताना ही पणती सतत तेवत राहील याची काळजी या वादळाने घेतली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुणे सोडून केडगावात स्थिर झाल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली. त्यानंतर अनाथ महिला, बालविधवा आणि मुलींचे पुनर्वसन, धर्मकार्य आणि बायबलचे मराठीत भाषांतर या कामातच वादळाने आपली सर्व शक्ती पणाला लावली. तोपर्यंत त्यांच्या पंखाखालची पणती मोठी ज्योत बनली होती आणि आपल्या आईच्या बरोबरीने तिने कार्य सुरू केले.
पंडिता रमाबाईंच्या वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे आणि त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यामुळे महाराष्ट्रीय समाजजीवनात वादळे निर्माण झाली, तसे त्यांची कन्या मनोरमा मेधावी यांच्या बाबतीत घडले नाही. मात्र या पणतीला आपल्या व्यक्तिगत जीवनात आणि भावनाविश्वात आपल्या अगदी जन्मापासून विविध वादळांना तोंड द्यावे लागले. सतत घोंघावत राहणाऱ्या वादळाच्या सानिध्यात राहूनही ही पणती तेवत राहिली याचे श्रेय त्या वादळाबरोबरच त्या पणतीच्या चिकाटीला आणि कणखर वृत्तीला द्यावे लागेल. शारीरिक व्याधीमुळे ही पणती नंतर अकाली निमाली तेव्हा पूर्वीप्रमाणेच वादळानेही तिची पाठराखण केली.
परदेशातून भारतात येऊन येथेच स्थायिक होऊन शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या अनेक ख्रिस्ती मिशनरी महिला आहेत. त्यापूर्वी अनेक दशके मराठी समाजात मिशनरी कार्य करणाऱ्या पंडिता रमाबाई, सुंदराबाई पवार, ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या, कीर्तन करणाऱ्या आणि रेव्ह. ना. वा. टिळकांनंतर ‘ख्रिस्तायन’ पूर्ण करणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक या मिशनरी महिलांमध्ये मनोरमा मेधावींना महत्त्वाचे स्थान आहे.
‘भारतातील स्त्रीमुक्तीची पहिली जाहीर उद्गाती असे मृणालिनी जोगळेकर यांनी पंडिता रमाबाईंचे वर्णन केले आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या मोजक्या महिलांपैकी एक, हंटर कमिशनसमोर स्त्रीशिक्षणाची बाजू मांडणारी सामाजिक कार्यकर्ती, बालविधवा आणि अनाथ महिलांसाठी शारदासदन आणि मुक्तिसदन चालविणाऱ्या समाजसुधारक, युरोपात अमेरिकेत व्याख्याने देणाऱ्या विदूषी अशा विविध अंगांनी सर्वांना परिचित असणाऱ्या पंडिता रमाबाई डोंगरे-मेधावी या महिलेच्या आईच्या रूपाची ओळख मनोरमा मेधावींच्या व्यक्तिमत्त्वातून होते.
विविध क्षेत्रात महत्त्वाचे येागदान करणाऱ्या, उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या रमाबाईंचे अल्पसे चरित्रही मनेारमाच्या उल्लेखापासून पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांच्या कन्येचे चरित्र रमाबाईंच्या उल्लेखावाचून अपूर्ण राहते. पंडिता रमाबाईंचे सार्वजनिक आयुष्य मनोरमाच्या जन्मापासून सुरू होते आणि दोघींच्याही आयुष्याची इतिश्रीही काही महिन्यांच्या काळातच होते.
आपले आई-वडील आणि थोरली बहीण यांचा लागेापाठ मृत्यू झाल्यानंतर नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या रमाबाई आपल्या श्रीनिवासशास्त्री या थोरल्या भावाबरोबर मद्रास इलाख्यातून कलकत्त्यात 1878 साली पोहोचल्या. त्यांच्या विद्वतेने आणि संस्कृतवरील प्रभुत्वाने प्रभावित झालेल्या तेथील विद्वानांनी ‘पंडिता’किताब देऊन रमाबाईंचा सत्कार केला. या सत्कारामुळेच महाराष्ट्रात येण्याआधीच रमाबाईंची कीर्ती येथे पसरली होती.
यानंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या त्यांच्या भावाचेही निधन झाले आणि परमुलखात एकाकी पडलेल्या रमाबाईंनी बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली गृहस्थाशी विवाह केला. 16 एप्रिल 1881 रोजी ईस्टर सणाच्या आदल्या दिवशी मनेारमाचा आसामातील सिल्चर येथे जन्म झाला.
बिपीनबाबूंनी आपल्या डायरीत आपल्या कन्येच्या जन्माची नोंद केली. "Saturday, April 16th Easter Eve, child born at 10 minutes to 8 p.m.''
वडिलांच्या डायरीतील ते पान मनोरमाने आयुष्यभर जपून ठेवले. याचे कारण म्हणजे तिच्या जन्मानंतर केवळ नऊ महिन्यांनी बिपीनबाबूंचे निधन झाले. डायरीत तिच्याविषयी नेांद असलेले ते पान तिच्या वडिलांची तिच्यासाठी एकमेव स्मृती हेाती.
पती निधनानंतर दोन महिन्यांनी रमाबाई आपल्या कन्येसह आसाममधून महाराष्ट्रात आल्या. पुण्यात स्थायिक होऊन तेथील सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्या सक्रिय भाग घेऊ लागल्या. त्या काळात पुणे हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले होते.
न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई या दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. आपल्या सामाजिक कार्यानिमित्त पंडिताबाई सोलापूर, अहमदनगर, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात दौरा करत असत. मनोरमा त्या वेळी एक तान्ही मुलगी हेाती. कुटुंबातील वा नातेवाईकांपैकी कुणाही व्यक्तीचा आधार नसताना रमाबाईंनी आपल्या मुलीला सांभाळून आपले सामाजिक कार्य चालू ठेवले हेोते हे विशेष म्हणावे लागेल.
रमाबाई 1883 साली इंग्लंडला गेल्या तेव्हा दोन वर्षे वयाच्या मनेारमाचीही परदेशवारी झाली. ॲना किंवा अन्नपूर्णा तर्खडकर, डॉ. आनंदीबाई जोशी, पंडिता रमाबाई यांचा परदेशवारी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलांमध्ये समावेश होतो. मात्र दोन वर्षे वयाची असताना परदेशगमनाची संधी मिळालेली मनोरमा ही पहिलीच भारतीय कन्या म्हणावी लागेल.
त्याकाळात युरोप- अमेरिकेत जाण्यासाठी जहाज हे एकमेव प्रवासाचे साधन होते. बोटीचा दीर्घकालीन आणि कष्टाचा प्रवास आपल्या तान्ह्या मुलीला झेपेल की नाही याची काळजी तिच्या आईला नक्कीच वाटली असणार. मात्र त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी कुठला होता?
इंग्लंडला मनेारमाला बरोबर घेऊन जाण्याच्या निर्णयाबाबत पंडिता रमाबाईंनी लिहिले आहे, “ मुलीला तिच्या आईने भुईवर ठेवले तर मुंगी चावेल आणि अधांतरी ठेवले तर कावळा नेईल, अशी आशंका करून अगदी नाजूकपणे वाढविले आहे असेही नाही. मुलीचे वय आठ महिन्यांचेही सुरू झाले नाही तोच तिची आई तिला घेऊन ऐन उन्हाळ्यामध्ये हिंदुस्थानच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत प्रवास करून आली आहे. या प्रवासात मुलीच्या प्रकृतीचा बराच परिचय झाला आहे.”
रमाबाईंच्या कणखर स्वभावाचे त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांमध्ये दर्शन घडते. आपल्या लाडक्या मुलीच्या संदर्भात निरनिराळे निर्णय घेतानाही त्यांचा हा स्वभाव दिसून येतो. पंडिता रमाबाईंनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात खूप सोसले होते. त्यामुळे आपल्या मुलीचे हित लक्षात घेऊन प्रसंगी काळजावर दगड ठेवून मनोरमाच्या बाबतीत त्यांनी अनेक निर्णय घेतले होते असे दिसते.
इंग्लंडला पोहोचल्यानंतर तेथील ऑक्सफर्ड जिल्ह्यातील वाँटेज येथे ‘सिस्टर्स ऑफ दी कम्युनिटी ऑफ सेंट मेरी दी व्हर्जिन’ या संस्थेच्या सिस्टरांच्या मठात त्या राहिल्या. त्या मठातील सिस्टर जेराल्डीन यांचे आणि छोट्या मनोरमाचे एक खास नातेसंबंध निर्माण झाले. सिस्टर जेराल्डीनने मनोरमाचा चांगला सांभाळ केला. मनोरमा या सिस्टरला आजी म्हणत असे. मनोरमा भारतात परतल्यानंतरही या आजी-नातीचे संबंध कायम राहिले. जगाच्या दोन टोकांत वास्तव्य करणाऱ्या त्या दोघींनी पत्रव्यवहारामार्फत हे नाते कायम राखले.
पंडिता रमाबाईंनी आपल्या कन्येसह वाँटेज येथेच 29 सप्टें 1883 रोजी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. वाँटेज येथील मठात छोट्या मनोरमाचे तेथील सिस्टरांबरोबर मायेचे नाते निर्माण झाले. रमाबाई मनोरमास लाडाने ‘बॉबी’ म्हणत असत. वाँटेज कॉन्व्हेंटच्या सिस्टर मनोरमाला ‘मनो’ म्हणत असत. मनोरमा हिंदुस्थानची कन्या म्हणून त्या सिस्टर तिला ‘डॉटर ऑफ दी ईस्ट’ किंवा पौर्वात्य कन्या म्हणत असत.
इंग्लंडमध्ये मनोरमा नव्याने निर्माण झालेल्या मायेच्या नात्यात रुळत असतानाच तिच्या आईला इंग्लंड सोडून अमेरिकेला जाण्याचे वेध लागले. अमेरिकेतील फिलाल्डेफिया येथे आनंदीबाई जोशींच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास त्या उपस्थित राहणार होत्या. 1886 च्या फेब्रुवारीत आपल्या कन्येसह पुन्हा एकदा रमाबार्ईंनी अमेरिकेला जाण्यासाठी जहाजाचा प्रवास सुरू केला.
पंडिता रमाबाईंचे अमेरिकेत स्वागत करण्यासाठी आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी दोन दिवस धक्क्यावर वाट पाहात होते. या भेटीविषयी डॉ. आनंदीबाईंनी लिहिले आहे. ‘पंडिता रमाबाई येथे खुशाल पोहोचल्या. वादळ, नद्या व ओढे यामुळे त्यांना येण्यास वेळ लागला. समुद्राच्या धक्क्यावर मी त्यांची दोन दिवस वाट पाहिली. त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर आहे. ती फार गोजिरवाणी आहे. ती सुस्वरूप व उमलणाऱ्या ताज्या गुलाबाच्या कळीप्रमाणे सुकुमार व मनोहर दिसते. ज्या तिच्या आईने आजपर्यंत दु:ख भोगले आहे त्या आईला तिच्यापासून समाधान वाटत असेल.
अमेरिकेत असताना छोटी मनोरमा खूप आजारी पडली तेव्हा नुकत्याच वैद्यकीय पदवी मिळालेल्या डॉ. आनंदीबाईनीं तिच्यावर उपचार केले. भारतात येण्यापूर्वी डॉ. आनंदीबाईंनी एका अडलेल्या बाळंतिणीला सोडविले होते. परदेशात वैद्यकीय पदवी संपादन करण्याचा बहुमान मिळविणाऱ्या डॉ. आनंदीबाईंची इच्छा मात्र दुर्दैवाने पूर्ण झाली नाही. मायदेशी परतल्यानंतर तीनच महिन्यांनंतर म्हणजे 26 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांचे निधन झाले.
अमेरिकेतील रमाबाईचे वास्तव्य लांबले तेव्हा आपल्या मुलीच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून मनोरमाला त्यांनी अमेरिकेतून इंग्लंडला परत जहाजाने पाठवून दिले. अत्यंत कष्टाच्या अशा जहाजाच्या प्रवासात त्यांनी आपल्या मुलीची जबाबदारी जहाजाच्या व्यवस्थापिकेवर सोपवून दिली. त्यांच्या या धाडसाचे आजही कौतुक वाटते. याचे कारण म्हणजे अमेरिकेहून जहाजाने एकट्याने प्रवास करणाऱ्या मनोरमाचे त्यावेळी वय केवळ सहा वर्षांचे होते.
अमेरिकेचा दौरा आटोपून रमाबाई पृथ्वीप्रदक्षिणा करत जपानमार्गे भारतात परतल्या आणि पुन्हा एकदा छोटीशी मनोरमा जहाजामार्गे इंग्लंडहून एकट्याने प्रवास करत भारतात परतली. मुंबईत रमाबाईंनी ‘शारदासदन’ हा बालविधवांसाठी आश्रम सुरू केला. तेव्हा मनोरमा आईबरोबर तिथेच राहू लागली. गोदूबाई या शारदासदनातील पहिल्या बालविधवा. या गोदूबाईचा पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला व आनंदीबाई (बाया) कर्वे म्हणून त्या पुढे ओळखल्या जाऊ लागल्या. शारदासदनात असताना आनंदीबाई मनोरमाला सांभाळण्याचे काम करत असत.
शारदासदनचे पुण्यात स्थलांतर झाले तेव्हा पंचहौद मिशनजवळील एपिफनी शाळेत मनोरमा शिकू लागली. याच काळात ती आपली मातृभाषा मराठी शिकली. त्यानंतर पुन्हा एकदा शिक्षणासाठी मनोरमाचे इंग्लंडला आणि नंतर अमेरिकेत स्थलांतर झाले. तेथे उच्चशिक्षण घेत असताना आईची प्रकृती बिघडली म्हणून मनोरमा 1900 साली भारतात परतली आणि त्यानंतर रमाबाईंच्या कामात ती मदत करू लागली. दरम्यानच्या काळात पंडिताबाईंनी शारदासदन पुण्याहून केडगावात हलविले.
केडगावात स्थायिक झाल्यानंतर रमाबाईंच्या आयुष्याचे एक नवे पर्व सुरू झाले. या पर्वातील त्यांचे कार्य करण्यासाठी आता त्यांना कन्येची साथ लाभली होती. शारदासदनातील मुली पंडिता रमाबाईंना ‘आई’ म्हणत असत. त्यामुळे नुकतीच विशीत पदार्पण केलेल्या मनोरमाने केडगावातील शारदासदन, मुक्तिसदन आणि इतर आश्रमांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली.
मनोरमाचे शिक्षण इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेत झाले. भारतात शिक्षणकार्य करताना येथे मान्य असलेल्या शैक्षणिक पदव्या आपल्याकडे असाव्यात या हेतूने पुण्यातील डेक्कन कॉलेजात त्या शिकू लागल्या. केडगावातून रोज त्या स्वत: मोटार चालवत पुण्यात यायच्या, अशाप्रकारे लांब अंतरावर कार चालवत येणारी मनोरमा पहिली भारतीय महिला असावी, पुढे काही दशकानंतर इरावती कर्वे या पुण्यातल्या पेठेंतून स्कुटर चालवाणाऱ्या पहिल्या महिला होत्या,
कॉलेज संपल्यानंतर घरी येऊन केडगावातील शाळेच्या कामाकडे, दैनंदिन हिशोबाकडे त्या लक्ष घालत असत. 1917 साली त्या बी. ए. झाल्या. याचदरम्यान त्यांची प्रकृती ढासळू लागली.
केडगावात स्थायिक झाल्यानंतर मनोरमाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा केला. या दौऱ्याचे स्वरूप प्रामुख्याने धार्मिक होते असे दिसते. या दौऱ्यात त्यांनी अनेक धार्मिक सभांमध्ये व्याख्याने दिली. त्यावेळी त्यांचे वय केवळ बावीस वर्षांचे होते. ‘म्हणजे ज्या वयात त्यांच्या मातेने कलकत्ता व सारा भारत हलविला त्याच वयात त्यांच्या या आवडत्या लेकीने ऑस्ट्रेलिया आणि सारे पाश्चात्य देश हलविले, असे देवदत्त टिळकांनी मनोरमाबाईंच्या या दौऱ्याबाबत लिहिले आहे.
ऑस्ट्रेलियात असताना मनोरमाबाईंनी आपल्या आईवर एक पुस्तकही लिहिले. पंडिता रमाबाई अमेरिकेत असताना त्यांनी 1887 साली ‘हाय कास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. त्यानंतर चौदा वर्षांचा काळ उलटल्यानंतर त्यांच्या कन्येने स्वतःही परदेशात असताना या पुस्तकाचा 95 पानांचा उत्तरार्ध लिहिला. सामाजिक आणि धार्मिक कार्यात गढून गेलेल्या एका कन्येने आपल्या थोर मिशनरी मातेचे चरित्र आणि कार्य या पुस्तकात लिहिले आहे.
एका कन्येने आपल्या हयात असलेल्या मातेच्या कार्याचे चित्रण करणारे हे पुस्तक अपवादात्मक म्हटले पाहिजे. पंडिता रमाबाई अमेरिकेच्या आपल्या पहिल्या दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याचा कसा विस्तार होत गेला याचे वर्णन या पुस्तकात आहे. आपल्या आईविषयी मनोरमाबाईंना वाटणारा आदर या पुस्तकातून व्यक्त होतो.
केडगावात मनोरमाबाईंनी भारतातील पहिली अंधशाळा सुरू केली. या अंधशाळेच्या कामासाठी मनोरमाकवून त्यांचे अपंगत्व दूर करून त्यांचे पुनर्वसन केले जात असे. मनोरमाबाईंनी परदेशात असताना ब्रेल लिपी शिकून घेतली. या अंधशाळेस ‘बर्थमी सदन’ असे नाव देण्यात आले. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने एका अंधाला दृष्टी प्राप्त करून दिली अशी कथा आहे. बर्थमी सदनातही अंधांना लिहिणे-वाचणे शिकवून त्यांचे अपंगत्व दूर करून त्यांचे पुनर्वसन केले जात असे.
मनोरमाबाईंनी अंधशाळेतील शिक्षकांना ब्रेल लिपीचे धडे दिले, त्या स्वतःही या शाळेत शिकवित असत. या शाळेतील अंध मुलींना आणि महिलांना वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे शिक्षण दिले जाई. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अंधांसाठी शाळा सुरू करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे मनोरमाबाईंचे कार्य निश्चितच महान होते.
अंधशाळेप्रमाणेच मनोरमाबाईंचे स्वतःचे आगळेवेगळे कार्य म्हणजे कर्नाटकातील गुलबर्ग्यात त्यांनी स्थापन केलेली मुलींची शाळा. 1913 मध्ये तत्कालील निजाम राजवटीतील गुलबर्ग्यात शांतिसदन ही शाळा त्यांनी सुरू केली. या दरम्यानच्या काळात पंडिता रमाबाईंनी आपले सर्व लक्ष बायबलच्या मराठी भाषांतरावर केंद्रित केले. त्यामुळे त्यांच्या सर्व संस्थांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मनोरमाबाईंकडे आली होती.
1918 नंतर मनोरमाची प्रकृती अधिकच ढासळू लागली. त्यांना हृदयविकाराचे दुखणे हेोते. केडगावातून त्यांना मिरजेच्या दवाखान्यात हलविण्यात आले. तेथेच 24 जुलै 1921 रोजी त्यांचे निधन झाले. या काळात पंडिता रमाबाईंच्या बायबलच्या भाषांतराचे काम संपत आले होते. प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. भाषांतराचे काम संपेपर्यंत आपल्याला बोलावू नकोस अशी परमेश्वराकडे त्यांची प्रार्थना चालू होती.
आपल्या मुलीच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी त्यांनी भाषांतराचे काम पूर्ण केले. 4 एप्रिल 1922 रोजी भाषांतराचे शेवटचे प्रूफ तपासून त्यांनी आपल्या छापखान्यात पाठविले आणि त्याच रात्री त्यांनीही या जगाचा निरोप घेतला.
ब्रिटिश आमदानीत निराधार महिलांचे पुनर्वसन करणाऱ्या, त्यांना साक्षर करण्याचे कार्य पंडिता रमाबाई आणि मनोरमा मेधावी यांनी केले. त्याकाळात अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या अगदी मोजक्या स्त्रियांमध्ये या दोघी मायलेकीचा समावेश होतो.
पंडिता रमाबाई त्यांच्या विद्वत्तेमुळे, राजकीय क्षेत्रातील सहभागामुळे आणि त्यांच्या आयुष्यातील काही वादग्रस्त घटनांमुळे अनेक वर्षे प्रकाशझोतात राहिल्या. तसे मनोरमाबाईंचे झाले नाही.
परदेशात अनेक वर्षे राहून नंतर केडगावसारख्या खेड्यात त्यांनी समाजकार्य केले. मनोरमाबाईंच्या जीवनातील अनेक प्रसंग काळजाला चटका लावतात. आईच्या मायेच्या आधाराने या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणे त्यांना शक्य झाले. त्यामुळेच पुढे त्या अनाथ बालिकांच्या दुःखाचे ओझे हलके करू शकल्या.
‘रमाबाईंच्या भोवती विहरणाऱ्या ग्रहतारादिकांत मनोरमा चांदणीसारखी शोभायची,’ असे पंडिता रमाबाईंचे एक चरित्रकार देवदत्त नारायण टिळकांनी त्यांचे वर्णन केले आहे. विशेष म्हणजे पंडित रमाबाईंचे पहिले चरित्र लिहिले आहे ते `प्रबोधन'कार केशव सिताराम ठाकरे यांनी.
मनोरमा बिपिन बिहारी मेधावींना अल्पायुष्य लाभले तरी त्यांच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे ब्रिटिश जमान्यातील महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील महिलांमध्ये त्यांना खास स्थान लाभले आहे.
मनोरमाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी ईस्टर होता, यावर्षीही असाच योग आला आहे
भारतातील या एका आद्य महिला समाजसुधारक असलेल्या मात्र तरीही दुर्लक्षित असलेल्या मनोरमा मेधावी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त (एप्रिल १६) खास अभिवादन.

(ख्रिस्ती मिशनरींचे योगदान - लेखक कामिल पारखे या पुस्तकातील एक प्रकरण )

Friday, April 23, 2021

पंडिता रमाबाई

अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या `समाजस्वास्थ'कार रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या चरित्रावरच्या 'ध्यासपर्व' या डाक्युमेंटरीमधील हा अगदी सुरुवातीचा प्रसंग. पांढरीशुभ्र साडी घातलेली आणि केशसंभार पूर्ण धवल असलेली उतारवयाची एक स्त्री केक कापत आहे असा तो सीन आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीे बालविधवा असलेल्या गोदूबाईशी विवाह केला आहे आणि त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा रघुनाथ खिन्न मनाने हे सगळे पाहतो आहे असे हे दृश्य.

यातली केक कापणारी महिला आहे पंडिता रमाबाई, कारण बालविधवा गोदूबाई ही त्यांच्याच अनाथाश्रमातली मुलगी आणि बालविधवेचा हा पहिला पुनर्विवाह ही भारतातली एक सामाजिक क्रांतीच होती. पंडिता रमाबाईंची भूमिका साकारली आहे विजयाबाई मेहता यांनीं.

मात्र गोदूबाईचे किरकोळ प्रकृतीच्या कर्वे यांच्याशी लग्न ठरवताना रमाबाईंनी अट घातली होती, आपल्या या 'जावईबापूं'नी आधी स्वतःचा विमा उतरवून घ्यावा, उगाच गोदू पुन्हा बालविधवा झाल्यास तिचे हाल व्हायला नको ! गंमतीचा भाग म्हणजे महर्षी कर्वे यांनी पुढे आयुष्याची शंभरी पार केली ! लक्ष्मीबाई आणि रेव्ह. नारायण वामन टिळकांचे चिरंजीव देवदत्त टिळक यांनी `पंडिता रमाबाई - महाराष्ट्राची तेजस्विनी' या चरित्रात हा प्रसंग रेखाटला आहे.

एक अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व असलेल्या पंडिता रमाबाई यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन.

मूळच्या कर्नाटकातल्या असलेल्या रमाबाई डोंगरे यांची महाराष्ट्र हीच कर्मभूमी. महाराष्ट्रातील काही अगदी मोजक्या म्हणजे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा काही विदुषींमध्ये मी त्यांचा समावेश करील. महाराष्ट्र ही तशी संशोधक आणि विद्वानांची खाण. `महाराष्ट्र चरित्रकोश : इ. स. १८०० ते इ.स. २०००’ या माझ्या चरित्रकोशात मी अनेक विद्वानांची अल्पचरित्रे दिली आहे, त्यात विदुषी म्हणता येईल अशी फारच कमी व्यक्तिमत्वे मला आढळली.

इरावती कर्वे, दुर्गाबाई देशमुख (सी. डी देशमुख यांच्या पत्नी), दुर्गा भागवत अशा त्या नावे घेण्यासारख्या महाराष्ट्रातील इतर काही विदुषी. यांमध्ये पंडिता रमाबाईंचे फार वरचे स्थान आहे.

पंडिता रमाबाई म्हटले कि ब्राह्मण समाजातून ख्रिस्ती होऊन या धर्माचा प्रचार करणारी महिला असेच चित्र समोर येते. पण पंडिता रमाबाई यांनी याहून खूप काही केले आहे. काँग्रेसच्या १८८०च्या दशकात सुरुवातीच्या अधिवेशनात हजेरी लावणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये त्या होत्या, हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी भारतीय महिलांच्या शिक्षणाच्या गरजेची जोरदार बाजू मांडली. बालविधवा, परित्यक्त्या आणि अनाथ मुलींसाठी त्यांनी किती कार्य केले हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. त्या तरुण वयात विधवा झाल्या, शिवाय त्या ख्रिस्ती मिशनरी, म्हणून पुण्यातील आघाडीच्या दैनिकात त्यांची 'रेव्हरांडा' असा द्विअर्थी शब्द वापरुन म्हणून संभावना, हेटाळणी केली गेली, जसे मिशनरींच्या जवळ गेल्याने महात्मा फुले यांना 'रेव्हरंड फुले' असे म्हणले गेले.

काम करणाऱ्या, घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी नऊवारी साडी ऐवजी सहावारी गोल साडी चांगली, असा प्रचार करणाऱ्या पंडिता रमाबाई. त्यांची मुलगी मनोरमा मेधावी यांनी केडगावात अंधांसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली आणि तिथे ब्रेल लिपी शिकवली. केडगावातून पुण्यात डेक्कन कॉलेजात चारचाकी वाहन चालवत येणारी मनोरमा मेधावी महाराष्ट्रातील किंवा पुण्यातील बहुधा पहिली महिला. नंतरच्या काळात इरावती कर्वे यांनी पुण्यातील पेठेंत स्कुटरवरुन प्रवास करत असाच विक्रम केला होता.

पंडिता रमाबाई यांनी मराठी आणि इंग्रजी भाषांत विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली, बायबलचे मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून भाषांतर करणाऱ्या त्या जगातील पहिला महिला. आजही बायबलचे मराठीत भाषांतर करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. पंडिता रमाबाईंवर आजवर मराठी, इंग्रजी आणि इतर भाषांत जितकी चरित्रे आणि पुस्तके लिहिली गेली आणि आजही लिहिली जाताहेत, तितकी पुस्तके महाराष्ट्रातील कुणाही महिलेवर आतापर्यंत लिहिली गेलेली नाहीत.

ज्योत्स्ना देवधर (पॉप्युलर प्रकाशन १९९०) यांचे `रमाबाई' , सिसिलिया कार्व्हालो यांचे 'महाराष्ट्राचे शिल्पकार: पंडिता रमाबाई' (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (२००७) आणि अनुपमा निरंजन उजगरे यांचे `पंडिता रमाबाई' (साहित्य अकादमी २०११) ही अगदी अलिकडची त्यांची प्रसिद्ध झालेली काही चरित्रे.

पंडिता रमाबाईंनी आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात अनेक वादळांना तोंड दिले. त्यांचे एकूण व्यक्तिमत्व कुणालाही अचंबित करेल असेच आहे. 'ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' (2003 ) या माझ्या पुस्तकाची सुरुवातच या विदुषी आणि समाजसुधारक व्यक्तिमत्वाच्या प्रकरणाने होते.

या थोर व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

Camil Parkhe 23 April 2021

Thursday, May 29, 2014

Why religious conversions? (Marathi)

JmdHw$gm~mhoaMm {¼ñVr g_mO

H$m{_b nmaIo

gwJmdm àH$meZ, nwUo




5) Y_m©§Va H$emgmR>r - ^mH$argmR>r, AmË_gÝ_mZmgmR>r {H$ {dÐmohmgmR>r

npíM_ _hmamï´>mV Ah_XZJa {OëømV, _amR>dmS>çmÀ`m Am¡a§Jm~mX Am{U OmbZm {Oëøm§V Am{U {dX^m©À`m H$mhr {Oëøm§V EH$mo{Ugmì`m eVH$mV _moR>çm à_mUmV gm_wXm{`H$ Y_mªVao Pmbr. Ë`m_mJo Ho$di AmÜ`mpË_H$ àoaUm hmoVr Ago åhUUo YmS>gmMo R>aob. n§{S>Vm a_m~mB©, aoìô. Zmam`U dm_Z {Q>iH$, bú_r~mB© {Q>iH$, aoìh. ZriH§$R>emór Zohoå`m Jmoèho, ~m~m nX_ZOr dJ¡ao gw{e{jV ì`º$s§À`m Y_mªVamV AÜ`mpË_H$ n[adV©Z KS>bo ho {Z:g§e`. Añn¥í` OmVrO_mVtÀ`m gm_wXm{`H$ Y_mªVam~m~V _mÌ Ago åhUVm `oUma Zmhr. Á`m bmoH$m§À`m d¡`{º$H$ dm gm_m{OH$ OrdZmV Xod-Y_©, XoD$i, Y_©J«§W `m g§H$ënZm§Zm H$Yrhr àdoe ZìhVm, Aem g_mOmVyZ dmirV Q>mH$boë`m bmoH$m§Zr {¼ñVr Y_m©Mo AÜ`mË_ AmYr g_OyZ KoD$Z Z§Va hm Y_© ñdrH$mabm Ago åhUUo dmñVì`mg Yê$Z hmoUma Zmhr.
Y_m©§Vao H$m hmoVmV? Amnë`m dmS>d{S>bm§nmgyZ Ambobm Y_© gmoSy>Z Xwgam Y_© H$dQ>miÊ`mMr nmir EImÚm ì`º$sda dm g_mOmda H$m `oVo? ì`º$sJV Y_m©§Va AWm©VM nyU©V: Ë`m ì`º$ser g§~§YrV Agboë`m _mZ{gH$, AmÜ`mpË_H$ Am{U gm_m{OH$ n[apñWVrda Adb§~yZ AgVo. _mÌ Ooìhm EImXm _moR>m g_yh Amnbm Y_© gmoSy>Z Xwgè`m Y_m©V OmVmo, Ë`mdoir `m Y_m©§Vam_mJMr H$maUo g_OyZ KoUo Amdí`H$ R>aVo. .
Y_mªVam_mJMr H$maUo Am{U àoaUm `m§Mo A{dZme S>moig `m§Zr nwT>rb eãXm§V {díbofU Ho$bo Amho :
""Y_mªVa hm Amnë`m XoemVrb EH$ `wJm-`wJmnmgyZ MmbV Ambobm à`moJ Amho. qhXy Y_m©À`m OmMmbm H§$Q>miyZ Amnë`m CÜXmamgmR>r AZoH$m§Zr Y_mªVa Ho$bo Amho. _wpñb_ amOdQ>rV Añn¥í`m§Vrb ~hþg§»` bmoH$m§Zr _wpñb_ Y_© ñdrH$mê$Z g_VoH$S>o Ymd KoVbr. Ë`mMà_mUo {~«{Q>e amOdQ>rV AZoH$m§Zr OmVrì`dñWoZo {Xbobo ZrMnU PwJmê$Z Ë`mVyZ _wº$ hmoÊ`mgmR>r {¼ñVr Y_m©Mm ñdrH$ma Ho$bm Amho. AZoH$ Am{Xdmgr bmoH$m§Zrhr {ejUmgmR>r, AmnwbH$sÀ`m {_iUmè`m dmJUwH$sgmR>r {¼ñVr Y_© ñdrH$mabm Amho. {_eZar bmoH$m§Zr Cno{jV, Jar~ bmoH$m§gmR>r S>m|JaXè`mV emim§Mr ñWmnZm H$ê$Z Ë`m§À`mn`ªV {ejU ZoD$Z EH$ Eo{Vhm{gH$ H$m`© Ho$bo Amho. `m gmè`m§Mm n[aUm_ åhUyZ ^maVmV A{YH$m{YH$ X{bV, Am{Xdmgr _§S>ir {¼ñVr Pmbr AmhoV. '' 1
Xwgè`m EH$m boImV S>moig `m§Zr Ago åhQ>bo Amho: ''doJdoJù`m amOdQ>rVrb Y_m©§VamMm g§X^© ~Xbbm Var Ë`m_mJrb Y_m©§V[aVm§Mr ^mdZm EH$gmaIrM amhV Ambr Amho. Om{Vì`dñWm, Añn¥í`Vm, eyÐ `m OmoI§S>mVyZ _wº$ hmoÊ`mgmR>r bmoH$m§Zr Y_m©§Vao Ho$br. H$Yr Vo _wñbr_ Pmbo, H$Yr Vo {¼íMZ Pmbo. Z§Va S>m° Am§~oS>H$am§À`m ZoV¥ËdmImbr Ë`m§Zr ~m¡ÜX Y_m©Mm ñdrH$ma Ho$bm. g_VoMr {eH$dU d dmJUyH$ OoWo {_iob Ë`m Y_m©bm Amnbogo H$ê$Z `m bmoH$m§Zr àñWm{nV Y_m©{déÜXMm Amnbm {ZfoY Zm|X{dbm Amho.''2
_hmamï´>mVrb dm BVa Hw$R>ë`mhr {R>H$mUr gm_wXm{`H$ {¼ñVr Y_mªVao AÚmpË_H$ n[adV©ZmZo Pmbr Agm Xmdm IwÔ {¼ñVr Y_©Jwê$ qH$dm MM©hr H$aV Zmhr. Ah_XZJa {OëømVrb ào{fVH$m`m©Mm B{Vhmg {b{hUmè`m \$mXa S>m° {¼ñVmo\$a eoiHo$ `m§Mo {díbofU nwT>rbà_mUo Amho: ''H°$Wmo{bH$ lÜXoMm {Za{Zamù`m ^mJmV H$gm àma§^ Pmbm ho nmhUo _moR>o _Zmoa§OH$ Amho. ¹${MV àg§JrM AÜ`mËå`mZo gwê$dmV Pmbobr {XgVo Ago IwÔ n{dÌ ew^g§XoemVhr Amnë`mbm Xwga§ {XgV Zmhr. bmoH$ `oeyÀ`m ^modVr JXu H$ê$ bmJbo. H$maU Ë`mZo AmOmè`m§Zm ~ao Ho$bo, _oboë`m§Zm nwÝhm CR>{dbo, AewÜXm§Zm Ë`mZo ewÜX Ho$bo Am{U ^mH$ar dmT>{dë`m. bmoH$m§Mm O_md Ë`mÀ`mH$S>o Amë`mZ§VaM Ë`mZo Ë`m§Mo bj emídV _wë`m§H$S>o AmoTy>Z KoVbo. ''Vwåhr _mÂ`mda lÕm R>odVm åhUyZ Vwåhr _mÂ`mH$S>o Ambm Ago Zmhr, Va _r Vwåhm§bm ^mH$a {Xbr åhUyZ Vwåhr AmbmV.'' Ë`mZ§VaM _J `oey AÜ`mËå`mH$S>o diyZ 'Zída AÞmgmR>r PQy> ZH$m. Ë`mEodOr {MaH$mbrZ AÞmgmR>r à`ËZ H$am' Ago Ë`m bmoH$m§Zm gm§JVmo.''3 {¼ñVr {_eZatZr gd©àW_ ^wHo$ë`m bmoH$m§Mr ^yH$ ^mJ{dbr, Ë`m§À`m gm_m{OH$ Am{U Am{W©H$ àJVrgmR>r à`ËZ Ho$bo Am{U Z§VaM Vo AÜ`mËå`mH$S>o dimbo. 'AmYr nmoQ>mo~m, _J {dR>mo~m' Aer åhU `m ^mJmV àM{bV Amho. Vr åhU `m {_eZar bmoH$m§Zr Amnë`m ào{fVH$m`m©V àË`jmV CVa{dbr.
`m g§X^m©V Hw$R>oVar dmMbobr EH$ Jmoï> _bm AmR>dVo. EH$ _hmË_m Amnë`m {eî`m§~amo~a {\$aV hmoVm. EH$m JmdmV Amë`mZ§Va Ë`m§Zm EH$ ^wHo$Zo ì`mµHw$i Pmbobm _mUyg {Xgbm. Ë`m _hmËå`mMm {eî` Ë`m _mUgmOdi OmD$Z Ë`mbm AÜ`mËå`m{df`r Mma Jmoï>r gm§Jy bmJbm. _mÌ Ë`m _mUgmH$S>o Ë`m {eî`mH$S>o nmR> {\$a{dbr. {eî` Ë`mZ§Va XwgarH$S>o Jobm. WmoS>çmdoimZo Vmo naVbm Voìhm VmoM _mUyg Amnë`m Jwê$À`m nm`mer ~gyZ AÜ`mËå`mMm g§Xoe EoH$V Amho Ago Ë`mbm {Xgbo. M{H$V hmoD$Z {eî`mZo Amnë`m Jwê$bm `m~m~VrV {dMmabo Voìhm Vmo _hmË_m åhUmbm. "_r Ë`mbm ImÊ`mgmR>r Ho$ir {Xbr. ^wHo$bm Agë`mZo Ë`mMr Ë`mdoiMr VrM JaO hmoVr.''
Y_mªVam_mJMr H$maU_r_m§gm ñnï> H$aVmZm EH$mo{Ugmì`m eVH$mV gm_m{OH AÝ`m`mMo, N>idUwH$sMo ~ir R>aboë`m X{bV g_mOmÀ`m Ñï>rZo {¼ñVr {_eZar XodXyVM R>abo Ago Zm{eH$À`m {\$bmo{_Zm ~mJyb `m§Zr åhQ>bo Amho. Ë`m åhUVmV: '' {_eZatZr Amåhmbm {¼ñVm~amo~a Eo{hH$ gwImMm _mJ© XmI{dbm. XmoZ hOma dfm©nwdu à^y {¼ñVmZo AZoH$ M_ËH$ma Ho$bo, {_eZatZrhr Am_À`mgmR>r AZoH$ M_ËH$ma Ho$bo. Ë`mZr à{VHy$b n[apñWVrV Ho$bobo H$m`© H$moUË`mhr M_ËH$mamnojm µH$_r ZìhVo. à^y {¼ñVmZo bmoH$m§Zm OodU XoD$Z V¥á Ho$bo. Ë`mMà_mUo {_eZatZr AZoH$m§Zm AÞ XoD$Z V¥á Ho$bo. à^y {¼ñVmZo A§Ym§Zm Ñï>r {Xbr,Ë`mMà_mUo {_eZatZr kmZ XoD$Z Amåhmbm ZdÑï>r {Xbr. à^y {¼ñVmZo _wŠ`m§Zm dmMm {Xbr, Ë`mMà_mUo {_eZatZr hOmamo df} dmMm ~§X Agboë`m Amåhmbm dmMm {Xbr. {¼ñVmZo XwIUmBVm§Zm ~ao Ho$bo, VÛV {_eZatZr Am¡fYmonMmam§Zr amo½`m§Zm ~ao Ho$bo. à^y {¼ñVmZo _oboë`m§Zm {Od§V Ho$bo. {_eZatZr _¥Ë`wn§Wmg Q>oH$boë`m§Zm OrdXmZ {Xbo. {_eZatMo ho H$m`© Am_À`mgmR>r EH$mEH$m _moR>çm M_ËH$mamà_mUoM hmoVo. {_eZatZr Amåhmbm µH$m` {Xbo Zmhr? Ë`m§Zr Amåhmbm {dídmg {Xbm, ào_ {Xbo, Y_© {Xbm, ^mH$a {Xbr, AmË_{dídmg {Xbm, ñdm{^_mZ {Xbm, AmË_gÝ_mZ {Xbm Am{U gdm©V _hËdmMo åhUOo C?d{U©`m©À`m Jwbm_{JarVyZ _wº$ H$éZ Am_Mm H$mo§S>bobm ídmg _wº$ Ho$bm.''4
C?d{U©`m§Zr nm`§Xir VwS>dboë`m, amoOMr ^mH$ar {_idÊ`mgmR>r YS>nS>Umè`m Añn¥í` bmoH$m§Zm naXoer {_eZatZr _m`oZo Odi Ho$bo. XwîH$mimÀ`m Am{U XmoZ _hm`wÜXm§À`m H$mimV Am{U BVahr doir AÞnmUr, H$nS>mbÎmm nwadbm. JmdmÀ`m doer~mhoa hmH$bboë`m `m X{bV bmoH$m§À`m Ñï>rZo Va ho {_eZar XodXyVM R>abo. `m {_eZatZr XmIdboë`m XodmMm, Y_m©Mm Am{U J«§WmMm Ë`m§Zr Hw$R>ë`mhr e§H$mHw$e§H$m Z H$mT>Vm ñdrH$ma Ho$bm. AemàH$mao AZoH$ Jmdm§Vrb gd©À`m gd© _hma dm _m§J Hw$Qw>§~o H$mhr dfmªÀ`m H$mimV {¼ñVr Pmbr.
Jmoì`mV Á`m nÜXVrZo Y_m©§Va Pmbo Vgo _hmamï´>mV Pmbo Zmhr Ago AZwn_m COJao `m§Zr åhQ>bo Amho. '' H$moUr ~m{áñ_m Úm åhQ>b§ Va {_eZar Ë`mbm AmVyZ nmaIyZ KoV. Vg§M, ~mhoa H$mhr H$mi§~oa§ Va Zmhr Zm hohr VnmgyZ ~KV. Om{V^oXmÀ`m N>imnm`r Ord _oQ>mHw$Q>rbm Amboë`m VimJmimVë`m§Zm, {_eZatZr XoD$ Ho$boë`m OrdZñVamMm _moh Pmbm. Ë`m_wio gm_y{hH$ Y_mªVa§hr Pmbr.'"5

'H°$Wmo{bH$ {_eZar§H$S>o bmoH$ àW_ dibo Vo Y_© ^mdZm _ZmV R>odyZ Zìho' Ago nwÊ`mVrb g|Q> {dÝg|Q> ñHy$bMo _mOr àmMm`© \$mXa Ho$ZoW {_pñH$Q>m Am{U \$mXa Wm°_g gmido `m§Zrhr 'OogwB©Q> 2005' `m dm{f©H A§H$mV ñnï> åhQ>bo Amho. {_eZatH$S>o diÊ`mMm Ë`m§Mm hoVy nmoQ>mnmÊ`mMm d gm_m{OH$ _mZgÝ_mZ hm hmoVm Ago `m Y_©Jwê§$Zr åhQ>bo Amho. Ah_XZJa {OëømVrb bmoH$m§Mo Eo{hH$ Am{U gm_m{OH$ àíZ hmVmiÊ`mMm {_eZar§Zr à`ËZ Ho$bm. Ah_XZJa hm H$m`_Mm XwîH$mir {Oëhm. Ë`m_wio XwîH$miJ«ñV OZVogmR>r {_P[a`moa, H$m[aVmg, grAmaEg `mgma»`m godm^mdr g§ñWm§À`m _XVrZo {_eZar§Zr {d{har ImoXÊ`mg, n§n Am{U {~`mUo I[aXÊ`mg ñWm{ZH$ bmoH$m§Zm _XV Ho$br. gm_m{OH$ Am{U Ym{_©H$ H$m_m§Mr J„V hmoD$ Z`o, AmÜ`mpË_H$ ~m~r§H$S>o Xwb©j hmoD$ Z`o åhUyZ gm_m{OH$ H$m_m§gmR>r àW_ lram_nya `oWo Am{U Z§Va Ah_XZJa `oWo gmoeb g|Q>aMr ñWmnZm H$aÊ`mV Ambr. bmoH$m§À`m JaOm ^mJdyZ, Ë`m§À`m{df`r AmñWm XmIdyZ O_©Z Am{U EVÔoer` `oeyg§Kr` d«VñWm§Zr `oWrb bmoH$m§Mr lÜXm Omonmgbr. 'àma§^r emiogmR>r EH$hr {dÚmWu {_iV Zgo. nU AmO ZJa {OëømVrb `oeyg§Kr`m§À`m d Y_©àm§{V`m§À`m emimV hOmamo H$mWmo{bH$ d A{¼ñVr {dÚmWu {ejU KoV AmhoV.n{hë`m _hm`wÜXmÀ`m gwédmVrg ZJa {OëømV 10,000 {¼ñVr hmoVo d \$º$ Mma {_eZ ñQ>oeZ hmoVr. AmO drg {_eZ ñQ>oeZ AmhoV d 60,000 {¼ñVr bmoH$m§Mr d A{¼ñVr OZVoMr AmÜ`mpË_H$ d Eo{hH$ JaO ^mJ{dbr OmVo,'' Ago \$mXa {_pñH$Q>m Am{U gmido `m§Zr `m boImV åhQ>bo Amho.6
Y_mªVam_mJMr H$maUo H$mhrhr AgmoV, hr gm_wXm{`H$ {¼ñVr Y_mªVao EH$mo{Ugmì`m eVH$mVrb _hmamï´>mVrb EH$ _moR>r gm_m{OH$ H«$m§Vr hmoVr. àM{bV g_mOì`dñWo{déÔMm Vmo EH$ _moR>m {dÐmoh hmoVm. Ë`mdoiÀ`m AÝ`mæ` pñWVrVyZ gwQ>H$m H$ê$Z KoÊ`mMm Y_m©§Va EH$ _mJ© hmoVm. {deof åhUOo `m X{bVm§Zm _wº$sMm hm _mJ© XmI{dUmam Ë`m§À`m_Ü`o Hw$Urhr _moPog ZìhVm. EH$m JmdmV EH$ Y_mªVa Pmbo Am{U Ë`m Y_m©§VamMo Eo{hH$, gm_m{OH$ Am{U Am{W©H$hr \$m`Xo Ë`mÀ`m ZmVodmB©H$m§Zm, ^mD$~§Xm§Zm bjmV Ambo Am{U Ë`m§Zrhr VmoM _mJ© nËH$abm. EH$mo{Ugmì`m eVH$mÀ`m CÎmamYm©V Am{U {dgmì`m eVH$mÀ`m gwédmVrg gm_wXm{`H$ {¼ñVr Y_mªVamMr hr bmQ> _hmamï´>mV da Z_yX Ho$boë`m {Oëøm§V Mmby am{hbr. IoS>çmnmS>çm§V, AmS>diUmÀ`m N>moQ>çmem dñVtda AqhgoÀ`m _mJm©Zo AJXr g§WnUo Pmboë`m `m H«$m§VrMr Ë`mdoiÀ`m C?d{U©`m§Zr gmYr XIbhr KoVbr Zmhr. `m gm_m{OH$ H«$m§Vr_mJMr ~hþ{d{dY H$maUo, Ë`mMm g_mOmÀ`m BVa KQ>H$m§da Pmbobm n[aUm_ Am{U daÀ`m OmVtÀ`m Aaoamdrg Am{U gd©M joÌm§Vrb _ºo$Xmarg AZoH$ eVH$m§Z§Va n{hë`m§XmM {_imbobo AmìhmZ `mMo g_mOemókm§Zr d BVa g§emoYH$m§Zr AmVmn`ªV {díbofU Ho$bobo Zmhr.
ho Y_mªVa amoIÊ`mgmR>r Ë`m Añn¥í` OmVtZm Ë`m§Zm hdm Vmo AmË_gÝ_mZ Úmdm qH$dm AÝ`mæ` g_mOì`dñWm ~Xbmdr Agohr Ë`mdoiÀ`m g_mOYw[aUm§Zm dmQ>bo Zmhr. Ë`mZ§Va H$mhr dfmªZ§Va `odë`mV 1935 gmbr S>m°. ~m~mgmho~ Am§~oS>H$am§Zr Y_mªVamMr JO©Zm Ho$br Voìhmhr ho gm_wXm{`H$ Y_mªVa amoIÊ`mgmR>r R>mog nmdbo CMbbr Jobr ZmhrM. Y_mªVamÀ`m KmofUoZ§Va AIoarg XmoZ XeH$m§Z§Va ~wÜX Y_m©Mm ñdrH$ma H$ê$Z S>m° Am§~oS>H$am§Zr Am{U Ë`m§À`m AZw`m`m§Zr EH$ A{^Zd gm_m{OH$ pñWË`§Va KS>dyZ AmUbo.

g§X^©:

1) A{dZme S>moig, ''Am§~oS>H$ar Midi: n[adV©ZmMo g§X^©'' , àH$meH$: Cfm dmK, gwJmdm àH$meZ, 861/1, gXm{ed noR>,nwUo - 411 030 (1995) ( nmZ 46)
2) Cnamoº$à_mUo, (nmZ 136)
3) \$mXa S>m°. {¼ñVmo\$a eoiHo$, ' {Zamoß`m' _m{gH$, Am°ŠQ>moda 1977 (nmZ H«$_m§H$ 33)
4) {\$bmo{_Zm ~mJyb, '{_eZ H$m`© 150 df}: gm_m{OH$ {dH$mg', ' X àm°{_g Am°\$ A aoZ~mo- E {Q´>ã`wQ> Am°\$ bìh Qy> Ada {_eZarO X dobpñà¨J Am°\$ hmon \$m°a X â`wMa - Zm{eH$ H°$Wmo{bH$ Y_©àm§VmV {_eZar H$m`m©g 125 df} Pmë`m{Z{_Îm àH$m{eV Ho$bobr ñ_a{UH$m (1878-2003), ( _amR>r {d^mJ, nmZ 23)
5) S>m°. AZwn_m COJao, '_amR>r àmoQ>oñQ>§Q> {¼ñVr g_mO', àH$meH$: J«§Wmbr kmZ`k, Q>monrdmbm boZ, å`w{Z{gnb ñHy$b B_maV, S>m° ^S>H$_H$a _mJ© nmo{bg ñQ>oeZg_moa, J«±Q> amoS>, _w§~B© - 400 007 (2003), (nmZ 22)
6) 'OogwB©Q>g 2005', B`a ~wH$ Am°\$ X gmogm`Q>r Am°\$ {OPg, àH$meH$ : gmogm`Q>r Am°\$ {OPg, ~moJm} Eg, pñn[aVmo 4, 00193 amo_, BQ>br (nmZ 135), Am{U ' {Zamoß`m' _m{gH$, \o$~«wdmar 2005 (nmZ 26)



Monday, May 19, 2014

NUNS HAIL RELEASE OF MOTHER TERESA COIN

NUNS HAIL RELEASE OF MOTHER TERESA COIN
- CAMIL PARKHE
Wednesday, 18 August 2010 - 12:09 PM IST

Nuns belonging to the Missionaries of Charity, a congregation founded by Mother Teresa, have expressed their joy over the government’s decision to release a coin in honour of the Nobel laureate on the occasion of her birth centenary later this month.

The coin would be released by President Pratibha Patil at the launch of year-long birth centenary celebrations in Delhi on August 28. 

The Missionaries of Charity, who have three homes for orphans and destitute in Pune, Chinchwad and Wakad, have planned a number of activities to celebrate their founder’s birth centenary and also on her death anniversary on September 5.

Sr Mary Angelic, superior of the Missionaries of Charity’s home at Tadiwala Road, said that it was indeed a noble gesture to honour the Blessed Mother Teresa of Kolkata.

Sr Angelic said that the design of the coin manufactured by the coins and currency department of the finance ministry has not yet been revealed.

The design of the coin has been approved by Sister Prema, Kolkata-based head of the Missionaries of Charity.

There are over 100 aged destitutes in the congregation’s Pune and Chinchwad convents, while the convent at Wakad has 200 destitutes including mentally challenged girls and 18 HIV-positive orphaned children.

Most of the inmates at the three houses are children and aged persons belonging to various religions and who have been abandoned by their relatives. These people are offered food, shelter and healthcare free-of-cost.

UNIQUE HONOUR
It would be the first time that a coin would be released in the memory of a Christian missionary. In the past, the government has released postal stamps to honour St Francis Xavier, linguist Rev William Carey, Sanskrit scholar Fr Robert De Nobili, and social reformer and Bible translator from Maharashtra, Pandita Ramabai.

 
0
 
0
 

Photo Gallery